(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वसुबारस

    चांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

      November 1, 2021


  • ।। श्री शंख जन्म कथा ।।

    देव्हाऱ्यातील देव अनेक शंख तयांमध्ये एक
    महत्त्व त्याचे जाणोनी ठीक सकलजन हो ।। १।।

    हिंदूची दैवते अनेक रूपे देवांची कित्येक
    इष्ट देवता पूजितो प्रत्येक सर्व देवांमध्ये ।।२।।

    देव्हाऱ्यातील देवांत शंखघंटा असावी त्यांत
    प्रथा पूजेची असण्यात हिंदूच्या ।।३।।

    शंखास पूजेतील मान प्राप्त होई ‘वर’ मिळोन
    कथा त्याची जाणून घ्यावी तुम्ही ।। ४।।

    सांदिपनी ऋषीच्या आश्रम शिष्यगण करिती श्रम
    प्रफुल्लता आनंद नी प्रेम आश्रममध्ये ।। ५।।

    कृष्ण गोपा संगती विद्या अभ्यास घेती
    संदिपनीचे आश्रमी राहती सर्व शिष्य गण ।। ६।।

    ईश्वर होई शिष्य जेथे काय उणे मग तेथे
    सीमा नसे आनंदाते ऋषीच्या आश्रमी ।। ७।।

    निसर्ग नयन मनोहर पुष्पलता यांचे माहेर
    तृप्त होती घेता फलाहार आश्रमवासी ।। ८।।

    श्रीकृष्णाचा सहवास लाभता त्या आश्रमास
    वाव नसे दु:खास त्या वातावरणी ।। ९ ।।

    परि तेथील एक व्यक्ती दु:खी कष्टी होती
    रात्रंदिनी झोप न येती गुरु पत्नीला ।। १० ।।

    सांदिपनी गुरुपत्नी आश्रू होते तिचे नयनी
    स्वपुत्र गमावूनी सागरामध्ये ।। ११।।

    कृष्ण विनविता गुरूसी स्वीकारण्या गुरू दक्षिणेसी
    सोडण्यापूर्वी आश्रमासी ज्ञान संपादूनी ।।१२।।

    शिष्य म्हणूनी राहीला सार्थक दिले जीवनाला
    हेच फळ गुरू दक्षिणेला मिळत असे तूजमुळे ।। १३ ।।

    सांदिपनीचे सारे समाधान कृष्ण जैसा शिष्य गण
    गुरू दक्षिणा मागील कोण प्रभू कडूनी ।। १४ ।।

    गुरूपत्नी संसारिक आंतरमनी इच्छा एक
    गुरू दक्षिणेचा मागती हक्क कृष्णाकडून ।।१५ ।।

    बाळ बुडाला सागरी असह्य माझे जीवन करी
    कशी जगू त्याचे परी बाळाविना ।। १६।।

    असता इच्छाशक्ती घेवूनी यावे बाळाती
    परत द्यावे माझे हाती हीच आसे गुरूदक्षिणा ।।१७ ।।

    गुरूपत्नीस वंदिले कृष्ण सागरतिरी आले
    सागरासी आव्हान केले गुरुपुत्रासासाठी ।। १८।।

    प्रगट झाली सागर देवता कृष्णासी वंदन करिता
    सांगू लागली लीन होता प्रभू समोरी ।। १९।।

    शंखासूर नामे राक्षस सागरतळी करी वास
    सागरी जिवांना देता त्रास राजा बनूनी तयांचा ।। २० ।।

    गुरुपुत्र पडता सागरी शंखासूर गिळंकृत करी
    बाळ तयाचे उदरी जात आसे ।। २१।।

    सागरी राजा शंखासूर असूनी तो आसूर
    भक्ती तयाची हरीवर विष्णूसी पूजित आसे ।। २२।।

    रावणाचे जैसे शिव दैवत तैसा शंखासूर विष्णू भक्त
    भाव प्रभू चरणी अर्पित मनोभावे ।।२३।।

    शंखासूरास दर्शन दिले श्रीकृष्ण प्रकट झाले
    प्रभू आसूनो विनविले शंखासुरासी ।।२४।।

    गुरूबाळ तुझे उदरी तो मजलागी परत करी
    इच्छा केली श्री हरी शंखासूरासी ।। २५ ।।

    झाला शंखासूर धन्य घेवूनी प्रभूचे दर्शन
    आनंदाने भरले मन प्रभूसी बघोनी ।। २६ ।।

    फाडोनीया उदरासी काढावे बाळासी
    विनविले प्रभूसी शंखासूराने ।। २७ ।।

    बघूनी त्याचे आत्मापर्ण बाळ देण्या पोट फाडून
    श्रीकृष्ण होई प्रसन्न त्याचे वरी ।। २८।।

    प्रसन्न होई भक्ती बघोनी आशीर्वाद दिला प्रभूनी
    घ्यावा ‘वर’ मागोनी श्रीकृष्ण बोले ।। २९।।

    पूजेमध्ये मान मिळावा देवामाजी गणला जावा
    सदैव प्रभू सहवास घडावा ही माझी इच्छा ।। ३०।।

    ‘तथास्तू’ म्हटले प्रभूनी त्याच्या भक्तीस बघूनी
    ‘वर’ दिला हरीनी शंखासुरास ।। ३१ ।।

    आत्मार्पण करूनी स्वत:चे उदर फाडूनी
    बाळास परत देवूनी टाकले आसे ।। ३२।।

    बलीदानाचे प्रतीक रूप मिळेल तव शंख
    जल पडता होईल अभिषेक तुझ्या पोटातूनी ।। ३३ ।।

    तुझ्या उदरातून जलधार पडत राहील देवांचे वर
    सार्थक पूजा न होई तोवर तूजविण पूजेमध्ये ।। ३४ ।।

    शंखाविना पूजा निरर्थक पूजेमध्ये असेल तो एक
    मिळण्या पूजेचे सार्थक शंख घंटा आसावी ।। ३५ ।।

    शंखासी धरले हाती प्रभूचा सहवास लाभती
    मोठेपण तयासी मिळती अपूर्व भक्तीमुळे ।।३६।।

    शंखासूराचा शंख बनला देवाऱ्यात मान मिळाला
    सर्व देवामध्ये बसला भक्ती सामर्थ्याने ।।३७।।

    भक्तीचा महीमा थोर अंतरयामी आसावा ईश्वर
    देवत्व येते असूनी असूर कुणालाही ।।३८।।

    कुणीही नसती थोर लहान मिळवावे लागते मोठेपण
    जेव्हां होई प्रभूचरणी लीन देवत्व तयांना येई ।। ३९।।

    जीवनाचे तत्त्वज्ञान थोर बनूनी व्हावे लीन
    सकलजनांचा मिळेल मान हेच माझे सांगणे ।। ४० ।।

    “ शुभं भवतू “

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९- २९१०८३

      January 9, 2018


  • जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

    दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

      August 16, 2014


  • निमित्त

    सोशल मीडियावर रेंगाळत असताना दोन व्हिडीओ पाहण्यात आले . दोन छायाचित्रे पाहण्यात आली . आता यात अतर्क्य काय असं कुणालाही वाटेल . रोज शेकडो व्हिडीओ आणि हजारो छायाचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ असतात . त्यापैकी हे व्हिडीओ , छायाचित्रे असतील असं वाटत असेल तर ते तसं नाही .

      February 12, 2023


  • श्री दत्तबावनी

    मुळ दत्तबावनी गुजराती भाषेत आहे. तिचे हे मराठी भाषांतर….

      October 5, 2022


  • गोडाचा वरचष्मा

    कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं.

      April 21, 2011


  • स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

    स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

    `दादा' म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले. दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय' परिवाराची स्थापना केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.

    श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव आठवले दलितांना भगवद्गीतेचे पाठ सांगायचे. लहानपणी दादा आपल्या आजोबांबरोबर दलित वस्त्यांमधून फिरत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एखाद्या सवर्णाने दलित वस्तीत जाणं, त्यांच्या घरांत बसणं हे फारच धाडसाचं कार्य होतं.

    आजोबांनी दिलेल्या या संस्कारांमुळे दादा प्रत्येक सजीव शक्तीत देव बघायला लागले. दादांनी हिंदू धर्मातील जाचक चातुर्वर्ण्य पद्धतीचा निषेध केला, त्याग केला. दादांचे वडील वैजनाथ हे संस्कृतचे शिक्षक होते. दादांच्या बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या आजोबांनी हेरली होती. पारंपरिक शालेय शिक्षण दादांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्यास असमर्थ असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यांनी दादांसाठी खास शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले. त्यांनी पदार्थ विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि इंग्रजी अशा चार विषयांचे उत्तमोत्तम प्राध्यापक दादांना शिक्षण देण्यासाठी नेमले. हे सर्व शिक्षण दादांना एकटय़ाला समोर बसून शिकवीत असत. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेवर आधारित असा हा आधुनिक प्रयोग होता. या विषयांशिवाय त्यांनी संस्कृत भाषेवर आणि वेद, उपनिषदे, भगवद्गीता, कालिदासाचे काव्य यांच्यावरही प्रभुत्व मिळवले. हा विशेष अभ्यासक्रम नऊ वर्षं चालला. याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दादांवर उत्तम संस्कार झाले. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली. १९५४ मध्ये जापान येथे झालेल्या दुसर्‍या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले. त्यानंतर त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या अनेक संधी आल्या, पण दादांनी त्या नम्रपणे नाकारल्या. वास्तव जीवन आणि भगवद्गीतेची शिकवण यांची सांगड घालण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना दादांच्या मनात आली. तरुणांनी भगवद्गीतेची तत्त्वे वास्तव जीवनात आचरणात आणावीत, म्हणून त्यांनी या विद्यापीठात दोन अभ्यासक्रम सुरू केले. पहिला अभ्यासक्रम `कला विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, इंग्रजी, तर्कशास्त्र, वेद, गीता, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जात. हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. दुसरा अभ्यासक्रम `प्राचीन विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, तर्कशास्त्र आणि वेद यांच्याबरोबरच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही शिकविले जात होते. या विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. आपल्या क्रांतिकारी `स्वाध्याय' चळवळीची सुरुवात त्यांनी १९५८ साली गुजरातमधील सौराष्ट्र विभागात केली. बघताबघता या चळवळीला एका खूप मोठय़ा `परिवारा'चं स्वरूप प्राप्त झालं. लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गांतील तरुण मुले-मुली आणि स्त्री-पुरुष यात सामील झाले. हे सर्व जण जाती-धर्मांच्या भिंती तोडून ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार घडवू लागले. अध्यात्माच्या शक्तीतून आश्चर्यकारकरीत्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडू लागले. मुख्यत: गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे एक लाख गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली. स्वाध्याय परिवारानं सहकारी तत्त्वावर शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली चळवळ चार दशकांत अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान, पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. `रिलिजस इकॉनॉमिस्ट' असा त्यांचा गौरव झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजेस काढली. भगवद्गीतेतील अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची योग्य सांगड त्यांनी घातली. त्यातूनच मच्छीमारांना एक दिवसांचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी वापरण्याचा `मत्स्यगंधा' उपक्रम जवळजवळ वीस वर्षे यशस्वीपणे चालला. `योगेश्वर कृषी'सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत,साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. याग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्वमानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.

    त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली `इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार' १९८८ साली `महात्मा गांधी पुरस्कार', १९९२ साली `लोकमान्य टिळक सन्मान`, १९९६ साली `रेमॉन मॅगसेसे पुरस्कार' आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे `पद्मविभूषण पुरस्कार' अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

    पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २५ ऑक्टोबर २००३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया/ इंटरनेट

      October 19, 2016


  • चाणाक्षपणा

    साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता.

      April 22, 2023


  • सांगावेसे वाटले म्हणून – शोले

    यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.

      November 20, 2024


  • पशुधन घटते; दूध कसे वाढते?

    कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.

      March 27, 2011