(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

    एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.

  • श्रावणमास आणि उपवास

    श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) या मुळेच एका दगडात दोन पक्षी मारावेत तसे आध्यात्म व आरोग्य दोन्ही सांभाळायला उपवासाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.

    या काळात पाचकाग्नी ला विश्रांती ची गरज असते,पण आपण खरंच ती अपेक्षित विश्रांती देतो का? की कामात बदल म्हणजे विश्रांती तसं खाण्यात बदल म्हणजे उपवास असं करतो? त्या दिवशीची खिचडी,साबुदाण्याचे वडे असे पदार्थ आठवले की याचे उत्तर मिळेल. मग अशा पदार्था ऐवजी गरम पाणी, एखादे फळ खाऊन केलेला उपवास निश्चितच लाभदायक.

    दिवसभराच्या उपवासाचं जाऊदे पण उपवास सोडताना तर श्रीखंड, पुरी,जिलेबी सारखे पदार्थ तर आपण घेतोच आणि ते सुद्धा दिवसभराचा उपवास भरून निघेल असं भरपेट. हे म्हणजे 2-3 महिने विश्रांती घेतलेल्या खेळाडूस थेट ऑलिंपिक च्या मैदानावर उतरवल्या सारखे. ज्याप्रमाणे असा खेळाडू मोठे आव्हान पेलू शकत नाही तसाच दिवसभर विश्रांतीने थोडा मंदावलेला अग्नी ही पंच- पक्वान्नानी सजलेला जड आहार पचवू शकत नाही. याबद्दल चुलीचं उदाहरण बघू. चुलीमधे बराचवेळ काही सरपण घातलं नाही तर आग विझते, मग पुन्हा पेटवताना आपण कागदाचे कपटे, काटक्या वगैरे टाकून आग पेटवतो व मग मोठ-मोठी लाकडे टाकली तरी ती सहज स्वाहा होतात. तसचं उपवास सोडतानाही मंदाग्नीचा विचार करून हलके, ताजे जेवण (उदा. गरम भात, तूप, वरण ) असा आहार घेतल्यास आहार पचतो, पाचकाग्नी वाढतो व आपण दुसर्‍या दिवसांपासून जो काही आहार घेऊ तो पचवण्यास सक्षम ही होतो.जर उपवासा मागची ही आयुर्वेदिक अग्नी संकल्पना समजून घेऊन उपवास केला तर आध्यात्म व आरोग्य दोन्ही ही हेतू साध्य होतील व आनंदाने म्हणता येईल

    - "श्रावणमासी हर्ष मानसी,
    हिरवळ दाटे चोहिकडे॥
    क्षणात येई सरसर शिरवे,
    क्षणात फिरूनी उन पडे ॥

    -- वैद्य प्रसाद सणगर,
    कोल्हापूर

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • कॅन्सर न्यूज – कॅन्सर व कॅनबीज् : मराठी-१६०८१३

    बातमी : कॅनबीज् (Cannabies)
    संदर्भ : CNN, USA वरील १२ ऑगस्ट २०१६ ची बातमी.

    • बातमी अशी आहे –
    ‘Canada allows patients to grow own canabies’.
    • तुम्ही स्वत: कॅन्सर पेशंट अथवा केअर-गिव्हर असल्याशिवाय, आणि त्याचबरोबर तुम्हाला Alternate medicine बद्दल कांहीं माहिती असल्याशिवाय, या बातमीचें महत्व ध्यानात येणार नाहीं.
    • ( आणखीही कांहीं व्याधींसाठी कॅनबीज् चा उपयोग होतो. तें आपण पुढे पाहूं ).
    • कॅन्सरसाठी केमोथेरापी, रेसिएशन थेरापी यांचें नांव आपण ऐकलेलें असतें, पण आल्टनेटिव्ह थेरापीज् बद्दल आपल्याला फार माहिती नसते. Allopathy च्या व्यतिरिक्त ज्या ज्या अन्य थेरापीज् आहेत, त्या AlternateTherapies म्हटल्या जातात. या Head खाली बर्‍याच वेगवेगळ्या थेरापीज् येतात.
    • आज आपण allopathy साठी मुख्यत्वें अमेरिकेकडे (USA) पाहतो. पण, दुर्दैवानें अमेरिकेत alterantive therapies ना quakary असें म्हणण्याची पद्धत गेली बरीच दशकें रूढ झालेली आहे. ( त्यापूर्वी तसें नव्हतें). हल्ली हल्ली तिथेंही आतां alternative therapy साठी अधिकृत संस्था निर्माण होऊं लागल्या आहेत. पण, they have a far way to go.
    • अशा बर्‍याच alternative therapies आहेत, पण त्यांचे प्रॅक्टिशनर्स अमेरिकेत hound केले गेले, व त्यांनी मेक्सिको, बहामाज् असा देशांमधे आपली क्लिनिक्स् सुरूं केली.
    • हा विषय फार मोठा आहे. त्याबद्दल नंतर केव्हांतरी.
    • कॅनबीज् चा वापर हा असाच alternate therapy चा प्रकार आहे. cannabies चा संबंध आहे marujuana शी. तें तर एक नारकॉटिक ड्रग आहे. त्यामुळे, कॅनबीज् म्हटलें की लोक घाबरतात. मात्र, कॅनबीज् जर अल्प प्रमाणात, व expertct च्या मार्गदर्शनाप्रमाणें सेवन केल्या, तर त्यांचा कॅनरसाठी उपयोग होऊं शकतो, असें म्हणतात.
    • पार्किन्सन्स साठी सुद्धा कॅनबीज् उपयुक्त आहेत, असें म्हणतात.
    • USA मधील कांहीं स्टेटस् मधें (जसें की, कोलोराडो) कॅनबीज् कांहीं-अल्प प्रमाणात medicinal use साठी मिळतात.
    • अणि, आतां कॅनडानें तर अशा वापरासाठी कॅनबीज् घरीं उगवायची परवानगी दिलेली आहे. Alternative therapy द्वारें असाध्य रोग बरा करण्यात, या सुधारणेचा नक्कीच उपतोग होईल.
    • भारतात, आपण allopathgy व्यतिरिक्त बर्‍याच थेरापी वापरतो, जसें की आयुर्वेद, होमियोपॅथी, यूनानी, तिबेटियन (जें आयुर्वेद व चिनी मेडेसिनचें मिश्रण आहे), नेचरोपॅथी,
    न्यूट्रिशन, सिद्ध-मेडिसिन. योगाचाही उपयोग आपण कांहीं व्याधींच्या निवारणार्थ करतो .
    आतां तर भारतानें ‘आयुष’ मंत्रालय स्थापून या थेरापीज् ना चालना दिलेली आहे.
    • पण, अजूनही, कॅनबीज् सारख्या गोष्टी इथें सहजासहजी मिळत नाहीत.
    • मी माझ्या पत्नीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी कॅनबीज् च्या शोधात होतो. (केमोथेरापी व रेडिएशन थेरापीची उपयुक्तता संपलेली होती, व एका अन्य थेरापीसाठी पेशंटच्या अंगात पुरेसी शक्ती नसल्यानें ती सुरूं करतां आली नाहीं ).
    • बराच शोध घेतल्यावर मी कॅनबीज् च्या सोर्सबद्दल माहिती मिळवूं शकलो. पण, त्यांचा ‘डोस’ सुरूं करण्यापूर्वीच पेशंटचें निधन झाले. मात्र त्यावेळी माझ्या एका फॅमिली-मेंबरची एका तरुण कॅन्सर पेशंटशी भेट झाली, जिला breast-cancer झालेला होया व जी कॅनबीज् चा डोस घेत होती. तिच्या म्हणण्याप्रमानें, तिची तोपर्यंत ६०% improvement झालेली होती.
    • या पार्श्वभूमीवर, कॅनडामधे कां होईना, पण पेशंटला घरीं कॅनबीज् उगवायची परवानगी मिळालेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पुढेमागे भारतातही असा कांहीं, पेशंटस् च्या फायद्याचा कायदा येईल अशी आशा करायला हरकत नाहीं.
    • मात्र, कुणा पेशंटला कॅनबीज् चा वापर करून पहायाचा असल्यास, त्यानें / तिनें ( व / किंवा केअरगिव्हरनें ) स्वत: या विषयाचा अभ्यास करून मगच त्याबद्दल निर्णय घ्याचा, असें माझें सांगणें आहे.
    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

    ---------------------------------------------------------------------------
    Disclaimer
    Regarding Cancer- & Health-related News presented by Subhash S. Naik

    Mr. Subhash S. Naik is not a physician. He has been a caregiver to his wife who was a cancer-patient, and who expired some time ago. Subhash S. Naik is merely collecting News & Information about Cancer-related & other relevant health-related matters from Print sources and /or electronic and / or other sources , and he is presenting it to the reader(s) with a belief that this collected information does not bear anybody’s copyright. In presenting this information, Subhash S. Naik is not expressing any personal opinion towards it. The readers should evaluate all the information themselves, and consult a physician &/ or any other expert as they deem necessary , and at their own responsibility, before putting this information to use.
    -----------------------------------------------------------------------------

  • देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव

    देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे.

    रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे. या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे.

    गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे. रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे.

    आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते.

    येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या.
    गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच; शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला. बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी काही कुटुंबे आहेत.

    यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.

    गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे; *पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते.

    देश- विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले. तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. *गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते. आता मात्र *रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे.

    सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत आठ रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून ११ ते १२ रुपये मिळवून देते. मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते.

    देशी गाईचे वाळलेले शेण रानगोवरी या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते. गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. (हीच पद्धति 'अग्निहोत्रात वापरली जाते).

    या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.

    वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे. ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे.

    गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे (9372208108) यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे.

    वाढती मागणी

    सध्या 'गोधन' या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून ...

    एक लिटर अर्क केलेले गोमूत्र १२५ रुपयांना,
    २०० मिली गोमूत्र ३५ रुपयांना व
    पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून १० मिली गोमूत्र १० रुपयांना विकले जाते.

    पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.

    देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत.

    गाय, दुधाला कमी झाल्यावर, मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

    आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो, काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते.

    देशी गायीच्या गोमुत्राने कैंसर बरा होतो. गाईचा स्पर्श नकोसा वाटतो. ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर व शिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे. शेण रेडिएशन शोषते.

    पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत.

    जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे.

    पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा देशी गाईचे दुध पिउन अतिबुद्धिमान, बलवान, चपळ आणि प्रेमळ व्हावे.

  • सनसेट अपियरन्स

    डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
    एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे त्यामानाने लहान होते. जन्मत: हा दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्यांचे ज्ञान व शोधक बुद्धी त्यांना शांत बसू देईना. त्याकाळी वैद्यकीय शास्त्र फार प्रगत नव्हते. आधुनिक उपकरणे, यंत्रे उपलब्ध नव्हती. विचार आणि तर्क ह्यावर जास्त भरवसा होता. ते त्या बालकावर त्याच्या रोगाची काय कारणे असतील, ह्यावर प्रत्येक अंगाने टिपणी करू लागले. आपला बराचसा वेळ ते त्या बालक व त्याच्या रोगावर केंद्रित करू लागले.

    त्या बालकाच्या मेंदू व मेंदूच्या सभोवताली असलेल्या द्रवाचे ( cerebro spinal fluid ) प्रमाण त्या रोगांत बरेच वाढलेले त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्या द्रवाने मेंदूवर व इतर अवयवावर एक दाब निर्माण केलेला त्यांना कळले. त्यांनी त्या विकाराचे नांव Hydro Cephalus असे ठेवले. अशाच केसेसवर ते लक्ष केंद्रित करू लागले. त्यावरचे आजही मान्यता पावलेले उपचार त्यांनी सुचविले होते.

    ह्याच Hydro -Cephalus विषयांत एक गमतीदार निरीक्षण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्याचे खूप बारकाईने पाहणी केली. जेंव्हा कोणतेही मूल आपले डोळे पूर्ण उघडते, म्हणजे डोळ्याच्या पापण्या उघडलेल्या असतात, डोळ्याचा मध्य काळा भाग, ज्याला Cornia म्हणतात व सभोवताली पांढरा भाग ज्याला Sclera म्हणतात तो दिसतो. काळा भाग गोलाकार असून मध्यभागी असतो व इतर भाग पांढरा असतो. ह्या विकारांत मधला भाग काळा असलेला अर्ध गोलाकार असा दिसतो. ह्याचे कारण मेंदूतील वाढलेल्या द्रवाचा दाब हा डोळ्याच्या बुबुळावर पडून ती पुढे सरकतात. फिरली जातात. आणि ती काळी टिकी Cornia अर्ध गोलाकार बनत तशी दिसू लागते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणाला मावळत्या सूर्याची उपमा दिली. The Cornia and slera around look like Sun -Set Appearance असे त्यांनी त्याचे प्रथम वर्णन नोंदविले.

    तेंव्हा पासूनच अशा विकारामधली डोळ्यामध्ये होणाऱ्या बदलला कायमचे Sun -Set Appearence हेच नांव पडले.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आइसक्रीम खा…पण हे वाचा

    बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत.

    परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

    मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

    त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.

    तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”

    प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.

    त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...”

    आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

    तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”

    “मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

    “डालडा तुपापासून!”

    “काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
    पण काय आहे सर
    “आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

    तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

    पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

    डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

    शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”

    “डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल"

    तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

    ह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ....

    -- व्हॉटसअॅप वरुन

  • पित्ताशयातील खडे

    हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या.
    पित्ताशयात खडे का होतात?
    आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात
    १. कोलेस्टेरोल (Cholesterol)
    २. पिगमेंट pigment (बिलिरुबीनचे घटक)
    ३. मिश्र.
    ७०-८० टक्केरुग्णांमध्ये ते मिश्र असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादुर्भाव होतो.
    हा त्रास कुणाला होऊ शकतो?
    वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.
    हा त्रास कसा ओळखावा?
    सुरुवातीची लक्षणे अॅासिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.
    पित्ताशयातील खडय़ाचे निदान
    सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.
    उपाय
    एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.
    जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.
    टाळण्यासाठी काय करावे?
    १) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
    २) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.
    ३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
    ४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
    ५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.
    खडे विरघळण्यासाठी औषधे ?
    पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.
    त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)
    पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.
    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ - डॉ. अविनाश सुपे

  • श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

    श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंनडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे. ह्या प्रक्रियेत फुफ्फूस, श्वास नलिका, नाक ही अवयवे सतत कार्यारत असतात. ह्या क्रियेची आपणास एका मर्यादेपर्यंतच जाणीव होत असते. तरी ही दैनंदिन क्रिया अजाणता (Involuntary Action) सदैव होत असते. आपले त्या क्रियाकडे केंव्हाच लक्ष नसते. वा तशी गरज देखील भासत नाही. सर्वकांही नैसर्गिक, सहज, व सतत होत राहते. केवळ शरीराची हालचाल कमीजास्त प्रसंगानुरुप होते, तेव्हांच त्या क्रियेची जाणीव होऊ लागते. ज्याला Conscious Breathing अर्थात श्वासोछ्वासाची जाणीव म्हणता येईल.

    श्वास घेणे व सोडणे ही म्हटले तर छोटीशीच क्रिया. परंतु हीला ध्यान धारणेत फार महत्व असते. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रक्रियेमध्ये, मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या जाणीवेवर बाधा येते. विचारावरचे लक्ष सारले जाऊन ते श्वासावर केंद्रित करण्याच्या प्रयत्यांत, भरकटणाऱ्या विचारांवरचे लक्ष त्या क्षणाला तरी टाळता येते. श्वास अर्थात हवा ही नाकाद्वारे कशी आंत जाते, घशातून छातीकडे तीचा मार्ग असतो. तुम्हास त्याच्या मार्गावरच लक्ष केंद्रित करायचे असते. हवा नाकाद्वारे आंत खेचली जाऊन ती पून्हा त्याच वाटेने परत बाहेर टाकली जाते. आंत जाणारी हवा थोडा क्षण क्रिया थांबते. व परत हवा बाहेर पडते. ह्या सर्व क्रिया तूम्हास जाणीव पूर्वक टिपायच्या असतात. हवेचे आंत बाहेर येणे फक्त. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. हे सुद्धा विचारावर लक्ष केंद्रित करण्यासारखेच असते. परंतु ह्यात विचाराबरोबर वाहून जाणे टाळले जाते. पून्हा येणाऱ्या विचारावर लक्ष जाण्यापासून अलिप्त राहता येते. ह्यांत विचारावरचे लक्ष श्वासावरच जात असल्यामुळे लक्षाची जाणीव एक मार्गीच होते. आत घेतला जाणारा व बाहेर काडून टाकलेला श्वास फक्त केंद्रित करणे.

    खरे म्हटलेतर श्वासोछ्वास ही क्रिया Involuntary अर्थात अजाणता होणारी, परंतु तीच आता प्रथम Voluntary जाणती करायची असते. म्हणजे श्वास दिर्घ करुन घेणे व हलके हलके सोडणे हे ह्यात महत्वाचे.

    ज्याप्रमाणे थंड पाण्याचा ग्लास भरुन पाणी पितानांच त्या पाण्याचा थंडपणा व तोंडातून घशातून पूढे जाताना जाणीव होते तशीच जाणीव तुमच्या श्वासाचीपण झाली पाहीजे. हा जाणता श्वासोछ्वास Awareness of breathing हा शक्यतो नेहमीचा भाग असावा. ह्याकडे लक्ष केंद्रित असावे. फक्त ध्यान धारणेच्या वेळीच नसून तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक हलचालीच्या वेळी देखील ही सवय तुमची कार्यकुशलबुद्धी वा लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीला वाढविते.

    मन चंचल असून ते कधीच शांत राहू शकत नाही. हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म ठरलेला असतो. त्यांत केव्हांच बदल करुन त्याला स्थिर अवस्थेत ठेवता येणे शक्य नसते. मात्र त्याच्या सततच्या धावपळीला, उड्डानाला एकाच दिशेने राहण्याचे मार्गदर्शन प्रयत्न करुन करता येते. हे फक्त जाणीवपूर्वक सवयीने साध्य करता येते. श्वासाच्या हलचालीवर लक्ष केंद्रित करणे ह्याने ते साध्य होते. मनाला सुद्धा ' एका वेळी एकच विचार ' ह्या तत्वावर हलचाल करण्याची गरज असते. तो त्याचा स्थायी स्वभाव तेव्हां त्या मनाला उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या मागे धावू देण्यापेक्षा जाणीवपूर्वक श्वासाच्या हलचालीवर केंद्रित करणे शक्य होऊ शकते. ह्यालाच मनाची एकाग्रता साधणे म्हणता येइल.

    ह्याच श्वासांच्या हालचालीवर मनाला केंद्रित करताना शरीरांत कांही क्रिया होऊ लागतात. प्रथम चांगल्या सपाट स्वच्छ आसनावर ताठ पाठीच्या कणाने बसलेल्या शरीराला स्थिर वा अचल केले जाते. व डोळे बंद करुन प्रथम ईश्वरी चिंतन वा नामस्मरण केले जाते. थोड्या वेळाने लक्ष श्वासाकडे केंद्रित केले जाते. ह्या प्रयत्न्यात मन एकाग्र होण्यास सुरवात होते. ह्या सर्व क्रिया जाणीवपूर्वक Voluntary action होत असतात. मात्र तुमच्या उत्स्फूर्त प्रामाणीक, आन्तरीक आणि सत्य प्रयत्नाने ह्याच जाणीवपूर्वक सूरु केलेल्या क्रियेमध्ये, लक्ष श्वासावर केंद्रित होत असताना, तुम्ही हळू हळू स्वतःला विसरु लागतात. अर्थात शरीराला विसरतात. स्वतःकडे आंत असलेल्या एका विशाल पोकळीमध्ये जावू लागतात. हे अजाणता Involuntary होऊ लागते. हीच जाणता व अजाणताची सिमा रेषा असते. कदाचित् विचीत्र अशा वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. Hallucinations प्रमाणे. जाण –अजाण ही सिमा अत्यंत महत्वाची असते. कारण याच पायरीवर तुम्ही कदाचित् बेचैन होतात. भिती वाटते. एका माहीत असलेल्या अस्तीत्वामधून अपरिचीत वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. हीच तुमची सत्व परिक्षेची वेळ असते. कित्त्येकजण जोराचा प्रयत्न करुन त्या सिमारेषेवरुन झटका देत, शरीर मनाला एकदम जागृत करतात. डोळे उघडतात व त्या अजाण अशा वातावरणांत जाण्याचे हमखास टाळतात. तुम्ही ध्यानमार्गाच्या दारापर्यंत पोहंचले असतात, परंतु तुमचे मन कमकुवत बनते. तुम्ही परत सामान्य व दैनंदिन वातावरणांत येतांत. झोपेच्या क्रियेमध्ये असेच असते. प्रथम व्यक्ती विश्रांती घेते. शरीर शिथील बनते. डोळे बंद होतात. हलके हलके देहातील जाणीवधारक क्रिया बंद पडून, सहज तुम्ही झोपेच्या आधीन जातात. जागृत अवस्था व निद्रा ह्याच्या सिमा रेखा निसर्ग अतिशय कौशल्याने पार करुन, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये नेवून सोडतो. ह्याची थोडीदेखील जाणीव आपणास होऊ देत नाही. कारण ही नैसर्गिक क्रिया असते. व जन्मापासून निसर्ग तुम्हाला ह्यात साथ करीत असतो. म्हणून यात सहजता आढळून येते. दोन अवस्थेचे पदार्पण. जागृत आणि निद्रा अथवा निद्रेतून चाळविले जावून जागृत होणे. हे निसर्ग सहज साध्य करतो.

    ध्यान प्रक्रिया प्रथमावस्थेत कृत्रीम असते. खऱ्या अर्थाने ती देखील नैसर्गिकच असते. परंतु तीला प्राप्त करावे लागते. आपल्या इच्छेनुसार ध्यानावस्था निर्माण करावी लागते. गाढ निद्रेचा खरा आनंद लूटण्यासाठी म्हणजे जाणीव होण्यासाठी गाढ निद्रा व जागृतावस्था ह्या दोन भिन्न अवस्थेला एकत्र करण्याची कला साध्य झाली पाहीजे. अत्यंत अवघड ही बाब आहे. ह्यात निद्रेमुळे शरीराला संपूर्ण विश्रांतीचे जे सुख समाधान लाभते ते तर साध्य होतेच. त्याच वेळी गाढ निद्रेमधील शांत नितांत आनंद, संतोष ह्याची जाणीव पण जागृत राहून मिळणे हे अप्रतीमच नव्हे काय ? ध्यानामध्ये हेच साध्य होते. दोन्हीही नैसर्गिक गुणधर्म जागृत अवस्था व निद्रा ह्यांचे सुख.

    परंतु ध्यान धारणा सर्व सामान्यासाठी सहज व नैसर्गिक क्रिया रहात नाही. झोप वा निद्रा सहज दोन्ही अवस्थेमधले रुपांतर साध्य करते. ध्यानावस्था जागृत अवस्थेमधून ध्यान लागणाऱ्या स्थितीत जाताना त्या सिमारेषेवरुन झेप घेऊन जाते. हालके हालके निद्रेप्रमाणे जात नाही. हीच झेप अत्यंत महत्वाची असते. उडणाऱ्या पक्षाने झाडाचा वा डोंगरकड्याचा आधार सोडून आकाशाच्या पोकळीत छलांग मारल्याप्रमाणे. पक्षी एकदम पडेल अथवा उडेल. निसर्ग त्याला तसे ज्ञान व कला देतो. विमानाला मात्र झेप घेवून उड्डान करावे लागते. एका मोठ्या पोकळीत शिरण्यासाठी. निद्रा पक्षाप्रमाणे व ध्यान धारणा विमानाच्या उड्डानाप्रमाणे. इस पार वा उस पार.

    प्राथमिक अवस्थेमधील ध्यान धारक ह्याच ' झेप ' अनुभवातून जातात. दोघाना एका अज्ञात वातावरणात शिरण्याचा एकदम नविन व प्रथम अनुभव घ्यावयाचा असतो. ह्यात शंका, भिती, अनिश्चीतता ह्या भावनाचा वरचश्मा होतो. म्हणून साधक घाबरुन त्याला सामोरे जाण्याचे टाळतो. येथेच कित्येक साघक हतबल होऊन ध्यानात खऱ्या अर्थाने शिरण्यामध्ये अयशस्वी होतात. ते आपले खोलात जाण्याच्या प्रक्रियेला तोडून टाकतात. निराश होतात. सुरवातीच्या श्वासावरचे लक्ष केंद्रित होण्याची क्रिया प्रथम जाणीवपूर्वक असली तरी सवय व प्रयत्नाने ती अजाणीव अर्थात Involuntary Action बनू लागते. ती मग सहज साध्य क्रिया बनते. साधक श्वासावरच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेस थोड्याशा प्रयत्नातच देह मनाची स्थिरता निर्माण करु शकतो.

    साधकाची पुढची पायरी म्हणजे तो ध्यानावस्थेमधल्या जाण-अजाण ह्या स्थरापर्यंत तर आलेल्या असतो. आता मनाचा निगृह, आत्मविश्वास आणि संकल्पाची शक्ती एकवटून ह्या पायऱ्यावरुन तसेच वाहून जावू देणे. ध्यान योगांत वा ध्यान धारणेमध्ये निसर्ग सदा तुमची साथ देत असतो. साथ देण्यास तत्पर असतो. तुम्हास कांही करावयाचे नसते. मनात कसलीही शंका वा भिती न बाळगता होवू घातलेल्या शांततेच्या अवस्थेला एकरुप व्हायचे असते. ह्यात कोणताच प्रयत्न वा हालचाल अपेक्षित नसते. जी स्थीती जी देहमनाची अवस्था निर्माण झालेली असते, त्यात झोकून द्यावे लागते. हा काळ देखील फार अल्प असतो. पण जर तुम्हास ध्यानावस्था प्राप्त झाली झाली तर मिळणारे समाधान, आनंद ह्याचे शब्दांत वर्णन करता येणार नसते. आणि त्या आनंदाची तुलना तर करताच येणार नाही. कारण तो तुमचा एकमेव 'एकमेवाद्वितीयो ' आनंद असेल. ज्याला म्हणतात Ecstasy of Joy अर्थात नितांत आनंद वा परमानंद
    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मानसिक आजार आणि शारीरिक दुष्परिणाम

    शरीराशी संबंधित गोष्ट ही केवळ शरीराशी संबंधित असते असं नसून तीचा मनाशीदेखील संबंध असतो. ताप आला की आपण किती अस्वस्थ आणि चिडचिडे होतो ते आठवा माझा मुद्दा लगेच पटेल!! याच पद्धतीने मानसिक आजारदेखील शारीरिक दुष्परिणाम करत असतात असा या दोघांचा निकटवर्ती संबंध आहे.

  • संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…

    "संयम राखा... भरपूर उपभोगत आनंदी रहा..."

    कोणे ऐके काळी म्हणायचे," स्वताःच ठेवाव झाकुन... दुसऱ्याच पहाव वाकुन...."....

    म्हणजे आजकाल या म्हणीला काही अर्थ उरलाय अस वाटतच नाही.. कारण स्वताः कडे असलेल आपण झाकुन ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांकरीता ऊघडुन स्वताःच नाराज होतोत.....

    म्हणजे एखादी वस्तु आपण नविन आणल्यावर भरपुर आनंदात असतोत... कारण तीच वस्तु ईतरांकडे नाही म्हणुन आनंदीच असतोत..

    पण ज्या वेळेस आपल्या सारखीच किंवा आपल्याहीपेक्षा अद्ययावत वस्तु ईतरांकडे पाहील्यावर हल्ली काही प्रमाणात का होईना मन थोडफार नाराजच होत.

    मग आपण आपणाकडे असलेल्या वस्तुचा पुर्णंपणे ऊपभोगण्याचा आनंद घेण्यापेक्षा आपल्यापेक्षा ही चांगली वस्तु दुसऱ्यांकडे आहे, याचे क्षणीक दुःखात अनेकवेळा अडकुन जातोत.. मग आहे त्या वस्तुचा ऊपभोग ही आपण फार काळ आनंदाने घेऊच शकत नाही... बरोबर ना....?

    मग ती वस्तु मोबाईल, दुचाकी, चारचाकी वा ईतर कोणतीही असो... दैनंदिन वापरातली कोणतीही ....

    का बर होत अस? कधी विचार करुन पाहीलय? याचे कारण नक्कीच तुम्हाला कळेल....

    "सयंम .... " हो सयंमच....

    हल्लीच्या पिढीला सगळच काही लहान वयात, विना श्रम, कमी मोबदल्यात, विन्या अडथळ्याने, अद्ययावत तंत्रज्ञान्याच्या सहाय्याने व सुलभ हफ्ताने ऊपलब्ध होत असल्यामुळे त्यांना दैनंदिन वापरात हवी असलेली साधन सतत अपडेट होत असल्याने नविन पिढी सतत त्या वस्तुवर अमर्यादितपणे अवलंबुन राहत स्वताःवरील मानसिक व शारीरिक नियंत्रण हरवते आहे. याचा नीटपणे व सखोल विचार केल्यास नक्कीच लक्षात येईल..

    हल्ली तर आज घेतलेली वस्तु ऊद्याच जुनी होऊन त्याहीपेक्षा नविन व अद्ययावत वस्तु बाजारपेठेत ऊपलब्ध होतेच. मग घेतलेल्या वस्तुचे मोल व ऊपयोग काय?

    "संयम...."

    हो... मंडळींनौ .... स्वताःच्या मनावर थोडेफार नियंत्रण ठेऊन त्या नविन वस्तुचा अगदी मनापासुन आनंद घ्या. काही काळ जावु द्यात. अद्ययावत वस्तुच्या मोहापासुन दुर ही रहा.

    नक्कीच सुखावताल.....

    म्हणजे मर्यादित किमंतीमध्ये घेतलेल्या वस्तुच्या मोबदल्यात तुम्ही जर "संयम" दाखवलात तर नक्कीच तुम्ही त्यापासुन अमर्यादित आनंद प्राप्त कराल... हे नक्कीच .... बघा प्रयत्न करुन... म्हणुनच

    "संयम राखा.. भरपुर ऊपभोगत आनंदी रहा"

    -- विवेक जोशी