(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • दुःखाची राणी: मीनाकुमारी

    प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते. मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती.

  • मराठीतील कोशवाङ्मय

    मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या.

  • हजार तोंडांचा रावण – मनोगत

    जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे.

  • जातिभेदाला पहिली थप्पड

    जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची.

  • दुसर्‍या महायुद्धातील ‘समज गैरसमज’

    दुसर्‍या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.

  • चाय पे चर्चा – आवळ्याचे तेल – देशी/ विदेशी

    ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

    चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

    नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

    दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.

    थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.

    अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

    आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

    थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.

    हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.

    मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .

  • दुधात साखर !

    ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत.

  • मीठ आणि साखर

    आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं.

  • ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही

    तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे-- मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते.

    विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कठीण प्लेक तयार होण्याचे प्रमाण वाढते. ह्याचा परिणाम म्हणून ह्या व्यक्तींना पुढील आयुष्यात हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका संभवतो. वेळीच ह्या वाढत्या लठ्ठपणाला आळा घातला नाही तर पुढे जाऊन जसा लठ्ठपणा फैलावताना दिसतोय, तद्वतच ह्रदय रोगाचा फैलावताना दिसेल. Atherosclerosis ही हळूहळू वाढीस लागणारी एक प्रोसेस (प्रक्रिया) असून ती अगदी लहानपणातच सुरू होते असे हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काही व्यक्तींमधे ही प्रक्रिया त्यांच्या तिशी मध्येच दिसून येते तर काहींच्या बाबतीत ही प्रक्रिया पन्नाशीत किंवा साठीत दिसून येते.

    अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार जेव्हा तुमचे वजन हेल्दी रेंज मध्ये (निरोगी श्रेणीत) असते तेव्हा
    -- तुमच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले व प्रभावी असते
    -- तुमची फ्लूइड लेव्हल (प्रवाही पातळी) चांगल्या प्रकारे मॅनेज (व्यवस्थापित) होते
    -- टाईप 2 डायबेटिस, ह्रदय रोग, काही प्रकारचे कॅन्सर आणि स्लीप अॅपनीया (झोपेत बिघाड) हया सारख्या रोगांचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.

    Reis आणि त्याचे सहकारी ह्यांनी 3300 व्हाइट आणि अफ्रीकन अमेरिकन प्रौढ व्यक्तिंची अध्ययनासाठी निवड केली आणि त्यांना 25 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. प्रयोगात सहभागी व्यक्तीचे वय 1980 मध्यान्ह मध्ये 18 - 30 वर्षे होते. सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भातील बॉडी मास इंडेक्स (BMI): उंची (सेंटीमीटर)/वजन (किलोग्राम), कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, आहार, शारीरिक हलचाली विषयी माहिती, तसेच कोलेस्टरॉल, ब्लडप्रेशर, टाईप 2 डायबेटिस होण्याची शक्यता ह्या सर्वाची माहिती दोन दशकांपेक्षा जास्त काळापर्यंत गोळा केली. सहभागी व्यक्तीच्या कोरोनरी आर्टरी मध्ये कॅलसिफीकेशन ज्याला सोप्या भाषेत कठीण प्लेक असेही म्हणता येईल ते झाले आहे कि नाही हे बघण्यासाठी 15, 20, आणि 25 वर्षाला ह्या व्यक्तींचा CT (computed tomography) स्कॅन केला. प्लेक चा धोका वाढण्याचे कारणअसते मेटाबॉलिक अ‍ॅक्टिव्ह फॅट जी इनफ्लमेशन वाढवते. हेच वाढलेले इनफ्लमेशन Atherosclerosis होण्यास आणि त्याच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावते. ह्या अध्यापन विषयीचे निष्कर्ष JAMA July 2013 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

    निष्कर्ष :
    -- तरूण प्रौढांमध्ये जे लठ्ठ होते त्यांच्यात कठीण प्लेक तयार होण्याचा धोका 2 ते 4% पर्यंत वाढलेला आढळला आणि हे सहभागी होणार व्यक्तीचे वय, लिंग, रेस, आर्थिक व सामाजिक स्थिती, बी.एम.आय, कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, शारीरिक हालचालीची लेव्हल, आणि दारूचे सेवन ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त लठ्ठपणा स्वतंत्र घटक कारणीभूत ठरताना आढळला आहे.

    -- ज्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा कालावधी जितका जास्त आणि ज्यांचा पोटाचा घेर (abdomial girth) जास्त त्या व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल वाढण्याचा धोका जास्त तसेच त्या व्यक्तीला टाईप 2 डायबेटिस होण्याचे प्रमाण जास्त आणि आशा व्यक्तीला ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी औषधांची गरज भासू शकते.

    दुसर्‍या एका प्रयोगात UK मधील व्यक्तींना 30 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. Masi आणि त्याच्या सहकारी व्यक्तींनी National Survey of Health and Development (NHSD)/1964 birth cohort मधली NHSD अध्ययनातील ज्यांचे 2006 ते 2010 साली 60 ते 64 वर्षे वय असलेल्या 1233 व्यक्तींची निवड केली. सहभागी व्यक्तींच्या बीएमआय, aortic pulses - wave velocity, aortic calcification score and caratoid IMT, ह्या सर्व गोष्टींची माहिती 36, 43, 53, आणि 60-64 वर्षी गोळा केली. सहभागी व्यक्तींना त्यांच्या बीएमआय नुसार वेगवेगळ्या गटात विभागले.

    अध्यापन पूर्ण होईपर्यंत नॉर्मल वजन
    -- 36, 43, 53, किंवा 60-64 ह्या वेळेस सहभागी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली
    -- नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले आणि कमी केलेला बीएमआय नंतर वाढू दिला नाही
    -- नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले पण घटलेला बीएमआय परत वाढला.

    60-64 ह्या वयोगटातील स्थूल किंवा लठ्ठ सहभागी व्यक्तींची तुलना त्यांच्याच वयोगटातील नॉर्मल वजन असलेल्या सहभागी व्यक्तींच्या बरोबर केली असता ह्या लठ्ठ व्यक्तींमधे इतर लठ्ठ व्यक्तींप्रमाणे मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रॉबलेम आढळला ज्यात ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल एच बी एवन सी वाढलेले आढळले. तसेच aortic pulses - wave velocity, aortic calcification score सुद्धा जास्त वाढलेले आढळले. हे अध्यापन European Society of Hypertension 2015 मिटींगमध्ये सादर केले.

    तिशी चाळीशी मध्ये जर आपण चांगल्या सवयी पाळू लागलो तर ह्रदय रोगाचा धोका कमी करू शकतो

    p-18292-heart-2शास्त्रज्ञांना असे आढळले आहे कि तिशी चाळीशी मधील व्यक्ती जेव्हा आपल्या अन-हेल्दी (वाईट) सवयी ज्या ह्रदयाला घातक ठरू शकतील आशा सवयी बदलून चांगल्या सवयींचा अंगीकार करते तेव्हा coronary artery disease चा धोका असल्यास तो आटोक्यात येतो आणि नैसर्गिकरित्या coronary artery disease होण्याचा संभाव्य धोकाही उलटवू शकते. ज्या व्यक्ती त्यांचे जसजसे वय वाढत जाते तसेतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयी आत्मसात करतात त्या व्यक्तींमध्ये त्यांच्या coronary artery वर मोजता न येण्या इतका हानिकारक परिणाम दिसू लागतो असे ही आढळले आहे.

    शास्त्रज्ञांनी 5000 व्यक्तींना Coronary Artery Risk Development in Young Adults (CARDIA) हया अध्ययनात सहभागी केले आणि ह्या व्यक्तींच्या रोजच्या सवयी हेल्दी आहेत कि नाहीत, त्यांच्यात coronary artery calcification झाले आहे कि नाही तसेच त्यांची जाडी ह्या विषयीची माहिती गोळा केली. सहभागी व्यक्ती जेव्हा 18 ते 30 वर्षाचे होते तेव्हा आणि ह्या सर्व गोष्टींचा आढावा परत 20 वर्षांनंतर ही घेतला.

    हेल्दी जीवनशैली ठरवताना: ती व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ नाही, धुम्रपान करत नाही, शारीरिक व्यायाम योग्य प्रमाणात करते, आहार हेल्दी आहे, आणि दारूचे सेवन एकदम कमी करत असेल ह्या सर्व गोष्टींचा विचार केला गेला. अध्यापनाच्या सुरुवातीच्या काळात 10% पेक्षा ही कमी सहभागी व्यक्ती ह्या 5 ही गोष्टींची पूर्तता करत होत्या. अध्यापन पुर्तीच्या काळात म्हणजे 20 वर्षांनंतर 25% सहभागी व्यक्तींनी कमीतकमी एक तरी हेल्दी जीवनशैलीचा अंर्तभाव केला होता तर 40% सहभागी व्यक्तींनी वय वाढत जात होते तसतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयींचा अंतर्भाव केला.

    हेल्दी जीवनशैलीचा अंतर्भाव केलेल्या सहभागी व्यक्तींमध्ये जाडी व coronary artery calcification कमी झालेले आढळले तर वाईट जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींमध्ये मात्र मोठा जाणवण्याची इतपत परिणाम झालेला आढळला. हे अध्यापन जून 2014 Circulation ह्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे.

    ह्या वरून स्पष्ट होते की तुम्ही कोणत्या ही वयात तुमच्या वाईट सवयी बदलायच्या ठरवून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही तुमचा ह्रदय रोगाचा धोका टाळू शकाल.

  • पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

    राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.

    जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह' हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची वेळ' लिहिलेली असते. म्हणजे तुमचे तुम्हीच ठरवा काय खायचे ते!

    परंतु हल्लीहल्लीपर्यंत छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्‍या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे.

    सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र अशा कोटिंग केलेल्या चकचकीत पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात. कारण उन्हात या पत्रावळींवरचा मेणाचा थर वितळायला लागतो आणि तो थेट आपल्या पोटात जातो. थर्माकोलपासून बनवलेल्या पत्रावळींमुळेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

    जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही अगदी आयुर्वेदातही दिलेली दिसते. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना किडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्व असलेल्या या पत्रावळीच भोजनसमारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.

    काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे तर अगदी रोजच्या घरातल्या जेवणातसुद्धा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळींच्या वापरामुळे अनेक फायदे होत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जेवल्यानंतर बायकांनासुध्दा ताट-वाट्या घासण्याचा त्रास कमी होत असे. पूर्वी घरातली पुरुष मंडळी संध्याकाळी घरी येताना येताना शेतावरची भाजी, फुले आणि कधीकधी पत्रावळीसाठी पळसाची पानेही घेउन घरी येत असत. काही घरांमध्ये पत्रावळी लावणे हा एक कार्यक्रम असे.

    पत्रावळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत. पळसाच्या पानाची पत्रावळ तर ऑल टाईम फेव्हरिट असायची पण त्याचबरोबर वडाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्‍या चाफ्याची पाने यांच्याही पत्रावळी बनवल्या जायच्या. मोहाच्या पानांचीही पत्रावळ काही ठिकाणी श्राध्दाला मुद्दाम लावली जात असे. कोकणात अनेक बायका चातुर्मासात आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात.

    प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. थर्माकोल आणि मेणाचा मुलामा दिलेला कागद यांचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ `रेडीमेड'च्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे.

    पळसाची पत्रावळ बनवणे हा एक ग्रामोद्योग होता. या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही आता बुडाली आहे.

    थर्माकोल, प्लास्टिक वगैरेचे विघटन पूर्णपणे होत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील `वापरा आणि फेका' या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. लग्नसमारंबात पाण्यासाठी सर्रासपणे मिनरल वॉटरच्या बॉटल्स किंवा पाऊच वापरले जातात.

    अर्थात आता यावर उपाय कठीणच आहे कारण प्लास्टिक, थर्माकोल वगैरेचा वापर आपल्या एवढा अंगवळणी पडला आहे की ती सवय चटकन मोडणार नाही.