वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
धम्मगिरी, इगतपुरी (महाराष्ट्र) येथे स्थित एक प्रसिध्द विपश्यना केंद्र आहे. हे केंद्र खास विपश्यना ध्यान साधनेसाठी ओळखले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. धम्मगिरीचे संस्थापक श्री सत्यनारायण गोयनका (गोयंका गुरुजी) होते, ज्यांनी विपश्यना साधनेसाठी हे केंद्र उभारले.
या फेसबुक आणि व्हाट्सअपमध्ये पब्लिक फारच गुंतलेय असं तुम्हाला वाटतं ना? मलाही तसंच वाटतं.' नुसतं वाटून काय उपयोग काहीतरी करायला पाहिजे!' असं भाषणात म्हणतात ना ते खरच आहे. मग ठरवलं या सगळ्या दोस्ताना फेसबुक व्हाट्सअप वरून उठवायचं आणि चांगले गेट-टुगेदर करायचं. दोस्तांचा ग्रुप परत जमवायचा. लागलो कामाला. पक्या, दिल्या, उम्या, सूर्या टाकले मेसेज व्हाट्सअप वर एकेकाला. हां!.. व्हाट्सअप वरूनच!.. म्हणलं काट्यानच याच काटा काढायचा. पण कुठलं?.. एकाचाही रिस्पॉन्स नाही. खात्री पटली शिव्या घातल्या शिवाय कोणी हलणार नाही म्हणून, मंग लावले फोन एकेकाला आणि घातल्या धाड धाड फुल्या फुल्याच्या शिव्या. बायको म्हटली ,"अहो, कशाला कटूपणा घेताय?" ...'कटूपणा' म्हणजे 'कटूता'? अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन आणि सिंगापूरचे ली कुआन आपापल्या देशासाठी कटू निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल हेही यातील. देशाची गरज म्हणून त्यांनी त्या त्या काळात तसे निर्णय घेतले.
जे देशात ते समाजात, जे समाजात ते गावात , जे गावात ते गल्लीत आणि गल्लीत ते घरातही लागू होते. आमच्या भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीत घरातले थोरले आप्पा, अण्णा, दादा असे निर्णय घेत असत. हे लोक आतून मृदू असतात आणि कुटुंबाच्या हिताचे निर्णय घेत असतात हे गृहीतक आहे. देशात, समाजात, गावात ,गल्लीत, घरात घडतं ते ग्रुप मध्ये ही घडू शकत.
ग्रुप वरची मरगळ झटकण्यासाठी असं कटू संभाषण आवश्यक होतं. मात्रा बरोबर लागू पडली. एकेकाचा प्रतिसाद यायला लागला. कुणी खाण्याची जबाबदारी घेतली, तर कोणी पिण्याची, तर कोणी चखण्याची. मैफिल जमली. (अशावेळी म्हणण्याचा एक पांचट शेर आहे- 'अकेले ही निकले थे... लोग आते गए कारवा बनता गया!'.. पण याचा उत्तर भागही आहे तो कुणी म्हणत नाही) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळेच 'नाॅस्टेलजियात' गेले. वाटलं कृत्रिम फेसबुकी व्हाट्सएप्पी बोलणे मागे पडून काहीतरी 'गहिरे' ओठावर येईल. त्यातून एखादा अस्सल जिवनानुभव टपकेल. ते मौतिके आपण अलगद झेलू. पुढे मागे कुठे साहित्य 'फार्मात' पेरू. विचार केला 'लगे हातो' दोन-चार नव्या कविता ऐकवाव्यात. पण कसलं? जुने गाणे म्हणण्याची टूम निघाली. कविता बासनातच ठेवाव्या लागल्या. हळूहळू एक एक जण निरोप घेता होऊ लागला. मैफिल निमाली.( आता उत्तर भाग-' लोक जाते गये.. कारवा बिखरता गया!') बासनातल्या कवितेसह मी एकटाच उरलो. सोबतीला रिकामे ग्लासेस, विस्कटलेला चखना, बेसिन मधल्या खरकट्या दिशेस्.( मी यांना शिव्या घातल्या तो राग कवितेवर निघाला बहुतेक.) असू दे, पण मी एकटा कसा म्हणता येईल?.. जळी, स्थळी, काष्टी ,पाषाणी असणारा परमेश्वर होता ना सोबत!.. सापेक्षतावादन तो आहे म्हणून मी आहे ,मी आहे म्हणून तो आहे. असं आमचं अदैत्व साधत.
... म्हणून गाळीव अनुभव असं म्हणालो!..
.... तुमचा काय अनुभव? ..
.... एकटेपणा आणि परमेश्वराबद्दल?
-मनोज महाजन.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक मनोज महाजन ह्यांनी लिहिलेला हा लेख
मानवी स्वभावाचा भाग म्हणुन तुमच्या, आमच्या, सर्वांमध्ये एक सुप्त चतुर रामलिंगम लपलेला असतो का?
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे.
कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना?
अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी – पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. आज आपण असाच आपल्यआजीच्या बटव्यातल पूर्वापार चालत आलेली बाळगुटी का देतात त्यात कोणत्या औषधींचा समावेश असतो त्याचे प्रमाण आणि द्यायची पद्धत ह्याबाबत माहिती मिळवणार आहोत.
मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं.
वाचून बघ किंवा होऊन बघ
मग कळेल, पुस्तकाने उत्तर दिले.
कपाटात रहातो म्हणून कमी समजू नका.
वाचता वाचता झोप आली की
तसेच छातीवर किंवा डोळ्यावर
ठेवून बघा.
अनेकांना मी हवा असतो
वाचकांना वाचण्यासाठी
कपाटांना कधी कधी सजवण्यासाठी
तर काहींना ढापण्यासाठी
पुस्तके ढापणारी मंडळी पण
मजबूत असतात....तरबेज असतात...
कोणी ज्ञानासाठी ढापते
तर कोणी अज्ञान झाकण्यासाठी..
पुस्तकाप्रमाणे मजकूरही ढापला जातो...
अगदी लहान ' C ' त्याचे रक्षण करतो म्हणे.
एक मात्र मानावे लागेल पुस्तक आहे
म्हणून जग ज्ञानी आहे हे नाकारता येणार नाही.
त्या पुस्तकात काय नसते राव...
सर्व काही
लेखकाचे हुंदके,आनंद, अश्रु
आणि हो
डुबवलेले मानधनही..
प्रकाशक, समीक्षक आणि पुस्तक
याचें नाते इतके घट्ट असते की त्याला
उपमा नाही...लेखक पण असतोच
अर्थात लेखकाचे, कवीचे हुंदके समीक्षकांला का समजत नाहीत ?
तरी सर्व काही असून नसून पुस्तके अजिक्य आहेत.
आजच्या इ बुक ने मात्र त्याला धक्का दिला हे निश्चित.
कपाटातून त्याला काढले आणि अँप मध्ये फिट केले.
हजारो पुस्तके, लाखो शब्द खिशात ठेवून वाचक फिरत आहे.
खरे तर पुस्तकाची जागा कपाटातच
खिशात नाही असे आता म्हणता येणार नाही.
माझ्या कपाटातील पुस्तके हातात येतात
टेबलावर अस्ताव्यस्त पडतात तेव्हा
एक वेगळेच अस्तित्व खोलीत, मनात असते...
पण कधीकधी त्या खिशातल्या पुस्तकाचा मोह होतोच होतो..
तरीपण एक मन सांगते पुस्तकेच श्रेष्ठ ?
अर्थात ई बुक देखील ?
काळच श्रेष्ठ असतो...
सतीश चाफेकर
भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे.
आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti