वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या.
November 11, 2015
घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही.
July 21, 2017
महासंकटी सोडिले देव जेणे | प्रतापे बळे आगळा सर्व गूणे |
जयांते स्मरे शैलजा शूलपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||31||
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली | पदी लागता दिव्य होऊनि गेली |
जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||32||
वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा | शशी सूर्य तारांगणे मेघमाळा |
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||33||
उपेक्षा कदा रामरूपी असेना | जिवा मानवा निश्चयो तो वसेना |
शिरी भार वाहेन बोले पुराणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||34||
असे हो जया अंतरी भाव जैसा | वसे हो तया अंतरी देव तैसा |
अनन्यासि रक्षीतसे चापपाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||35||
सदा सर्वदा देव सन्नीध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे |
सुखानंद आनंद कैवल्यदानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||36||
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||37||
मना प्रार्थना तूजला एक आहे | रघूराजअंकीत होऊनि राहे |
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||38||
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | जयाचेनि योगे समाधान बाणे |
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||39||
मना पाविजे सर्वही सूख जेथे | अती आदरे ठेविजे लक्ष तेथे |
विवेके कुडी कल्पना पालटीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||40||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
December 27, 2015
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः ।
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥
आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते.
आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही दृष्टी अमृताने भरलेली आहे.अर्थात ज्याच्यावर हा दृष्टिपात होतो त्याला अमृत प्राप्त होते. अमृत स्वर्गात असते. म्हणजे जणूकाही त्या साधकाला या जगातच स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.
लक्ष्मीस्वयंवरण- आईच्या दृष्टीचे वैभव म्हणजे ती ज्याच्यावर पडते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःच धावत येते. जगात बाकी सगळ्यांना लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मात्र आई जगदंबेच्या कृपा पात्र साधकाला या जगातील सर्व सुखे आपोआप
बसल्याजागी मिळतात. हे आचार्य कथन किती सुंदर आहे?
मंगलदीपिकाभिः- आईची दृष्टी मंगलाची दीपिका आहे. दीप प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करतो. तो नसला तर समोर असलेली गोष्ट ही अंधारात दिसत नाही. तो असला की सर्वत्र लख्ख दिसू लागते. तशी आईची कृपादृष्टी प्राप्त झाली की सर्वत्र मंगलच मंगल दिसू लागते. अमंगलाचा अंधार दूर होतो.
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ- हे आई जगदंबे एकदा तुझा चरणकमलांची सेवा करण्याला सुरुवात केली की मग त्या सेवेने,
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम्- त्या भाग्यवान जणांच्या मनामध्ये असलेले काय होत नाही? अर्थात त्यांच्या मनात जे जे येईल ते पूर्ण सफलच होते.
अशी आईची सेवा करणाऱ्या साधकाला आचार्य भाग्यवंत म्हणत आहेत.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 12, 2020
प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’
महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.
” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |
अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )
प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल.
October 28, 2015
ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.
April 13, 2008
सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते.
सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा. रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते.
दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे .
अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे.
हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते.
ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे.
रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते.
दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.
दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते.
दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे.
रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 2, 2017
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!!
January 7, 2018
आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं
December 23, 2023
श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ ।
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ
मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ - चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ - श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.
श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.
मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,
मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 25, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti