वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.
ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.
ह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.
ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.
साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.
ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.
स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. थकवा दूर झाल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. स्विमिंग करताना आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
राज्यातील इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) या संसर्गजन्य आजाराची शासनाने गंभीर दखल घेतली असून अंमलबजावणी यंत्रणेत सुसूत्रता, समन्वय आणि नियंत्रण ठेवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कोअर ग्रुप’ची स्थापना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगितले.
या तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो.
निसर्गाने मानवाला दिलेली नैसर्गिक संपत्ती ही अनमोलच आहे. त्यात कोकणाचा विचार केला तर कोकणाला लाभलेले हे निसर्गाचे वरदान पर्यटनासोबत आरोग्य संवर्धक देखील आहे. कोकणच्या जंगलात सापडणार्या शेकडो वनौषधी मनुष्याच्या आरोग्याला हितकारक आहेत. त्यांच्या योग्य वापराने आपण निरोगी राहू शकतो.
११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४.
--
पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!
हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?
आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?
आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?
आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे.
'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय'; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
आज रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या आत्यंतिक वापरामुळे, आपल्या खाण्यात येणारी फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविली असतील याची शाश्वती देता येत नाही. जर ती आपल्या परसबागेत पिकवून वापरता आली तर त्या फळाच्या शतप्रतिशत शुद्धतेबाबत आपल्याला विश्वास असतो.
पाश्चात्य उपचारपद्धतीला अवास्तव महत्व दिल्याने भारतीय जीवनशैलीचे विस्मरण होत गेले. आहार विहाराबाबत ऋतुमानानुसार घ्यावयाची काळजी नगण्य वाटायला लागली. सुश्रुत सहिंतेतील सुत्रांप्रमाणे कितीतरी सूत्रे आवळ्याच्या उपयोगाबाबत संस्कृत साहित्यात लिहून ठेवलेले आहेत.
जगात आढळणार्या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल.
व्यक्तीच्या आहारावर त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होईल का नाही हे अवलंबून असते. साहित्य पुनरावलोकनानुसार शाकाहारी भोजन कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात तर जास्त प्रथिने व जास्त फॅटयुक्त आहार ह्या कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच आशा प्रकारचा आहाराचे सेवन तुम्ही किती काळ केले ह्यावर ही कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.
कॅलिफोर्नियातील Loma Linda विद्यापीठात 70,000 लोकांच्या खाण्याच्या सवयीचं विशलेषण केले. ह्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहे का नाही आणि असल्यास तो किती आहे हे तपासण्यासाठी शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींची तुलना मांसाहार घेणार्या व्यक्तीबरोबर केली असता शाकाहारी भोजन घेणार्या व्यक्तींमध्ये 22% कॅन्सरचा धोका कमी झालेला आढळला जेव्हा ह्याच व्यक्तींची तुलना मासे खाणार्या व्हेजिटेरिअन लोकांबरोबर केली असता हा धोका 43%पर्यंत कमी झालेला आढळला. मासे व इतर सीफूड घेणार्या व्हेजिटेरिअन लोकांच्या आहाराला pesco-vegetarian डाएट असे संबोधले जाते. वरील शोधप्रबंधाची माहिती JAMA Internal medicine ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
The Adventist Health Study 2 (AHS_2) हया प्रयोगात 96354 लोकांचा सहभाग होता. ह्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा 7.3 वर्ष केला असता 380 व्यक्तींना Colon cancer व 110 व्यक्तिंना rectal कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आढळला तसेच शाकाहार घेणार्या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमीच आढळला. जेव्हा मांसाहार विरूद्ध Pesco-vegetarian आहाराशी तुलना केली असता Pesco-vegetarian आहार घेणार्या व्यक्तींमध्ये तो धोका कमी झालेला आढळला. हा शोधप्रबंध JAMA Intern.Medicine 2015; 175 (5):767 - 776 ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
शाकाहार कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका का कमी करताना दिसतात?
• Insulin and insulin like growth factor कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात असे निदर्शनास आले आहे आणि शाकाहारी जेवणामुळे ह्या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण येते आणि म्हणूनच वेस्टर्न आहाराच्या तुलनेत शाकाहारी जेवणामुळे हा त्रास कमी होत असेल.
• फोलेट, कॅल्शियम, फायबर ह्या सारखे महत्वपूर्ण अन्नघटक जे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात ते शाकाहारी पदार्थातून मिळतात.
• बर्याचदा ज्या पद्धतीने मटण, रेडमीट शिजवले जाते त्यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे, आणि हेच मटण प्रक्रिया केलेले असेल तर हा धोका दुप्पटीने वाढताना दिसतो.
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो?
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो ह्यावर US - BRITISH ह्यांच्या एकत्रित संशोधनात फक्त 2 आठवड्यातच खाण्या पिण्याच्या सवयी बदलीचा कॅन्सरच्या धोक्यावर परिणाम झालेला आढळला.
Imperial College London आणि The University of Pittsburgh ह्या मधील शास्त्रज्ञांनी 20 अफ्रिकन अमेरिकन आणि 20 ग्रामीण साउथ अफ्रिका भागांतील लोकांची प्रयोगासाठी निवड केली. ह्या दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या प्रयोग शाळेत ठेवले. ह्या दोन्ही गटातील लोकांच्या जेवणात वापरण्यात येणारे जिन्नस व त्याची पदार्थ शिजवण्याची पद्धत वापरून त्यांच्या साठी विशेष जेवणाची निर्मिती केली आणि ते पदार्थ त्यांना खाण्यास दिले. African American लोकांना rural African लोकांचा आहार खाण्यास दिला व rural African लोकांना African American लोकांचा आहार खाण्यास दिला. Rural African लोकांना जेव्हा पाश्चात्य पद्धतीचा आहार दिला गेला तर African American लोकांना जास्त फायबर असलेला ज्यात बीन्स डाळी कडधान्य असलेला आहार खाण्यास दिला.
प्रयोग सुरु होण्याआधी व नंतर colonoscopy, bacterial samples आणि कॅन्सरशी निगडित असलेले बाकीचे इतर महत्वाचे biomarkers ह्यांचा तपास केला. ह्या तपासात सुरवातीला असे दिसले की अर्ध्या अधिक अमेरिकन व्यक्ती मधे पॉलीप्स (polyp) दिसून आले ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावते. परंतु एकाही अफ्रीकन व्यक्ति मध्ये हा धोका आढळला नाही पण ज्यावेळेस जेवणात अदलाबदल केली तेव्हा मात्र अमेरिकन व्यक्ती मधे अंतर्गत सूजेचे पातळी कमी आणि इतर biomarkers मध्ये लक्षणीय रित्या घट झालेली आढळली आणि अफ्रीकन गटात कॅन्सरचा धोका नाट्यमय रित्या वाढलेला आढळला.
ह्या वरून असे स्पष्ट होते की कमी दिवसातच आहारातील बदल कॅन्सरचा धोका वाढवतो आणि म्हणूनच केव्हाही अगदी ह्या क्षणापासूनही बदल केल्यास तुमचा कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि कॅन्सरचा धोका लवकरात लवकर निदर्शनास आल्यास कोलोरेक्टल कॅन्सर बरा होण्यास किंवा टाळण्यास एकदम सोपे आहे आणि त्यासाठीच वेळच्या वेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. Continuous Update Project नुसार खाण्या पिण्याच्या सवयी हेल्दी केल्यास, स्मोकिंग बंद केल्यास, दररोज शारीरिक व्यायाम केल्यास, आणि उंची साठी योग्य वजन राखल्यास लोकांचा कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका साधारणतः 47% पर्यंत कमी होतो.
Copyright © 2025 | Marathisrushti