(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अलर्जी म्हणजे काय?

    अनेक ऍलर्जीकारक घटक, ते वातावरणात समाविष्ट असतात, जसे, फुलांचे परागकण, धूळ, धूर, त्याचप्रमाणे विविध अन्नघटक, धातू, कीटकदंश, निरनिराळ्या प्रकारची औषधे ही त्वचेची तसेच श्वाचसनलिकेची संवेदनशीलता वाढवू शकतात, तेव्हा असे ऍलर्जीन्स किंवा ऍलर्जीक सूक्ष्मकण आपल्या शरीरातील IGE अँटीबॉडीस‘शी संयोग पावतात, तेव्हा हिस्टॅमिन नावाच्या रसायनाचे रक्तातले प्रमाण वाढते आणि त्याचे पर्यवसान निरनिराळ्या ऍलर्जीक त्रासांमध्ये होते. प्रामुख्याने दिसून येणाऱ्या निरनिराळ्या ऍलर्जीस कोणत्या व त्या कशा प्रकारची लक्षणे निर्माण करतात याविषयी आपण थोडी माहिती.
    ऍलर्जीक सर्दी व सायनुसायटीस - ऍलर्जीक विकारांमध्ये सर्वांत जास्त आढळून येणारा हा विकार आहे. सध्याचे वाढते प्रदूषण हेही या विकाराच्या प्रमाणामध्ये भर टाकत आहे. ही ऍलर्जीक सर्दी, हवेतील घटकांमुळे होते. हवेतील धूळ, धूर, परागकण आणि इतर काही सूक्ष्मकण यांच्यामुळे नाकातील पटलाला सूज येते- त्यामुळे नाकातून वारंवार पाणी येणे, साधारणतः 10 ते 20 किंवा कधी कधी जास्तच शिंका येणे, नाक चोंदणे, नाकात व टाळ्याला खाज येणे, डोळ्यालाही खाज येऊन डोळे लाल होणे, नाकातून पाण्याची धार लागणे या प्रकारच्या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. ही लक्षणे विशिष्ट ऋतूत तर काही व्यक्तींमध्ये वर्षभर त्रास देत राहतात. वेळीच या त्रासावर उपाय केले गेले नाहीत, तर या त्रासाचे रूपांतर सायनुसायटीस, नाकातील पॉलिप्स किंवा कानाच्या विकारातही होऊ शकते. या सर्दीला गंभीर व्याधीचे स्वरूप बिलकूल नसूनही सततच्या शिंका, वाहते नाक, डोळ्यांची खाण यामुळे व्यक्तीची कामातली तत्परता, उत्साह खरोखरच कमी होते आणि व्यक्ती संत्रस्त बनते.

    ऍलर्जीक दमा बऱ्याच व्यक्ती, या ऍलर्जी सर्दीने त्रस्तत असतात, त्यांच्यामध्ये ऍलर्जीक दम्याचेही प्रमाण अनेक वेळा दिसून येते. ऍलर्जीक सर्दी आणि ऍलर्जिक दमा ते एकमेकांबरोबरच बऱ्याच वेळा आढळून येतात. थोडासा धूर, धूळ, अत्तरांचे सुगंध, फुलांचे गंध या आणि अशा प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः वासातून संपर्क आला, की छाती जड वाटणे, भरून येणे दम लागणे, श्वाशस घ्यायला त्रास होणे, थोडाफार खोकला येणे अशी लक्षणे दिसायला लागतात आणि ही लक्षणे ठराविक ऋतूत जास्त तीव्र होतात.

    अर्टिकॅरिआ किंवा अंगावर गांधी उठणे (अंगावर पित्त उठणे)
    अनेक प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः खाण्यातून संपर्क आला की अंगावर पुरळ, चट्टे उठणे, मोठ्या गांधी येऊन खाज येणे यालाच वैद्यकीय भाषेत अर्टिकॅरिआ असे म्हटले जाते. अशा प्रकारची त्वचेची तक्रार अंडी, मासे, सागरी खाद्ये, ठराविक भाज्या यांच्या सेवनाशी निगडित असते. कधी कधी काहीच न खाताही पित्त उठू शकते. लक्षणांची सुरवात अंगावर छोटे पूरळ उठण्याने होते. थोड्या वेळाने हे पूरळ मोठे होतात, त्यांचे चट्टे बनतात व खाज येऊ लागते. या चट्ट्यांचे प्रमाण पोटावर, पाठीवर, हातापायांवर मानेवर, कधी कधी चेहऱ्यावरही जास्त असते. त्वचेची ऍलर्जी कशामुळे यावी याला तसा काहीच नियम नाही. कोणाला गवारीच्या भाजीमुळे तर कोणाला कोबीच्या भाजीमुळे पित्त उठते. सालीसकट खाल्ली जाणारी फळेही जंतुनाशक फवारा मारल्यामुळे जर स्वच्छ धुतली गेली नाहीत, तर ऍलर्जीचे चट्टे उठू शकतात.

    ऍलर्जीक इसब (अटोपिक दाह किंवा अटोपिक डरमॅटायरीस) ऍलर्जीमुळे होणारा त्वचेचा दाह यालाच वैद्यकीय भाषेत अटोपिक डरमॅटायरीस (Atopic dermatitis) असे म्हटले जाते. बऱ्याच वेळा ऍलर्जीक सर्दी, ऍलर्जीक दमा आणि त्वचेचा ऍलर्जीक दाह हे एकत्रच दिसतात. यांना "ऍलर्जीचा त्रिकोण‘ असेही म्हणतात. ही तक्रार शक्यहतो लहान वयातच सुरू होते. यामध्ये त्वचा रुक्ष व कोरडी बनते. त्वचेला लाली, सून येऊन खाज येते. व कात्रेही पडतात. लहान मुलांमध्ये अंगावर कोठेही तर जसजसे वय वाढेल तसतसे त्वचेचे हे चट्टे गुडघ्याच्या मागे, कोपरावर येत राहतात. ऍलर्जीचा हा प्रकार अत्यंत चिवट आहे. तो आपली उपस्थिती परत परत दाखवतो- वेळप्रसंगी होमिओपॅथिक औषधांच्या मात्रा बदलून त्याला शह देत राहावे लागते.

    त्वचेचा संपर्कदाह (contact dermatitis) त्वचेचा जो भाग काही प्रकारच्या ऍलर्जीक घटकांच्या संपर्कात येतो, तो लाल होणे, खाज उठणे, पूरळ येणे यालाच वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्टट डरमॅटायरीस म्हणतात, काही साबणे, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, खोटे दागिने यांच्या वापरानंतर अशा प्रकारचा त्वचेचा दाह सामान्यतः दिसून येतो. हाही ऍलर्जीचाच एक प्रकार आहे.

    अशा सर्व ऍलर्जीक व्याधींमध्ये ऍलर्जिन्सचा संपर्क टाळणे हा जरी उपाय असला तरी तो व्यावहारिक खचितच नाही. अशा वेळेला अशा तक्रारींवर ऍटीऍलर्जीक (ऍन्टीहिस्टॅमिनिक्सट- Antihistaminics) औषधे घेऊन ती ऍलर्जी सतत दाबून टाकायचा प्रयत्न करणे याखेरीज यावर उपाय काय असा प्रश्नत पडणे अगदी साहजिकच आहे. या प्रश्नातला होमिओपॅथी अगदी समर्पक उत्तर देऊ शकते. वर नमूद केलेल्या ऍलर्जीक खेरीज ऍलर्जीचे अनेक प्रकार आहेत; परंतु वरील प्रकारच्या ऍलर्जीमध्ये होमिओपॅथी अत्यंत गुणकारी ठरते, असे अनुभवाप्रमाणे दिसून येते. होमिओपॅथीत अतिसंवेदनशील ते वर अनेक परिणामकारक औषधे आहेत जी सर्दी, दमा, त्वचेचा दाह, पित्ताच्या गांधी यासारखी लक्षणे तर कमी करतातच; पण त्वचेची अतिसंवेदनशीलताही मर्यादित करतात. त्यामुळे नेहमी त्रास देणारे वातावरणातले घटक, खाद्यपदार्थ हेसुद्धा तितकेसे त्रासदायक ठरत नाहीत. होमिओपॅथीत ऍलर्जीक दमा, सर्दी यावर ऍलियम सेपा, अर्सिनिक अलव, नक्सयहोमिका ही आणि अशी अनेक गुणकारी औषधे आहेत, तसेच त्वचेच्या दाहावर कोपायव्हा, एपिसमेल, आर्टिकायुरेन्स यासारखे रामबाण उपाय आहेत, जी प्रकृतीसाधर्म्यानुसार, तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य शक्तींमध्ये घेतली तर ऍलर्जीकारक प्रवृत्ती, ऍलर्जीक लक्षणे कमी करतातच याशिवाय प्रतिकारशक्तीही वाढवतात आणि त्या पदार्थाप्रति असणारी अतिसंवेदनशीलताही कमी करतात.

    एकतर लक्षात ठेवले पाहिजे, की ऍलर्जी ही मुळात खोलवर रुजलेली, जुनी प्रवृत्ती आहे. कधी कधी तर ती आनुवंशिकही आहे, त्यामुळे पेशंटने दाखवलेला "पेशन्स‘ डॉक्टृरची आपल्या पेशावरची आणि उपचारपद्धतीवरची निष्ण, होमिओपॅथीक शास्त्राची नवीन युगातही पुरून उरणारी व्यापकता या साऱ्यांचा संगम झाला तर वैद्यकशास्त्रातील अनेक अवघड समस्यांची उत्तरे निश्चि तच उलगडत जातील.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. अपर्णा पित्रे

      October 23, 2016


  • जागर स्त्री आरोग्याचा

    ‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि 'चूल आणि मूल' इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी सईबाईसाहेब अशा कित्येक कर्तृत्ववान स्त्रियांची नावे आपल्या नजरेसमोर आहेत. भारतीय समाज खरंच स्त्रियांबाबत अनुदार दृष्टिकोन ठेऊन वागत असता तर ही नावे खचितच दिसली नसती हे साधेसोपे निरीक्षण आहे. मात्र मेकॉले आणि मॅक्सम्युल्लर आदिंनी पेरलेल्या विषारी बीजांचे आज वृक्ष झालेले असल्यानेच अशा गोष्टी आमच्या माथी मारल्या जातात. अशाच प्रकारचा कांगावा केला जातो तो स्त्रियांच्या आरोग्याबाबतदेखील भारतीय संस्कृती उदासीन आहे म्हणून!! याबाबतची सत्यपरिस्थिती वाचकांसमोर यावी यासाठी हा लेखप्रपंच.

    आयुर्वेद हे प्राचीनतम वैद्यकशास्त्र असून आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वंकष विचार सर्वप्रथम जगासमोर मांडला. कायचिकित्सा आणि कौमारभृत्यतंत्र या शाखांच्या अंतर्गत आयुर्वेदाने स्त्रियांच्या आरोग्याचा विचार मांडला आहे. मासिक पाळी, सगर्भावस्था, प्रसूती झाल्यावर अशा तीन टप्प्यांत हा विचार करता येईल.

    मासिक पाळी:

    मासिक पाळी हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण शारीरिक आणि मानसिक घटनाचक्र आहे. स्त्रीला खऱ्या अर्थाने 'स्त्रीत्व' प्रदान करणारी बाब म्हणजे मासिक पाळी होय. केवळ प्रजननक्षमताच नव्हे तर स्त्रियांचे एकंदरीत आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट. मात्र सध्याच्या काळात सुमारे ८० ते ९० टक्के मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या असल्याचे दिसून येते. आम्हा वैद्यांकडे येणाऱ्या स्त्रीरूग्णांत पीसीओडी सारखे निदान घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढे जाऊन स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे म्हणजेच वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे पीसीओडीसारख्या समस्या आहेत हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदीय उपचारांनी या समस्येत उत्तम लाभ होतो हे सत्य असले तरी त्याचे मूळ कारण हे प्रामुख्याने बदलत्या जीवनशैलीत आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

    झोपण्या-उठण्याचा अनियमित वेळा, सतत बाहेरचे अनारोग्यकर पदार्थ खात राहणे, चॉकलेट्सचा अतिरेक (लहान मुलं खात नसतील इतकी चॉकलेट्स पौगंडावस्थेतील मुली फस्त करतात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.) आणि व्यायामाचा अभाव ही मासिक पाळीच्या समस्या निर्माण करणाऱ्या कारणांपैकी प्रमुख कारणं. ब्राह्ममुहूर्तावर उठणे आणि रात्री उशिरापर्यंत जागून चॅटिंग न करता वेळच्या वेळी झोपणे इथपासून ते प्रकृतीनुसार कोणी कुठला आहार घ्यावा इथपर्यंत आयुर्वेद बारकाईने विचार करतो. पूर्वीच्या काळी मासिक पाळीशी संबंधित समस्या असल्यावर पिंपळ वा वडाला प्रदक्षिणा मारणे हा ‘तोडगा’ सुचवला जाई. यात अन्य काही नसून केवळ शारीरिक व्यायाम अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदात केवळ पीसीओडी सारखीच समस्या नव्हे तर मासिक पाळीशी संबंधित किमान २० समस्यांचा विचार केला असून त्यांना 'योनिव्यापद' असे म्हणतात. आज आयुर्वेदात स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम असून स्वतंत्रपणे कार्यरत असणारे 'आयुर्वेदीय स्त्रीरोगतज्ज्ञ' आहेत हे अनेकदा आपल्याला ठाऊक नसते म्हणून मुद्दाम नमूद करत आहे.

    मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना त्यांची नाजूक स्थिती लक्षात घेता संपूर्ण विश्रांती मिळावी याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. या काळात स्त्रियांनी पचायला हलका आहार घ्यावा, व्यायामादि शारीरिक श्रम करू नयेत याचे सविस्तर वर्णन चरकसंहितेत वाचायला मिळते. आजही तसे करणेच श्रेयस्कर आहे. दुर्दैवाने 'स्त्री-पुरुष समानता' या शीर्षकाखाली काही विचित्र संकल्पना आपल्या मनात रुजवलेल्या असल्याने त्यांचा गैरफायदा घेत काहीजण सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातींत मासिक पाळीच्या काळात गिर्यारोहण वा अन्य खेळ वगैरे आता सहजशक्य आहेत असे चित्र रंगवत असतात. मात्र या दिवसांत केलेल्या अशा दगदगीचे किती गंभीर दुष्परिणाम त्या स्त्रीच्या आरोग्यावर होतात याकडे मात्र आम्ही उत्पादन खपवण्याच्या नादात सोयीस्कर दुर्लक्ष करतो. 'इष्टं धर्मेण योजयेत।' असे शास्त्र सांगते. अर्थात, योग्य गोष्ट समाजात रुजवण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा. स्त्रियांना या काळात आराम मिळावा ही भावना घराघरांत पोहचावी या हेतूनेच त्याला धार्मिक विचारांची जोड दिली गेली. काही काळाने त्याचा विपर्यास झाला हेदेखील मान्य. मात्र तसा विपर्यास होणे ही तत्कालीन समाजाची मर्यादा आहे; शास्त्राची नव्हे. अर्थात हाच एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. त्यामुळे तूर्त आपण पुढील मुद्द्याकडे वळूया.

    सगर्भावस्था:

    सगर्भावस्था म्हणजे बाळंतपण हा स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक आणि सुखदायी असलेला काळ. माता आणि तिच्या गर्भात वाढणारे बालक यांच्या एकंदर आरोग्याचा सर्वांगीण विचार आयुर्वेदाने केलेला आहे. आजकाल बाळंतपण आणि आयुर्वेद हे शब्द एकत्र ऐकले की स्वाभाविकपणे जो शब्द आपल्या मनात येतो तो म्हणजे ‘गर्भसंस्कार’. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आयुर्वेद बाळंतपणातील एकंदर आहार-विहार आणि औषधी यांबद्दल सविस्तर वर्णन करताना गर्भसंस्कार हा शब्द कुठेही वापरत नाही!! आयुर्वेदात वापरलेली संज्ञा आहे ‘सुप्रजाजनन’. मग ‘गर्भसंस्कार’ हा शब्द इतका प्रसिद्ध कसा? ‘मार्केटिंग’ हे त्याचे एकमेव उत्तर आहे! गरोदरपणात काय खावे, टाळावे याचे मार्गदर्शन कोणत्याही पुस्तक, सीडी यांतून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वैद्यांना भेटूनच घ्यावे. आजकाल तर गरोदरपणात करायची आसने फारच फोफावत आहेत. मात्र त्याकरतादेखील तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या बुद्धीने केलेल्या प्रयोगांचे गंभीर परिणाम होतात; आणि काहीही दोष नसताना खापर मात्र आयुर्वेदावर फुटते हे प्रत्यक्ष रुग्णानुभवांवरून नमूद करू इच्छितो.

    आयुर्वेदानुसार ‘चांद्रमास’ गणना धरून २८ दिवसांचा एक महिना याप्रमाणे १० महिन्यांची सगर्भावस्था मानली जाते. (आधुनिक विज्ञानाने मानलेला ९ महिने ९ दिवस हा काळदेखील तितकाच म्हणजे सरासरी २८० दिवसांचा असतो. हा केवळ मोजणीच्या पद्धतीतील फरक आहे.) या प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ कशी होते आणि त्यानुसार मातेने कोणता आहार आणि औषधी घ्यावीत याचे सखोल वर्णन चरक-सुश्रुतादि आयुर्वेदीय ग्रंथांत आलेले आहे. आजही कित्येक माता-भगिनी आधुनिक उपचारांसह बाळंतपणासाठी आयुर्वेदीय वैद्यांचा नियमित सल्ला घेऊन स्वतःचे आणि बालकाचे उत्तम आरोग्य राखून आहेत.

    प्रसुतीपश्चात:

    नवजात अर्भक आणि त्याची माता या दोघांच्याही आरोग्याची काळजी आयुर्वेदाला आहे. आई आणि बाळ या दोघांनाही तेलाने मालिश करणे, मातेला दुध-तूपयुक्त उत्तम आहार देऊन तिच्या शरीराची या काळात झालेली झीज भरून काढणे याबाबत आयुर्वेद आग्रही आहे. बालकासाठी त्याच्या आईचे दुध हा सर्वोत्तम आहार आहे हे जगाला सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने. केवळ इतकेच नव्हे तर स्तन्यपान (स्तनपान नव्हे!) करवण्याची योग्य पद्धत, अंगावरील दूध जास्त/ कमी करण्यासाठीचे उपचार आणि मातेच्या दुधातील दोष व त्यांवर करण्याचे उपचार अशा प्रकारे अद्यापि आधुनिक वैद्यकानेही विचारात न घेतलेले पैलू आयुर्वेदात सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहेत. आयुर्वेदानुसार केवळ आहार म्हणून स्तन्यपान देण्याची सीमारेषा ही सहा महिने आहे. आज आपण पाश्चात्य संशोधने आणि काही खिसेभरू एनजीओ यांच्या नादी लागून २-३ वर्षे वयापर्यंत बालकांना स्तन्यपान देण्याची भलामण करत आहोत. मात्र तसे करणे मातेच्या आरोग्यास घातक आहे याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. इतक्या उशिरापर्यंत स्तन्यपान करवल्यावर मुले ते सोडण्यास तयार न होणे, मातेच्या हाडांची झीज, केस गळती, कंबरदुखी यांसारख्या समस्या आ वासून उभ्या राहतात. आम्हाला जणू या साऱ्याची जाणीवच नाही. दुसरीकडे मात्र बाळाला तेल लावू नका, बाळगुटी देऊ नका असे ‘अशास्त्रीय’ सल्ले देण्यात याच लोकांची चढाओढ लागल्याचे दुर्दैवी दृष्य पाहायला मिळते आहे. अर्थात; सत्य परेशान हो सकता है; पराजित नहीं| या न्यायाने लवकरच आयुर्वेदाचा शाश्वत उपदेश सर्वप्रथम पाश्चात्य देशांतील लोक पाळू लागतील; त्यानंतर कदाचित आपल्याकडच्या लोकांना नेहमीप्रमाणेच जाग येईल!!
    बाळंतपणानंतर योग्य काळानंतरही कित्येक स्त्रियांना शरीरसंबंध पूर्ववत् ठेवण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. यावरही आयुर्वेद आणि कामशास्त्र यांच्या समन्वयातून उत्तम उपचार करता येतात हा प्रत्यक्ष चिकित्सानुभव आहे.

    एकंदरीत विचार करता; आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याने आपल्या संस्कृतीने स्त्रियांबद्दल कोणताही संकुचित दृष्टीकोन न ठेवता उलट त्यांच्या आरोग्याबद्दल अतिशय काळजीपूर्वक विचार केला आहे हे स्पष्ट होते. आचार्य चरक तर म्हणतात; जगात उत्तम असे जे जे काही आहे ते सर्व स्त्रिच्याच ठायी आहे. नवरात्रीसारखा उत्सव म्हणजे या स्त्रीत्वाचा मूर्तिमंत सन्मान आहे. मात्र ‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता’ असे म्हणत गौरव करण्याची प्रथा ज्या देशात आहे; त्याच देशात ‘बेटी बचाव देश बचाव’ सारखे अभियान हातात घ्यावे लागणे हे निश्चितच सुखावह नाही. ही स्थिती बदलायची असल्यास केवळ सण साजरा करून भागणार नाही. चला तर; नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री-आरोग्याचा जागर करण्यास कटिबद्ध होऊया आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून या दुर्गेची आरोग्यपूजा बांधूया.

    © वैद्य परीक्षित स. शेवडे; MD (Ayu.)
    (आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
    श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 3, 2016


  • सामाजिक शिष्टाचार – फोनवर बोलण्याचे शिष्टाचार

    फोन आणि मोबाईल यांचा वापर कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी करतानाही काही भान बाळगायला पाहिजे. कसे ते बघूया…

      October 20, 2018


  • धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही

    डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते. धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही.

      November 11, 2016


  • कापसापासून सुतापर्यंत

    अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

      November 10, 2023


  • सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

    मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

      February 29, 2016


  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

      June 10, 2024


  • वॅक्सिंग करताना

    सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायलाच हवी अन्यथा त्वचा सुंदर दिसण्याऐवजी भलतेच काही तरी होऊ शकते. साधारणपणे मुली मुले वयात येऊ लागली की अंगावर केस येऊ लागतात. त्यातही मुलींना हाता पायावर अथवा ओठांवर केस येऊ लागले की सौंदर्याला बाधा निर्माण होते व त्यासाठी वॅक्सिंग करून हे नको असलेले केस काढून टाकता येतात. शिवाय उन्हात सतत फिरल्याने त्वचा काळी पडते म्हणजे टॅन होते तो टॅनही वॅक्सिंगच्या सहाय्याने कमी करता येतो. वॅक्सिंग घरच्याघरीही करता येते मात्र प्रथमच वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये ते करावे हे उत्तम. एखाद्या कार्यक्रमासाठी जायचा प्लॅन असेल तर दोन दिवस आधीच वॅक्सिंग करावे कारण अनेकांना त्याची अॅलर्जी येऊ शकते व अॅलर्जी बरी होण्यासाठी दोन दिवस हाताशी असलेले केव्हाही चांगलेच. वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात. घरात वॅक्सिंग करताना त्वचा, हातपाय स्वच्छ करा व मगच वॅक्सिंग करा. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका राहणार नाही. वॅक्स गरम केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही तसेच वॅक्सवर लावण्यासाठी सुती कपड्याच्या ४ इंच रूंदीच्या पट्ट्या वॅक्स स्ट्रीप म्हणून वापरता येतील. वॅक्सिंक करून झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करणे व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे. पायावर हातावर लावताना वॅक्स वरून खाली लावा व स्ट्रीप ओढताना केसाच्या वाढीच्या विरूद्ध बाजूने ओढा. ओठावर अथवा हनुवटीवर वॅक्सिंग करताना कटोरी वॅक्सचा प्रयोग करा. या भागातली त्वचा जास्त संवेदनशील असते. त्यामुळे या भागाचे वॅक्सिंग करताना ३-४ छोटे छोटे भाग करून वॅक्सच्या केळ्याच्या सालीएवढा जाड थर द्यावा व ७ -८ सेकंदानंतर तो थर खेचून काढावा. त्या जागी लगोलग अँटीसेप्टीक क्रिम लावण्याची खबरदारी घ्यावी. वॅक्सिंग केलेली जागा कापसाने स्वच्छ पुसून कोरडी करावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 10, 2017


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २

    भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,

      December 5, 2020


  • शेवगा (ड्रमस्टिक) – आहारातील पौष्टिक कॅप्सुल

    दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन "सांबार'मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक "क' जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' यासाठीच म्हटले जाते.

    शेवग्याच्या शेंगेतही "क' जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्‍त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.1% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्‍तदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. 1 वाटी (50 ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत 59 कॅलरीज, 0.8 ग्रॅम प्रोटिन्स व 2.2 ग्रॅम्स फॅट्‌स असतात. 1 वाटी सांबार मधे 87 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटिन्स व 2.8 ग्रॅम फॅट्‌स असतात.

    एकूणच भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं आपलं म्हणून एक स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही, असं सांगितलं जातं. याचं मुख्य कारण आहे त्याचे औषधी गुणधर्म. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या कढय़ात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.

    शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईक अ‍‍ॅसिड, बेटेनिक अ‍‍ॅसिड,ओलेईक अ‍‍ॅसिड हे घटक असतात. तसंच टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असतं. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.

    ही यादी खूप मोठी आहे. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा.

    शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो.

    वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते. गर्भवतीने आहारात शेवग्याच्या भाजीचा वापर केल्यास गर्भाची वाढ चांगली होते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी.

    आरोग्यम् धनसंपदा

      April 6, 2017