वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१९६२ साली भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिज चे गोलंदाज त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करायचे आणि त्या दौऱ्यात देखील अपेक्षेप्रमाणे त्यांनी तेज गोलंदाजी केली. परिणामी बरेच भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यात त्यावेळचे भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील समावेश होता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यावेळी परदेशी असलेल्या या भारतीय खेळाडूला रक्ताची गरज होती तेव्हा वेस्ट इंडिज चा खेळाडू फ्रॅंक वोरेल सर्वात आधी रुग्नालयात पोहचवला आणि इतकेच न्हवे तर त्याने रक्तदान देखील केले होते.
March 14, 2022
या पृथ्वीतलावर हजारों प्रकारचे कीडे विचरण करतात, पैकी काही दिवसा तर काही रात्री म्हणजेच अंधारात! मनुष्य जातीमध्ये देखील अशा प्रकारचे कीडे असतात,जे कायम अंधारात राहून कट कारस्थाने करत असतात.कुणाच्याही नजरेस न पडता गुप्तपणे आपले डाव टाकत असतात.
December 12, 2023
मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील 'हिंग लावणे' हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो.
चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव.ह्याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात,त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास हिराहिंग म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो.हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणी उष्ण असतो.त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अतिवापराने पित्त मात्र वाढवू शकतो.हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा.तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१)अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२)भूक लागत नसल्यासवअथवा तोंडास रूची नसल्यास १/४चमचा हिंगपूड +२चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासा सोबत घ्यावे.
३)१/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापुर्वी चावून खावे ह्याने जीभेवर साचलेला मळ आणी तोंडास दुर्गंध येणे ह्या समस्या कमी होतात.
४)जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणी हिंग ह्यांची पेस्ट जखमेवर लावणे.(क्रूपया डायबेटिस मुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५)गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणी सूज कमी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे माहेरघर आहे.
जीवनात केलेली कितीही पापे वाराणसीत धुतली जातात या श्रध्देपोटी रोज 30 ते 40 हजार यात्री वाराणसी नगरीला भेट देतात. काशी म्हणजे प्रकाशाची नगरी. त्याची स्थापना काश्य राजाने केली म्हणून काशी हे नाव पडले. अनेक स्वाऱ्या झाल्याने काशी नामशेष होऊ लागले म्हणून जवळच गंगेच्या दोन उपनद्या वरूणा व आसी यांच्या संगमावर नवीन गाव उभारले ते वाराणसी.
आर्य कालापासून वाराणसीचा उल्लेख आहे. उपनिषदात वारायते अथवा वारणा म्हणजे जी नदी पापे वाहून नेते ती वाराणसी.पालीमध्ये वाराणसीचा उच्चार बराणसी होता म्हणून पुढे त्याचे नाव होत गेले बनारस. या नदीच्या काठी शंकर पार्वतीचे वास्तव्य होते. शंकर म्हणजे सृष्टीचा नाश करणारा म्हणजे रूद्र. त्याचे निवासस्थान असते महास्मशान. अर्थात प्रेते झोपण्याची जागा. येथील दोन प्रसिध्द घाट मनकर्णिका व हरिश्चंद. सतत 2500 वर्षे जळणारे स्मशानघाट म्हणून हे जगात प्रसिध्द आहेत.
पुर्वीच्या काळी काशीला पोहोचणे महादिव्यच होते म्हणून त्याला काशी यात्रा म्हणत. आज मात्र भारतीय रेल्वेच्या उत्तम जाळयामुळे भारताच्या कुठल्याही भागातून थेट वाराणसीस पोहोचता येते. मुंबईहून 27 तासाच्या प्रवास करून वाराणसी गाठले.स्टेशन अतिशय भव्य. एखाद्या देवळासारखे डोळयात भरते. गाडीतून उतरलो आणि बनारसी ठगांनी बडगा दाखविला. रिक्षातून नेतो असे सांगून चक्क एका टॅक्सीत टाकले व परत आम्हालाच खोटे पाडले की आम्हीच टॅक्सी मागितली होती. बोला! आता पैशावरून भांडाभांडी. पोलीसही त्यांना सामील. शेवटी आम्हीच नांगी टाकली आणि हॉटेलमध्ये डेरेदाखल झालो.
अनेक च्रित्रकारांनी तसेच अनेक फोटोंमध्ये उतरवलेले काशीचे घाट डोळयासमोर येत होते. नदीकाठी बांधलेले घाट, गंगेत स्नान करणारे हजारो भाविक, घाटावर उभारलेल्या छञ्या, आकाशाला भिडलेले मंदिराचे कळस, संथ गंगेच्या प्रवाहात दाटीदाटीने डोलणाऱ्या नावा हे सर्व डोळयासमोर उभे होते पण प्रत्यक्ष अनुभवण्याकरता घाटापर्यंत पोहचणे हेच एक दिव्य होते.
संध्याकाळचे 6 वाजलेले. वाराणसीतले रस्ते माणसांच्या लोंढ्यांनी तुडुंब वाहात होते. बरोबर सायकली, सायकलरिक्षा व ऑटो रिक्षा, मोटारी व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची व फेरीवाल्यांची रांगच रांग. हॉर्नचा कान किटणारा आवाज.रस्त्याच्या मध्यातून शांतपणे चालणारे गाई, बैल आणि त्यांचा मान राखत जोरात मार्ग आक्रमणारी आमची दिव्य सायकल रिक्षा एका अरूंद बोळात घुसली. चक्क रिक्षा एकमेकंाना घासत अगदी धक्काबुक्की करावी तशा पुढे जात होत्या. शेवटी नाइलाजास्तव उतरून चालण्यास सुरवात केली. प्रचंड गर्दीतून मार्ग कसा बसा काढत होतो आणि त्यात गाइडचा आपापले पैशाचे पाकीट जपा असा सतत ढोशा चालू होता. बोळांमागून बोळ आणि माणसांचे लोंढे कापत जात होतो. नदीचा वा घाटाचा मागमुसही नव्हता. एक अरूंद बोळ ओलांडला आणि नाटकाचा पडदा एकदम बाजूला व्हावा तसा समोर रंगीबेरंगी विजेच्या रोषणाईत नाहून गेलेला भव्य घाट व समोर संथ वाहाणारे गंगेचे पात्र. अखेर मनाला शांती देणारी जागा मिळाल्याने धन्य झालो.
काशीचा धनुष्याकृती घाट 9 ते 10 किमी.लांबीचा असून त्यावर जवळजवळ 70 ते 80 पक्के बांधलेले घाट आहेत. जवळजवळ सर्वच घाट नावानिशी प्रसिध्द आहेत. गंगेच्या काठापासून वरपर्यंत जाण्यास शेकडोंनी पायऱ्या, चौथरे व वर मंदिरे आहेत. हे सर्व घाट पश्चिम तीरावरच आहेत. पूर्व तीरावरच्या प्रदेशाला मघर म्हणतात. तो तीर पूर्वापार पापी समजला जात असल्याने सर्व जागा ओसाड आहे. ऋषिकेश पासूनची उफाळत येणारी गंगा या जागी संथ, शांत, मनाला प्रफुल्लीत करणारी. ती रामनगर गावापर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात येते. तिथे थबकते व चक्क उलट पावली ती उत्तरेकडे वळते. त्यामुळे वारााणसीला खळखळाट पूर्ण थांबतो व त्यामुळे पूर येत नाही.
दशास्वमेध हा मुख्य घाट मध्यात विराजमान झालेला आहे. ब्रम्हदेवाने आपले 10 दास म्हणजे अश्व येथे अर्पित केले असे म्हणतात. हा घाट सर्वात पुण्यवान त्यामुळे अखंड गजबजलेला. अनेक पडाव, मोटर लाँचेस नदीतील सफरीकरता सज्ज असतात.
आमचा गाईड आम्हाला एखादा शिक्षक या नात्याने सर्व माहिती रंगवून सांगत होता. मधेच थांबून तो विचारे 'आप समझ रहे है ना' त्यामुळे शब्दन् शब्द एैकणे भाग होते नाहीतर आम्हाला त्याने नापासच केले असते. घाटावर अतिशय शिस्तीत आरती चालू होती. झांजांबरोबर अनेक वाद्ये, पद्यरचना सुगम, अतिशय सुरेल गाणारे कलाकार, व उत्कृष्ट प्रकाश योजना. समोरच गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या पणत्या. सगळे वातावरण आल्हादायक होते. नाव एकएका घाटासमोरून संथपणे जात होती. काळोखात प्रकाशनगरी काशी चमचमत होती.
डॉ. अविनाश वैद्य
July 30, 2019
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
August 7, 2020
मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला.
August 19, 2023
पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे.
March 2, 2019
सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.
गाभार्यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.
मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.
या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.
जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.
सौ. मीनल कुलकर्णी
7249822096
January 3, 2017

ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.
February 6, 2018
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!
गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
September 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti