वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12
वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.
उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.
भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.
मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, "मी हिंदु आहे" असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.
भारतीय सौभाग्यवती महिलांचे "मांग मे सिंदूर भरना" अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.
देवासाठी "चंदनं समर्पयामी" आणि देवीसाठी "हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी" हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.06.2017
खालील तक्त्यात भारतीय व युरोपियन कारागारांची संख्याही दर्शवलेली आहे.
| वर्ष | मार्गबांधणी (मैलांमध्ये) | भारतीय मजुरांची संख्या | युरोपियन कामगारांची संख्या |
| १८६०
१८७९ |
१,६०३ (एक मैल बांधणीला १२६ मजूर लागले.)
१,३८७ |
२,३८,७०२
१,७४,७६२ |
६४१
४६२ |
रेल्वेचं जाळं भारतभर सर्वत्र पसरण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत, एकूणच रेल्वे बांधणीत 'कामगार' हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे कामगारांची भरती करणारे मुख्य ठेकेदार आणि उप-ठेकेदारही महत्त्वाचे ठरत होते. हे ठेकेदार ज्या भारतीय कामगारांची भरती या कामी करत त्यांत पुरुष, स्त्रिया, लहान मुले, मुली सर्वांचाच समावेश असे. कामगार मुख्यतः रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या खेड्यांतील असत. त्यांतील कुशल कामगारांचं प्रमाण १० ते १५ टक्के असे आणि दुर्गम भागांतील आदिवासी अकुशल कामगार-मजूर म्हणून श्रमत असत. बुडर (वडार) जमातीचे लोक माती व दगड उकरण्याचे काम करीत. हे सर्व कामगार रोज ७८०० क्युबिक फीट माती उकरत असत, ज्यामुळे ७८ वाघिणी (वॅगन्स) भरत. उत्तर-पश्चिम भागातील बेलदार जमातीचे अत्यंत गरीब कामगार कामावर असत. मद्रास विभागात या कामावर असलेल्या स्त्रियांचं प्रमाण ४९%, तर मुलांचं प्रमाण १४% इतकं होतं.
बोरघाटात मीनाबाई नावाच्या ठेकेदारणीकडे ३३ अकुशल कामगारांचा जथा असे आणि अशा अनेक जथ्थ्यांवर मीनाबाईंचा वचक असे. सिंधप्रदेशात तर एक ठेकेदार चालू काम सोडून पळूनच गेला. त्या कामावर अफगाण जमातीतले कामगार काम करत होते. ठेकेदाराच्या पलायनानं खूप गोंधळ उडाला, कामगारांनी काम करण्यास नकार दिला आणि अखेर बंडाळी माजल्यामुळे काम ठप्प झालं. कामगार मिळवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं हे जसं व्यवस्थापनासाठी जिकिरीचं होतं, तसं प्रत्यक्षात रेल्वे बांधणीसाठी काम करणं ही गोष्ट कामगारांसाठीही कष्टमय, यातनादायी होती. खूप कष्टांबरोबर अकुशल कामगारांवर अंगभूत धोकेही टांगते असत. अनेकदा उंचावर काम करणाऱ्या कामगाराच्या हातून, खाली काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर हत्यार पडून त्यात त्या कामगाराचं मरण ओढवत असे. असे किती अपघाती मृत्यू झाले याची तर गणतीही राहिली नाही. जीवघेण्या साथीच्या आजारांनी दगावणाऱ्या कामगारांची संख्याही भरपूर होती.
कामगार, कामाचा दर्जा, वेळेचं गणित, अनपेक्षित अपघात, इत्यादी विविध स्तरांवर तोंड देताना ब्रिटिश अधिकाऱ्यांचीही कसरत होत असे. कामगारांच्या कामचुकारपणामुळे काही वेळा सरळ सरळ दंगलीचे प्रसंगही उद्भवत. कित्येकदा अगदी मामुली कारण घडून काम ठप्प होत असे आणि त्याचा विपर्यास होऊन कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याची वेळही येई. काही घटनांचं पर्यवसान ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारण्यातही होत असे. बोरघाटातल्या कामादरम्यान एक ब्रिटिश अधिकारी १२,००० कामगारांना पगार न देता अचानक इंग्लंडला पळाल्यामुळे ते सारे कामगार एकदम संपावर गेले आणि अनपेक्षितपणे तारांबळ उडाली. नद्या आणि दऱ्यांवरचे पूल बांधल्यावर ते पडणं हीदेखील एक सततची डोकेदुखी ठरलेली होती. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी धैर्यानं साऱ्या अडचणींचा सामना केला, इच्छित यशावरची नजर जराही ढळू दिली नाही. अनुभवांमधून शिकत, काम भराभर होण्याच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी मार्गपद्धतीत आवश्यक ते बदल केले, खर्च कमी करण्याचे मार्गही अवलंबिले. मालाची, पैशांची कमतरता तर नव्हतीच आणि अडचणी असल्या तरी कामगारांची उणीवही भासत नसे. कामगार एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतातही नेले जात. त्यामुळे रेल्वेबांधणीच्या ताळेबंदावर नजर टाकली तर दिसून येतं, की भारतभरच्या सर्व गोष्टी जमेस धरता हजारो मैल रेल्वेमार्ग वाजवी काळात बांधून झाला.
एका बाजूनं भारतीय रेल्वे आकारत होती आणि त्याचवेळी रेल्वेबांधणीत प्रत्यक्ष सहभागी असण्याचा फायदा भारतीय अभियंत्यांनाही मिळत होता. नद्या-दऱ्यांवरील पूल बांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडी कमानी इंग्लंडमध्ये तयार होऊन भारतात येत असत. कामाच्या जागी ह्या सुट्ट्या भागांची जोडणी होत असे. या कामामुळे एका नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय अभियंते जोडले गेले. या भारतीय अभियंत्यांना 'मेकॅनो अभियंता' म्हणत असत. नद्यांवर पूल बांधताना पात्रात खोल विहिरी खणाव्या लागत. प्रथम सर्वच्या सर्व ब्रिटिश पाणबुडे खोलवर जाण्याचं काम करीत, पण पुढे १८९० सालापर्यंत ३२ भारतीय पाणबुडे शिक्षण घेऊन हे काम करू लागले.
भारतीयांच्या पिढ्या या बांधकामात तयार होत गेल्या. मोठ्या पुलांचा पाया रचण्याचं काम त्यांनी आत्मसात केलं. त्या अनुभवातून त्यांनी नर्मदा (भडोच), गोदावरी (राजमुन्द्री) सारख्या विशाल नद्यांवरील पूलबांधणी पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात पूल बांधण्यासाठी पाच वर्षे लागत, पण नंतर तेच काम केवळ तीन वर्षांत पूर्ण होऊ लागलं. या मोठ्या पुलाच्या बांधकामात एक एक तुळई २५७ फुटांची होती. अशा १६ कमानी होत्या, आणि त्या प्रत्येक तुळईचं वजन ४०५ टन होतं. हे काम एवढं अवाढव्य होतं, की कामासाठी लागणाऱ्या सर्विस बोल्ट्सची संख्याच ३०,००० पर्यंत असे. नर्मदेवरील पुलासाठी सुमारे २० ते ४५ लाख विटा लागल्या. ह्या प्रचंड कामासाठी बी.बी.सी.आय. रेल्वेनं दोन एकर जागा विटा पाडण्यासाठी म्हणून रेल्वेमार्गाच्या बाजूला राखून ठेवली होती. २५,००० विटा तयार करण्याचं काम तिथे रोज चालत असे. विशाल नद्यांवरील पुलांसारखी अशी भव्य कामं पेलण्यासाठी भारतीय अभियंते सक्षम झाले होते. स्मारकाच्या इमारती बांधण्यात मोगल काळापासूनच भारतीय तंत्रज्ञ निष्णात होते. त्याच अनुभवाचा फायदा मोठमोठाली रेल्वेस्थानकं बांधताना कामी आला.
रेल्वेरुळांमध्ये बसवलेले तळपाट (स्लीपर्स) हा रेल्वेबांधणीतला आणखी एक महत्त्वाचा भाग होता. हे तळपाट लाकडी असत. प्रथम ते इंग्लंड व ऑस्ट्रेलियातून आयात केले जात असत, पण रेल्वेबांधणीच्या वाढत्या पसाऱ्यात या तळपाटांची मागणी वाढू लागली आणि अखेर ते भारतीय जंगलातल्या लाकडापासून भारतातच तयार होऊ लागले. याशिवाय, इंजिनात आग पेटवण्यासाठी इथल्या लाकडांचा उपयोग करावा लागतच होता.
त्या काळात साधारण अर्धा मैल लांबीचा रुळांचा मार्ग १२ माणसांचा गट बांधीत असे. त्याकरता -
• १७०० स्लीपर्स (तळपाट) • ११५ टन वजनाचे रूळ (१५ ते २० फूट लांबीचा प्रत्येक रूळ) • ३५ टन बोल्ट्स • ५ टन फिश-प्लेटस् आणि • ३ टन अणुकुचीदार खिळे अशी सामग्री त्यांना लागत असे.
हळूहळू भारतीय कामगार रेल्वेमार्गावरील प्लेटस् लेअरिंग (मार्गावर अंथरण्याचे काम) करण्यातही तरबेज झाले, ते इतके तरबेज झाले की त्यांच्या अनुभवकुशलतेमुळे त्यांना सुदान देशात लष्करी कामावरही नेण्यात आलं. ज्या भारतीय कामगारांनी कसब मिळवलं, त्यांना उत्तरेकडून दक्षिणेतल्या पुलांच्या कामावर नेण्यात आलं. चिनाब नदी ते कृष्णा नदीपर्यंत जाऊनही त्यांनी कामं केली. पंजाबचिनाब-शेरशहा ब्रीज, आंध्र-कृष्णा-बेसवाडा ब्रीज बांधले गेले. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात नेलेल्या कामगारांची काळजीही घेतली जात असे. उत्तरेकडील कामगार दक्षिणेत आल्यावर त्या कामगारांची जेवणाची आबाळ होऊ लागली. अशा वेळी त्यांच्याकरता गव्हाचं पीठ कलकत्त्यातून पुरवण्याची व्यवस्था केली गेली.
दरम्यान, ब्रिटिश अभियंते भारतीय हवामानात रुळत होते. त्यांच्यापैकी काही ब्रिटिश अभियंते भारतीय कामगारांच्या कामाची, त्यांच्या चिकाटीची वाहवा करू लागले होते. त्यांच्या धैर्याबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल त्यांची पाठ थोपटू लागले होते. या अनेक पातळ्यांवरच्या उत्साही प्रगतीमुळेच पुढच्या शंभर वर्षांतल्या भारतीय रेल्वेच्या प्रचंड वेगाचा पाया मजबूतपणे घातला गेला.
-– डॉ. अविनाश वैद्य
एखाद्याला पडलेल्या प्रश्नातून किंवा सुचलेल्या कल्पनेतूनच शोध लागतात. आजच्या काळात जसे आपल्या विविध गरजा किंवा समस्या शास्त्रज्ञांना नवनवी तंत्रे विकसित करायला भाग पडतात, तशाच गरजांमधून खरेतर लाखो वर्षांपूर्वी आदिमानवांनीही शोध लावण्यास सुरुवात केली.
सुरवातीला वर्षभर आम्ही गावातल्या घरात रहात होतो. मग माझं संशोधन प्रकल्पाचं काम जसं वाढलं आणि संध्याकाळी उशीरा किंवा शनिवार रविवारी देखील जसं काम सुरू झालं, तसं आम्ही कंपनीच्या जुन्या फार्महाऊसवर रहायला गेलो. हे फार्महाऊस साधारणपणे सत्तर वर्षांचं जुनं आणि फारसं निगराणी न राखलेलं होतं. त्याचा उपयोग केवळ आमच्यासारखे काही काळापुरते येऊन प्रकल्पाचे काम करणारे किंवा फार्मवर उन्हाळ्याच्या सुट्टीत कामासाठी येणारे कॉलेजचे विद्यार्थी करायचे. आतापर्यंत बहुतेक सारे अविवाहित कॉलेज तरूण, तरूणी तिथे येऊन रहात असल्यामुळे, घराला आणखीनच हॉस्टेलची कळा आलेली होती. आम्ही त्यामानाने प्रौढ आणि कुटुंबीय, त्यामुळे इतर कॉलेज विद्यार्थ्यांबरोबर ते फार्महाऊस शेअर करण्याऐवजी सारं घरच आम्हाला देण्यात आलं.
घराला खालच्या मजल्यावर मोठा दिवाणखाना, एक स्टडीरूम, एक बेडरूम, किचन आणि डायनिंग रूम होती. वरच्या मजल्यावर तीन बेडरुम्स होत्या. कार्पेट आणि वॉलपेपर कधी बदललेले होते कुणास ठाऊक. घरात सर्व फर्निचर होतं पण ते देखील असंच जुनाट. बाहेरुन घराचा रंग करडा निळसर होता आणि पोपडे उडून आतल्या लाकडाचा मूळ रंग काही ठिकाणी दिसत होता. घराला वरच्या दोन बेडरूम्सना जोडून एक पोटमाळा (attic) होतं. त्यात कधी काळचं जुनं सामान अडगळीत पडलेलं होतं. मृणालने एक दोनदा ती अडगळ व्यवस्थित करण्याचा, धूळ झटकण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि शेवटी तो नाद सोडून दिला. त्यात वटवाघळं किंवा इतर काही प्राणी नव्ह्ते हेच नशीब!
घराला एक तळघर (basement) होतं. त्याचं दार उघडलं की अलीबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटायचं. त्याच्या दाराशी एक दिव्याचं बटण होतं. ते लावून दिवा लावला की खाली जाणार्या पायर्या दिसायच्या. आत गेलं की अशीच अडगळ आणि मोडक्या तोडक्या वस्तूंची गर्दी! त्यात जुने पुराणे वॉशर, ड्रायर, फ्रिझ वगैरे देखील पडले होते. तिथेच घराची furnace देखील होती. हिवाळ्यात ती चालू केली की सारं घर बर्यापैकी उबदार व्हायचं. बर्यापैकी अशासाठी की घर इतकं जुनं असल्यामुळे खिडक्या दारांच्या चौकटीजवळ बारीकशा फटी आणि भेगा झाल्या होत्या आणि त्यातून आत शिरणारं गार वारं आमच्या furnace च्या उबदार हवेशी झटापट करायचं. त्या तळघराचं एकंदर रूप बघून आम्ही तिथे फक्त जरूरीपुरते जायचो. इतर वेळी तळघराचा दरवाजा बंद केला की अलीबाबाची ती जादुची गुहा, आपली सारी अडगळ पोटात घेऊन निपचीत पडून रहायची.
घराला जोडूनच एक गराज होतं. त्याची जमीन चक्क मातीची होती. त्याचं दार म्हणजे लाकडाच्या फळ्या जोडून केलेले दोन दरवाजे. गाडीतून आलं, की कुणीतरी गाडीतून खाली उतरायचं, दरवाजाची मोठाली कडी उघडायची, दरवाजे दोन बाजूला ओढून घ्यायचे, ते परत बंद होऊ नयेत म्हणून त्याला दोन्ही बाजूला दगड लावायचे आणि मग गाडी गराजमधे घ्यायची. परत तेच सोपस्कार करून दरवाजे बंद करायचे, बाहेरून कडी लावायची आणि मग मुख्य दारातून घरात शिरायचं. इथे सगळी सपाट जमीन आणि त्यात वार्याला अडथळा करतील अशी झाडं अगदीच नावापुरती. त्यामुळे पार उत्तरेला कॅनडातून येणारे थंडगार वारे सारखे भणाणत असायचे. त्यामुळे त्या वार्यांच्या जोरापुढे, लाकडी दरवाजे उघडून त्यांना दगड लावणं म्हणजे मोठीच कसरत असायची. थंडीत तर उबदार गाडीतून खाली उतरून, थंडी वार्याशी झुंजत, गराजचे दरवाजे उघडायला जीवावर यायचं. मला तर त्या गराजकडे बघितलं की त्याच्या आत घोडे बांधून ठेवले असतील आणि एखादा क्लिंट ईस्टवूड घोडयावर बसून गोळीबार करत बाहेर येईल की काय, असं वाटत रहायचं.
घराच्या आवारात, पुढच्या पायर्यांजवळ एक मोठंसं मेपलचं झाड होतं. घराच्या मागे चांगलं मोठं लॉन होतं. लॉनच्या एका कोपर्यात चेरी ब्लॉसम आणि दुसर्या कोपर्यात सफरचंदाचं अशी दोन छोटी झाडं होती. उन्हाळ्यात अधे मधे कंपनीतील लोक येऊन लॉन कापून जायचे, हिवाळ्यात तर बर्फ पडलेलं असल्यामुळे काही प्रश्नच नसायचा. घराच्या तीन बाजूंना, साधारण १०० फूट सोडून फार्मचं कुंपण होतं, त्यामुळे घराच्या कुठल्याही खिडकी, दरवाजामधून पाहिलं तरी, कुंपणापलीकडे शेकडो काळ्या कुट्ट बीफ गायींचं दर्शन व्हायचं. दिवसाच्या ठरावीक वेळेला फार्मचे ट्रॅक्टर्स, गायींसाठी चारा आणि आंबोण घेऊन यायचे आणि कुंपणाच्या कडेला बांधलेल्या सिमेंटच्या पन्हाळीमधे ओतत जायचे. तेवढयापुरता गायींच्या हंबरण्याचा, धावण्याचा, खुरांचा आवाज आसमंतात भरून रहायचा. त्या आवाजाची आम्हाला पुढे एवढी सवय झाली की घडयाळात न बघता, आम्हाला गायींच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची वेळ सांगता येऊ लागली.
घराच्या मागच्या बाजूला, लॉन संपलं की कच्चा रस्ता आणि रस्त्याच्या पलिकडे मक्याची शेतं. त्यामुळे तीन बाजूंनी गायींचे कळप आणि चौथ्या बाजूला मक्याची शेतं यांचा आमच्या फार्महाऊसला वेढा पडलेला होता. गायींच्या आवाजानं चांगली जाग असायची. भारतात असताना, घोडयांच्या, गायींच्या फार्मवर राहिल्यामुळे, मला या आवाजाची सवय होती. मृणालने देखील लग्नानंतर काही महिने, आमच्या NDDB च्या बीडजच्या फार्मवरच्या घरात घालवल्यामुळे, तिला देखील अशा आयुष्याची कल्पना होती. सिद्धार्थच्या दृष्टीने मात्र हा जगावेगळा अनुभव होता. मुंबईतल्या लोकल ट्रेन्स, गाडया, बसेस, रिक्षा, गर्दी, कोलाहल, या सगळ्यांपेक्षा हे जग फारच वेगळं होतं.
गायींच्या खाण्याच्या वेळचा आरडाओरडा, गोंधळ सोडला, तर इतर वेळ त्या शांत असायच्या. घरामागच्या कच्च्या रस्त्यावरून जाणार्या गाडया मोजायच्या म्हटलं, तर तासाभरात माणूस कंटाळून झोपी जाईल, अशी परिस्थिती. ट्रॅक्टर्स आणि ट्रक्स थोडया वेळापुरते येऊन जाणारे, त्यामुळे शांतता हाच इथला स्थायिभाव! ना कसला गोंधळ, ना आरडा ओरडा, ना गायींचा आवाज, ना कुत्र्यांचं भुंकणं. फक्त वारा असला की दारा खिडक्यांच्या फटीतून येणारा त्याचा आवाज हीच तेवढी जाग. मैलामैलाच्या अंतरावर रस्ते असल्यामुळे आणि साधारणत: उभे आडवे रस्ते मिळतील अशा कोपर्यांवर एक एक घर असल्यामुळे, आमचे जवळचे शेजारी मैलाच्या अंतरावर होते. मुंबईकर माणसाला कल्पना करणं देखील अवघड जावं, अशी ही परिस्थिती होती.
घराच्या आसपास थोडीफार बीळं होती. क्वचित छोटे साप दिसायचे. पण ते बिनविषारी आणि निरुपद्रवी आहेत, असे सांगून सगळ्यांनी आम्हाला निर्धास्त केलं होतं. बहुतेक बीळं सशांची असायची. पहाटे आणि संध्याकाळी बिळांतून बाहेर येऊन गवतावर बसलेले ससे हमखास दिसायचे. हे ससे मातकट, कबर्या रंगाचे, मातीच्या रंगाशी मिसळून जाणारे. संध्याकाळी, रात्री बाहेरून आलो आणि गाडी आवारात शिरली की गाडीच्या दिव्यांच्या उजेडात चरणारे ससे दिसायचे. क्षणभर टवकारून बघायचे आणि मग अचानक भानावर येऊन बाजूच्या अंधारात उडया मारून नाहीसे व्हायचे. झाडं फारशी नसल्यामुळे खारी त्यामानाने कमीच दिसायच्या. इतर प्राणी फारसे काही दृष्टीस पडायचे नाहीत पण हिवाळ्यात जेंव्हा सारी जमीन बर्फाच्छादित असायची, तेंव्हा सकाळी उठल्यावर, घराच्या आसपास अनेक प्राण्यांच्या पाऊल खुणा बर्फात उमटलेल्या दिसायच्या. त्यावरून रात्री घराच्या आसपास प्राण्यांचा वावर असणार, हे समजायचं. हळू हळू ते ठसे बघून जनावरांचा अंदाज यायला लागला. रकून्स, हरणं आणि सशांच्या पाऊलखुणा ओळखता येऊ लागल्या.
विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत
वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे.
संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य होईल. कृतीसाठी सामुहिक स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो.
लॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता.
सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.
आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.
-शुभंभवतु
-- प्रा.गजाननशेपाळ
जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti