वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता.
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे.
एकंदरीत “आदर्श” च्या प्रकरणात विलासरावांना वाचविण्यासाठी अशोक चव्हाणांचा गेम करण्यात आल्याचे दिसत असले, तरी त्याच आधारावर अशोक चव्हाण आणि इतर आरोपीही सहज निर्दोष सुटू शकतात. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आणि ती म्हणजे यानंतर कोणताही अधिकारी किंवा मंत्री अशी कोणतीही वादग्रस्त फाईल क्लिअर करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल, हा एक आदर्श संदेश यातून निश्चितच गेला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी एक केरळी ख्रिश्चन जोडपं मला भेटायला आलं होते. निमित्त होतं त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीची जन्म पत्रिका पाहाणं..!
आता अशा या उच्चभ्रू लोकांनी, त्यातही परधर्मीय, जन्मकुंडली पाहण्यासाठी माझ्याकडे का यावं असा पुरोगामी प्रश्न कुणालाही पडण्यासारखा.
औदुंबर अर्थात उंबर ....
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे ...
भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो, औदुंबर झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते ....
किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो ...
या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया ...
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते . त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे ....
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा .
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते ..
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो ...
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात .... सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे ...
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात ...
७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात ...
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा ...
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात ...
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे ...
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला .. तो कशानेच थांबेना . मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला ...
देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते.
गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो

भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
कबीर म्हणतो,
मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
…मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.
हावीपर्यंतच्या गणिताची ओळख असणा-या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. आज २२ जुलै! म्हणजेच वेगळ्या स्वरूपात ही तारीख लिहायची झाली तर २२/७ अशी लिहितात. या संख्येला गणिती भाषेत ‘पाय्’ असे म्हणतात.
समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे.
आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर , माझा संसार , माझे कुटुंब ,माता पिता आणि मुला बाळांची जो फक्त जो सदैव काळजी करतो तो रजो गुणी .चांगले जेवावे,चांगले नेसावे ,चांगले राहावे याच बरोबर जो दुस-याच्या चांगल्या गोष्टींची सतत अभिलाषा बाळगतो तो रजो गुणी.जो तीर्थ , व्रत , आणि पाहुणे यांचे करता काहीही खर्च करीत नाही,ज्याचे मन सदैव पैसा अडका, धान्य,संपत्ती यातच अडकलेले असते आणि जो अत्यंत कंजूस असतो तो रजो गुणी.
मीच सुंदर, मीच बलाढ्य ,मीच चतुर, मीच थोर अशी ज्याची समजूत असते तो रजोगुणी.कपटी,अंतर्यामी मत्सरी, सतत कामवासना ज्याच्या मनात असते आणि दुस-याला जो हीन लेखतो तो रजोगुणी. .जो सतत संसाराच्या चिंतेत असतो आणि माझे कसे होईल याची सतत काळजी करतो तो रजो गुणी.जो पूर्वी जे सुख भोगले त्याची आठवण करतो आणि ते सुख आता भोगता येत नाहीत म्हणून दुखः करतो तो रजो गुणी.
ज्याला विनोद, शृंगार,नाच गाणे ,गायन,याची आवड असते आणि गाणे आणि त्यासाठी हावभाव करणे इत्यादी मध्ये जो रंगून जातो त्याच्या अंगी रजो गुण पुरेपूर भरला आहे असे समर्थ म्हणतात.जो विनाकारण दुस-याची टिंगल टवाळी करतो,विनाकारण सतत हास्य विनोद करतो तो रजो गुणी.जो कलावंत असतो , नाटक पाहण्याचा शौकीन असतो.निरनिराळ्या खेळात पैसे खर्च करतो तो रजो गुणी असे समर्थ म्हणतात.
समर्थ म्हणतात रजो गुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.समर्थ रजोगुणाला पूर्ण त्याज्य ठरवत नाहीत पण रजो गुणात पण "शुद्ध रजोगुण" आणि "शबल रजोगुण" हे दोन प्रकार आहेत.
समर्थ म्हणतात हा शबल रजोगुण माणसाला संसारात अडकवतो तर शुद्ध रजो गुण माणसाला भक्ती मार्गात घेवून जातात. संगीत , नाट्य , ,कीर्तन हे जर लोकांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी जो उपयोगात आणतो आणि ज्यामुळे समाजात आनंद निर्माण होतो तो अतिशय चांगला "शुद्ध रजो गुण" आहे असे समर्थ म्हणतात ---
रज तम आणी सत्व | येणेंचि चाले जीवित्व |
रजोगुणाचें कर्तुत्व | दाखऊं आता ||६||
रजोगुण येतां शरीरीं | वर्तणुक कैसी करी |
सावध होउनी चतुरीं | परिसावें ||७||
माझें घर माझा संसार | देव कैंचा आणिला
थोर | ऐसा करी जो निर्धार | तो रजोगुण ||८||
माता पिता आणि कांता | पुत्र सुना आणी दुहिता |
इतुकियांची वाहे चिंता | तो रजोगुण ||९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
दुसर्याचें अभिळाषावें | तो रजोगुण ||१०||
कैचा धर्म कैचें दान | कैचा जप कैचें ध्यान |
विचारीना पापपुण्य | तो रजोगुण ||११||
नेणे तीर्थ नेणे व्रत | नेणे अतीत अभ्यागत |
अनाचारीं मनोगत | तो रजोगुण ||१२||
धनधान्यांचे संचित | मन होये द्रव्यासक्त |
अत्यंत कृपण जीवित्व | तो रजोगुण ||१३||
मी तरुण मी सुंदर | मी बलाढ्य मी चतुर |
मी सकळांमध्ये थोर | म्हणे तो रजोगुण ||१४||
माझा देश माझा गांव | माझा वाडा माझा ठाव |
ऐसी मनीं धरी हांव | तो रजोगुण ||१५||
दुसऱ्याचें सर्व जावें | माझेचि बरें असावें |
ऐसें आठवे स्वभावें | तो रजोगुण ||१६||
कपट आणी मत्सर | उठे देहीं तिरस्कार |
अथवा कामाचा विकार | तो रजोगुण ||१७||
बाळकावरी ममता | प्रीतीनें आवडे कांता |
लोभ वाटे समस्तां | तो रजोगुण ||१८||
जिवलगांची खंती | जेणें काळें वाटे चित्तीं |
तेणें काळें सीघ्रगती | रजोगुण आला ||१९||
संसाराचे बहुत कष्ट | कैसा होईल सेवट |
मनास आठवे संकट | तो रजोगुण ||२०||
कां मागें जें जें भोगिलें | तें तें मनीं आठवलें |
दुःख अत्यंत वाटलें | तो रजोगुण ||२१||
वैभव देखोन दृष्टी | आवडी उपजली पोटीं |
आशागुणें हिंपुटी | करी तो रजोगुण ||२२||
जें जें दृष्टी पडिलें | तें तें मनें मागितलें |
लभ्य नस्तां दुःख जालें | तो रजोगुण ||२३||
विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन |
राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा |
हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||
आळस उठे प्रबळ | कर्मणुकेचा नाना खेळ |
कां उपभोगाचे गोंधळ | तो रजोगुण ||२६||
कळावंत बहुरूपी | नटावलोकी साक्षेपी |
नाना खेळीं दान अर्पी | तो रजोगुण ||२७||
उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती | ग्रामज्य आठवे
चित्तीं | आवडे नीचाची संगती | तो रजोगुण ||२८||
तश्करविद्या जीवीं उठे | परन्यून बोलावें वाटे |
नित्यनेमास मन विटे | तो रजोगुण ||२९||
देवकारणीं लाजाळु | उदरालागीं कष्टाळु |
प्रपंची जो स्नेहाळु | तो रजोगुण ||३०||
गोडग्रासीं आळकेपण | अत्यादरें पिंडपोषण |
रजोगुणें उपोषण | केलें नवचे ||३१||
शृंगारिक तें आवडे | भक्ती वैराग्य नावडे |
कळालाघवीं पवाडे | तो रजोगुण ||३२||
नेणोनियां परमात्मा | सकळ पदार्थी प्रेमा |
बळात्कारें घाली जन्मा | तो रजोगुण ||३३||
असो ऐसा रजोगुण | लोभें दावी जन्ममरण |
प्रपंची तो सबळ जाण | दारुण दुःख भोगवी ||३४||
आतां रजोगुण हा सुटेना | संसारिक हें तुटेना |
प्रपंचीं गुंतली वासना | यास उपाय कोण ||३५||
उपाये येक भगवद्भक्ती | जरी ठाकेना विरक्ती |
तरी येथानुशक्ती | भजन करावें ||३६||
काया वाचा आणि मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें |
ईश्वरीं अर्पूनियां मनें | सार्थक करावें ||३७||
येथानुशक्ती दानपुण्य | परी भगवंतीं अनन्य |
सुखदुःखें परी चिंतन | देवाचेंचि करावें ||३८||
आदिअंती येक देव | मध्येंचि लाविली माव |
म्हणौनियां पूर्ण भाव | भगवंतीं असावा ||३९||
ऐसा सबळ रजोगुण | संक्षेपें केलें कथन |
आतां शुद्ध तो तूं जाण | परमार्थिक ||४०||
त्याचे वोळखीचें चिन्ह | सत्वगुणीं असे जाण |
तो रजोगुण परिपूर्ण | भजनमूळ ||४१||
ऐसा रजोगुण बोलिला | श्रोतीं मनें अनुमानिला |
आतां पुढें परिसिला | पाहिजे तमोगुण ||४२||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा || २.५ ||
-- चिंतामणी कारखानीस
Copyright © 2025 | Marathisrushti