(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक डोळ्याची दिव्यदृष्टी

    गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवाशी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते.

  • विचारांची किमया

    संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.

  • शिवाष्टकम् स्तोत्र

    भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

  • “नुक्कड”चा बायस्कोपवाला.‌.

    पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सात

    ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

    एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

    सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

    प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

    सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

    बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे "काम" करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त "आऽऽ कर" असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा "कामानिराळा" राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

    दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

    पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !

    ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

    ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

    आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

    उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.03.2017

  • शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजकारण

    शेतकर्‍यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा पायंडा राजकीय पक्षानी पाडला आहे. इतर कोणत्याही मुद्यांना हात न लावता या भावनिक मुद्याचा लाभ घेण्याच्या हेतूने आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार राजकीय पक्षानी चालविला आहे.

  • नयन तुझे जादुगार

    खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.

  • आहारातील बदल भाग ६३ – चवदार आहार -भाग २५

    औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे.

    त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती, त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध देत असताना वैद्याने रूग्णांशी काही वेळा गोड आंबट कडू बोलत, आपली शक्ती औषधांमधे मिसळायची असते. औषधाबद्दल विश्वास वाढवायचा असतो. तरच ते औषध विशिष्ट ठिकाणी जाऊन विशिष्ट काम करते. असे आयुर्वेद मानतो. त्यामुळे एखादे औषध प्रत्येकावर तोच, तसाच परिणाम दाखवेल असे नाही.

    जसे पॅरासिटामोल हे औषध समजा आयुर्वेदीय मानले तर त्याची गोळी कडू चवीची असते. आणि सिरप गोड चवीचे असते. आयुर्वेदानुसार गोड चव कफ वाढवते. त्यात लहान मुलांचे वय हे कफाला वाढवणारे असते. म्हणजे लहान मुलांना हे औषध वापरायचे झाले तर सिरपपेक्षा गोळी वापरावी, जी चवीला कडू आहे. कडू चव वात पित्ताला वाढवते. पण लहान मुलांचे कफाचे वय हे पित्ताला विरोध करणारे असल्यामुळे त्यांना फायदाच होईल. असे मत माझे मित्र संगमेश्वर स्थित वैद्य अजित जोग म्हणायचे.

    आयुर्वेदाचे हेच वैशिष्ट्य आहे फक्त जीभेला गोड लागावे एवढाच त्या गोड किंवा कडू चवीचा उद्देश नसून वय आणि प्रकृतीचाही संबंध चवीशी येतो. फार खोलात जाऊन विचार करू नका. सहज आठवलं ते लिहिलं.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    25.11.2016

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ५

    कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां ,
    कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् |
    मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं ,
    मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५||

    पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे?
    कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी जिने वीणेचा दांडा धरलेला आहे अशी. अर्थात पूर्ण हृदयापासून आणि भक्तांच्या हृदयाला पूर्ण आकर्षित करणारे संगीत ज्यातून निर्माण होत आहे अशी. कुटिलकुंतलालंकृतां - कुटिल म्हणजे कुरळे किंवा गोल गोल गुंडाळलेले आपले केस जिने अत्यंत सुंदर रीतीने अलंकृत केली आहेत अशी.
    कुशेशयनिवासिनीं- कुशेशय म्हणजे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. कुटिलचित्तविद्वेषिणीम् - ज्यांचे चित्त कुटील असते अशा दुष्टांचा द्वेष अर्थात राग करणारी. त्या धर्मभ्रष्टांचा विनाश करणारी.
    मदारुणविलोचनां- मधु प्राशनाने नेत्र लाल झालेली. मनसिजारिसंमोहिनीं - मनसिज अर्थात मनातून जन्माला येणारा म्हणजे कामदेव मदन. त्याचे अरी म्हणजे शत्रू ते भगवान शंकर. त्यांना संमोहित करणारी.
    देवी पार्वती स्वरूपात तपस्यारत असणाऱ्या भगवान शंकरांच्या मनात देखील प्रेमाचा अंकुर जागृत करणारी.
    मतंगमुनिकन्यकां- मतंग ऋषींच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली. मधुरभाषिणीमाश्रये- मधूर भाषण असणाऱ्या श्री त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • हुरहुरणारा किरवाणी

    मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात.