वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रसन्न कपूर निर्मित आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘परिचय’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसन्न कपूर म्हणजे जितेंद्र याचा सख्खा भाऊ होय आणि त्या काळात जितेंद्र आपल्या अभिनयाविषयी गंभीर आहे हे अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशी चर्चा होती. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी येथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. यात जीतेंद्र, जया भादुरी, प्राण आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत आहेत.
सरकारने दाखविलेल्या ‘कापूस ते कापड’ या सोनेरी स्वप्नात हरवून गेलेला विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जेव्हा वास्तवात परतला तेव्हा फार उशीर झाला होता. त्या स्वप्नाच्या धुंदीत त्याने खूप काही गमावले होते आणि नंतर गमाविण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तेव्हा तो आपला जीव गमावू लागला. रोजच्या आत्महत्या सुरू आहेत.
माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे.
गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.
यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥
फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत.
ते म्हणतात,
यः - जो कोणी, श्लोकपंचकम् इदं - हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला,
सौभाग्यदं - सौभाग्य दायक असलेला, सुललितं - लालित्यपूर्ण असलेला.
पठति प्रभाते- सकाळच्या वेळी पठण करतो.
तस्मै - त्याच्यावर ललिता झटिति प्रसन्ना - आई ललिता चटकन प्रसन्न होते.
आणि त्याला,
ददाति- प्रदान करते.
काय काय प्रधान करते ती सूची सादर करताना आचार्य श्री म्हणतात,
विद्यां - विद्या अर्थात अध्यात्मविद्या, मोक्षविद्या, आत्मज्ञान.
श्रियं- अर्थात वैभव विमलसौख्य- शुद्ध सुख. अर्थात इतर कोणाच्याही दुःखाला कारणीभूत न होणारे सुख.
सामान्य व्यवहारात माझे सुख कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, प्राध्यापक म्हणून मला सुख मिळायचे असेल असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाचे दुःख सहन करावे लागेल. मुलाला खाण्याचे सुख मिळायचे असेल तर आईला स्वयंपाक करण्याचे दुःख भोगावे लागते. त्यामुळे व्यवहारातील सुख निर्भेळ नाही. निर्भेळ सुख एकच. आत्मसुख. आईच्या कृपेने ते प्राप्त होते
अनन्तकीर्तिम्- कधीच न संपणारी कीर्ती.
हे अंतिम पद फार महत्त्वाचे आहे. जगात स्वार्थाने लोक समोर करतात ती स्तुती, प्रसिद्धी. पण आपल्या मागे लोक आपल्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ती कीर्ती. की खरी असते. कारण त्यात स्वार्थ नसतो.
आई ललितांबेच्या कृपेने साधकाला अशी कीर्ती प्राप्त होते. अशी कीर्ती मिळावी असे कार्य त्यांच्या हातून घडते. जी शाश्वत असते .चिरंतन असते.
त्यासाठी तिचे हे स्तवन आहे.
जय श्री ललितांबा !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
जर तुम्हाला एकाएकी खुप पैसे मिळाले तर तुम्ही तुमचे आयुष्य कसे बदलाल?? या प्रश्नाच उत्तर देताना जर तुमचा पहिला निर्णय नोकरी सोडून देईन असा असेल तर ही धोक्याची सूचना आहे हे लक्षात घ्या. अनेक यशस्वी लोकांची जेव्हा तुम्ही आत्मचरित्र वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांनी कामाची एवढी गोडी लावून घेतली होती की ते काम करताना त्यांना खूप मज्जा येत होती किंवा त्यांनी असे क्षेत्र निवडले ज्याची त्यांना आवड होती त्यामुळे ती काम त्यांनी मनापासून केली आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते.
आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.
तक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे.
काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे.
ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.
पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||
यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
Copyright © 2025 | Marathisrushti