(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • परमपुज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराजांची प्रवचने – भाग २

    गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.

  • ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी

    ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय?

  • कॅप्टन नितीन चव्हाण : गाथा शौर्याची

    लहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’.

  • हैदराबादच्या स्वतंत्र-संग्रामाची सांगता सैन्याच्या ऑपरेशन पोलोने

    अखेर ९ सप्टेंबर १९४८ रोजी मंत्रिमंडळाने सैन्याच्या ऑपरेशन पोलोला परवानगी दिली. ज्यांनी निजामाचे अत्याचार पाहिले त्यांच्यासाठी ऑपरेशन पोलो म्हणजे स्वातंत्र्यसूर्यच होता.निजामाच्या कचाट्यातून हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यानंतर संस्थानात काही वेळ लष्करी प्रशासन होते.

  • मनाची भक्ती

    एक माणूस होता, त्याच्या पत्नीने त्याला महामूर्ख ठरविले. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला फार बोचली. त्याला वाईट वाटले आणि त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. प्रौढावस्थेत विद्याध्ययनास सुरुवात केली. दीर्घकाल निरंतर अभ्यास व दृढ निश्चयाच्या बळावर तो संस्कृतचा महाकवी कालिदास झाला.

  • आपलं स्वयंपाकघर.. भाग तीन

    अॅप्रन वापरणे हे अजुनही मागील पिढीतील स्त्रियांना एखादे फॅड वाटते. ‘उगाचच· कौतुक’ असा सूरही ऐकायला येतो.

  • मायफळ / मायाफल

    ह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.

  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री नागेश्वर औंढ्या नागनाथ

    ह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे.

  • हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग २ – पिंपळ

    पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ९/११

    संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान :

    शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे.

    • गेल्या कांहीं सहस्त्रकांचा भारताचा इतिहास पाहिला तर, भारताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या काळात भिन्नभिन्न राजवटी होत्या. इ.स च्या आधीची कांहीं व इ.स.च्या सुरुवातीची कांहीं शतकें भारताच्या कांहीं भागात (महाराष्ट्राचाही कांहीं भाग) शक, कुषाण, हूण वगैरेंची सत्ता होती. मध्य युगात आसामातील कांहीं भागात ब्रह्मदेशाच्या सीमेवरून आलेल्या अहोम यांची राजवट होती. गेली जवळजवळ १००० वर्षें पाहिली तर, इ.स ११९२ (महंमद घोरी) ते १७५७-१८५७ पर्यंत (म्हणजे, पलाशीची, प्लासीची, लढाई ; गदर / स्वातंत्र्ययुद्ध) , या ५५०-६५० वर्षांतील बराच काळ, बर्‍याच भागात मुस्लिमांची राजवट होती (विजयनगर, राणाप्रताप, शिवराय, छत्रसाल, मराठे, हे कांहीं अपवाद) . १९४७ पर्यंत, म्हणजे शेदोनशे वर्षें परदेशी इंग्रजांची (जे प्रोटेस्टंट आहेत) राजवट होती. चारसाडेचारशे वर्षें गोव्यावर पोर्तुगीझांची सत्ता होती (जे रोमन कॅथॉलिक आहेत) , व कांहीं थोड्या भागावर फ्रेंचांची सत्ता होती. या भूभागात वेवगेगळ्या काळीं भिन्नभिन्न प्रादेशिक भाषा उदयाला आल्या व लोपल्या. एवढें सगळें होऊनही भारतातील भावनिक ऐक्य अढळ राहिलें. याचें कारण म्हणजे संस्कृतच्या साह्यानें भारतभर आधीच्या काळात (व नंतरच्याही काळात ) पसरलेली व स्थिरावलेली ‘कॉमन’ संस्कृती. एवढेंच नव्हे, तर, ही संस्कृती अनेक शतकें ‘Far East आशिया’मधील देशांमध्येही पसरली . इथें अभिप्रेत आहे ती, राजकीय-सत्ता नव्हे , धार्मिक-अधिसत्ता नव्हे ; तर भौगोलिक संदर्भात सांस्कृतिक-ऐक्य, हें आहे.
    • भारतीय परंपरा पाहिल्यास, आपल्या येथील बहुतांश लोक व विद्वज्जन, अन्य धर्मांप्रमाणें ‘एकाच पुस्तकाला’ (जसें, बायबल किंवा कुराण ) बांधील नव्हते. भारतात वेदप्रामाण्यही चाले व अवैदिक दर्शनेंही आहेत. एकेश्वरवार-अद्वैतवाद-द्वैतवाद-विशिष्टाद्वैतवाद-इहवाद-निरीश्वरवाद, अनेक विचारधारा नांदल्या आहेत. (इथें ‘वाद’ म्हणजे विचारधारा, असें अभिप्रेत आहे). अनेक पंथ आहेत. येथें वैविध्य हें natural समजलें जातें. भारतात वादसंवादाची परंपरा आहे. ( इथें ‘वाद’ म्हणजे मुद्देसूद , point-by-point डिस्कशन , पॉइंट-काउंटरपॉइंट , मुद्दा आणि त्याचें उत्तर, प्रश्न-प्रतिप्रश्न, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, अशा प्रकारची जी बौद्धिक चर्चा चाले, ती अभिप्रेत आहे. याचें एक उदाहरण म्हणजे, आद्य शंकराचार्य व पंडित मंडनमिश्र यांच्यात झालेला बौद्धिक ‘वाद’). इथें विद्वत्सभा होत, राजेही आपल्या पुढाकारानें अशा सभा भरवत. तिथें अनेक विषयांची गंभीर चर्चा चाले, विचार-वैविध्य स्वीकारलें जाई, फ्रीडम-ऑफ-एक्सप्रेशन, फ्रीडम-ऑफ-थॉट यांना मान होता. रामायण-महाभारत-भगवद्गीता-हरिवंश-भागवत, वगैरे ग्रंथांनीही भारतभर पसरून, या भूभागात संस्कृतिक एकात्म्य साधायला मोठी मदत केलेली आहे. अन्य विषयांच्या ग्रंर्थांनीही तेंच केलें, उदा. चरक-सुश्रुत-वाग्भट यांच्या ग्रंथांनी आयुर्वेद भारतभर पसरवला.
    • विविध विषयांचे ग्रंथ लिहितांनाही, ग्रंथकर्ता पूर्वसूरींचा सन्मानपूर्वक उल्लेख करून व त्यांची मतें मांडून, नंतर आपलें स्वत:चें भिन्न मत मांडत असे.भारतात, ‘यूनिटी इन् डायव्हर्सिटी’ खरोखरच होती, आणि ही ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यात संस्कृत भाषेचा मोठाच सहभाग होता / आहे.
    • या संदर्भात लोकमान्य टिळकांच्या, केसरीमधील अग्रलेखाचा कांहीं भाग पहा ( संदर्भ : ‘महाभारत : संघर्ष आणि समन्वय’ , लेखक – रवीन्द्र गोडबोले ) -

    ‘….लोकांच्या.आचारात किंवा विचारात जें कांहीं साम्य आहे तें महाभारत किंवा रामायण या आर्ष महाकव्यांमुळेच उत्पन्न झालें आहे ; व आजमितीस जागृत आहे. बंगाल्यात जा, काश्मिरात जा, किंवा मद्रासेत जा, रामायण-महाभारतातील कथा, उपकथा किंवा आख्यानें ही लोकांस सारखीच आवडतात, व त्यांच्या श्रवणानें एकसारखेच विचार त्यांच्या मनांत उत्पन्न होऊन भरतभूमीच्या राष्ट्रीय ऐक्याची साक्ष देतात… ’ .

    लोकमान्य टिळक हे थोर राजकीय नेते तर होतेच, पण ते संस्कृतचे आणि संस्कृती या विषयांचे मोठे विद्वान होते. ‘गीता रहस्य’, यासारखे तत्वज्ञानाधिष्ठित व ‘Orion’, ‘Artic Home In the Vedas’ यासारखे संशोधनाधारित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तेव्हां त्याचे एकात्मकेबद्दलचें मत ग्राह्य धरायलाच हवें.

    • राजोपाध्ये यांच्या एका ऑब्झर्वेशनबद्दल : मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद :

    ‘... मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ ( इति राजोपाध्ये ) :

    हा मुद्दा महत्वाचा आहे जरूर, पण तो मूळ विषयाशी डायरेक्टली संबंधित नाहीं, म्हणून, त्याचा परामर्श, मुद्दाम शेवटी, ‘ परिशिष्ट – (२) ’ मध्ये घेतला आहे.

    मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद बर्‍यापैकी-व्यवस्थित मिळाला आहे , असें मला वाटतें.

    (पुढे चालू )

    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com