(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आचार्य अत्रे कट्टा, ठाणे

    कैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.”

      June 3, 2026


  • देवपूजेतील साधन – शंख

    सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.

    महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.

      January 21, 2016


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – २

    द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात.

      September 5, 2020


  • इन्सुलिन रेजिस्टन्स

    इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक शारीरिक अवस्था असून ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करतात पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यास त्या अयशस्वी ठरतात. ह्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनसाठी प्रतिरोधक (रेजिस्टन्स) बनतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व शरीरातील किटोन बॉडिजचे प्रमाण वाढू न देण्यासाठी २०० किवा त्यापेक्षा जास्त इन्सुलिनची मात्रा आवश्यक असते अशीही इन्सुलिन रेजिस्टन्स ची व्याख्या करतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये आवश्यक तपासण्या - फ़ास्टींग शुगर (उपाशी पोटीची साखर), फ़ास्टींग इन्सुलिन (उपाशी पोटीचे इन्सुलिन), सी रिअॅक्टीव प्रोटिन (सिरपी), लिपिड प्रोफाईल (रक्तातील चरबी), पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पिसिओस) असलेल्या स्त्रियांनी इन्सुलिन टॉलरन्स टेस्ट आणि क्वानटिटेटिव्ह इन्सुलिन सेन्सिटिव चेक इंडेक्स (QUICKI) - हे एक गणिती सूत्र असून ह्यात रक्तातील साखर व इन्सुलिन ह्यांचा तपासण्यांचा वापर करण्यात येतो.

    ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो अश्या व्यक्तींमध्ये साखर ही शरीरातील पेशींमध्ये शोषण्याऐवजी रक्तातच मिसळलेली राहते. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर पेशींमध्ये शोषण्यासाठी शरीरातील पॅनक्रीयाज मधील बीटा सेल (पेशी) जास्त इन्सुलिनची निर्मिती करतात. जो पर्यंत ह्या पेशी जास्त इन्सुलिनची निर्मिती करू शकतात तोपर्यंत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात ह्या पेशी यशस्वी ठरतात पण कालांतराने ह्या पेशी योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाहीत. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढलेले रहाते. इन्सुलिनची अयोग्य निर्मिती आणि वाढलेली साखर ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणुन आपणास मधुमेह (डायबेटिस), प्रिडायबेटिस तसेच शरीराला जास्त अपाय करणारे रोग होण्याची शक्यता बळावते. प्रयोग असे दाखवतात कि टाइप २ डयबेटिस होण्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक महत्वाचा घटक आहे. असे असूनही मधुमेह होईपर्यंत बऱ्याच जणांमध्ये ह्या अवस्थेची तपासणी केलेली आढळत नाही.

    ब्रेन (मेंदू) फोगीनेस - एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण, पोट फुगणे, सुस्ती येणे अणि मुख्यत्वे जेवल्या जेवल्या सुस्ती येणे, भूक जास्त लागणे, वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, रक्तदाब वाढणे, ट्रयग्लिसरेइड नावाची रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, प्रो एन्फ़्लमेटरि सायटोकायनेज नेराश्या किवा खिन्नता विषःणता जाणवणे (डिप्रेशन), अकांथोसीस निग्रीकंस (AN) - जसे कि मानेवरची अक्झीला (बखोट) येथील त्वचा काळसर व जाडी दिसणे, त्यावर दोरी सारखे वळ दिसणे, यकृतामध्ये चरबी जमा होणे, स्त्रियांमध्ये प्रजनन दोष निर्माण होणे, मुलांमध्ये वाढ योग्य प्रमाणात न होणे ह्या सारखी लक्क्षणे इन्सुलिन रेजिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी विविध करणे आहेत पण अनुवंशिकता हे एक सबळ कारण ठरू शकते. प्रयोगाअंती अति कॅलरीजचे सेवन आणि शारीरिक हालचालीची कमतरता ह्यांचा जवळचा संबंध आहे असे सिद्ध झाले आहे. शारीरिक हालचालीची कमतरता, एखादे इन्फेक्शन (रोगाची लागण) किवा एखादा गंभीर आजार, मेटबोलिक सिंड्रोम, वाढलेले वजन मुख्यत्वे पोटाचा घेर वाढणे, गर्भावस्था, काही औषधांचे सेवन उदाहरणार्थ स्टिरोइड तसेच तणाव ह्या सगळ्यांमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याची शक्यता बळावते. लेप्टिन रेजिस्टन्स असल्यास जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची चटक लागते व ती वाढतही जाते.

    अति कॅलरीज, अति फॅट, मुखत्वे सॅचुरेटेड फॅटचे सेवन, मिठाचे अतिसेवन तसेच फास्ट फूडचे अतिसेवन आणि जास्त प्रमाणात नॉन-व्हेजचे सेवन अशा काही चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे शरीरात चरबीच्या पेशीत वाढ होते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा वेग वाढतो. वाढलेल्या वजनामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सच्या प्रमाणात वाढ होते.

    न्युट्रिशनल मोडुल्येशन ओफ इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या विषयावर पुनर अवलोकानातील लेखात असे आढळले आहे कि पोटाच्या भागातील जमा झालेली चरबी हे इन्सुलिन रेजिस्टन्स व डायबेटीस साठी महत्वाचे कारण ठरू शकते आणि वजन घटल्यास आणि त्यातूनही पोटाच्या भागातील चरबी घटवल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यास व उलटवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यात व बरा करण्यात जीवनशैली महत्वाची कामगिरी करते त्यामुळे जर आपणास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळावयाचा असेल तर किवा तुम्ही जर ह्या व्याधीने ग्रस्त असाल आणि ती तुम्हाला आटोक्यात आणावयाची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. वाढलेले वजन कमी करणे, शरीरिक हालचालीत वाढ करणे जरुरीचे आहे.

    अन्नातील तंतुमय पदार्थ भूक कमी करण्यास मदत करतात आणि भूक मंदावण्यास मदत झाल्यामुळे आपला आहार (कॅलरीजचे सेवन) कमी होते. ह्यामुळे वजन घटायलाही मदत होते. रक्तातील साखर व रक्तातील चरबी घटवण्यासही मदत करतात. तळकट पदार्थ, गोड पदार्थ, खारट पदार्थ, फास्ट फूड, मीठ, साखर ह्यांचे सेवन केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळण्यास किवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल

    आहारात कोणता व कसा बदल करायचा हे तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्सच्या करणावर तसेच तुमच्या सर्व चाचण्यांवर अवलंबून असेल.

    डॉ. शीतल म्हामुणकर
    आहारातज्ज्ञ

      March 2, 2015


  • नैवेद्य का दाखवावा ??

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

    गणपतीचा नैवेद्य ठरलेला.

    मोदक. मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे.

    आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे.

    बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो.

    जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर.
    हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते.

    चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ?
    नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती.

    टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता।
    आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता.
    भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार......

    फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ?
    घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती.

    गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला
    नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते.

    नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

      September 19, 2018


  • जागतिक आदिवासी दिवस

    संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

    संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. खरे तर १९७२ सालापासून युनोने आदिवासींच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली. आदिवासींच्या संदर्भात वाढत्या संघर्षामुळे १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढे १८ डिसेंबर १९९० च्या युनोच्या आमसभेत १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले आणि हे वर्ष १० डिसेंबर १९९२ च्या मानवाधिकार दिवसापासून सुरू झाले. या वर्षाच्या दरम्यान आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले.

    भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 9, 2021


  • त्रिपुरारी पौर्णिमा

    कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी त्रिपुर पाजळवितात. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा भगवान शिवानी वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा होय.

      October 1, 2023


  • नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द

    २४-३०/११/२०१२
    पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु
    झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे.
    स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी
    करायला तयार आहे

      November 29, 2012


  • सप्टेंबर २९ – हुकमी कारकून आणि फिरक्या गिब्ज

    २९ सप्टेंबर १९४१ रोजी “युद्धासाठी खास बोलविण्यात आलेल्या बँक कारकुनाचा” जन्म झाला आणि २९ सप्टेंबर १९४१ रोजी कसोट्यांमध्ये सर्वप्रथम ३०० बळी घेणार्‍या फिरकीपटूचा जन्म झाला.

      September 28, 2010


  • गुन्हेगार, दारूडे

    काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.

      September 5, 2010