(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घर्षणोपचार सामान्य नियम

    घर्षण करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत- अर्थात घर्षण नेहमी लाकडाच्या पाटावर, खुर्चीवर किंवा पलंगावर बसून किंवा उभे राहून करावे. मात्र बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी वापरलेली वस्तू ही धातूची असू नये. कारण धातू हे विद्युतवाहक असल्याने घर्षणासाठी निर्माण होणारी वीज जमिनीत निघून जाईल व घर्षणाचा फायदा होणार नाही,

  • निसर्गप्रकोप

    दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात.

  • पाच चवींनी युक्त औषधी लसूण

    गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे … खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा ....

    संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा …

    लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. जगातील अर्जेटिना, बल्गेरिया, चीन, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका आदी देशांत याची लागवड केली जाते. परंतु उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाचा स्वाद आणि चव उग्र असते. परंतु शिजवला असता त्याची चव गोडसर होते. भारतीय मसाल्यांमध्ये, सॉस, चटण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा या लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत. लसणात ऍलिसीन (dllicin) नावाचे सल्फर कंपाउंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.

    भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.

    लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते. वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढणिवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.

    लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लसणाच्या दोन कच्या पाकळ्या खाणे आवश्यक आहे.

    आपल्या वायू पोटात तयार होतो किंवा आपण बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल. काही काळ नियमितपणे लसूण खाण्यात समाविष्ट केले तर त्याचा लाभ चांगला होतो. लसूण बारीक करुन गरम दूध आणि गरम पिण्यातून पिणे चांगले. सांधे दुखी किंवा कमर दुखीवर हे पाणी अधिक गुणकारी आहे.

    आपली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी लसूण चांगली. तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करायचे. थंड झाल्यावर ते तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो. हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. कान दुखण्यावर आराम मिळतो. लसूण अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.

    लसणाचे उपयोग :
    १. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

    २. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

    ३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

    ४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

    ५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

    ६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

    ७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

    ८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

    ९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

    १०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

    ११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

    १२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

    १३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

    १४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….

    १५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

    १६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

    १७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

    १८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

    १९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

    २०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

    २१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

    काळजी :
    लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे …..

    जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे …

    गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.

    आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

  • न्याययंत्रणेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

    सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्‍या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्‍यांचे लक्ष लागले आहे.

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ११

    अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥

    आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.

    अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.

    अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, "अन्नपूर्णे सदापूर्णे. "

    शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.

    ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.

    कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.

    दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.

    माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे...

    भिक्षां देहि च पार्वति !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • ‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

    सिरिस उपकरणांनी गेली काही वर्षं, कमी उंचीवरील ढगांकडून होणाऱ्या प्रारणांचं प्रमाण कमी होत असल्याचं नोंदवलं आहे. कमी होणारं प्रारणांचं हे प्रमाण, कमी उंचीवर पूर्वीइतके ढग तयार होत नसल्याचं दर्शवतं. कमी उंचीवरील ढगांचं कमी प्रमाणात निर्माण होणं आणि चंद्रावरचा पृथ्वीप्रकाश कमी होणं, हे एकाच वेळी घडत असल्याचं या संशोधकांना आढळलं. कमी उंचीवरील ढगांच्या प्रमाणाचा आणि पृथ्वीप्रकाशाच्या तीव्रतेचा थेट संबंध या तुलनेतून स्पष्ट झाला. कमी उंचीवरचे ढग हे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित करतात. या कमी उंचीवरील ढगांचं प्रमाण कमी होत असल्यानंच, पृथ्वीकडून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळेच पृथ्वी निस्तेज होत चालली आहे.

  • २५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन १३ ते १५ जानेवारी दरम्यान मुंबईत होणार

    पक्षीनिरीक्षण आणि पक्षीसंवर्धन या विषयी जनमानसात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गेली चोवीस वर्ष महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन’ आयोजित केले जात आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने पहिल्यांदाच हे संमेलन मुंबईत १३, १४, १५ जानेवारी २०१२ रोजी संजय गाधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे संपन्न होत आहे.

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग ५

    जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.

    वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.

    मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.

    पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
    असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
    ( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.

    दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.

    कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
    ........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.

    जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
    पायांना भक्कम आधार हवा,
    पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
    हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    21.09.2016

  • सौभाग्यलेणं – हळदीकुंकू

    सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

  • दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

    कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे?

    भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार सरासरी ६० वर्षे हे आम्हा भारतीयांचे आयुर्मान आहे. राज्यवार अभ्यासल्यास हे आयुर्मान केरळ या राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ७४.९ वर्षे इतके आहे. केरळ; ज्याला God's own country असंही म्हटलं जातं....हे राज्य आयुर्मानाच्या आणि एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आजवर कायम आघाडीवर राहिलं आहे. यामागची कारणंदेखील महत्वाची आहेत. शिक्षणाचे अधिक प्रमाण, दरडोई उत्पन्न उत्तम असणे आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ही काही प्रमुख कारणं. मात्र या सगळ्यांच्या पलिकडे असलेले आणि हे सर्वकाही व्यापून उरलेले आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे 'आयुर्वेद'.

    आयुर्वेदाच्या क्षेत्रात पंचकर्म हा शब्द ऐकला-वाचला की दुसरा जो शब्द लगेच आपल्या मनात येतो तो म्हणजे केरळ! केरळाने छोट्या छोट्या गोष्टींत आयुर्वेद जपला आहे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेली गौरवशाली अष्टवैद्य परंपरा जपली ती याच राज्याने. आपल्याकडे 'आजीबाईचा बटवा' असतो तसाच केरळात 'उट्टमूली' असतात. उट्टमूलीमध्ये एखाद्या रोगावरील एक किंवा फारतर दोन वनस्पतींचे मिश्रण वापरण्याची पद्धत आहे. आपल्याकडचा 'आजीबाईचा बटवा' हा आज भरकटत जाऊन जणूकाही घरगुती औषधे म्हणजेच आयुर्वेद अशा पायरीवर जाऊन पोहचला आहे. उट्टमूलीमध्ये मात्र आयुर्वेदातील सिद्धांतांवर आधारित एकल द्रव्य चिकित्साच प्रामुख्याने दिसते. सहस्रयोग वा चिकित्सामंजिरी यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय ग्रन्थ जन्मले ते याच देवभूमीत. संस्कृत भाषेव्यतिरिक्त अन्य कुठल्या भाषेतील ग्रन्थ असूनही अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याने आयुर्वेदाच्या महत्वाच्या संहिता/ निघण्टु ग्रंथांच्या मांदियाळीत या मल्याळम् ग्रंथांना आदराचे स्थान आहे. असे अन्य उदाहरण विरळाच.

    दैनंदिन आयुष्यातही केरळाने आयुर्वेद आजही जपलाय. कळरीपायट्टपासून ते अगदी रोजच्या खाण्यासोबत घेतल्या जाणाऱ्या 'चुक्कु वेल्लम्' किंवा 'पथीमुकम् वेल्लम्' पर्यंत मल्याळी बांधव आयुर्वेद 'जगत' असतात. (या दोन्हीवर स्वतंत्रपणे लिहीनच; तूर्त वेल्लम् म्हणजे पाणी; आणि हे दोन्ही प्रकार म्हणजे आयुर्वेदीय औषधींनी सिद्ध केलेले पाणी इतकेच लक्षात ठेवलेत तरी पुरे. असे पाणी केरळात जेवणासह घेण्याची प्रथा आहे.)

    सुश्रुतसंहितेत स्पष्टपणे म्हटले आहे;

    'आयुरस्मिन् विद्यते, अनेन वाऽऽयुर्विन्दन्ति इत्यायुर्वेदः।' (वेदोत्पत्त्यध्याये।)

    अर्थात्; ज्यात आयु आहे किंवा ज्यामुळे आयुर्प्राप्ती होते तो म्हणजे आयुर्वेद. केरळ हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. आम्ही वैद्यगण आमच्या ग्रंथाबाबत 'पोथीनिष्ठ' आहोत असे काहीजण कुत्सितपणे म्हणत असतात. हो; आम्ही पोथीनिष्ठच आहोत. कारण; त्या ग्रंथांतील शब्दन् शब्द आम्हाला प्रत्यक्षात अवतरलेले सतत दिसतात. हा सूर्य हा जयद्रथ!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

    https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/2016/10/30/आयुष्मान-केरळ/