वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या भागाची सुरवात आपण पहेलिका (कोडे) असणाऱ्या श्लोकांनी करू या. ही लेखमाला इथेच संपूर्ण करू या . ह्या लेखमालेत संस्कृत सुभाषितांचे मराठी भाषान्तर केले आहे. शक्यतो कळण्यास सोपी सुभाषिते निवडायचा प्रयत्न केला आहे. सगळेच श्लोक सगळ्या लोकांना माहित असतील किंवा सर्वच श्लोक प्रसिद्ध असतील असे नाही. परंतु सामान्य लोकांना सोप्या भाषेत सांगावयाचा प्रयत्न केला आहे.
आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.
मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
एका गुरुकुलातील हि कथा… जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत.
आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं तसंच उपविभागाचं कार्य सुरळीत राहावं म्हणून त्यांना खनिजांची गरज असते. कारण शरीरातली प्रत्येक क्रिया मग ती रासायनिक असो किंवा हार्मोनल त्या प्रत्येक क्रियेत खनिजं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
आपण जे अन्न सेवन करतो त्यात ही खनिजं नैसर्गिकरीत्याच परिपूर्ण असतात. आणि जे पदार्थ किंवा खनिजं शरीराला अनावश्यक आहेत ती मल- मूत्र किंवा घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात. ही सगळी खनिजं निसर्गत:च उपलब्ध असतात.
तुम्ही कृत्रिमरीत्या शरीराला त्या खनिजांचा साठा पुरवण्याचा प्रयत्न केलात तर शरीर त्या खनिजांचा स्वीकार कजरत नाही परिणामी आपल्याला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. खनिजं ही कार्बनविरहीत रासायनिक तत्त्व असतात जी पाण्यामध्ये अगदी सहज विरघळतात.
निसर्गात २४ प्रकारची खनिजं असून त्यातली सात खनिजं ही अनिवार्य असतात आणि ती फळं, भाजी, धान्य, दूध आणि पाणी या नैसर्गिक गोष्टींमधून मिळतात.
आपल्या शरीराला आवश्यक असणारी खनिजं
कॅल्शिअम
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
लोह
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
सोडिअम
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
आयोडिन
शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
पोटॅशिअम
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅतसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
फॉस्फरस
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
सिलिकॉन
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
मॅग्नेशिअम
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
सल्फर
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
क्लोरिन
पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध यात असतं.
कमतरतेमुळे काय होतं?
अॅतसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅालर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- प्रहार
मसाल्यातला एक खमंग आणि झणझणीत प्रकार. हा हमखास सर्वांच्या जेवणात झणझणीत तडका देण्याकरीता वापरला जातो .हा कंद देखील जमीनीखालीच उगवतो.
आयुर्वेदानुसार लसुण ही शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते. ह्यात आंबट सोडुन बाकीचे पाच ही रस अर्थात चवी असतात. आश्चर्य वाटले का? तर स्पष्टीकरण हाजिर हैं! लसणाच्या वरच्या शेंडा तुरट चवीचा असतो, शेंडयाचे टोक खारट असते, लसणाचे बी गोड असते, लसणाचा कंद तिखट असतो, आणि लसणाची पाने कडू चवीची असतात.
चला तर मग ही लसूण आपले बारीक सारीक आजार बरे करून आपल्याली तब्येत ठणठणीत कशी ठेवते ते पाहूयात.
१)नायटा हा त्वचेचा विकार होऊन आपण त्रस्त झाला आहात का? नुसता लसणीचा रस त्या नायटयावर लावा काय बिशाद आहे त्याची पुन्हा डोके वर काढायची!
२)ज्या लहान मुलांना वांरवार सर्दी होऊन छातीत कफ साचतो साधा सोपा उपाय लसणाच्या पाकळयांची सुरेख माळ करा आणि घाला तुमच्या चिमूकल्याच्या गळ्यात त्याच्या उग्र आणि गरम वाफेनेच छाती मधला कफ कमी होईल.
३)लसुण ही डोळयांचे आरोग्य देखील उत्तम राखते बरे का. त्या करीता लसणाचा रस हा तुप व मधासोबत घ्यावा.
४)सारखा सारखा पोटात गॅस होऊन छातीत दुखत असल्यास १/२ चमचा लसुण रस + १ चमचा आल्याचा रस हे मिश्रण घ्या व त्यांवर थोडे कोमट पाणी प्या बघा गॅस कुठल्या कुठे पळुन जाईल.
५)सांध्यांना सुज येऊन सांधे दुखत असल्यास दिवसातून तीन वेळा दुखणा-या सांध्यांना लसणाचा रस लावून थोडा वेळ अर्थात १५ मिनिटे ठेवा आणि मग धुवा ह्या उपायाने निश्चित फायदा होईल.
६)ज्या व्यक्तींना वारंवार जंतांचा त्रास होतो त्यांच्या जेवणात लसणीचा वापर असावा.
तसेच लसूण ही योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि ह्रदयाचे आरोग्य चांगले राखायला मदत करते ह्यात काहीच शंका नाही.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.
जर "ती" जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
"ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
ऋग्वेदापासून ते सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था ही दहा महिन्यांची सांगितली आहे. भिंतीवर दिनदर्शिका नसतांनाच्या काळात हा महिना कसा मोजला असावा? ह्या शंकेचे निरसन आयुर्वेदाच्या चष्म्यातून देणारा लेख.
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥
आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात,
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील सहज मिळू शकते. मग सामान्य प्राप्तीची कथा ती काय?
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि- मूर नावाच्या राक्षसाचे विद्विष् अर्थात शत्रू असणाऱ्या भगवान श्री विष्णूंना देखील अधिक आनंद देणारा असा हा नेत्रकटाक्ष आहे. 'श्रीहरींना देखील' हा उल्लेख मोठा महत्वाचा आहे. भगवंताचे स्वरूप आनंदरूप आहे. त्यांना बाहेरून आनंद मिळण्याची आवश्यकता नाही. त्यांनादेखील आनंद मिळतो. मग सामान्य दुखी जीवांना किती आनंद देत असेल? याचा विचार जागवणारा हा उल्लेख.
इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः- इंदीवर म्हणजे निळ्या रंगाचे कमळ. त्याचे उदर म्हणजे आपला गाभा. सहोदर अर्थात त्याच्या सौंदर्यासमान असणारा असा देवी इंदिरा म्हणजे आई लक्ष्मी चा नेत्रकटाक्ष आहे.
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् - शेवटी आचार्यश्री प्रार्थना करतात की आईचा तो दिव्य नेत्र कटाक्ष अर्ध क्षण का होईना माझ्यावर कृपादृष्टीवर्षाव करो. कारण माझ्या उद्धारासाठी तेवढाही पर्याप्त आहे.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
आपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत. हे मार्ग कोणकोणते ? याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात….
Copyright © 2025 | Marathisrushti