(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मधुमेहींसाठी आहारनियमन

    हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.

  • जुने ते सोनेच होते!

    ’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्‍यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!

  • अध्यात्म आणि सायन्स

    देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

    देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

    सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

    त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.

    आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

    1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
    ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभिगातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

    जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

    2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
    ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

    3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
    अ. कापूर जाळणे -- दृष्टी
    ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
    क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
    क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
    हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
    ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.

    अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
    मूर्तीच्या मागील बाजूस वभवतालात पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
    पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरातजरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

    मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..

  • सलिल चौधरी – प्रयोगशील संगीतकार!!

    चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील

  • गोठ्यातील गोचिडां पासून शुन्य खर्चात मुक्ती

    गोठ्यातील गोचिडांची पासून शुन्य खर्चात मुक्ती
    गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गोचिड झाल्यास
    उपाय १)
    १ किलो सिताफळ पाला +
    १ किलो कडूलिंब पाला +
    १ किलो करंज
    पाला कुटुन घ्यावा.
    १० लिटर पाण्यात २४ तास पाण्यात भिजवावा.
    नंतप गाळून गाईला पुसून घेणे तसेच,
    गोठयात फवारने ८ दिवसांनी परत करणे.
    उपाय २)
    गाईच्या गोमुत्रात खडे मिठ टाकून ते गाईच्या अंगाला लावून गाईना बाहेर सोडल्यास गोचिड निधून जाते नंतर साध्या पाण्यानी धुवावे
    उपाय ३)
    गोठ्यात भिंतीना ,चरणीला,( गव्हाणीला )दाराना,चुना लावावा .त्यामळे गोचीडीची वाढ होत नाही.
    हा नैसर्गिक उपाय व जनावरांसाठी आरोग्यदायी उपाय आहे.

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ११

    हृद्यं वेदांतवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् !
    सत्यं शांतस्वरूपं सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् !!
    जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि !
    क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो !! ११!!

    या स्तोत्राच्या अनेक आवृत्तीमध्ये प्रस्तुत श्लोक उपलब्ध नाही. मात्र कांची कामकोटि पीठाद्वारे प्रकाशित स्तोत्रावली मध्ये समाविष्ट असलेला हा अत्यंत सुंदर श्लोक.
    जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    हृद्यं - अत्यंत मनोहारी असणाऱ्या,
    वेदांतवेद्यं - वेदांत सारखा उपनिषदांमध्ये प्रतिपादित तत्वज्ञानाच्या द्वारे ज्यांची जाणीव होते असे,
    हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् - ज्यांच्या कृपा स्वरूपात हृदय कमला मध्ये भक्तीची दिव्य ज्योत प्रज्वलित होते असे,
    सत्यं - भूत, भविष्य वर्तमान या तीनही काळांच्या अतीत असणारे, परम सत्य,
    शांतस्वरूपं- काहीच मिळवायचे नसल्याने परमशांत असणारे, सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् - सगळ्या ऋषीमुनींच्या हृदय कमलरुपी समर्पणानेच जाळता येणारे,
    जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ- जागृती, स्वप्न व सुषुप्ति म्हणजे गाढ निद्रा या माझ्या तीनही अवस्थांमध्ये,
    त्रिगुणविरहितं - तीनही गुणांनी रहित असणाऱ्या,
    शङ्करं न स्मरामि - भगवान शंकरांचे मी कधीही स्मरण केले नाही.
    येथे आचार्यश्री सांगत आहेत की जीव हा तीन अवस्थांमध्ये सारखा तीन गुणांनी युक्त आहे. तर भगवान त्रिगुणातीत आहे. तीन गुणांमुळे प्राप्त होणाऱ्या सकल समस्यांच्या निराकरणासाठी स्थान एकच त्रिगुणातीत भगवान शंकरांची चरणकमले.
    पण जीव त्यांचे स्मरण करीत नाही.
    क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या अपराधा करित मला क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कॅन्सरच्या नवीन उपचार संशोधनांतील आयुर्वेदीय सिद्धांत !!

    कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या उपचारांत वा त्याला आळा घालण्यात किंवा त्याला रोखण्यात काही भूमिका बजावतो का?

    आपल्याला आश्चर्य वाटेल पण कॅन्सरच्या क्षेत्रातील तुलनेत ताजे मात्र परिणामकारक संशोधन हे आयुर्वेदीय सिद्धांतांवर आधारलेले आहे! या नव्या दालनाला Immunotherapy असे म्हणतात. या संशोधनातर्गत वापरण्यात आलेल्या औषधांना आता अमेरिकेत एफडीए चे प्रमाणपत्र मिळून त्यांचा उपचारांत वापरदेखील होऊ लागला आहे.

    Immunotherapy म्हणजे काय?

    थोड्क्यात सांगायचे झाल्यास; या प्रकारात रोगावर थेट औषध न देता आपल्या शरीरातील पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातो. आपल्या रक्तातील टी सेल्सना कॅन्सरच्या प्रोटीन्स आवरणाचे रूप बदलणाऱ्या पेशींना ओळखण्यास इंजेक्शनमार्फत काही औषधे देऊन प्रशिक्षित केले जाते. या संशोधनाने कॅन्सरच्या उपचारांत एक संपूर्ण नवा आयाम निर्माण केला असून हेच या उपचारांचे भविष्य असू शकते असे मतही जागतिक पातळीवरील कित्येक मान्यवर कॅन्सर उपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

    आयुर्वेद काय सांगतो?

    आपल्यापैकी कित्येकांना हे माहिती नसेल; पण रोगप्रतिकार शक्ती अथवा 'व्याधीक्षमत्व' हा शब्द जगाला सर्वप्रथम आयुर्वेदाने सांगितला आहे. पुन्हा त्याचेही दोन उपप्रकार आणि त्यांचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. रोगावर थेट हल्ला न करता शरीराची एकंदरीत परिस्थिती अशा प्रकारे सुधारणे की जेणेकरून तो रोग शरीरात घर करूच शकू नये असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. आयुर्वेदात 'स्वभावोपरम वाद' या शीर्षकाखाली हा विषय सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.

    आता आपल्या लक्षात आले असेल की नेमका हाच आयुर्वेदीय सिद्धांत वापरून सध्या आधुनिक वैद्यकाची वाटचाल सुरु असून; त्यांना याविषयी मोठा आधार वाटू लागला आहे. कॅन्सरचे रुग्ण आयुर्वेदीय पद्धतीने हाताळणारे शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न वैद्यगण याच सिद्धांताच्या आधारे उपचार करत असतात. (या क्षेत्रात आयुर्वेदाच्या नावाखाली भलत्याच लोकांकडून केली जाणारी लूटमार समोर असल्यानेच 'शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न' हे शब्द निवडले आहेत.) अर्थात; रोगाची अवस्था लक्षात घेऊन आणि क्वचित काही अपवाद वगळता बहुतांशी आधुनिक वैद्यकाच्या जोडीने हे उपचार दिले जातात. मात्र या संशोधनाने आयुर्वेदीय विचारसरणीला नव्याने बळकटी दिली आहे.

    अर्थात; लगेच आयत्या बिळावर नागोबा बनायचेदेखील कारण नाही. कारण हा सिद्धांत आणि संकल्पना आयुर्वेदाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. जोवर सध्या आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधनांच्या आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या परिस्थितीत आपदतलमस्तक बदल होऊन आयुर्वेदीय परिभाषा व सिद्धांतानुसार रिसर्च प्रोटोकॉल तयार होत नाही किंवा या संशोधनांची क्षमता कित्येक पटीने अधिक वाढत नाही तोवर या क्षेत्रात सध्याच्या युगात अधिकारवाणीने भाष्य करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला नसेल. अर्थातच; हे एकट्या- दुकट्याचे काम नसून त्याकरता शासकीय पातळीवरूनच बदल करावा लागेल. अन्यथा तिथेही अमेरिका वा जर्मनीसारखे आयुर्वेदाचे महत्व जाणणारे देश आहेच. आज या दोन्ही देशांत आयुर्वेदावर मुबलक संशोधने सुरु आहेत. आमच्या देशात मात्र एक वर्ग आयुर्वेद म्हणजे भंपकपणा हा मूर्ख समज (जाणूनबुजून) कवटाळून बसला आहे तर दुसरा वर्ग आयुर्वेद हा अमक्या- ढमक्या पण्यजीवी व्यक्तींमुळेच सर्व लोकांपर्यंत कसा पोहचला या मिथ्या स्वप्नरंजनात दंग आहे. प्राप्त परिस्थितीत उद्या या देशांतील 'वैद्य' आपल्या हिंदुस्थानात येऊन 'अष्टांगहृदय' वा 'चरकसंहिता' शिकवू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

  • दिवाळी आणि फटाके….!

    भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही.

  • जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

    भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते. 

  • जब भी कोई कंगना बोले’

    जगात दोन प्रकारची माणसे सापडतात…
    पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी..
    अगदी बचपनसे बुढापे तक..
    ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत..
    अगदी मरेपर्यंत..
    यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत..
    जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं 'वैकुंठा'ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..)
    तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण बनलय..हे लोक आपलं आयुष्य उतारवयातही मजा करत घालवतात...म्हणजे 'गळ' टाकतात..फ्लर्ट करतात..प्रेमात पडतात..
    ही माणसं अगदी मुन्नाभाई एम बी बी एस मधल्या गाण्यासारखे..'बचे चार आणे..वेस्ट न करना यार..' असे ठणकावून सांगणारे..अन 'डंके की चोटपर' तसे वागणारेही..
    शौकीन मधले तीन म्हातारडे असलेच अवलिये आहेत..
    (होते म्हणवत नाही,तिघे काळाच्या पडद्याआड गेले तरी)
    अशोक कुमार, ए.के.हंगल आणि (अच्छाs)उत्पल दत्त..
    आपापल्या इलाक्यात गुलहौशीपणा करणारे तीन मित्र..
    ए के हंगल हा बिझनेसमन आहे आणि आपल्या सेक्रेटरीलाच पटवायचा प्रयत्न करतोय..
    उत्पल दत्त घरमालक आहे व विधवा भाडेकरु बाईवर जाळे टाकतोय..
    आणि आपले दादामुनी…
    रोज घरासमोरुन जाता येता दिसणाऱ्या फटाकडीला डोळे भरुन पाहतात.. दुरुनच.'चंदा को चकोर निहारे' हे गाण्यातले वाक्य या सिनसाठीच..
    तर असे हे तिघे शौकीन..खरं तर आंबट शौकीनच..
    जीवाचा गोवा करायला निघतात. एका गोड तरुण पोरीला पटवायसाठी (हाय..हाय...रती अग्निहोत्रीss) काय काय उद्योग करतात हे या सिनेमात दाखवलाय.
    अर्थात सिनेमाची सगळी स्टोरी सांगणार नाही कारण हा लेख यातल्या गाण्यावर आहे..पण नमनाला घडाभर तेल यासाठीच की पार्श्वभूमी माहित असेल तर गाणे बघताना पटकन रिलेट होईल..
    हे गाणे मी हा सिनेमा दूरदर्शनवर रात्री पाहिला तेंव्हा पहिल्यांदा ऐकले..अन त्याच्या प्रेमात पडलो..
    परदेशी गेलेल्या मैत्रीणी प्रमाणे अनेक वर्ष हे गाणे फक्त मनात राहिले..कारण रेडिओवर हे फार वाजत नाही..
    तेंव्हा युट्यूब आणि गाण्याला वाहिलेले साइट्स नव्हते..
    तीन चार वर्षापूर्वी परत गाणं शोधून काढलं..
    अन पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडलो..
    गीतकार योगेश हा माणूस दिग्दर्शक बासू चॅटर्जीचा आवडता..पण यात संगीतकार म्हणून सलीलदांऐवजी आर.डी..आणि गाणे गायला किशोरकुमार..
    आहाहा..
    मग काय म्हणता...अशी मस्त भट्टी जमलीय..
    की इथे पिउन उठणारा फुल्ल टाईटच..
    एकतर योगेशजींनी हे गाणं इतकल चपखल लिहिलय की बस्स..आंबटशोकीन म्हाताऱ्यांची मनोवस्था बरोबर पकडलीय त्यांनी. आर.डी.ने खरे तर वडिलांच्याच एका बंगाली गाण्यावरुन ही चाल बेतलीय म्हणे.. (मेरे बापका माल है..तेरेको क्या..?)पण या गाण्यासाठी चाल इतकी भारी जमलीय की यंव रे यंव..
    आणि त्यात त्याने मधला अंतऱ्यातला जो जिवघेणा म्युझीक पिस टाकलाय की प्रत्येकवेळेला मी ऐकताना मी मागे जाउन तो पुन्हा ऐकतो..आई.ग..ss
    आणि किशोरदानचे तर काय सांगावं…
    आमच्या सांगली कोल्हापूरच्या भाषेत 'जाळ आणि धुर संगाटच'..! एकतर किशोरच्या आवाजातल्या गाण्यात अशोककुमार डान्स करताहेत हा दुग्धशर्करा योग या गाण्यात आलाय..किशोरदाने इतक तब्येतीत गाणे गायलय की बस्स..आपण फक्त म्हणायचं..मजा आ गया..
    तर असे हे गाणे..
    किशोर-आर डी च्या 'बडव्यां'ना नक्कीच माहित असणारे..पण हा लेख प्रपंच इतर वारकऱ्यांसाठी आहे..
    बघा मग गाणं...लिंक देतोय..

    ता.क- हे गाणे ऐकून दादामुनी इस्टाईल नाचावेसे वाटल्यास ते काम घरात न करता बिल्डींगच्या टेरेसवर करावे.. लॉकडाउन मुळे घरीच असणाऱ्या बायका पोरांना (आणि शेजारणींना) फेफरं यायला नको..

    इत्यलम..!

    https://youtu.be/ZWkucLNdyKE

    -- सुनील गोबुरे.