(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक भारतीय नागरिक

    मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.

    सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.

  • त्यांनी चारशे मासोळ्या निर्वंश केल्या

    आफ्रिकेच्या व्हिक्टोरिया सरोवरात सोडलेल्या ‘नाईल पर्च’ माशाने लहान ‘सिचलीड’ मासोळी खाण्याचा सपाटा लावला व मासोळी निर्वंश होण्याची वेळ आली.

  • लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

    लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या महिन्यापासून बाळाला दात येण्यास सुरुवात होते.

  • डाळींब

    ।। बटवे नम: दाडीमपत्रं समर्पयामि।।

    डाळींब हे फळ जितके पौष्टीक तितकेच दिसायला आकर्षक असून त्याची आंबट गोड चव आपल्या सर्वांनाच आवडते.जसे हे फळ रूचकर लागते तसेच ते औषधी गुणांनी परिपूर्ण अाहे म्हणूनच ह्याची पाने पत्रीमध्ये समाविष्ट केली आहेत.

    ह्याचे ३-५ मीटर उंचीचे वृक्ष असते.काण्ड त्वचा धुरकट तांबडी असते व गुळगुळीत असते.पाने ५-७ सेंमी लांब व तीन सेंमी रूंद असून दोन्ही टोकास निमुळती असतात.फुले लाल एकल अथवा क्वचित २-४ च्या गुच्छात असतात.फळ गोल,५ सेंमी व्यासाचे व भरपूर कोष युक्त असते.फलत्वचा चिवट असते.

    ह्याचे उपयुक्त अंग आहेत फलत्वचा,मुलत्वचा,व फल.ह्याची चव गोड,तुरट,आंबट असून हे अनुष्ण गुणाचे असते तसेच हल्के व स्निग्ध असते.हे शरीरातील तिन्ही दोष शमन करते.

    चला आता ह्याचे उपयोग पाहूयात:

    १)सालीचा काढा जखम धुवायला तसेच घशाच्या रोगात उपयुक्त आहे.

    २)उल्टी मळमळ ह्यात फळाचा रस उपयुक्त आहे.

    ३)कृमींवर डाळींबाच्या मुळाचा काढा उपयुक्त आहे.

    ४)जुलाब होत असल्यास सुकवलेली डाळींबाची साल उपयुक्त आहे.

    ६)डाळिंबाचे फळ हृदयास हितकर असून रक्त वाढवायला मदत करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • हेलन… नृत्य हेच तिचे व्यक्तीमत्व

    ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा… शम्मी कपूर संगीतकार राहुल देव बर्मनच्या युथफुल ट्यूनवर मोहम्मद रफीच्या आवाजाला नेमके पकडत अंगाला जमतील तितके आळोखे पिळोखे देत बेभान नाचतोय (त्याची ती स्टाईलच आहे) आणि अशातच… ओ अंजाना धुंडती वो परवाना धूंडती हू असे आशा भोसले यांच्या मादक आवाजाचा नेमका सूर पकडून हेलन गाण्यात एन्ट्री करते आणि संपूर्ण पडदाभर नृत्याचा वेगळा आविष्कार दिसतो. हा जणू एक प्रकारचा नृत्याचा सामना.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग तेहेतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

    धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक

    नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.

    भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत "ड्रम किंवा बॅरल" तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !

    धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.

    जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर "गुरू" असतात. "गुरू" असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !

    आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर "आमा" सारखे दोष कमी होतात.

    फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. .... म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । - इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.

    प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !

    धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच "काळ" हे पण मोठे प्रभावी औषध आहे.

    ठराविक "काळ" निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.05.2017

  • पक्षीपरीचय २

  • याला जीवन ऐसे नाव भाग १२

    वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते.

    जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन,
    पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे होते. पुनः तो गरम होण्यासाठी जास्ती अग्निची आवश्यकता पडते. तसेच, पचन पूर्ण होण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. त्यावेळी त्यावर पाणी ओतून चुलीतील पेटलेला अग्नि विझवण्याचे पाप करू नका. असे केल्याने अन्न पोटात तसेच पडून रहाते आणि जाडी वाढते.

    आणि जेवता जेवता पाणी पिल्याने शरीर संघटन जसे आहे, तसेच राहाते. मिक्सरमध्ये नारळ वाटता वाटता जर पाणी घातले तर नारळाचा उत्तम रस निघतो. तसे आहे. वाग्भटाचार्यांच्या ग्रंथातील सूत्रस्थान 5-14 या श्लोकामधून ही माहिती मिळते.

    पाणी कमी करण्यासाठी, आर्द्रता कमी. होण्यासाठी, अग्निची आवश्यकता असते.
    पाणी आणि अग्नि एकमेकाचे पिढीजात शत्रू. जिथे पाणी वापरले जाते, तेथील अग्नि नाहीसा होतो, या व्यावहारिक सत्याला आरसा कशाला हवा ?

    एकदा एका लमाणी माणसांच्या तांड्याशी संवाद साधण्याची संधी शोधली. एका सकाळी 9 वाजता घरातील (घर कुठले, तंबूच ) सर्व आवरून, घरातील सर्व माणसासकट, ही मंडळी आमच्याच घराच्या बाजूला एका स्लॅब घालायच्या कामाला आली. पहिलं काम केलं ते डबे खाण्याचं. त्यांच्या डब्यावर माझं लक्ष होतं. जसं शिंप्याचं लक्ष कपड्याच्या डिझाईनवर, बूट पाॅलिश करणाऱ्याचं लक्ष बूटावर, केशकर्तनकाराचं लक्ष केसांच्या स्टाईलवर असतं, तसं माझं लक्ष खाण्याच्या डब्यावर !

    डब्यात डाळ भात भाकरी आणि लसणाची सुकी चटणी. कापडात गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्यांची चवड. त्याच्यावरच लसणाचा लालभडक गोळा. मी त्यांना विचारलं, एवढ्या भाकऱ्या भाजायला सकाळी कधी वेळ मिळाला ? त्यावर त्या लेकुरवाळ्या माऊलीने उत्तर दिलं. "आज नाही भाजल्या, बुधवारी सुटी असते, तेव्हाच भाजून ठेवल्या." मी उलटे दिवस मोजायला सुरवात केली. तो वार होता सोमवार. म्हणजे बुधवार ते सोमवार तब्बल सहा दिवसापूर्वी भाजलेल्या भाकऱ्या ती आत्ता खात होती. मी भाकरी हातात घेऊन बघीतली. कडकडीत पापडच जसा ! मी विचारले, एवढे दिवस या भाकऱ्या टिकल्या कश्या ? ती आपल्या भाषेत म्हणाली, "ते मला माहिती नाही, पण आमच्या भाकरी खाऊन झाल्या की उरलेल्या भाकऱ्या आम्ही सूर्याला दाखवतो."

    कानाखाली झणकन मारल्यासारखे तिचे शब्द कानात घुसले. विज्ञानातले एक व्यावहारिक सत्य त्या अशिक्षित, निरक्षर माऊलीने सहजपणे मला उलगडून दाखवले होते.

    भाकरी सूर्याला दाखवतो, सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. दगडाच्या राशीवर भाकऱ्या पसरून ठेवतो, म्हणजे सूर्य त्यातील पाणी आपल्या उष्णतेने शोषून घेतो आणि त्या टिकवतो. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ जास्त दिवस टिकतो, हे व्यावहारिक, त्रिकालाबाधीत, वैश्विक सत्य तिच्याकडून मला शिकायला मिळाले होते.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.12.2016

  • मलेरियाची अफ्रिकेतील समस्या

    मलेरिया व बर्किट लिम्फोमा - ( एक प्रकारचा कॅन्सर ) यांचा संबंध

    बर्किट लिम्फोमा हा एक प्रकारचा जबड्याच्या खालच्या बाजूचा कॅन्सर असून तो अफ्रिकेत व मुख्यतः लहान मुलांमध्ये ९ ते १२ वर्षे या वयोगटात आढळतो . आता जगातील दुसऱ्या काही भागातूनही अशा केसेस नोंदल्या गेल्या आहेत .

    प्रसिद्ध सर्जन डॉ . बर्किट व त्यांचे दोन सहकारी डॉ . क्लीफ नेल्सन व डॉ . टेड विल्यम यांनी अफ्रिकेत १० आठवड्यामध्ये १०,००० मैलाचा प्रवास केला व ५७ हॉस्पिटलस्ना प्रत्यक्ष भेट दिली . साधारण १ ९ ६० सालाच्या सुमारास हा सर्व प्रवास त्यांनी २०३५ डॉलर्स खर्चून केला . यामधून निष्कर्ष असा निघाला की बर्किट लिम्फोमाची भौगोलिक स्तरावरील उपस्थिती ही मलेरिया रोगाच्या भौगोलिक विभागातील उपस्थितीशी तंतोतंत जुळणारी होती . हा लिम्फोमा एखाद्या विषाणूमुळे होत असावा व त्यासाठी डास त्याचा वाहक असावा असे वाटत होते . विविध प्राण्यांमध्ये विषाणूंमुळे कर्करोग होतो हे सिद्ध झालेले आहे . परंतु माणसांतही विषाणू हे कर्करोग निर्माण करू शकतात हे सिद्ध झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती . १ ९ ६४ मध्ये Epstein व Barr यांनी या कॅन्सरच्या गाठींमधून विषाणू अलग केला .

    याठिकाणी मलेरियाचा संबंध असा आला की सतत होणाऱ्या मलेरियामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व त्यामुळे संरक्षण देणाऱ्या T. Lymphocytes निष्प्रभ ठरतात . T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ झाल्याने बर्किट लिम्फोमा होतो . तसेच मलेरियाचे परोपजीवी CIDRI नावाचे प्रथिन तयार करतात ज्यामुळे Ebstein Barr Virus वाढण्यास मदत होते . हे विषाणू T. Lymphocytes ची अनियंत्रित वाढ घडवितात व त्यामुळे लिम्फोमा होतो . या परिस्थितीत E B Virus मलेरिया व बर्किट लिम्फोमा असे संगनमत घडून येते .

    अर्थात प्रत्येक मलेरिया रुग्णाला हा कर्करोग होण्याची अजिबात शक्यता नाही .

    अफ्रिकेतील एक अनुभव

    अफ्रिकेतील काही भागात एका विशिष्ट प्रकारच्या परोपजीवांमुळे ( Onchocer ciasis , River blindness ) हा डोळ्याचा रोग होतो . त्यासाठी Ivermectin or Mectizan हे प्रभावी औषध दिले जाते . असे आढळून आले आहे की हे औषध घेतलेल्या रुग्णांना ज्यावेळी डास चावतात तेव्हा ते डास लवकर मरतात . यावरून काही शास्त्रज्ञांना असे वाटते की हे औषध माणसाला दिल्यास ते डासांसाठी मृत्यूला कारण ठरू शकेल . साधारणत : नवीनच तयार ( young ) झालेल्या डासांमध्ये मलेरियाच्या परोपजीवींची पुरेशी वाढ झालेली नसते परंतु या परोपजीवींची पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व ( old ) झालेल्या डासांकडून मलेरिया रोगाचा प्रसार होण्यास जास्त मदत होते . अशा औषधाने डासांचे आर्युमान कमी केल्यास मलेरिया प्रसारावर आळा घालता येईल .

    ह्या अचाट प्रयोगात कायम स्वरुपाचे यश मिळविण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत . हे औषध सरसकट सर्वांना देणे कितपत योग्य ठरेल याबाबत शास्त्रज्ञ साशंक आहेत .

    मनुष्य घेतो गोळी -डास घेतो चावा आणि मृत्यु होतो डासाचा !
    ( From The American Journal of tropical Medicine July 2011 , Quote Indian Express -13/07/2011 )

    दुर्गंधित मोज्यांचा मलेरिया या रोगाच्या निर्मूलनासाठी होणारा उपयोग

    एखाद्या उघड्या जागेवर वापरलेल्या जुन्या मोज्यांचा ढीग करून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधाकडे डास आकर्षिले जातात असे आढळून आले आहे . अशा तऱ्हेने फसवणूक करून ह्या डासांना एकत्रित केल्यानंतर त्यांच्यावर डासांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी रसायनाचा फवारा मारल्यास ते डास मरतात . अशा आकर्षण पद्धतीने डास एकत्रित होण्याचे प्रमाण वाढविता येते असा दावा टांझानिया इफाकारा संस्थेचे प्रमूख डॉ . फ्रेड्रॉस ओकुमु यांनी केला आहे .

    प्रगत देशात मलेरियाचे प्रमाण कमी होत आहे परंतु विकसनशील देशात हे प्रमाण वाढतच आहे . डच वैज्ञानिक डॉ . बार्ट नोल्स यांनी प्रथम वरील सिद्धांत मांडला . ते स्वतः एका काळोख्या खोलीत नग्नावस्थेत उभे राहिले व त्यांनी दाखवून दिले की डास पायाच्या वासाकडे सर्वांत जास्त आकर्षिले जातात .

    ओकुमु यांनी आठ रसायने एकत्रित करून पायमोज्यांना येणाऱ्या वासासारखे रसायन तयार केले आहे . शिवाय डासांना मारण्यास योग्य असे विषारी द्रव्यही प्रयोगशाळेत बनविले आहे . त्यांचा दावा आहे की ९ ५ टक्के डास या पद्धतीने मरतात . या संशोधनासाठी डॉ . ओकुमु यांना बिल गेट फाऊंडेशन कडून आठ लाख अमेरिकन डॉलर्सची भरघोस मदत मिळालेली आहे .

    हे रासायनिक सापळे माणसांच्या घरांच्या फार जवळ ठेवणे योग्य नाही कारण तेथे आकर्षित झालेले डास माणसांनाही चावण्याची शक्यता जास्त असेल . त्याचप्रमाणे ते मनुष्य वस्त्यांपासून फार दूर ठेवले तरी तेथे फारसे डासांचे वास्तव्य नसल्याने प्रयोग उपयोगी ठरणार नाही . आज या रासायनिक सापळ्यांची किंमत ४ ते २० डॉलर्सच्या दरम्यान आहे . मानवी जीवन वाचविण्यासाठी ही दुर्गंधीयुक्त मोज्यांची योजना कितपत यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न शास्त्रज्ञांपुढे आहे .

    -डॉ. अविनाश वैद्य

  • दुष्काळ खालपासून वरपर्यंत पसरलेला !

    आमच्या गुणवत्तेवर नव्हे, तर आमच्या जातीचा गौरव करण्यासाठी आम्हाला मंत्रिपद मिळाले, यात धन्यता मानणारे मंत्री या देशात असतील, तर सगळ्याच प्रकारच्या दुष्काळांचा आपल्याला सामना करावा लागेल. ज्या दिवशी या देशाचे सरकार, या देशाची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे लोक आणि या देशातील लोकप्रतिनिधी केवळ गुणवत्तेवर, नैतिक आचरणावर निवडले जातील त्याच दिवशी या देशाचा दुष्काळ खंडीत होईल!