वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१९२० साली याच दिवशी नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.
नुकतीच एक बातमी वाचली की पुण्याच्या एका प्रसिध्द संस्थेत कायदा शिकणार्या मुलांनी एका मुलाचे रॅगिंग केले त्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्या मुलाच्या पाठीवर ‘माझे वडील पोलीस आहेत आणि ते गैरमार्गाने पैसे मिळवतात’ अशी पाटी लिहुन त्याला सगळीकडे हिंडवण्यात आले त्यामुळे त्याने आत्महत्या केली. हे सर्व धक्कादायक होते. पण यातून बरेच प्रश्नही निर्माण होतात.

१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.
१६ एप्रिल १८५३ च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने १४ डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली, त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून, तशाच प्रकारचे जुने दुर्मिळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू कार्यक्रमाला झालेल्या तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर, रेल्वेमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, वेदप्रकाश गोयल, राम नाईक, दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल, जयवंतीबेन मेहता व मुंबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.
दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ व ८ वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर, मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता, छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली.
रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले, की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस, १६ एप्रिल २००२ महत्त्वाचा आहे.
तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले, आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता, मात्र दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.
ठीक ३.३५ वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून निघाली, तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टर्मिनस सोडल्यानंतर मस्जिदबंदर, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मुंबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.
दीडशे वर्षांपूर्वीच्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की १६ एप्रिल २००२ रोजी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गर्दी एवढी वाढली, की रेल्वेचे इतर मार्ग गर्दीने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या.
दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गर्दीने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं, धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल, कुर्ला स्टेशन, घाटकोपर, विक्रोळी, कांजुर-मार्ग, भांडूप, मुलुंड या साऱ्या ठिकाणी गर्दीचा महापूर लोटला होता.
ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतर्फे पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर ४.४५ वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या, शिट्टया, आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.
५.४० वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुर्मिळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर ६.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.
-- टिम मराठीसृष्टी
शाळा-कॉलेजमधले आपले शिक्षण पूर्ण झाले. शैक्षणिक वर्षाला एक पूर्णविराम असतो.पण एकदा नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवण्यासाठी, उच्च पदावर जाण्यासाठी पुन्हा अभ्यास करावाच लागतो. व्यवसायात आणि पेशातही तसेच आहे. फरक एवढाच आहे, प्रशासकीय सेवेत असणार्या किवा बँक कर्मचार्यांना स्वतःच्या पैशांतून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. व्यावसायिकाला मात्र धंद्यात टिकून राहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी स्वतः पदरचे पैसे खर्च करावे लागतात.
गुरुंची साथ मिळालेल्या शिष्याचा उद्धार हा निश्चित स्वरुपात होणारच. त्याच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्याला जिवनामधल्या संकटांना सुक्ष्म रुपात पाहण्याची एक अलौकीक दॄष्टी मिळते. आणि आपल्या शिष्याला त्याच्याही कळत-नकळत त्याच्यातील अवगुणांपासुन त्याची सुटका करणे हे साक्षात सदगुरुचं वैशिष्टय….
जाणोनी लोटली मी या वादळात होडी’ ही सचोटी भीमसेन यांच्या गाण्यात जशी होती तशीच गाडी चालवण्याबाबत. गाणं असेल तेव्हा किंवा डोक्यात राग असला की भीमसेन निघालेच ड्रायव्हिंग करत. वाट कुठे फुटेल तिकडे. ते कोठे हे त्यांना देखील माहित नसायचं. त्यामुळे इतरजण शोधत बसत कुठे कुठे…
स्वतःला अलीकडच्या काळात निवांत कधी भेटला आहात ? आणि स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं इतक्यात कधी निरखून पाहिलंय? जन्मल्यापासून आपण फक्त आणि सदैव स्वतःच्याच सान्निध्यात असतो. स्वतःला इतर कोणाहीपेक्षा आपणच अधिक ओळखत असतो. पण हे “ओळखपत्र ” बाह्य असतं की अंतर्गत? वपु म्हणतात- ” ओळखपत्रासारखं विनोदी दुसरं काही नाही. आपण कसे आहोत हे दाखविण्यापेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवतं.” असं तर आपल्याबाबतीत घडत नाही नं, हा प्रश्न एकदातरी स्वतःला विचारायलाच हवा.
प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.
सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !
हेच भारतीयत्व !
बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी "हात" असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?
भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.
कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.
दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.
पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.
शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.
आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.
समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.
आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.
जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर "सर्व्ह" केल्यासारखं होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
17.03.2017
विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .

Copyright © 2025 | Marathisrushti