वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.
याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुपवरुन
कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या उपचारांत वा त्याला आळा घालण्यात किंवा त्याला रोखण्यात काही भूमिका बजावतो का?
आपल्याला आश्चर्य वाटेल पण कॅन्सरच्या क्षेत्रातील तुलनेत ताजे मात्र परिणामकारक संशोधन हे आयुर्वेदीय सिद्धांतांवर आधारलेले आहे! या नव्या दालनाला Immunotherapy असे म्हणतात. या संशोधनातर्गत वापरण्यात आलेल्या औषधांना आता अमेरिकेत एफडीए चे प्रमाणपत्र मिळून त्यांचा उपचारांत वापरदेखील होऊ लागला आहे.
Immunotherapy म्हणजे काय?
थोड्क्यात सांगायचे झाल्यास; या प्रकारात रोगावर थेट औषध न देता आपल्या शरीरातील पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातो. आपल्या रक्तातील टी सेल्सना कॅन्सरच्या प्रोटीन्स आवरणाचे रूप बदलणाऱ्या पेशींना ओळखण्यास इंजेक्शनमार्फत काही औषधे देऊन प्रशिक्षित केले जाते. या संशोधनाने कॅन्सरच्या उपचारांत एक संपूर्ण नवा आयाम निर्माण केला असून हेच या उपचारांचे भविष्य असू शकते असे मतही जागतिक पातळीवरील कित्येक मान्यवर कॅन्सर उपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आयुर्वेद काय सांगतो?
आपल्यापैकी कित्येकांना हे माहिती नसेल; पण रोगप्रतिकार शक्ती अथवा 'व्याधीक्षमत्व' हा शब्द जगाला सर्वप्रथम आयुर्वेदाने सांगितला आहे. पुन्हा त्याचेही दोन उपप्रकार आणि त्यांचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. रोगावर थेट हल्ला न करता शरीराची एकंदरीत परिस्थिती अशा प्रकारे सुधारणे की जेणेकरून तो रोग शरीरात घर करूच शकू नये असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. आयुर्वेदात 'स्वभावोपरम वाद' या शीर्षकाखाली हा विषय सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
आता आपल्या लक्षात आले असेल की नेमका हाच आयुर्वेदीय सिद्धांत वापरून सध्या आधुनिक वैद्यकाची वाटचाल सुरु असून; त्यांना याविषयी मोठा आधार वाटू लागला आहे. कॅन्सरचे रुग्ण आयुर्वेदीय पद्धतीने हाताळणारे शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न वैद्यगण याच सिद्धांताच्या आधारे उपचार करत असतात. (या क्षेत्रात आयुर्वेदाच्या नावाखाली भलत्याच लोकांकडून केली जाणारी लूटमार समोर असल्यानेच 'शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न' हे शब्द निवडले आहेत.) अर्थात; रोगाची अवस्था लक्षात घेऊन आणि क्वचित काही अपवाद वगळता बहुतांशी आधुनिक वैद्यकाच्या जोडीने हे उपचार दिले जातात. मात्र या संशोधनाने आयुर्वेदीय विचारसरणीला नव्याने बळकटी दिली आहे.
अर्थात; लगेच आयत्या बिळावर नागोबा बनायचेदेखील कारण नाही. कारण हा सिद्धांत आणि संकल्पना आयुर्वेदाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. जोवर सध्या आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधनांच्या आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या परिस्थितीत आपदतलमस्तक बदल होऊन आयुर्वेदीय परिभाषा व सिद्धांतानुसार रिसर्च प्रोटोकॉल तयार होत नाही किंवा या संशोधनांची क्षमता कित्येक पटीने अधिक वाढत नाही तोवर या क्षेत्रात सध्याच्या युगात अधिकारवाणीने भाष्य करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला नसेल. अर्थातच; हे एकट्या- दुकट्याचे काम नसून त्याकरता शासकीय पातळीवरूनच बदल करावा लागेल. अन्यथा तिथेही अमेरिका वा जर्मनीसारखे आयुर्वेदाचे महत्व जाणणारे देश आहेच. आज या दोन्ही देशांत आयुर्वेदावर मुबलक संशोधने सुरु आहेत. आमच्या देशात मात्र एक वर्ग आयुर्वेद म्हणजे भंपकपणा हा मूर्ख समज (जाणूनबुजून) कवटाळून बसला आहे तर दुसरा वर्ग आयुर्वेद हा अमक्या- ढमक्या पण्यजीवी व्यक्तींमुळेच सर्व लोकांपर्यंत कसा पोहचला या मिथ्या स्वप्नरंजनात दंग आहे. प्राप्त परिस्थितीत उद्या या देशांतील 'वैद्य' आपल्या हिंदुस्थानात येऊन 'अष्टांगहृदय' वा 'चरकसंहिता' शिकवू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
1] Big-bang Theory_ (विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत):
हे विश्व एका महा स्फोटातून निर्माण झाले .हे सांगणारा हा सिद्धांत आहे. हजार /लाखो वर्षांपूर्वी एक भयंकर स्फोट झाला त्यातून जी काही energy व particles बाहेर पडले त्यातून हे विश्व निर्माण झाले . ते कसे हे सिद्ध करण्यासाठी Dark matter, String theory आणि काही Dimensional concept पूर्ण व्हायला हव्या. पण जर प्रश्न विचारला Big-bang पूर्वी काय होते ? काहीच नसेल तर शून्य म्हणावे वे लागेल पण science Big-bang’ पर्यंत थांबते पुढे जाण्यासाठी सद्या काही समीकरण उपलब्ध नाही research चालू आहेत. असे scientist सांगतात.
पण अध्यात्म याचे उत्तर देते जसे “ पाहिजे कवण हे अवघे विए | तव मूळ ते शून्य || ” (ज्ञाने 8.24) वरील वाक्य ज्ञानेश्वरी मधले आहे त्याचा अर्थ – हे सर्व कोणी निर्माण केले पहाता मुळातून शून्यातून निर्माण झाले असे दिसते .(It means the world is created
by out of nothing), असेच गीतेतील एक श्लोक आहे” अव्यक्तात व्यक्त: सर्वा: प्रभवत्न्हयहरागमे “| (भ.गी:8.18) अर्थ – हे विश्व अध्यात्मिक द्रष्ट्या अव्यक्तातून दिसते. अर्थात हे विश्व शून्यातून निर्माण झाले परंतु हे अध्यात्माचे बोल आहेत आणि विज्ञान अध्यात्माला मानत नाही. कारण स्वाभाविकच आहे या Theory चाच विचार करूया ; विज्ञान हे अस्तित्वाची सुरवात शोधत आहे पण का ? कारण त्याला असे वाटते म्हणजे विज्ञाना अनुसार सर्वच गोष्टींची सुरवात आणि शेवट असते वाक्य तार्किक असल्याने बुद्धीला पटते पण कारण प्रत्येक गोष्टीची सुरवात पाहायला मिळते , माणूस जन्मतो-मरतो , वस्तु तयार होतात/बनतात पुन्हा नष्ट होतात . पण बनणे किंवा मिटणे म्हणजे सुरवात वा शेवट नव्हे . जे नष्ट होते किंवा बनते ते त्या पूर्वी दुसर्या form/state मध्ये असतेच जसे बर्फ नष्ट झाल्यावर त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही फक्त स्वरूप बदलते, त्याहून पुढे पाण्याला नष्ट केले तरी ते वाफ होईल पण अस्तित्व राहते अवस्था मात्र बदलेल. तसेच इतर सर्व गोष्टी बाबत आहे आपल्याला सुरवात आणि अंत दिसतच नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टी बनू शकतात मिटू शकतात पण सुरवात ठरवता येणार नाही कारण ते अस्तित्व असतं ते हमेशा असतचं काही नसणं हे सुधा काहीतरी अस्तच. आपण भारतीय जे नाही त्याला शून्य म्हणतो म्हणून अस्तित्वाची निर्मिती शून्यातून झाली असे अध्यात्म सांगते आणि यालाच Quantum theory सुधा आधार देते .
पूर्वी ठीक होतं पण आज मात्र विज्ञानाला हे पटत आहे. कारण ज्या पदार्थाचा सर्वात लहान Particle- Atom हा दृश्य स्वरुपाचा होता त्यामुळे हे जग दृश्य स्वरुपाचे होते . आज Atom च्या पुढे नवीन Particle-Quark व Sub-quark ,String. इत्यादि हे अदृश्य स्वरुपाचे आहेत . मग हे जग दृश्य कसे होईल . आणि यामुळेच Dimensional concept आली आणि अदृश्य जगाची / विज्ञानाची सुरवात झाली And therefor this is a beginning of invisible world and Science.
खाली next theory दिली आहे.
To be continued … In next Article /PART:3 Starting from MULTIVERSE & DIMENTIONS…
पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता.
यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
या लक्षणांकडे बघा
* त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
* यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
* सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
* पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
* सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे
* दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते
* मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.
जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
* मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
* स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
* अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
* ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
* हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
निरोगी यकृतासाठी योग्य आहार
यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
* शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
* ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
* सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
* कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
* भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
* यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
* मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
* दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
* हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
* काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. रामदास जाधव
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्हणजे कमळ आणि “आलय” म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते.
रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक वर्षांनी घरी आले आहेत, पण मुलांना लहानपणापासून ते माहीतच नाहीत. मग मुलांना आपल्या वडिलांचीच अडचण होऊ लागते कारण त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होऊ लागतो. मुलं आपल्या भरकटलेल्या बापाला माफ करायला तयार होत नाहीत.
एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् ।
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां सुखरूपां
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ५॥
आई जगदंबेचे मानवी शरीरातील सूक्ष्मतम अस्तित्व म्हणजे कुंडलिनी शक्ती. नाभीजवळ साडेतीन वेटोळ्यात, वर्तुळाकारात ती सुप्तावस्थेत असते.
तिचा रंग अत्यंत आकर्षक लालबुंद वर्णिलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, नागिनचे पोर कुंकुमे अर्चिले , अशा सुंदर उपमेने तो लाल रंग दाखवितात.
योगमार्गाने या आदिशक्तीला जागृत केल्यानंतर तिच्या होणाऱ्या प्रवासाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,
मूलाधारादुत्थितवीथ्या विधिरन्ध्रं- मूलाधारा पासून वर सरकत वीथी म्हणजे मार्गाने विधिरंध्र म्हणजे मस्तकातील सहस्त्रार कमल, ब्रह्मरंध्रात पोहोचणारी.
ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पाठीच्या दांड्याच्या खाली असणाऱ्या मूलाधार चक्रातून ऊर्ध्वगामी होत स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशा चक्रांचा मार्ग पार करीत , ब्रह्मरंध्रात स्थिर होते.
सौरं चान्द्रं व्याप्य विहारज्वलिताङ्गीम् - सूर्यनाडी चंद्रनाडी स्वरूपात वर्णन केलेल्या इडा आणि पिंगला या नाड्यांना व्यापून, अत्यंत दिव्य तेजस्वी स्वरूपात असणारी.
सूप्तावस्थेत लालबुंद असणारी ही कुंडलिनी मार्गक्रमणा करताना अत्यंत तेजस्वी सुवर्णमयी स्वरूपात चकाकते. ' सुवर्ण नागिन लचकत मुरडत आकाशी चालली ' अशा स्वरूपात संत तिचे वर्णन करतात.
येयं सूक्ष्मात्सूक्ष्मतनुस्तां- ह्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर असणाऱ्या तिला. आई जगदंबे ला इथे सूक्ष्मातिसूक्ष्म म्हटले आहे . जी गोष्ट जितकी सूक्ष्म तितकी अधिक शक्तिशाली, असा शास्त्र सिद्धांत आहे. आई जगदंबा परमशक्ती असल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म.
सुखरूपां- तिचे हे ब्रह्मरंध्रात स्थिर होणे हेच परमसुख आहे. ते जिचे मूलभूत स्वरूप आहे अशा,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
प्रकाशन दिनांक :- 04/04/2004
विज्ञान आणि शास्त्रज्ञांसाठी अद्यापही आव्हान असलेले अनेक भौगोलिक चमत्कार आजही अस्तित्वात आहेत. अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगल हे असेच एक रहस्य आहे. अटलांटिक महासागरात असलेल्या या त्रिकोणी प्रदेशात कोणतीही वस्तू गडप होते.
Copyright © 2025 | Marathisrushti