(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिर्फ खिलौना छीना हैं

    १८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर - बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी " लाजते , पुढे सरते , फिरते " अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा - बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ - उताराचे आहे हो !

    हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि " ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि " तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं " .

    हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर - बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० - २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .

    पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .

    एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि " सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं "

    असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर - बाजार आणि " ऐ दिल हैं मुश्किल " या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव " अली " . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !

    तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .

    त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .

    गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .

    पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) " रोने और हँसने के बीचवाला रास्ता " असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर - बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात " . . . . दिल नही टूटा हैं " असं असतेच .

    " असन्गाशी संग , प्राणांशी गाठ " अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर - बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही " पाकिस्तान " असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच " ऐ दिल हैं मुश्किल " अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .

    याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर " अमीर - रईस " , " इजाजत - जसबात " , " मोहोब्बत - आदत " यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं " .

    अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! " फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं " ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .

    हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक - आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर " वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता " हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी " सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . " या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )

    नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि " कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते " . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर " रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना " तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " ?

    तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण " एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं " . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे " सिर्फ खिलौना छीना हैं " कि " दिल टूटा हैं " या प्रश्नाचा चक्रव्यूह .

    या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण " मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे " हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .

    पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे " तुझे नसणे मला अजमावत राहते " अशी अनुभूती देणारी .

    कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?

    नसणे की नडण हे तर नाहीच नाही .

    " ऐ दिल हैं मुश्किल " या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की " मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . "

    आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग " ऐ दिल हैं मुश्किल " चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे " अधूरे इश्क का जिक्र " , " प्यार मे जुनून ( वेडेपणा ) " , " दोस्ती मे सुकून ( दिलासा ) " असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . " गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं " हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , " जख्मों के कर्ज अदा नही होते " हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . " तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! " . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !

    तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की " आज जाने की जिद ना करो " . कारण

    " सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं "

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल - ९८२०२९२३७६
    Email - tilakc@nsdl.co.in

  • परमपुज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराजांची प्रवचने – भाग १

    अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे. शत्रू आहे. रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्वपरीने सद्-गुरु चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही. मानवावर अनेक प्रसंग येत असतात. परमेश्वराने,अनंतानी मानवाला शक्ती दिलेली आहे.

  • ब्रह्मगिरी फार उंच पर्वत

    वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो.

  • क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिन कसे वापरावे याची माहिती.

    क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिन मिळविण्याकरिता काय करावे लागते तसेच ते कसे वापरावे याची माहिती.

    नोटाबंदी हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल आहे. ज्यामुळे देशामध्ये विकासाचे नवीन मापदंड प्रस्थापित होतील. मोदींनी आता डिजिटल इकॉनॉमीच्या माध्यमातुन कॅशलेस इकॉनॉमीची ओळख भारतीयांना दिली आहे. भारतामध्ये नेहमीच कॅश इकॉनॉमीची गरज होती, पण नोटाबंदी मुळे आता लोकांना डिजिटल सिस्टीमचाही अधिक परिचय होईल. बँकांमध्ये जास्त खाती उघडतील, आपला उद्योग लहान असो अगर मोठा आता क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप मशिन ही काळाची गरज बनली आहे.

    क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप मशिनच्या सहाय्याने कसे वापरावे.
    आपला उद्योग लहान असो अगर मोठा कामाचा किंवा वस्तूंचा किंवा सेवेचा तात्काल मोबदला मिळविण्याकरिता क्रेडिट/डेबिट कार्ड, स्वाईप मशिनसोबत वापरणे हा एक उत्तम उपाय आहे. हे मशीन मिळविण्याकरिता काय करावे लागते तसेच ते कसे वापरावे या मशीनला EDC (Electronic Data Capture) किंवा PDQ (Process Data Quickly) असेही म्हणतात. हे मशीन वापरण्याने बरेचसे धोके टाळता येतात. रोख रक्कमच नसल्याने कोणी लुटून नेऊ शकत नाही किंवा नोटा जीर्ण होत नाहित. परंतु, या बरोबर दुसरा धोका संभवतो. कार्डाची प्रत तयार करण्यात काही लोक पटाईत आहेत. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सोबत जर गुप्त क्रमांक (पासवर्ड) मिळाला तर ते लोक त्या कार्डद्वारे खरेदी करू शकतील. सर्व साधारणपणे ही पद्धत सोपी, खात्रीशीर व तात्काळ पैसे मिळवून देणारी असल्याने माल किंवा सेवा विकणाऱ्याकरिता उत्तम आहे. यामुळे करचुकवेगिरीला बंधने पडतील व कर रचना सोपी व कमी खर्चिक होईल.

    क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप सोबत वापरण्याचे मूलभूत उपयोग
    या पद्धतीचा मूलभूत उपयोग खरेदी-विक्रीची माहिती तसेच पैशाच्या हस्तांतराची नोंद करण्याकरिता होते. हे मशीन चार्ज कार्ड करिताही उपयोगी आहे. या पद्धतीत जास्त झालेले पैसे परत करण्याचीही सोय आहे. अशा मशीन द्वारा पैशांच्या हस्तांतराची खातरजमा वैयक्तिक ओळख क्रमांकाची (PIN i.e. Personal Identification Number) माहिती पडताळून करता येते. एका ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यापारी असतील तर ते सर्व मिळून एकच मशीन वापरू शकतात.

    स्वाईपमशीन द्वारा पैसे हस्तांतर करण्याची पद्धत
    स्वाईप मशीन वापरण्याची पद्धत
    पूर्वी फक्त क्रेडिट कार्डच स्वाईप मशीन बरोबर वापरता येत असे तेंव्हा त्याला क्रेडिट कार्ड टर्मिनल असे म्हणत. आता मात्र डेबिट कार्ड बरोबरही वापरता येते. हल्ली म्हणूनच त्याला ईडीसी किंवा पीडीक्यू मशीन म्हणून ओळखले जाते. ते वापरण्याची पद्धत खाली दिली आहे.
    सर्वात प्रथम माल किंवा सेवा घेणारा म्हणजेच पैसे देणारा आपले कार्ड देणाराकडे सोपवितो.

    ते कार्ड घेऊन रोखपाल ते स्वाईप मशीनला असलेल्या छोट्या चीरेतून ते एकदा फिरवेल.
    हे कार्ड फिरवताना स्वाईप मशिन कांही महत्वाची माहिती स्वतः कडे साठवून ठेवतो. ती माहिती म्हणजेः कार्डवरील नांव, कार्ड क्रमांक, कार्ड वापराचा अतिम दिनांक तसेच व्यवहाराची जागा.

    ही माहिती कांही सेकंदातच ही सेवा पुरविणाराला पाठवली जाते. त्या करिता इंटरनेट हे माध्यम म्हणून वापरले जाते. सेवापुरवठादार योग्य पैसे ज्याला द्यावयाचे त्याच्या खात्यात जमा करतो. या प्रकारे व्यवहार पूर्ण होतो.

    जर काही अडकाठी आली तर सर्व माहिती भरण्याची सोय मशीनमध्ये असल्याने व्यवहार निश्चितपणे पूर्ण होतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर मशीनमधून निघणारी छापील पावती रोखपाल कार्डधारकाला देऊन त्यावर सही घेतो. ही सही कार्डवरील सहीशी रोखपाल पडताळून पाहतो व वस्तू अगर सेवा ग्राहकाला दिली जाते. जर सहीमध्ये दोष आढळला तर ते कार्ड धारकाचे नसल्याचे समजते. ही एक सुरक्षाप्रणाली अशा व्यवहारात वापरली जाते.

    भारतामध्ये कार्ड स्वॅपींग मशीन कोठे मिळते?
    या मशीनचा उपयोग आर्थिक कारणाकरिता होत असल्याने याला सक्षम संस्थेची मंजूरी आवश्यक आहे. या करिता बँक तसेच कार्ड पुरविणाऱ्या संस्थाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. हे काम बँकेमार्फत होते व बँकेबरोबर काँट्रॅक्ट करण्याची आवश्यकता आहे. या करिता संबंधिताचा कमीत कमी सहा महिने व्यवसाय अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

    अर्जासोबत कांही कागदपत्रे आवश्यक आहेत. ती खालीलप्रमाणेः-
    1. पैसे स्वीकारणाराच्या ओळखीचा पुरावा.
    2. व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
    3. व्यवसायाची परवानगी
    4. जर एकापेक्षा जास्त मशीनची आवश्यकता असेल तर त्याकरिता अर्जामध्ये नोंद असणे आवश्यक आहे.

    ईडीसी मशीनची किंमत तसेच भाडे प्रत्येक बँक स्वतः ठरविते. अर्ज करणाराला मशीन बसविण्याचे, जीपीआरएसचे मासिक भाडे तसेच इतर कर भरावे लागतात. ही सर्व माहिती बँक देते.

    ईडीसी मशीन घेताना लक्षात ठेवण्याची माहिती:-
    1. काँट्रॅक्ट मधील सर्व कलमे वाडून समजून घ्यावीत. त्यावर जर आक्षेप असतील तर त्यावर चर्चा करुन शक्य झाल्यास बदलून घ्यावीत.
    2. सर्व प्रकारचा खर्च निश्चित स्वरुपात नोंदविला पाहिजे.
    3. सर्वसाधारणपणे जी बँक जमाखर्च सांभाळते त्याच बँकेचे मशीन घ्यावे. त्यामुळे खर्च एकाच बँकेला देता येतो.

    ईडीसी मशीन वापरताना घ्यावयाची काळजी
    1. कार्ड तसेच स्लीपवरील सही एकाच व्यक्तीची असली पाहिजे. जर शंका आली तर पॅन कार्ड, आधारकार्ड किंवा वाहनचालक परवाना पाहून खात्री करुन घ्यावी.
    2. ईडीसी मशीन वापरात नसताना त्याला कूलूप लावण्याची सोय असावी. दुरुपयोग होऊ नये म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे.
    3. हे मशीन वापरण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
    4. व्यवहाराची कागदोपत्री नोंद ठेवण्याकरिता प्रिंटरची सोय आवश्यक आहे.

    या बद्दलची अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वापरुन व्हिडीओ बघता येतील. https://www.youtube.com/watch?v=DIJzERqSTzg
    How To Deposit Cash easily in SBI Cash Deposit Machine
    https://www.youtube.com/watch?v=GI1LF_jPyZ0
    In Hindi
    https://www.youtube.com/watch?v=jttEUNSIlHc
    State Bank Of India Launch Point of Sale Machine : https://www.youtube.com/watch?v=sds8MGijiPk
    Chhota ATM: https://www.youtube.com/watch?v=In50rh6GNi8
    How to Install Mini ATM:
    https://www.youtube.com/watch?v=BOCiytcGZPo
    https://www.youtube.com/watch?v=XctlXcO1VNA

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • दांडी यात्रेचा दिवस

    ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला.

  • बाळाला द्या कॅल्शिअम

    बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.

    बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.

    लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.

    बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.

    प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे "ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. "ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! "ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
    जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.

    मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व "ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.

    जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.

  • मराठा आरमार दिन – भाग-२

    आपल्या देशात आरमारी सामर्थ्याचे महत्व प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यांच्या निधनानंतर बलाढ्य आरमार हे त्यांचे सुत्र धरुन कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला जावा.शत्रुंनी त्यांचा उल्लेख समुद्री चाचे असाच करायचे खरं तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि हे सर्व शत्रु चाचे आहेत.इंग्रज त्यांना जमिनीवरचं आणि पाण्यातलं जे मिळेल ते गिळंकृत करणारा 'लॅण्डशार्क' म्हणायचे.. इंग्रजांनी कान्होजींना लुटारु,चांचा,खलपुरूष,बंडखोर सगळं काही म्हणुन घेतलं आणि आपल्या वकिलांना त्याच्या दारी तिष्ठत राहायला पाठवताना मात्र 'त्याच्याशी सभ्यपणे बोलावे' अशा सूचनाही दिल्या. पोर्तुगिजींनी तर कान्होजीला गलिच्छ शिव्या दिल्या तरीही त्यांची बार्बारोसाशी (तुर्की साम्राज्याचा नौसेनासंघटक व सेनापती) तुलना करुन त्याच पोर्तुगिजींनी त्यांना मैल्यवान भेटीही पाठवल्या.पश्चिम किनारपट्टिवर इंग्रज,डच,पोर्तुगिज,फ्रेंच इ. परकिय सत्ता होत्या पण ह्या युरोपिय शक्तींपैकी कुणाचही एकमेकांशी पटत नसत. इतकं असुनही आठराव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या परदेशी रक्तपिपासूंना कोकण किनार्यावरचा सर्वमान्य शत्रू निवडायला सांगितलं असतं तर त्यातल्या कुणीही मोगल किॅवा मराठ्यांच नाव घेतलं नसतं.ते एकमुखाने म्हणाले असते : "कान्होजी आंग्रे".

    कान्होजी आंग्रे युद्ध ह्या घटनेकडे खुप विचारपुर्वक पाहात असत लढाईतील यश केवळ बेफाम धाडसावर अवलंबुन नसुन अनावश्यक धोके पूर्ण विचारानी टाळणं हे डावपेचाइतकच महत्वाचं होतं हे त्यांना उमगलं होतं.

    सुरुवातीला कान्होजींनी आपल्या लढाऊ जहाजांचा वापर नौदलासारखा न करता किनार्यावरील गस्त घालणार्या जहाजांसारखा करुन ज्या जहाजांकडे मराठ्यांचे दस्तक परवाने नसतील त्यांना दंड भरायला लावणे इतकाच केला.समुद्रावरील मराठ्यांची सत्ता मुकाट्यांनी मान्य करायला लावणं हे त्या परिस्थितीतलं काहीसं महत्वाकांक्षी उद्दिष्ट कान्होजींनी बाळगलं होत.शिवछत्रपतींच्या मृत्युनंतर धामधमीच्या काळी संभाजीराजेंची हत्या व राजाराम महाराज दुर जिंजीप्रदेशी अशा वेळी आरमाराचं संपुर्ण परिवर्तन अाणि कोकणचा पद्धतशीर रितीने कबजा मिळवला तो ह्या एकाच माणसानी.जिंजीला राज्याभिषेकाच्या वेळी त्याच्या नेमणुकीची घोषणा करण्यापलीकडे छत्रपतींकडुन कान्होजींना फारसा साहाय्य नव्हतं.पण कान्होजी मात्र मराठ्यांच्या छत्रपतीखेरीज कुणालाही स्वामी मानायला तयार नव्हते.राजाराम महाराज जिंजीवरुन स्वराज्यात आल्यावर त्यांनी फार मोठा कोकणी मुलुख त्यांच्या हवाली केला.७-८ वर्षांच्या अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या सागरी मुलुखावर राजाराम महाराजांनी आपल्याला आरमाराचा सरसेनापती करावे अशी अपेक्षा करणे कान्होजींची चुकीची नव्हती पण राजाराम महाराजांनी उत्तरेला कान्होजी आंग्रे व दक्षिणेला भवानजी मोहिते यांना आपापल्या विभागाचे नायब सुभेदार नेमले.मराठा सार्वभौमत्व न जुमानता स्वखुषीने कारभार करायला आणि वेगळी वाट धरायला जर कारणच हवं असेल तर ते इथे होतं. पण शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या सार्वभौमाविरुद्ध असणार्या विचाराचा त्यांच्या मनाला स्पर्शही झाला नव्हता.आपली बढती व बर्खास्ती त्यांनी राजांवर सोपवली.४० वर्षापुर्वी जेव्हा आरमार स्थापन केलं त्यावेळी अारमाराची कर्तव्य कोणती,जबाबदार्या कोणती ह्याची शिवरायांनी स्पष्ट शब्दात मांडणी केली होती.किनारपट्टीचं संरक्षण,देशाच्या समुद्रावरुन चालणार्या व्यापाराच्या धोक्यापासुन बचाव आणि सर्व जहाजांकडून जकातीची वसुली.आता कान्होजीच्या काळात आरमाराला दाढा,पंजे आणि पिळदार स्नायू लाभले होते.आता ते कामगिरीला सज्ज झालं होतं.सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी आरमाराला कान्होजीसारखा थंड डोक्याचा आणि कर्तबगार सरखेल लाभला होता.कान्होजींनी समुद्रपर्यटनाला निघालेल्या सर्व जहाजांना परवाने द्यायला सुरुवात केली होती त्यांना "दस्तक" म्हणत.पोर्तुगिझांच्या "कार्ताझ" इतकीच ह्या दस्तकींची किंमत होती.आणि सवलती तशाच होत्या.

    कान्होजींच मुख्य ध्येय आणि उद्योग ,अधिक मोठी आणि अधिक मजबुत जहाजं बांधणे हेच होतं.हिंदुस्थानातल्या जहाजांच्या रचनेत पुरातन काळापासून चालत आलेल्या पध्दतीत काही फरकच पडला नव्हता.सगळी जहाजं एका ठरावीक नमुन्याचीच बांधली जायची.फक्त त्यातली काही मोठी होती.आणि काही लहान होती एवढाच काय तो फरक.जहाज बांधणीच्या एकूण कल्पनेतच आमुलाग्र फरक घडवून आणायची गरज होती.

    कान्होजी व पोर्तुगिजांशी असणारा मुख्य दुवा"मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" नावाचा इसम होता.ह्या माणसाला कान्होजी आंग्रेंनी जहाज बांधणीच्या आणि रचनेच्या कामात आपला सल्लागार नेमला.वस्तुत: त्यांनी बऱ्याच परदेशी तंत्रज्ञांना,बंदुकबाजांना,बंदुकीच्या नळ्या करणाऱ्यांना,बंदुकीची दारु करणाऱ्यांना,अश्वपरिक्षा असणाऱ्यांना अशा अनेकांना आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते.पण सर्वात जास्त परदेशी लोक होते ते जहाद बांधणीचे लोक."मॅन्युएल मोराईस डि कार्व्हालो" या सोबत आणखी एका पोर्तुगीज नावाचा वारंवार उल्लेख आढळतो ते म्हणजे"मॅन्युएल डि कॅस्ट्रो" याचा. हा निशाणबाजीत अतिंशय तरबेज होता.

    इंग्रज,फ्रेंच,डच,पोर्तुगिझ हे मराठ्यांच्या जहाजांचा उल्लेख "आंग्र्यांची गलबतं" असा किंवा "आग्र्यांचा आरमार" असासुद्धा करायला लागले.सेनापतीच्या नावाने फौजा ओळखल्या जाण्याचे दाखले इतिहासात क्वचितच आढळतात.युद्धात लढणार्या खलाशी किंवा सैनिकांपैकी फार थोड्याजणांना आपल्या नौसेनापतीचं नाव ठाऊक असतात.मराठ्यांच्या आरमाराचा उल्लेख "आंग्र्यांचा आरमार असा करणे" हेच आंग्र्यांचा पराक्रमाची साक्ष आहे.पण ह्यांमधुन एक विचित्र गोष्ट घडली छत्रपतींच्या मनात आंग्रेविषयी संशय निर्माण करण्यासाठी इंग्रज,पोर्तुगिज,डच,फ्रेंच ह्या लोकांनी त्यांच्या अजोड पराक्रमचा विपर्यास करुन कान्होजीबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली की, कान्होजी आंग्रे स्वतंत्र राजा असल्याचे जाहीरपणे सांगतो छत्रपतींच्या अनुमतीशिवाय आपला अंमल गाजवु पाहतो.याउलट कान्होजींनी कंपनीच्या सल्लागारांना वारंवार बजावलं होतं की आपण "मराठा साम्राज्याचे सरखेल आहोत.समुद्राचे सार्वभौमत्व मराठ्यांच्या छत्रपतीकडे आहे."

    कान्होजींनी मानसून ,बाॅम्बे,गोडोल्फिन,अॅन हे कंपनीच्या अत्यंत महत्वाच्या जहाजांवर यशस्वी हल्ला चढवला.

    चर्चगेट,बझार गेट हे जे आज मुंबईच्या ठिकाणांची नावे आहेती त्या कान्होजी आंग्रेंपासुन बचाव करण्यासाठी मुंबई शहराभोवती बांधलेल्या भिंतीच्या दरवाजाचे नाव आहेत.

    कान्होजींच्य् विरुध्द लढाईस इंग्रजांनी सहा महिन्यांच्या आत ब्रिटानिया,फेम,रिव्हेंज,व्हिक्टरी,फ्राम,बून अशी अधिक बलवान असं आधुनिक पद्धतीच आरमार उभा केलं.नवीन नियुक्त झालेला गव्हर्नर "बुन" ह्याने विजयदुर्गावर हल्ला करण्यासाठी आपलं हे आरमार बाहेर काढलं व १८ जून १७१८ ला मोठी नामुष्की पदरी पाडुन हे आरमार मुंबईला परतले.हा हल्ला सर्वात मोठा समजला जातो.कोकणच्या इतिहासात झाला नाही असा तोफांचा भडिमार विजयदुर्गावर झाला.आजही विजयदुर्गाच्या भोवताली खडकावर आदळलेल्या तोफांचे खुणा आहेत.पण आंग्र्यांचे बळ इतके वाढले होते की हा हल्ला त्यांनी यशस्वीरित्या परतवला व शत्रुसैन्याचा जबर नुकसान केलं ही लढाई अहंकारी गव्हर्नर बुनला मोठी चपराक होती ह्या हल्ल्यातुन त्याने धडा न घेतल्याने पुढे त्याच्या पदरी आणखी नामुष्की आली.फेमस होण्याच्या बाबतीत तत्कालीन मुघल बादशाह, छत्रपती शाहू आणि बाजीराव यांनाही आंग्रेंनी मागे टाकले होते . मलबार ते नॉर्थ कॅरोलिना पर्यंत प्रसिद्ध पावलेले एकमेव कान्होजी आंग्रे. छत्रपतींनी कान्होजींचे इतके विराट स्वागत केले होते कि जेजुरी ते सातारा पूर्ण रस्ता भंडारा उधळल्या मुळे सोनेरी झालेला.

    जमिनीवर कुणाचीही सत्ता असो, खंदक आणि भिंतीच्या कडेकोट बंदोबस्ताआड असणार्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो पण अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कोकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यावर दुमच नव्हतं.
    "सत्ता होती ती मराठा आरमार प्रमुख सरखेल कोन्होजी आंग्रे यांचीच!"

  • विवोन फोनटेन दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    विवोन फोनटेनचा जन्म 8 ऑगस्त 1913 ला फ्रांस मध्ये झाला. तिने हळूहळू 1943 मध्ये जर्मन काबिज फ्रांस मधील क्रांतिकारकारकाना मदत करायला सुरुवात केली.जेव्हा एसओई गुप्तहेर संघटनेचे दोन हेर डेनीस आणि बेनजामीन एसओई संघटनेसाठी घातपाती कारवायांसाठी ट्रॉय शहरात आले. बेनजामीन फोनटेन ला भेटला व त्याने तिला कुरियर म्हणून 2 हजार फ्रँक पगारावर ठेवले. आणि नेनेट सांकेतिक नाव दिले. ती संदेश नेऊ लागली व फ्रान्सच्या उत्तरपूर्व भागात घातपाती साहित्य पोहोचवू लागली. त्यात त्याना यश येऊ लागले. 4 जुलै ला त्यानी जर्मनांची 6 गाडीची इंजिने उद्ध्वस्त केली.फोनटेन ने 18 जखमी अमेरिकन वैमानिकांना स्विसमध्ये पळून जायला मदत केली. 1943 साली जर्मनांनी फ्रांस मध्ये घुसखोरी करून एसओई गुप्तचर संस्थेच नेटवर्क उधवस्थ केले.सप्टेंबर 1943 ते नोव्हेंबर 1943 मध्ये एसओई गुप्तचर संस्थेचे सगळे हेर इंग्लंड मध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.

    फोनटेनने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला.व प्रशिक्षण घेतले. तिथून ती फ्रांसला परतली.तिथे ती पुन्हा एसओई संघटनेच्या हेराना मिळाली. तिने आपले सांकेतिक नाव मीमी असे घेतले. कुरियरचे काम करण्याबरोबर तिने फ्रांस हेराना विमानातून शस्त्र उतरवण्यासाठी गुप्त जागा शोधल्या. ती पॅरॅशूटने उतरलेल्या फ्रांस हेराना भेटली. दोस्त राष्टरणी जर्मनव्याप्त फ्रांसमध्ये आक्रमण केले.आणि जर्मनांची अनेक गोदामे उद्ध्वस्त केली. यात फोनटेनची खूप मदत झाली. .पुढे कार्यकर्त्यापैकी ती एकटी वाचली बाकीचे मारले गेले.

    ऑगस्त 1944 पर्यन्त तो जर्मनांच्या ताब्यातून मुक्त होई पर्यन्त ती एकटी लढली.16 सप्टेंबर 1944 ला ती इंग्लंडला गेली. एसओईला दिलेल्या रिपोर्टमध्ये तीने साथीदार मारल्याबद्दल कडवट टिका केली. लंडन मध्ये ती एसओईच्या आपल्या दोन साथीदारासोबत राहिली. त्यानीही एसऑईवर टिका केली. त्यामुळे तिला एसओई कडून कधीही अधिकृत मान्यता मिळाली नाही. महायुद्ध संपल्यावर तिने ड्यूपोंट या फ्रेंच माणसाशी लग्न केले. 9 मे 1996 ला तिचा मृत्यू झाला.

  • लाले दी जान !

    लाले दी जान !

    समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते.

  • दोन नोबेल पारितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी

    ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडमध्ये शिक्षकी पेशातील स्क्लोडोवस्की दाम्पत्याच्या पोटी मादाम मारी यांचा जन्म झाला होता. रेडियमचा शोध लावून आणि पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांतील दोन नोबेल पारितोषिके मिळवून मादाम मारी क्युरी यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले.