वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात.
वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।
असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।
प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।
ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।
खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।
प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।
कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।
लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।
उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।
ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।
उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।
सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।
ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।
हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।
ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।
नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।
माता सुनिती, हतबल होती,
न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।
आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।
न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।
भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।
नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।
उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।
प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।
प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।
ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।
नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।
बालक ते लहान, मनी विश्वास महान
विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।
असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।
मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।
मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।
मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।
मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।
तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।
इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।
अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।
इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।
संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।
प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।
निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।
दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।
'वर'दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।
कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१५- २७११८३
देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत.
धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले.
श्री गजाननाच्या पूजेत श्रीगणेशस्तोत्राचे स्थान मोठे आहे. नारदमुनींनी रचलेले हे स्तोत्र मराठीतही भाषांतरीत झाले आहे.
श्रीगणेशाय नम । नारद उवाच ।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिेये ।। 1।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवत्रं चतुर्थकम् ।। 2।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्दं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।। 3।।
नवमं भालचन्दं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।। 4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य पठेन्नर ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभुः ।। 5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।। 6।।
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशय ।। 7।।
अष्टेभ्यो ब्राह्म्णेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत ।। 8।।
।। इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम् ।।
रोग कसा होतो हे कळलं की, रोग घालवणं सोपं होतं. द्राक्षांच्या उदाहरणातील सर्दी होण्याच्या कारणांचा विचार केला तर,
1. तिच्याबरोबर बाजारात जाणे. 2. माझे लक्ष त्या हातगाडीवाल्याच्या द्राक्षांकडे जाणे. 3. ती द्राक्षे खायचा मोह होणे. 4 द्राक्षे खाऊन सर्दी होते, हे पूर्वी अनुभवले असताना देखील, ती उचलणे, 5. खिशात सुटे पैसे ठेवणे. 6. मनाला न विचारता खरेदीची कृती करणे, 7. घरी आणल्यानंतर विचार करायला पुरेसा वेळ असून सुद्धा ती खाणे. ही सर्दी होण्याची मुख्य कारणे आहेत.
कारण नंबर एक आणि दोन हे पूर्वजन्मानुसार किंवा कर्मफलानुसार तिथे जाणे हे अगोदरपासूनच ठरलेले असणे. याला आध्यात्मिक दोष हे कारण असते.
कारण नंबर तीन आणि चार द्राक्षे खायचा मोह होणे, ती स्वतःच्या मनाने खरेदी करणे हे मानस हेतु झाले आणि पाच ते सात ही कारणे, म्हणजे द्राक्षे खरेदी करून आणल्यानंतर ती कृतीतून खाणे हा प्रत्यक्ष हेतु म्हणजे शारिरीक कारण घडले.
यातील एक कारण जरी कमी ताकदीचे असले असते तर संप्राप्ती पूर्ण झाली नसती. आणि सर्दी झालीच नसती.
एखादा रोग होण्यामागे प्रत्येक वेळी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण असते. ते समजले की तसा उपाय करता येतो. म्हणजे रोग आध्यात्मिक स्तरावर असेल उपाय आध्यात्मिक, कारण मानसिक असेल तर मनापर्यंत पोचता यायला हवे आणि शरीराशी संबंधित व्याधी असेल तेव्हा औषध प्रत्यक्षात द्यावे लागते.
हे प्रमेहाच्या बाबतीतही तसेच लागू होते.
प्रमेह हा मुख्य रोग. त्याचे कफ पित्त वात या क्रमानुसार प्रत्येकी दहा, सहा आणि चार असे प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह आहे. ज्याची भीतीयुक्त ओळख आज सगळ्यांनाच आहे. हा रोग होण्याची कारणे आयुर्वेदानुसार काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
काही गोष्टींची कारणमीमांसा प्रत्यक्षात करता येते, काही गोष्टी तर्काने जाणून घ्यायच्या असतात, तर काही अनुभूतीच्या स्तरावर. मग प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि दुःख होत नाही....
नाहीतर....
आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.01.2017
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले.प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून “दर्पण” पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.
विलक्षण जीवन कहाणी -
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली.
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( “प्रोफेसर”) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
अष्टपैलू व्यक्तिमत्व -
आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्तेचा गौरव केला होता.
भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. १७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
समाजसुधारक चळवळीचा आदर्श -
प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली !
राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम !
क्रिकेट विश्वातील २ ऑगस्ट
अर्थमंत्र्यांनीच सादर केलेल्या आकडेवारीनुसार विविध करांद्वारे सरकारला मिळणारे अंदाजे ढोबळ उत्पन्न 7 लाख 46 हजार 656 कोटी राहिल. करांव्यतिरित्त* इतर स्त्रोतांपासून मिळणारे उत्पन्न 1 लाख 48 हजार 118 कोटींचे असेल. या एकूण उत्पन्नापैकी कृषीक्षेत्राच्या विकासासाठी किती तरतूद करण्यात आली आहे?
मुंबईचा प्रभादेवी भाग आज जगभरात प्रसिद्ध आहे, तो इथल्या श्री सिद्धिविनायकामुळे. अलम जगातून या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्तगण येत असतात..पण एक गंमत आहे, हा श्री सिद्धिविनायक कितीही प्रसिद्ध झालेला असो वा अगदी परदेशातही प्रतिष्ठापित झालेला असो, तो ओळखला जातो,
Copyright © 2025 | Marathisrushti