वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो.
September 29, 2025
१७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्यानात घेऊनच. शाहूला स्वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्यासाठी त्याच्या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्यातील हिस्सा त्याला दिला की तो खुष होता.
March 8, 2019
ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षो उल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. बेल्जियम, जर्मनी, फिनलंड या देशांत नाताळसाठी खास बिअर बनवली जाते, तर नॉर्डिक देशात "ग्लोग' हे पारंपरिक ख्रिसमस ड्रिंक बनवले जाते. रेड वाईनमध्ये थोडा संत्र्याचा रस व लवंग, दालचिनी, सुंठ आणि वेलदोडा असे मसाले घालून ग्लोग बनवले जाते. इस्टर्न युरोपमध्ये नाताळच्या जेवणासाठी बारा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे बारा हा आकडा श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो तसेच तो आकडा वर्षाच्या सगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. हे जेवण संपूर्ण शाकाहारी असून त्यात पारंपरिक पद्धतीनुसार व त्या सीझनमध्ये मिळणारी फळे व भाज्या वापरून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये बीटचे सूप, भाज्या भरलेले डंपलिंग्ज, खसखस घातलेली केक, जिंजर ब्रेड, कोबीचे रोल्स, हे पदार्थ प्रामुख्याने असतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
ख्रिसमससाठी काही खास पदार्थ
ख्रिसमस केक
ब्लॅक फॉरेस्ट केक
ख्रिसमस जिंजर कुकी
खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
हनी बनाना ब्रेड
सोया नानकटाई
कॉर्न नानकटाई
रम केक
पोटॅटो ब्रेड
पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
December 26, 2016
आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो.
August 2, 2023
महावितरणच्या राज्यातील अतिरेकी भारनियमनाविरुद्ध आम्ही गेल्या आठवड्यात समठा विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात छेडलेले आंदोलन बरेच गाजले. अकोल्याचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आंदोलन शांततापूर्ण राहिले. बऱ्याच ठिकाणी वीज मंडळ अधिकाऱ्यांनीच आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेऊन आणि त्यांचा सन्मान ठेवीत स्वत:च कार्यालयातील पंखे, ट्यूब लाईट्स, वातानुकूल यंत्रे काढून ठेवलीत, अथवा बंद ठेवली.
August 10, 2008
कोण म्हणत पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणात जायला शिक्षणच हवे असते.. आणि काय गरज आहे पत्रकार म्हणजे चांगला शिकलेला, विचारवंतच असला पाहिजे. दोन्ही वर्गातील लोकांनी काही बोलले, काही लिहिले की, समाजाला नवीन दिशा मार्ग दाखवला जातोच की, खरंच! काय गरज आहे का पत्रकार शिकलेला असण्याची.
December 21, 2023
स्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
June 23, 2026
आपल्या घरातील, नात्यातील किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यातील वयस्करांकडून एक तक्रार नेहमी ऐकू येते- गुडघेदुखीची! ज्येष्ठांच्या या समान तक्रारीला कारणीभूत असतो झिजेचा संधिवात.
May 13, 2023

'मैत्री पेक्षा थोडं जास्त'...असं जुनं, हळवं नातं ... पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं...असं हे 'मैत्रीपेक्षा थोडं जास्त' असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट 'सहेला रे' ....
प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय...
मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध भावे म्हटल्यावर जी सहजता अभिप्रेत आहे ती अर्थातच चित्रपटात दिसते. त्यामुळे अभिनय हा माझ्या परीक्षणासाठीचा विषय नाही. मुळात परीक्षण म्हणून मला लिहायचं नाही.
'विवाहित स्त्री चा मित्र, किंवा विवाहित पुरुषाची मैत्रीण' हे एक हळवं नातं आहे, त्याला कुठेही विवाहबाह्य संबंधाची दुर्गंधी नाही हे लक्षात घेऊन चित्रपट मांडलेला आहे..
विवाहित आयुष्य , हे घरामधे व कुटुंबामधे गुंतून राहिल्याने कालांतराने बंदिस्त, सीमित, थोडक्यात, फारसं happening राहत नाही. मग ते स्त्रीचं असो अथवा पुरुषाचं. मतभेद किंवा काही गंभीर समस्या असतीलच असं नाही पण बऱ्याच अंशी पती पत्नी एकमेकांना गृहीत धरू लागलेले असतात.
तेव्हाच यातून बाहेर काढण्याकरता , ध्यानी मनी नसताना एखादा मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात अनपेक्षितपणे येतात आणि हे मळभ आपोआप दूर होतं ते त्याच्याशी मनमोकळेपणे बोलल्याने आणि त्याच्या सहवासाने.
शमा वर भरभरून प्रेम करणारा निरंजन असाच तिला शोधत अमेरिकेवरून येतो आणि राहून गेलेला मनातलं सगळं तिला सांगतो. शमा सुद्धा तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करते. एकमेकांवरचं एकेकाळी व्यक्त न होऊ शकलेलं प्रेम व्यक्त करतात. शमा मध्ये असेल्या ताकदीची निरंजन तिला जाणीव करून देतो, तू मला माझ्या आयुष्यात कायम हवा आहेस 'मित्रापेक्षा थोडा जास्त' म्हणून , हे शमा सुद्धा निरंजन ला सांगते. आणि विणलं जातं ते एक सुंदर नातं..एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र मैत्रिणीचं .
अवघ्या तीन-चार दिवसांच्या काळात घडणारी ही कथा, योग्य व्यक्ती आणि त्याने आपल्या आयुष्यात योग्य क्षणी येणं याची गंमत सांगते. शमा मध्ये झालेल्या आत्मविश्वासपूर्ण बदलाचं स्वागत जेव्हा विक्रम, तिचा नवरा करतो तेव्हा शमाची ताकद, एक स्त्री व एक पत्नी म्हणून अजून वाढते. इथे चित्रपट टिपिकल केलेला नाही याचा आनंद होतो. निरंजन हा माझा जुना मित्र हे सुद्धा ती मोकळेपणाने विक्रम ला सांगते.
स्त्री ने स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं असताना सुद्धा तिचा नवरा आज तिचा मित्र हे तिची ताकद बनू शकतात हा मोठा विचार चित्रपटातून अगदी सहज पोहोचवला जातो.
या सगळ्या कथानकाला उत्तम साथ देतात ती चित्रपटाची निसर्गरम्य दृश्य, उत्तम संवाद आणि डॉ .सलील कुलकर्णी यांचं संगीत.
मृणाल कुलकर्णी यांचं गड किल्ल्यांवरचं प्रेम जाणवतं ते त्यांच्या गरुडमाची वचारच्या सहज वावरामुळे. चित्रपटात त्यांनी त्याची अगदी उत्तम सांगड घातली आहे.
निरंजन आणि शमाच्या एकमेकांविषयीच्या प्रेमाचा उलगडा होतो तो गरुडमाची च्या एका उंच टोकावर. आजूबाजूला हिरवळ, पावसाळी वातावरण, ढग ..असं असताना दिली गेलेली प्रेमाची कबुली..हे दृश्य फारच परिणामकारक ठरलं आहे.
निरंजन आणि शमाची ट्रेक ची आवड, त्यातून बाहेर येणाऱ्या जुन्या आठवणी, आणि आठवणींबरोबर पुन्हा पुन्हा हळवे होणारे हे मित्र मैत्रीण आपल्याला आपल्याही एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीची आठवण करून देतात.
स्त्री च्या आयुष्यात असा एक मित्र का हवा आणि पुरुषाला सुद्धा अशी एक मैत्रीण का असावी , याचं उत्तर शोधणारा हा सुंदर चित्रपट आहे.
मर्यादांची पूर्ण जाणीव ठेवून, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं एकमेकांना बिनधास्त सांगू शकणारे मित्र मैत्रीण..त्यांची उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे... सहेला रे..
-- गौरी सचिन पावगी
Image source : google
October 8, 2022
रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो. रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे.
October 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti