(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकेतील शाळा

    अमेरिकेत शहराशहरात सरकारी आणि स्वतंत्ररित्या चालवलेल्या शाळा असतात. स्वतंत्रपणे चालवलेल्या शाळांमध्ये फी अधिक असते. तुलनेने सरकारी शाळांमध्ये कमी. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालतात.

  • अमेरिका-अफगाणिस्तान सुरक्षा करार

    एका आठवड्या पेक्षा जास्त दिवस होऊनही “शटडाउन”चे शटर न उघडल्यामुळे अमेरिकेचे देशातील आणि परकीय देशांबरोबरील बरेचसे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर असताना जगातील सर्वच मिडिया, पत्रकार, आर्थिक आणि राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय सुरक्षा करारातील बहुतांश मुद्यांवर एकमत झाल्याने आणि करार लौकरच संपन्न होण्याची चिन्हे आहेत असे खुद अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष करझाई यांचे म्हणणे आहे.

  • जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

    अमेरिकेतील मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) या १९ वर्षांच्या तरुणाने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने एक खाजगी वेबसाईट 'गम्मत' म्हणून सुरु केली. ' सोशल Networking ' असे त्या वेबसाईटचे स्वरूप होते. पण अल्पावधीत हि वेबसाईट जगात प्रचंड लोकप्रिय होईल आणि तरुण वयातच आपल्याला जागतिक गौरव आणि मान सन्मान मिळेल असे मार्कला स्वप्नात सुध्धा वाटले नव्हते. या वेबसाईट चे नाव आहे फेसबुक.

    जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

    जुलै २००९ मध्ये फेसबुक च्या सभासदांची संख्या ५० कोटी होती. ती आता ६० कोटी झाली असावी असा अंदाज आहे. फेसबुक च्या सभासदांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले तर लोकसंख्येच्या मानाने तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश ठरेल. जगातील सर्वात मोठे देश व त्यांची लोकसंख्या खालीलप्रमाणे:

    चीन - १३३ कोटी
    भारत - ११७ कोटी
    फेसबुक - ६० कोटी
    अमेरिका - ३१ कोटी
    इंडोनेशिया - २४ कोटी

    फेसबुक च्या प्रगतीचा आलेख

    फेब्रुवारी २००४ - फेसबुक ची सुरवात
    डिसेम्बर २००४ - १० लाख सभासद
    डिसेम्बर २००५ - ५५ लाख सभासद
    डिसेम्बर २००६ - १.२ कोटी सभासद
    एप्रिल २००७ - २ कोटी सभासद
    ऑगस्ट २००८ - १० कोटी सभासद
    एप्रिल २००९ - २० कोटी सभासद
    सप्टेंबर २००९ - ३० कोटी सभासद
    फेब्रुवारी २०१० -४० कोटी सभासद
    जुलाई २०१० - ५० कोटी सभासद

    मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) आणि फेसबुक

    Time या जगातील प्रतिष्ठित मासिकाने मार्कचा २०१० सालचा फेस ऑफ दि इयर ( Face of the year ) म्हणून गौरव करून त्याचा सन्मान केला आहे. आज मार्क केवळ २६ वर्षांचा आहे. इतक्या तरुण वयात असा सन्मान मिळविणारा तो जगातील दुसरी व्यक्ती आहे. या आधी ८३ वर्षांपूर्वी म्हणजे १९२७ साली हा सन्मान चार्लस लिंडबर्ग (Charles Lindberg ) याला वयाच्या २५ व्या वर्षी मिळाला होता. आज मार्क प्रसिध्धीच्या झोतात आला आहे तो एका वेगळ्या कारणाने. त्याने १०० कोटी डॉलर्स एवढी संपत्ती समाज कार्यासाठी दान करून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अजून बरीच मोठी संपत्ती समाज कार्यासाठी दान करण्याची घोषणा त्याने केली आहे. इतक्या लहान वयात तुम्ही एवढी संपत्ती दान का करते असे मार्कला एकाने विचारले. तेंव्हा त्याने उत्तर दिले कि एखादी संपत्ती समाज कार्यासाठी दान देण्यासाठी म्हातारे किंवा वृद्ध होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ज्या वेळी आपण दान करू शकतो त्याचवेळी दान देणे योग्य असते.

    मार्क एका मध्यम वर्गीय कुटुंबातून आला असून त्याची राहणी पण तशीच आहे. अजूनही तो ऑफिस जवळ असलेल्या भाड्याच्या घरात राहतो. कंपनीत तो चालत जातो. त्याच्याकडे सुबारू ही स्वस्तातील मोटार आहे. तो सूट, बूट, टाय असे फ्याशनेबल कपडे कधीच वापरत नाही. त्याचे कपडे अगदी साधे म्हणजे जीन प्यांट, टी शर्ट, शूज असे काज्युअल असतात. त्याच्या कंपनीत त्याला केबिन, चेम्बर, सेक्रेटरी असा थाट नाही. त्याचे ऑफिस म्हणजे एक भला मोठा हॉल असून सगळे जण त्या हॉल मध्ये बसूनच काम करतात. मार्क पण तिथे बसूनच काम करतो. त्याने आपल्या कंपनीत एक आगळी वेगळी कॉन्फेरेस रूम ( Conferrence Room ) बांधली आहे. या कॉन्फेरंस रूमच्या सर्व भिंती काचेच्या आहेत. मार्कचे म्हणणे आहे कि कॉन्फेरंस रूम मध्ये काय चालते हे सगळ्यांना दिसायला हवे. कारण त्याचा पारदर्शी पणावर ( Transperency वर ) पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत फेसबुक ला अनेक प्रसिध्ध व्यक्तींनी भेट दिली आहे. या मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्रपती George W Bush , अमेरिकेचे माजी उपराष्टापती अल गोर, CBI आणि FBI या संथांचे प्रमुख, अनेक देशांचे प्रतिनिधी, हॉलीवूड मधील बडी स्टार मंडळी यांचा समावेश आहे. या सगळ्यांबरोब झालेल्या चर्चा याच काचेच्या भिंती असलेल्या कॉन्फेरंस रूम मध्ये झाल्या आहेत.

    हल्लीचे तरुण हे ऐदी, आळशी, निकम्मे, चैनीची चटक लागलेले, बेजबाबदार असतात असा अनेकांचा झालेला समज मार्क आणि त्याच्या टीमने खोटा ठरवला आहे. कारण आज फेसबुक मध्ये जे २००० लोक काम करतात त्यातील ९८ % लीकांचे वय ३० वर्षांच्या आतले आहे. आजचे तरुण काय चमत्कार करू शकतात हे मार्कने दाखवून दिले आहे.

    एखादा भारतीय आणि त्यातूनही एखादा मराठी तरुण अशा प्रकारची कंपनी किंवा व्यवसाय उभारू शकेल काय ?

    -- उल्हास हरी जोशी
    January 31, 2011

  • बाळक्रीडा अभंग क्र.३९

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

  • स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

    अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.

  • रम्य ते बालपण : रविंद्र मांडे

    माझे लहानपण तालुका, पण खेडेवजा ठिकाणी गेले. गावात नगरपालिकेच्या पहिले ते सातवी मराठी शाळा. तो काळ साधारण १९५५-५६ चा होता. पावसाळ्यात शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

    बाबा सांगतात...

    बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात,
    सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे.
    हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. यांचा काया, वाचा आणि मनेकरून त्याग करावा.

    या सर्व उपदेशात्मक उपचारांना हितोपदेश असे म्हटलेले आहे. जसे योग शिकताना, अष्टांग योगामधील यम नियम प्रथम पाळायचे असतात, त्यानंतरच त्यापुढील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा विचार करावा. तसेच आयुर्वेद शिकताना प्रथम हितोपदेश शिकावा, आचरावा, कृतीत आणावा. म्हणजे पुढील उपचार शिकणे सोपे असते.

    आजच्या काळात हे नियम पाळणे शक्य आहे का, असे म्हणून नियम टाळणे तर नक्कीच समर्थनीय नाहीत. काळानुरुप यात बदल अवश्य करावेत, पण ग्रंथातील मूळ सूत्र सोडू नये.

    ही दहा पापकर्म सांगितलेली आहेत.
    ही अशा प्रकारची कर्मे करू नयेत. असं सांगण्याचं कारण, कथनी और करनी मे यदी एकता नही है तो मन मे खोट जरूर पैदा होती है । जे आत असेल तेच बाहेर येते.

    विहिरीत किंवा टाकीमधे जे पाणी असते, बाहेर काढल्यावर तेच पाणी येणार ना. आपल्याला जर चांगले पाणी हवं असेल तर जिथून घेणार तो मूळ स्रोतदेखील चांगलाच हवा. म्हणजेच मन स्वच्छ असेल तर मनात काही पापभावना नसतील तर शरीरातील दोष देखील जरा अपथ्य झालं तरी संतुलीत रहातात. कारण या मनाचा संबंध थेट हार्मोन्सशी आहे. मन स्थिर आणि उच्च विचारांनी प्रेरीत असेल तर अंतःस्रावी ग्रंथींची कामे देखील स्थिर आणि उच्च दर्जाची होतात.

    या प्रत्येक शब्दावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. कधी कोणाची शाब्दीक हिंसा देखील करू नये, कठोर बोलू नये, हे गांधीनी पण सांगितले होते. पण भविष्यातील सोय पाहून, सर्वधर्म समभावच्या नावाखाली काही ठिकाणी गांधींनी सोयीस्कर दुर्लक्ष देखील केले होते. या असत्याचाच राग पुढे व्यक्त झाला असे आफळेबुवांच्या एका किर्तनात ऐकले होते. नरो वा कुंजरो वा असे म्हणून धर्मराजाने देखील असत्य भाषण केले होते, ज्यामुळे त्याचा रथ पुढे स्वर्गापासून दोन बोटे लांब राहीला होता. नुकसान झालेच होते. याच असत्यामुळे गांधीना आपला प्राण गमवावा लागला होता, हे सत्य लक्षात घ्यावे.

    भविष्यात आपल्याला जे संभाव्य आजारपण येणार आहे, त्याचा आतापासूनच नीट विचार करावा. यासाठी आपल्याला उपयोगी होणाऱ्या मंडळींना प्रेमाने जिंकून घ्यावे. ही माणसे तुटु नयेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रयत्न करूनही काही फायदा होत नसेल तर समजावणे सोडून द्यावे. भविष्यात येणाऱ्या आजारपणात, आपत्तीत जी माणसे उपयोगी ठरतील अशांना हाताशी धरावे.

    केवळ आपलेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचे हित कशात आहे, हे ओळखून पावले उचलावीत.

    या हितोपदेशांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
    तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.

    ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.

    २)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.

    ३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.

    ४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.

    ५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.

    अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग २

    नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं
    नताधिकापदुद्धरम् !!
    सुरेश्वरं निधीश्वरं
    गजेश्वरं गणेश्वरं !
    महेश्वरं तमाश्रये
    परात्परं निरंतरम् !!२!!

    नतेतरातिभीकर - नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर.

    नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, ज्ञानाचा, तेजाचा वर्षाव करणारे. तरीही सूर्याप्रमाणे दाहक नसलेले, प्रसन्न मनमोहक असणारे.

    नमत्सुरारिनिर्जरं - सुरारी अर्थात सुरांचे म्हणजे देवांचे शत्रू, दैत्य. तर निर्जर म्हणजे देव. त्यांना कधीच जरा म्हणजे म्हातारपण येत नसल्याने त्यांना निर्जर असे म्हणतात. हे दोन्ही ज्यांना वंदन करतात ते नमत्सुरारिनिर्जर.

    नताधिकापदुद्धर- विनम्र असलेल्या आपल्या भक्तांच्या मोठातल्या मोठ्या आपत्तींमधून अर्थात शास्त्रीय भाषेत या संसारदु:खातून उद्धार करणारे ते नताधिकापदुद्धर.

    सुरेश्वर अर्थात सगळ्या देवांचे देव.

    निधीश्वर अर्थात सर्वप्रकारच्या वैभवांचे स्वामी.

    गजेश्वर अर्थात निर्गुण निराकार परब्रह्म. जे सगुण-साकार ते जग. त्याच्या विपरीत ते गज.ते निर्गुण निराकारत्व हेच मोरयाचे वैभव. त्यामुळे ते गजेश्वर

    गणेश्वर अर्थात गणांचे ईश्वर. शास्त्रात व्यष्टी आणि समष्टी असे दोन स्तरांवर वर्णन असते.

    व्यष्टी स्तरावर व्यक्तिगत स्वरुपात, शरीरातील विविध अवयवांच्या शक्तींना गण म्हणतात. तर समष्टी अर्थात वैश्विक पातळीवर सर्व देवी-देवतांना ईश्वर महेश्वरांना गण असे म्हणतात. या सगळ्यांवर भगवान गणेशांचा अधिकार चालत असल्याने त्यांना गणेश्वर असे म्हणतात.

    महेश्वर अर्थात सगळ्यात मोठे ईश्वर. सर्वपूज्य, सर्वादिपूज्य परब्रह्म.

    त्या परात्पर अर्थात श्रेष्ठाहून श्रेष्ठ भगवंताला मी निरंतर अर्थात सदैव शरण जातो. माझ्या सकल कल्याणार्थ त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो.

    -- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • गोकुळ म्हणजे काय?

    भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.