(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक टेलिव्हिजन दिवस

    १९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

      February 5, 2019


  • समर्थ रामदास स्वामी – भाग १०

    सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो सत्व गुणी असे समर्थ म्हणतात .समर्थांनी या समासात सत्व गुणी माणसांचे वर्णन केले आहे.

    भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनास युद्धाला तयार हो म्हणून जरी युद्धभूमी वर सांगत असले तरी त्यांना कुणी तमो गुणी म्हणणार नाही याचे कारण जो सन्मार्ग दाखवतो,अज्ञानी लोकांना ज्ञान देतो तो सत्व गुणी असतो.ज्या ज्ञान दानात स्वार्थ नसतो तर समाजाचेच हित असते त्या ज्ञान दानाला सत्व गुणी म्हणावे लागेल.

    देशाच्या रक्षणासाठी रणात युद्ध करणारा योद्धा सुद्धा सत्व गुणीच म्हणावा लागेल. स्वतःचे दुखः पचवून जो निदकांवर सुद्धा उपकार करतो, जो इंद्रिय दमन करतो,ईश्वराच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास आहे,जो संत आणि विद्वान यांना शरण जातो,ज्यास लोकांना शहाणे करण्याची सवय असते.जो सतत ज्ञानोपासना करण्यासाठी प्रयत्न करतो,दुस-याला दुःख झालेले ज्यास सहन होत नाही आणि त्याचे दुखः निवारण करण्यासाठी जो सतत प्रयत्नशील असतो तो सत्व गुणी.

    दानधर्म करावा,रुग्णांची सेवा करावी ,विहिरी खोदून लोकांच्या पाण्याची सोय करावी.समाजाच्या कल्याणासाठी उत्सव साजरे करावे.मंदिरे बांधावी,संतांची सेवा करावी अशी सत्व गुणी माणसास आवड असते.

    लांड्या लबाड्या ज्यास आवडत नाहीत , समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी जो सगज असतो तो सत्व गुणी असतो.म्हणून प्रामाणिक व्यापारी,प्रामाणिक पोलिस,सैनिक,आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना सत्व गुणीच म्हणावे लागेल.मी पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे समर्थ परामानस शास्त्रात पारंगत होते.समाज कसा असावा याचे ज्ञान त्याच मूळे समर्थ देऊ शकले.

    दासबोधाची व्याप्ती प्रचंड आहे.त्यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही परंतु मला समर्थ मनापासून आवडतात.जगात वाचण्या सारखे पुष्कळ आहे.परंतु जे ज्ञान सहज उपलब्ध आहे तो दासबोध,ज्ञानेश्वरी , गाथा,आणि एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत अथवा आनंद लहरी सोडून आपण इतर सगळे वाचतो पण ज्यात खरे " विज्ञान " आहे ते ज्ञान मात्र आपण अभ्यासत नाही.संतांचे ग्रंथ एकदा तरी मनापासून वाचावे खूप फरक पडतो.

    ॥श्रीराम॥

    मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |
    आतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||
    जो भजनाचा आधार | जो योगियांची थार |
    जो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||
    जेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |
    जेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||
    जो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |
    मोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||
    जो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |
    रजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||
    जो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |
    देऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||
    जो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |
    जयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||
    ऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |
    तये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||
    ईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |
    सदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||
    संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |
    भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||
    परमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |
    परोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||
    स्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |
    शरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||
    येजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |
    स्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||
    निरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |
    क्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||
    अश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |
    नाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||
    धनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |
    करी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||
    कार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |
    निःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||
    सहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |
    निष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||
    तीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |
    बांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||
    देवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |
    वृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||
    लावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |
    निववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||
    संध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |
    भांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||
    नाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |
    वाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||
    जेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |
    नाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||
    नाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |
    हरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||
    छेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |
    वाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||
    वृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |
    ऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||
    सुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |
    देवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||
    देवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |
    अपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||
    ऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |
    स्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||
    तिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |
    कायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||
    हरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |
    घेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||
    नर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |
    घेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||
    महत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |
    भक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||
    थोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |
    तिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||
    देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |
    नित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||
    शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |
    योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||
    सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |
    श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||
    अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |
    पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||
    हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |
    आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||
    मुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |
    घेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||
    देहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |
    मिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||
    कांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |
    उकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||
    संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |
    ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||
    असतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |
    सदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||
    सकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |
    आघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||
    सर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |
    आठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||
    पदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |
    ऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||
    लोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |
    निश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||
    अंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |
    नष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||
    शरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |
    सत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||
    शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |
    सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||
    आले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |
    येथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||
    तडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |
    तयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||
    आश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |
    शक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||
    जेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |
    जयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||
    होणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |
    डळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||
    येका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |
    केलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||
    विषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |
    ज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||
    देह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |
    तरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||
    श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |
    शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||
    जयास अहंकार नसे | नैराशता विलसे |
    जयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||
    सकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |
    सर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||
    सकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |
    परोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||
    आपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |
    मरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||
    पराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |
    समुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||
    नीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |
    आला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||
    अन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |
    तितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||
    शरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |
    निंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||
    मन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |
    इंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||
    सत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |
    वाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||
    जया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |
    नाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||
    पर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |
    जयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||
    विदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |
    अथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||
    कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |
    जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||
    लिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |
    देवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||
    संत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |
    नमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||
    संतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |
    तो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||
    सन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |
    ज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||
    आवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |
    जया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||
    भक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |
    धातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||
    झळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |
    पवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||
    परपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |
    वैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||
    परभूषणें भूषण | परदूषणें दूषण |
    परदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||
    आतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |
    भजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||
    ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
    येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||
    सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
    सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||
    ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
    सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    *सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||
    ॥श्रीराम॥
    लेखनसीमा ...... संपूर्ण

    --चिंतामणी कारखानीस

      March 25, 2016


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेपन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 8

    स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणावीत, काही सुभाषिते आठवावीत, गंगेची प्रार्थना करावी. सप्तनद्यांना आठवावे. या नद्यांच्या पाण्याने माझे बाह्य शरीर शुद्ध होत आहे, आणि त्यांच्या तीर्थरूप पवित्रतेने अंतर्मन निर्मळ होत आहे, विशेषतः ईश्वराने दिलेल्या भौतिक शरीराची मी पूजाच करीत आहे, असा भाव असावा.

    देवाला जशी वस्त्र आणि उपवस्त्रे वहातात, तशी वस्त्रे स्वतः परिधान करावीत. देवाला कापसाची वस्त्रे वहावीत. जोडीने वहावीत, मधे मधे पिंजर लावून वहावीत. कापसाच्या वस्त्रांचे मणी करणे, ते सारख्याच आकाराचे होणे, मारलेला पीळ न सुटणे, त्यांची संख्या देवतेनुसार निश्चित असणे हे कर्मकांडामधे येते. ते तेवढेच महत्त्वाचे आहे.

    देवायला वहायची वस्त्रे कापसाचीच असतात, हे यावेळी लक्षात आणून देऊ इच्छितो. भारतीय परंपरांना जो इतिहास आहे, त्या इतिहासाच्या आधारे असे सांगता येते की, भारतात कापसापासून अत्यंत तलम वस्त्रे तयार करणारे कारागिर होते. ते वस्त्र एवढी तलम बनवायचे की एक पाचवारी साडी घडी केली की, काडेपेटीच्या काडीएवढी व्हायची. भारतीयांचा विदेशांशी असलेल्या प्रमुख व्यापारामध्ये सूती कपडे, पोलाद, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सोने यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. उरूग्वे सारख्या छोट्याशा देशातील लोक सुद्धा आजही गोपालन हा भारताने दिलेला व्यवसाय आहे, असे ते अभिमानाने सांगतात. ज्यांच्याकडील गोधन दरमाणशी चार एवढे प्रचंड आहे. असो.

    कापसाची शेती करणे, कापूस गोळा करणे, कापूस साठवणे, कापसाच्या वस्त्राला पीळ पाडणे, त्यापासून सूत तयार करणे, ते रंगवणे, हातमागावर आणि पुढे यंत्रमागावर त्याचे वस्त्र तयार करणे, त्या वस्त्राचा पोत ठरवणे आदि चाळीस प्रकारचे उप व्यवसाय गुरूकुलांमधून शिकवले जायचे, अशा ब्रिटीशांनी केलेल्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. असोत. आज या इतिहासातील कालबाह्य गोष्टी आत्ता परत कशाला उगाळत बसायच्या असेही काही जणांना वाटेल. त्याचा अभ्यास सुद्धा आज करायचा नाही का ? आज विदेशातून भरमसाठ किंमतीला जी अनैसर्गिक कापडे आणली जात आहेत, ज्यामधे पाॅलीस्टर, होजियरी, नायलाॅन आदि शरीराला हानीकारक असणारे कपडे, भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात येणारा घाम टिपून घेऊ शकत नाहीत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग, कर्करोग, अॅलर्जी निर्माण होताना दिसतात. ज्याचे उपचार देखील विदेशी औषधे वापरून करावे लागतात.

    अजून तरी देवाला घालायची वस्त्रे कापसाची अथवा रेशमाचीच असतात. पूर्णपणे नैसर्गिक आणि पूर्णपणे आरोग्यदायी !

    अध्यात्म आणि आयुर्वेद वेगळे नाहीतच. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, हे अगदी सहजपणे कळते.
    समजून घेणाऱ्याला !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.06.2017

      June 2, 2017


  • बँकिंग विनोद

    जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात??

    बँकर्स कधीच कंटाळत नाहीत, त्यांचा फक्त ‘इंटरेस्ट’ कमी होतो.

    नोटाबंदीचा एक फायदा झाला की आपल्याला विभागातील सर्व ATM चा व त्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसराचा ठावठिकाणा मुखोद्गत झाला.

    जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बँकेचं ‘दहा लाख’ रुपये कर्ज असतं तेव्हा त्याची परतफेड हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा ते कर्ज “दहा हजार कोटी” रुपयांचं असतं तेव्हा तो बँकेचा प्रॉब्लेम असतो.

    गोलरक्षकांचा (goal keepers) बँक बॅलन्स उत्तम का असतो?

    : कारण त्यांना चांगल्या “सेव्हींग” (saving) चा भरपूर सराव असतो.

    उत्तर ध्रुवावर बँक खाती का उघडली जात नाहीत?

    : कारण तेथे खाती लगेच “गोठवली” (freeze) जातात.

    रमेशची बँकेतली नोकरी पहिल्याच दिवशी तेव्हा गेली, जेव्हा एका वृद्ध स्त्रीने त्याला तिचा ‘बॅलन्स’ चेक करायला सांगितला आणि त्याने त्यासाठी तिला हलकासा धक्का दिला.

    राहुलला आपल्या बँकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तेव्हा फार चिंता वाटू लागली जेव्हा तो पाच ATM फिरला पण सर्व ठिकाणी आपले एटीएम कार्ड टाकल्यावर त्याला insufficient funds चा बोर्ड दिसला.

    नोटाबंदीच्या काळात असे वाटायचे की आपण भारतीय चलन घेऊन कुठेतरी परदेशात आलोय आणि परकीय चलनाच्या अदलाबदली साठी आटापिटा करतोय.

    प्रभाकर आपल्या बँक मॅनेजर कडे गेला आणि म्हणाला : मला एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सल्ला द्याल का?

    बँक मॅनेजर उत्तरला : एखादा मोठा व्यवसाय चालू कर आणि फक्त सहा महीने वाट पहा!

    महेश व नरेश हे बँकेतले मित्र गावात नदीकिनारी फिरायला गेले असता अचानक महेशने खिशातून एक दहा रुपयाची नोट काढून नदीच्या प्रवाहात सोडून दिली. यावर नरेशने कारण विचारले असता महेश बोलला : काल माझ्या लोन्स मॅनेजर ने “कॅश फ्लो” (cash flow) चा अभ्यास करून ये म्हणून बजावले आहे!

    (तीन बंद atm बघून निराश होऊन चौथ्या ठिकाणी आलेली) तरुणी : ते तीन जादुई शब्द ऐकायला मी आतूर झाले आहे,

    ATM गार्ड (खूश होऊन) : कोणते?

    तरुणी : एटीएममध्ये कॅश आहे!

    बँक दरोडा टाकून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला, इतर कर्मचारी घाबरून शांत असताना कॅशियर मात्र बांधलेले हात पाय झाडत आणि तोंडात बोळा असतानाही जीवाच्या आकांताने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तेव्हा दया येऊन म्होरक्याने तोंडातला बोळा काढला असता कॅशियर विनवणी करू लागला : भाऊ, तुम्ही येण्याआधी गेला एक तास माझी कॅश पोझिशन टॅलि होत नव्हती आणि दहा हजारचा डिफरन्स मिळत नव्हता. तेव्हा जाताना जरा माझे हे कॅश बुक सुद्धा घेऊन जाता का, म्हणजे माझ्या डोक्याची भुणभूण तरी थांबेल!”

    बँकेत कॅश काढायच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक उचक्या सुरू झाल्या. १५ मिनिटांनंतर जेव्हा ती कॅश काउंटरवर पोहोचली तेव्हा तिच्या उचक्या खूपच वाढल्याने ती पार हैराण होऊन गेली होती. तिने चेक कॅशियर कडे दिल्यावर त्याने काही काळ संगणकात बघून तिला चेक परत दिला आणि सांगितले की तिला कॅश मिळू शकत नाही. यावर महिलेने कारण विचारले असता कॅशियरने सांगितले की तिच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा नाही किंबहुना रु.५०० डेबिट बॅलन्स असल्याने तिलाच खात्यात पैसे भरावे लागतील. या उत्तराने भडका उडून काही काळ कॅशियरवर शाब्दिक भडिमार केल्यावर तिचे शेवटचे वाक्य होते – “तुला इथे मस्करी म्हणून ठेवले आहे वाटते”. यावर तो कॅशियर शांतपणे स्मितहास्य करत म्हणाला – “होय मॅडम, मी तुमची मस्करीच केली, पण गेल्या पाच मिनिटात तुम्हाला एकही उचकी आली नाही हे तुमच्या लक्ष्यात आले का?”

    संकलन : गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,

    माहीम, मुंबई.

    फोन : ८८७९४३१३७१

    ईमेल : guru.pandurkar@gmail.com

    (व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

      November 27, 2022


  • बाळगुटी एक वरदान- भाग ८ : नागरमोथा वनस्पती

    नागरमोथा वनस्पती ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी बाळगुटीमध्ये वापरली जाते; आणी तिच्या थंडगुणधर्मासाठी आणि पचनास मदत, कृमीनाशक, लघवी साफ करण्यास मदत, आणी वजननियंत्रणात उपयोगी असणाऱ्या फायद्यांसाठी ओळखली जाते. ही पित्त आणि कफ कमी करते, तसेच अतिसार व कृमींवर प्रभावी आहे.

      January 23, 2026


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २३

    यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे
    रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति |
    तदा देवदेवेश गौरीश शंभो
    नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖

    भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे.
    भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका आचार्य मांडत आहेत.
    त्या अंतिम समयाचे वर्णन करताना ते म्हणतात,

    यदा- ज्यावेळी
    पुत्रमित्रादयो- पुत्र मित्र इत्यादी माझे नातेवाईक,
    मत्सकाशे- माझ्याजवळ येऊन,
    रुदंति- रडत असतील,
    अस्य हा कीदृशीयं दशेति - अरे अरे काय ही याची दशा? असे म्हणत माझ्या मरणासन्न अवस्थेत चे वर्णन करीत असतील,
    अर्थात माझ्या त्या जराजर्जर अवस्थेला पाहून, त्या बाह्य अवस्थेलाच माझी वास्तव अवस्था समजत ज्यावेळी ते शोक करीत असतील,
    तदा - त्यावेळी
    देवदेवेश- हे देवाधिदेव !
    गौरीश शंभो- भगवान गौरीनाथा शंकरा,
    नमस्ते शिवाय- नमः शिवाय , हा महामंत्र
    इत्यजस्रं ब्रवाणि - मी अखंड जपत असावा.

    आचार्यश्री म्हणत आहेत की अंतिम समयी देहाची परिस्थिती ही गलितगात्रच असणार आहे. पण तशी "परिस्थिती" असताना देखील माझी "मनस्थिती" वाईट असू नये.
    जमलेले नातेवाईक बाहेर माझ्याबद्दल काहीही म्हणोत , मी आत मध्ये नमःशिवाय हेच म्हणत असावे. अंतरंगी आपल्या स्मरणाने शांती असावी. चिंतनात आपले नामस्मरण असावे.
    बाहेरून पाहणाऱ्या नातेवाईकांना माझी अवस्था कशी ही दिसत असली तरी अंतरंगामध्ये मी चा नातेवाईकांशी नाही तर आपल्या चरणांशी गुंतलेला असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 2, 2020


  • श्रीहरी स्तुति – ९

    भगवंताच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात….

      October 27, 2020


  • समंजस (मंगळ) सूत्र

    ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली. पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला. शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता.

      September 23, 2023


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ६

    उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माताकृपासागरीवेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी ।
    सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥

    आई जगदंबेचा वैभवाचे आणखी काही पैलू कडून दाखवताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत,

    उर्वीसर्वजनेश्वरी- उर्वी अर्थात पृथ्वी, त्यावरील सर्वजन अर्थात सर्वप्रकारचे लोक त्यांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे सर्वप्रकारचे जीव. त्यांची जनेश्वरी म्हणजे उत्पन्न करणारी देवता. सोप्या शब्दात पृथ्वीवरील सर्व जीवांची तथा लोकांची माता ती उर्वीसर्वजनेश्वरी.

    जयकरी- उपासकांना त्यांच्या सुयोग्य, इच्छित कार्यात विजय प्रदान करणारी.

    माताकृपासागरी- जसा सागराचा अंतपार लागत नाही तसाच तिच्या कृपेचा पारावार सापडत नाही , अशा अपार करुणामयी आई जगदंबेला माताकृपासागरी म्हणतात.

    वेणीनीलसमानकुन्तलधरी- खूप काळ्या केसांना तेल लावले तर ते निळसर दिसतात. अशा निळसर, कुंतल म्हणजे केसांची समान अर्थात व्यवस्थित रचना करून तिने धारण केली आहे. त्यामुळे तिला वेणीनीलसमानकुन्तलधरी संबोधिले आहे.

    नित्यान्नदानेश्वरी- मा अन्नपूर्णा समस्त जीवांना नित्य अन्नाचे दान करीत असते.

    सर्वानन्दकरी - पोट भरल्यानंतर प्राप्त होणारा आनंद सर्वांना प्रदान करणारी. सर्व प्रकारचे आनंद प्राप्त करून देणारी.

    सदा शुभकरी- साधकांचे, उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगल करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती,ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 3, 2020


  • दहीहंडी उत्सव: साहसी खेळ की सांस्कृतिक, सामाजिक उत्सव ?

    दहीहंडी उत्सवा संदर्भात मुख्य न्यायालयाच्या दडपणाखाली शासन दरबारी महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयांना दहीहंडी आयोजक, कि ज्यामध्ये प्रतिष्ठित राजकारणी व्यक्ती आहेत, त्यांनी विरोध केलाच आहे,परंतु दहीहंडीत सहभागी होणारे गोविंदा मंडळे पण नाराज झाली. शासनाने दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून जाहीर करून झालेल्या कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाच्या नेहमीच्या संदीग्ध धोरणामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे. दहीहंडी साहसी खेळ जाहीर झाला म्हणून आजच्या दहीहंडी उत्सवात त्यामुळे काय फरक पडणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. हा खेळ रस्त्यावरून मैदानात अथवा बंदिस्त क्रीडांगण खेळला जाणार आहे का? हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात अजूनही आहे. त्या बाबतीतल्या असणाऱ्या नियमावली अगदी ढोबळ सूचना जाहीर केल्या आहेत. दहीहंडी उत्सवाची साहसी खेळात गणना करणे किती योग्य आहे याची कारण मिमांसा करणे आवश्यक आहे.

      August 20, 2026