(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री रामरक्षा

    पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे.

    संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . शुभंकरोती कल्याणं ....म्हणणे आणि त्या नंतर रामरक्षा हे नित्योपचार असायचे .

    रामरक्षा अत्यंत गुणकारी असून घरात सौख्य , आरोग्य , आणि ऐश्वर्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्रा मध्ये जी ताकद आहे तेव्हडीच ताकद या स्तोत्रात आहे.ज्या घरात हे स्तोत्र लहान मुलांना शिकवले जाते त्या घरात सदैव नितीमत्ता आणि त्यातून येणारे धैर्य घरातील लोकांमध्ये वास करून असते .हल्ली मुले रामरक्षा म्हणत नाहीत . ती पुन्हा परत म्हणणे सुरु करणे हि काळाची गरज आहे.सोबत एक यु ट्यूब ची लिंक दिलेली आहे. रामरक्षा कशी म्हणावी हे ती लिंक उघडल्यावर कळेल !!!

    श्री राम ....

    https://www.youtube.com/watch?v=TIbijIE0Om4

    --चिंतामणी कारखानीस

  • मातीतील काळे सोने – ह्युमिक अँसिड

    १५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड

    सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.

    ह्युमस /ह्युमिक अँसिड?

    ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.

    ह्युमिक अँसिडचे गुणधर्म

    ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.

    ह्युमिक अँसिडचे फायदे –

    ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

    -- वसंत चरमळ

  • सौभाग्यलेणं – मंगळसूत्र

    सौभाग्य अलंकारातील सुवासिनी स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दागिना म्हणजे “मंगळसूत्र”.

  • मरावे परी अवयव रुपी उरावे……..

    कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!

    गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला "ब्रेनडेड" घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.

    शिवपार्थ चे चार अवयव.....हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.

    आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे.......सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!

    शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी...........नक्की विचार करा!!!

  • आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने

    सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो.

  • मनाचे श्लोक – ४१ ते ५०

    बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही |
    विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41||

    बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे |
    दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42||

    मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे |
    रघूनायकावीण बोलो नको हो | सदा मानसी तो निजध्यास राहो ||43||

    मना रे जनी मौनमुदा धरावी | कथा आदरे राघवाची करावी |
    नसे राम ते धाम सोडूनि द्यावे | सुखालागि आरण्य सेवीत जावे ||44||

    जयाचेनि संगे समाधान भंगे | अहंता अकस्मात येऊनि लागे |
    तये संगतीची जनी कोण गोडी | जिये संगतीने मती राम सोडी ||45||

    मना जे घडी राघवेंवीण गेली | जनी आपुली ते तुवा हानी केली |
    रघूनायकावीण तो शीण आहे | जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ||46||

    मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे | जनी जाणता भक्त होऊनि राहे |
    गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||47||

    सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा |
    स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा | जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||48||

    सदा बोलण्यासारिखें चालताहे | अनेकीं सदा एक देवासि पाहे |
    सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||49||

    नसे अंतरी काम नाना विकारी | उदासीन जो तापसी ब्रह्मचारी |
    निवाला मनी लेश नाही तमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||50||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • एम एस १० हजार एक – उसाची नवी जात

    एम एस १० हजार एक ही उसाची जास्त साखर उतारा देणारी व लवकर पक्व होणारी जात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस केंद्रात विकसित करण्यात आली असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जातीच्या उसाचे जास्त उत्पादन घेतल्यास ते शेतकरी व साखर कारखानदारांच्या फायद्याचे ठरणार आहे. सन २०१० मध्ये प्रथम ही जात तयार करण्यात आली व ती फुले-२६५ आणि एम एस ६०२ यांच्या संकरातून तयार करण्यात आल्याने त्याला एम एस १० हजार एक असे नाव देण्यात आले आहे.

    एम एस १० हजार एक या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे दहा ते बारा महिन्यांत उसाला पक्वता येते. साखरेचा उतारा, उसाचे उत्पादन इतर लवकर पक्व होणाऱ्या जातींपेक्षा जास्त आहे. क्षारपड जमिनीत चांगले तग धरून राहते. चांगले उत्पादन येते. तसेच ही जात कानी, लालकुद व इतर रोगांना प्रतिकारक आहे. कमी पाण्यात इतर जातींपेक्षा चांगली वाढते. ही जात तयार करण्यात संशोधन केंद्रातील डॉ. रामदास गारकर, दत्तात्रय थोरवे, कृषी सहायक मरतड भुसे, अंकुश भोसले, मृद्शास्त्रज्ञ डॉ. धमेंद्र फाळके, रोगशास्त्रज्ञ सूरज नलावडे, मंगेश बडगुजर यांची मदत झाली असून ऊसतज्ज्ञ डॉ. एस. एम. पवार संशोधन कार्यात प्रमुख होते.

    उसाच्या पारंपरिक जाती या मध्यम पक्वता असलेल्या आहेत. या जातीचे उस १४ ते १६ महिन्यात पक्व होतात. मात्र, एम एस १० हजार ही जात १० ते १२ महिन्यात पक्व होते. या जातीचा साखर उतारा चांगला आहे, लवकर पक्व होते. तसेच पूर्वीच्या जातीपेक्षा अर्धा टक्का साखर जास्त उत्पादन होते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण येथे हा प्रयोग केला. तो यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतर गोवा येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची (डीएसटीए) जी साखर परिषद झाली, त्या वेळी याबाबतचा संशोधन प्रबंध सादर करण्यात आला होता. त्याबाबत डीएसटीएच्या यंदाच्या वर्षी झालेल्या साखर परिषदेत डॉ. पवार यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

    गेल्या वर्षी ज्या कारखाने व शेतकऱ्ऱ्यांना एम एस १० हजार एकची बियाणे देण्यात आले होते. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर यंदा हे बियाणे प्रसारीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

    प्रसारण म्हणजे चारही कृषी विद्यापीठाची बैठक होते. त्यानंतर सरकारकडे त्यात पिकाचे उत्पादन करण्याची शिफारस केली जाते. सरकारकडून अधिकृत शिक्का मिळाल्यानंतर ते उत्पादन प्रसारित करता येते.

    दरवर्षी पाडगावला एम एस १० हजार एकची बियाणे तयार करून साखर कारखान्यांना, शेतकऱ्यांना पुरविली जातात. जेणेकरून जास्तीत जास्त क्षेत्रात त्याचा प्रसार व्हावा. या उसाच्या जातीचा प्रसार झाला तर शेतकरी व साखर कारखानदार या दोघांनाही त्याचा फायदा होईल.

    -- डॉ. एस. एम. पवार यांनी लिहिलेला लेख

  • काळवंडलेला राष्ट्राभिमान !

    अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.

  • राऊळ – एक आडनांव

    आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीतलं एक आडनांव. कुडाळ नजिकच्या पिंगुळीच्या ‘राऊळ महाराजां’मुळे सर्वदूर परिचित आडनांव. गुजरातेत आढणारं ‘रावळ’ किॅवा ‘रावल’ आडनांव म्हणजे राऊळचंच गुजराती व्हर्जन..

  • नवरात्र

    आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असते. आश्वििनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्विपन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो.

    श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत. आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका, भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्व-री, श्यातमा, ललिता, चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे. तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.

    या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघटा, ४) कुष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.

    नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. पहिला दिवस घटस्थापना, पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र श्रीमंत आदि शंकराचार्यांनी रचले आहे. अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात. नवमीला खंडेनवमी असेही म्हणतात. या दिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा करतात.

    सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. "वेदिकाय नम:' या मंत्राने शेताची पूजा करतात. त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. (शक्यय असल्यास वैदिक पौराणिक मंत्र म्हणावे.) हे सर्व पुरोहित पूजेच्या वेळी सांगतात. परंतु आजकाल बरेचदा गुरुजी मिळू शकत नाहीत अशावेळी आपण हे करू शकतो. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा, तांब्याचा, चांदीचा वापरता येतो. पूर्वी सुवर्णाचादेखील घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, त्यामुळेच की काय नवरात्र आहे; याला घट बसलेत असे म्हणण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. नऊ, पाच अशा विषम संख्येत घट घेऊन उतरंडीप्रमाणे त्याची रचना करून म्हणजे एकावर एक घट ठेवून, त्यावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात. चांदीच्या पत्र्यावरील देवीच्या प्रतिमेला टाक म्हणतात. देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशाप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात. ही माळ जोडमाळ नवव्या दिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते.

    माळ तयार करताना रेशीम लोकर वापरली जाते. रिळाचा किंवा सुताचा दोरा वापरायचा असल्यास दोऱ्याला थोडी तेलहळद लावतात. घटावर देवीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात. देवीजवळ अखंड दिवा लावतात. हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे. ही तेलवात नऊ दिवस-रात्र तेवत राहावी यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते. ती जोडवात एक वीत लांब असते. ती कुंकवाने रंगवतात. समईदेखील जाड धातूची वापरतात. दिव्यावर काजळी जमू नये याची काळजी घेतली जाते.

    नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड दिव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.
    देवीच्या पूजेसाठी पुरोहित बोलाविण्याची पद्धत आहे. त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्रोक्त, तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु पुरोहित न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावी. विड्याची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.

    नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात. आपापल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. "मात: क्षमस्व' किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : डॉ. र. रा. घाटे, पुणे / देवी भागवत स्कंध.