(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जोडी विल्यम्सने यशस्वी केलेली ‘बॅन लॅण्डमाइन्स’ चळवळ

    मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली.

      November 6, 2017


  • जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी…..

    जर प्रत्येकानं असा छंद बाळगला तरी हजारो कुटुंबांच्या भाकरीची सोय होईल ...

    अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात. अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,

    कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'

    'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात.
    झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो. शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'

    त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते. पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!

    बारमाही काम करता येईल असा हा देश. बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती. बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.

    वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.

    ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल..
    सह्याद्रीच्या कडेकपार्या आपलीही वाट पहात आहेत..

    -- संतोष द पाटील

      September 12, 2021


  • ट्रेन प्रवासात स्त्रिया किती सुरक्षित?

    मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणार्‍या मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेस शनिवारी ६० वर्षे पूर्ण झाली. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेविषयी ६० वर्षात तेवढी सुधारणा झाल्याचे दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. मुंबईतील ८० टक्के जनता ट्रेनने प्रवास करते त्यात नोकरी करणार्‍या स्त्रिया, शाळा व कॉलेजात जाणारे विद्यार्थी/वाद्यार्थिनी, वृद्ध, अपंग, दृष्टीहीन यांचे प्रमाण खूप आहे. दळणवळ क्षेत्रात रेल्वेवेचा देशात पहिला नंबर लागत असेल परंतू प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे फारच उदासीन आहे असे सध्या घडत असलेल्या घटनांकडे बघितल्यास प्रकर्षाने जाणवते.

      November 9, 2011


  • मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!

    पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल.

      February 12, 2019


  • श्रीहरी स्तुति – ४२

    अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे. कसे आहे हे तत्व? ते म्हणतात,

      December 2, 2020


  • निष्ठेची किमत!

    जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणाऱ्या लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

      April 19, 2009


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग एक !

    बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.

    आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.

    काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
    (दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)

    जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.

    भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
    हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
    आयुर्वेद सांगतो,
    पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
    झालं....
    टीकाकार आता विचारतील,
    "म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
    या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?

    तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.

    निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.

    जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.

    निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.

    फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.05.2017

      May 6, 2017


  • पक्षीपरिचय २२

      October 10, 2015


  • आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

    भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ?

      March 22, 2019


  • युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

    आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि.

      August 6, 2018