वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला.
मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.
घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.
आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी...! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?
आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.
त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.
औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?
मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?
पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुकच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...! हे थांबायला हवे.
मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...
-- अतुल कुलकर्णी
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.
आपल्या गावात आणि शहरातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बर्याचदा होत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. "मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय."
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.
"मला ब्लडप्रेशर आहे,
मला डायबेटीस आहे,
मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,
माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,
मला थायराॅईड आहे,
किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं,
" तुम्हाला काय होतंय ?"
तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,
"तुम्हाला त्रास काय होतोय?"
तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो,
"मला तर त्रास काहीच होत नाही."
"मग औषध कशासाठी घेताय ?" असं परत विचारलं तर सांगतात, "डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती."
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत.
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.05.2017
नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो.
शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत
आपण आजूबाजूच्या वातावरणामुळे व परिस्थितीमुळे, तसेच शहाणपणाचा अभाव असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे अहंकारी बनतो. याचा दुस-यांवर वाईट किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ते कमी प्रतीचे किंवा हीन दर्जाचे लेखतात…………
प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्॥४॥
प्रातः स्तुवे - प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.
परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.
ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.
भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.
त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.
वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.
करुणानवद्याम्- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.
विश्वस्य - विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.
विलय- प्रलय, विनाश.
स्थिति- संचालन.
हेतुभूतां - या सगळ्याचे मूळ कारण असणारी.
विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने
विदूराम्- प्राप्त होणे असंभव असलेली.
अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
जगत श्रेष्ठ अवतार अंबा विझा देवीचा । अंबा विझा देवीचा ।
ताम्हीणीते वास, ताम्हीणीते वास देवी विध्यवासिनीचा
हो देवी विध्यवासिनीचा ।।धृ0।।
उपासक शत्त*ी प्रभु चांद्रसेनिय । कायस्थाते रक्षी दुर्गा विध्य पर्वतीय ।।1।।
महिषादी असुर अंबे त्वांची वधिले । अनंत नांवे रूपे दुर्गे भत्त* तारीले ।।2।।
गंगा सुते अतुल भत्त*ी अंबेची केली । विध्यवासिनी देवी नच प्रसन्न झाली ।।3।।
बंधू द्वया दिधला अंबे तुच दृष्टांत । श्रेष्टाने करावा मम चरणी देहान्त ।।4।।
पाहिलेस सत्व अंबे प्रधान रामाचे । अर्पण केले शीर, तुते हस्ते स्वतचे ।।5।।
शीर कमळ अर्पण करीता तव चरणी । भत्त* कौतुका लागी प्रगटे विझाई देवी ।।6।।
माग माग पसन्न तुजला म्हणे महादेवा । विळेकरांच्या मूळ पुरूषा प्रभू महादेवा ।।7।।
पहाताच जगत् अंबा प्रत्यक्ष आता । ब्रह्यानंदी लागे द्वितीय गंगा सूता ।।8।।
मागणे ते एकची आहे आई जगदंबे । तव चरणासी विलीन करावे माते जगदंबे ।।9।।
संतती संपत्ती कुलवृध्दी सर्व गुणे । आर्शिवाद माझा कूला काय उणे ।।10।।
निरंतर ध्यान माझे तुम्ही करावे । संकट येता काही तुम्ही मजला स्मरावे ।।11।।
पती बंधनी जाता अंबे स्मरले तुजला । माहेराचे देवी दे चुडेदान मजला ।।12।।
त्याच करीता वास तुझा वैद्य देव्हारी । भाकेला गेली अंबा वैद्या घरी ।।13।।
तव गुण वर्णितां सर्व देवही शिणले। विध्यवासिनी देवी तुझे तुच वर्णिले ।।14।।
गणेश सुत दास तुझा प्रार्थी भगवते । संधी द्यावी पुन्हा प्राण अर्पण्याते ।।15।।
गायक - श्री.गजानन प्रधान.
गायीका - सौ. हेमा.
Copyright © 2025 | Marathisrushti