वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ सारखी गावागावातल्या भिंतींवर ‘शोले न पाहिलेली अभागी व्यक्ती कळवा आणि लाख रुपये मिळवा’ अशी जाहिरात दिल्यास जाहिरातीला शून्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता शेकडा शंभर टक्के आहे.

आज दीपपूजनाचा दिवस...
सनातन हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येक घरात आज, 'तेज' आपल्यापर्यंत आणणा-या दिव्यांना पुजलं जातं...
काही घरात आज दिवे स्वच्छ धुवून केवळ पुजले जातात तर काही ठिकाणी हेच दिवे स्वच्छ धुवून पुन्हा एकदा लावले जातात ..पद्धती वेगळ्या मात्र भावना सारखीच...
मानवाची उत्क्रांती झाली, निसर्गात असलेल्या किमयांचा एक एक करून मानवाला शोध लागू लागला...त्याचे वेगवेगळे उपयोग मानव करू लागला...
मात्र अग्नी आपल्यापुढे कुठल्या रूपात प्रदीप्त झाल्यावर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात हे मानवाला समजायला अनेक वर्षांचा काळ लोटला...
उदाहरणार्थ होळीची पूजा करताना आपल्यामधे एक ऊर्जा संचारते..काही काळ होळीसमोर उभं राहिल्यावर अंगात शक्ती संचार झाल्याचा अनुभव आपण नक्कीच घेतला असणार. वाईट शक्तीला भस्म करून वातावरणात प्रचंड सकारात्मकता पसरवण्याचं सामर्थ्य होळीत आहे.
हेच जर का आपण चिते समोर उभे असू तर गेलेल्या देहाला सद्गती मिळावी ,त्याची वाईट कर्म अग्नीत भस्म होऊन पावित्र्य घेऊन त्याने पुढल्या प्रवासाला निघावं ही भावना आपल्यात निर्माण होते..मन काहीसं उदास असलं तरी त्यातही नकारात्मकता जाणवत नाही. मात्र होळीइतकी ऊर्जाही जाणवत नाही.
देवघरातल्या दिव्यासमोर बसलं की मात्र जो परिणाम आपल्यावर होतो तो या सगळ्याहून वेगळा..मला नेहमी असं जाणवतं की देवघरातला दिवा लावला, मग तो समई च्या रूपात असो ,लामण दिवा असो, निरांजन असो किंवा अगदी पणती असो....हा दिवा लागताच एक दिवा आपल्या आतही प्रज्वलित होतो..आपल्याला आतून शांत करणारा , दिवसभरातले विचार बाजूला सारून मन निर्विकार करणारा..मन शुद्ध करणारा..म्हणूनंच सायंकाळच्या वेळेला दिवेलागणीची वेळ म्हणतात. आपल्या हिंदू संसकृतीत याला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवसभराची कामं, धावपळ सगळ्यातून आपण काही मिनिटं स्वतःकरता काढणं अत्यावश्यक असतं...रोजच्या रोज मनाचं हे शुद्धीकरण होऊन पुन्हा दुसर्या दिवशी एक स्वच्छ मन (mindset) घेऊन आपण दिवसाची सुरूवात करावी हा मोठा विचार यामागे केलेला आहे..
काळाच्या ओघात दिवेलागण, शुभंकरोती म्हणणं मागे पडलेलं दिसतं...
आता मात्र आपण हे न चुकता करावं व आपल्या पुढल्या पीढीलाही हे करण्याकरता प्रेरित करावं.. तरंच हे संस्कार पिढ्यांपिढ्या हस्तांतरित होऊन टिकून राहतील..
ll शुभम् भवतू ll
ll तेजस्वी भव ll
-गौरी सचिन पावगी
शिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..
एका ब्रँचला एक पेन्शनर आजोबांचा एवढा विश्वास की, एकदा मी रजेवर होते, तर FD करायला आणलेली एक लाख वीस हजाराची रक्कम परत घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, ‘काका पैसे नेण्याआणण्याची इतकी जोखीम का घेतली.’ तर म्हणाले, ‘तू नव्हतीस ना, मग मी आपला परत गेलो.’
अठराव्या शतकात मराठी सत्तेने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भारताचा बराच भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्लीला धडक दिली वा दिल्ली काबीजही केली पण ते दिल्लीपती झाले नाहीत. याचे कारण म्हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्याचा मराठी भाषा, संस्कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्या स्वाभिमानामुळे आणि आपल्या आत्मसंतुष्ट किंवा अल्पसंतुष्ट वृत्तीमुळेच मराठे दिल्लीच्या उंबरठ्यावरच राहिले, दिल्लीपती झाले नाहीत.
कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!
१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंनी पहिले मोटारचलित विमानोड्डाण केले. “विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला सुरु झाला होता.
हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.
मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti