वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाबा गाढे हे अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते आहेत. ब्राम्हण आणि सी. के. पी. समाजाविषयी त्यांनी केलेले हे जाहीर निरीक्षण
October 8, 2016
आचार्यश्री म्हणतात, मी सदैव अशा भगवान गणेशांना शरण जातो.
January 23, 2020
या दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. ‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.
July 25, 2017
चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता खास उकडे तांदूळ व मेथी घालून खीर बनवितात जिला मेथीची पेज म्हणतात.
अशी हि मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच असते.आपण मसाल्या मध्ये वापरतो त्या मेथीच्या बिया होय.मेथीचे लहान क्षूप असते त्याची पाने भाजी मध्ये वापरतात.
मेथी चवीला कडू असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते पण पित्त वाढवू शकते.
हि मेथी देखील ब-याच घरगुती औषधांमध्ये उपयुक्त आहे.
१)शरीरात वात भरल्याने हाता पायांना कळा येत असल्यास मेथ्या तूपात भाजून पीठ करावे व ह्याचे अगदी लहान लाडू वळावेत आणि रोज एक लाडू खावा साधारण पणे आठ दिवसात फरक पडतो.
२)संडासातून आव पडत असल्यास १/२ चमचा मेथी चुर्ण दह्यात मिसळून खावे.
३)प्रसुतीनंतर अंगातील दुःख कमी होण्यास आणि अंगावरचे दुध वाढण्यासाठी ४ चमचे मेथी रात्री पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी बारीक वाटून त्यात नारळाचा रस व गूळ घालून शिजवावे आणि थोडे तूप घालून बाळंतीण बाईला रोज खायला द्यावे.
४)मधुमेहात रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा मेथी चुर्ण गरम पाण्यासह घ्यावे.
५)६ महिन्यानंतर लहान मुलांना त्यांच्या तीन वेळच्या खाण्यामध्ये रात्री मेथी भिजत घातलेले पाणी एक एक चमचा घालावे ह्या मुळे कडू चव पोटात जाते आणि बाळाला पोटाच्या तक्रारी देखील वारंवार होत नाहीत.
मेथी खाण्याचा अतिरेक केल्यास एॅसीडीटी,संडासला पातळ होणे,अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 23, 2016
माणूस जन्माने भ्रष्ट नसतो त्याला आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती तसेच इर्ष्या, अतृप्त इच्छा, हव्यास, दुर्बलता, लोभ, राक्षसी प्रवृत्ती भ्रष्टाचार करण्यास भाग पाडते त्यात श्रद्धा-सबुरीचा अभाव आणि अयोग्य मार्गदर्शनाने भ्रष्टाचारापेक्षा भयंकर अश्या विविध अत्याचारासारखी दुष्कृत्ये करण्यास उद्युक्त होतो. दैनंदिन जीवनात माणूस सर्व जगाला फसवू शकतो पण स्वत:च्या मनाला कधीच फसवू शकत नाही ती भिती कुठेतरी असतेच.
September 13, 2011
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा युती झाल्या ज्यांनी सिनेमाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. अशीच एक अभूतपूर्व जुळणी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी. १९७० आणि १९८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते आणि नंतर जेव्हा त्यांनी सुपरस्टारपद गाजवले, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला संगीताची खरी ताकद कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. आनंदजी आणि अमिताभ बच्चन यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर अतिशय कौटुंबिक आणि आदराचे नाते होते. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात, तेव्हा ते सर्वात आधी आनंदजींच्या पत्नीचे पाय छूकर आशीर्वाद घेत असत, इतकी आपुलकी त्यांच्यात होती.
August 2, 2026
भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात दुआ चहालाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
July 1, 2019
तुमच्या गरजेनुसार योग्य कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन (Computer Configuration) निवडण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या:
April 9, 2026
डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.
डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
१. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
२. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटिऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
३. फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
४. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
५. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
६. वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
७. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
८. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
९. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
१०. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
११. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
१२. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
१३. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
१४. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.
April 7, 2017
आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. जखमेवर अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास हळद मदत करते. सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात:
February 21, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti