वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय. ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते. प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात, तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजारी” माणसाकडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा”, “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते. आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देहरुपी असले तरी ते देहातीत असतात, ”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग, किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे. महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता, त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा-प्रणहितानि गताऽऽगतानि।मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥
मुग्धा - अत्यंत शुद्ध,निर्मल, सरल, निष्पाप, अबोध. आई महालक्ष्मीची दृष्टी अशी आहे.
मुहुर्विदधती वदने मुरारेः- ती दृष्टी वारंवार भगवान मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू भगवान श्रीहरींच्या मुखकमलावर जात असते.
गताऽऽगतानि- जात राहते .येत राहते. ही आचार्यश्री ची रचना मोठी सुंदर आहे. आईची दृष्टी भगवंताच्या मुखावर जाते .परत येते. पुन्हा जाते. पुन्हा येते. यामध्ये तिच्या चांचल्य गुणाचा भाग आहे तसाच सौंदर्याचा देखील.
ती दृष्टी स्थिर का नाही? याचे नितांत सुंदर वर्णन करताना आचार्य श्री कारण देतात,
प्रे
मत्रपा-प्रणहितानि- ची दृष्टी प्रेम आणि लज्जा यांनी भरलेली आहे. श्रीहरींवर उत्कट प्रेम असल्याने ती दृष्टी भगवंताच्या मुखकमलाकडे जाते आणि दृष्टादृष्ट होताच त्रपा लज्जेने आईची दृष्टी खाली वळते. असे नितांत रमणीय दृश्य आचार्य वर्णन करीत आहेत.
त्याच सौंदर्याला उपमा देताना ते म्हणतात,
मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या- एखाद्या महोत्पल म्हणजे पूर्णप्रफुल्लित कमळावर मधुकरींची रांग यावी तशी. वास्तविक येथे फक्त आई लक्ष्मीचीच दृष्टी आहे. पण तीच वारंवार जाणे-येणे करत असल्याने जणू काही रांग वाटत आहे. सातत्याने त्या दृष्टीचे आवागमन एखादा दृष्टीचा समुदाय असल्यासारखे वाटत आहे.
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः- सागर संभवा अर्थात समुद्रातून जन्माला आलेली. समुद्रमंथनाच्या दिव्य प्रसंगात समुद्रातून जी चौदा रत्ने प्रगटली यामध्ये आई महालक्ष्मी चे वर्णन आहे. त्याचा संदर्भ वापरत आचार्य श्री म्हणतात ,समुद्रातून प्रकट झालेल्या आई महालक्ष्मीची ती दृष्टी मला वैभव प्रदान करो."
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.
पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.
ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.
पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.
२)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.
३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.
४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.
५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
स्तुतिं - हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
अर्चां - आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
यथावद्विधातुं - याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
महेशावलंबे - हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् - यमराजां पासून प्राण वाचवणार्या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
नामस्मरण करून जर माझा फायदा होत असेल तर काय हरकत आहे आणि मला काही त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही उलट मी नामस्मरणामुळे वर्तमानकाळात राहतो, डोक्यात नको ते विचार येत नाहीत
जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!
जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा…
Copyright © 2025 | Marathisrushti