(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • चित्रभाषा

    मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ५

    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् |
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः
    स्मरामि स्मरापत्तिसंपत्तिहेतोः ‖ ५ ‖

    निर्माण आणि प्रलय दोन्हींची नियामक महाशक्ती आहेत भगवान शंकर. त्यांचे सदाशिव रूप निर्माणाचे अधिष्ठान आहे तर रुद्र हे विनाशाचे संचालक.
    या दोन्हींच्या समन्वयातून साकारलेल्या भगवान शंकरांचे स्वरूप सांगतांना आचार्यश्री म्हणतात,
    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं- प्रवाळ म्हणजे पोवळे नावाचे रत्न. त्याचा प्रवाह म्हणजे त्यातून बाहेर पडणारे तेज. त्याची प्रभा म्हणजे चमक. त्याप्रमाणे शोण म्हणजे लालरंगाचे. अर्ध म्हणजे ज्यांचे अर्धे शरीर आहे असे.
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् -मरुत्वन्मणि म्हणजे इंद्रनील मण्याच्या श्रीमहः- तेजा प्रमाणे
    श्याममर्धम्- अर्धे शरीर निळसर काळपट असे सावळे आहे.
    यातील पोवळ्याच्या लालीमे चा रंग आदिशक्तीचे प्रतीक असून भस्मधारण केल्याने निळसर धूसर दिसणारे शरीर भगवान शंकरांचे आहे. अर्धनारीश्वर स्वरूपात हे दोन्ही रंग एकवटतात.
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः- शैववपु म्हणजे भगवान शंकरांच्या शरीरात हे दोन गुण स्यूत अर्थात एकत्र आलेले आहेत.
    स्मरापत्तिसंपत्तिहेतोः - स्मर म्हणजे मदन त्याच्यावरची आपत्ती म्हणजे त्याचा विनाश आणि त्याची संपत्ती म्हणजे निर्मिती, या दोन्हींचा आधार असणारे.
    शक्ती स्वरूपात, प्रकृती स्वरूपात विश्वाची निर्मिती आणि शंकर स्वरूपात विलय या दोन्हींचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या अर्धनारीश्वराचे मी स्मरण करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ५

    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् |
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः
    स्मरामि स्मरापत्तिसंपत्तिहेतोः ‖ ५ ‖

    निर्माण आणि प्रलय दोन्हींची नियामक महाशक्ती आहेत भगवान शंकर. त्यांचे सदाशिव रूप निर्माणाचे अधिष्ठान आहे तर रुद्र हे विनाशाचे संचालक.
    या दोन्हींच्या समन्वयातून साकारलेल्या भगवान शंकरांचे स्वरूप सांगतांना आचार्यश्री म्हणतात,
    प्रवालप्रवाहप्रभाशोणमर्धं- प्रवाळ म्हणजे पोवळे नावाचे रत्न. त्याचा प्रवाह म्हणजे त्यातून बाहेर पडणारे तेज. त्याची प्रभा म्हणजे चमक. त्याप्रमाणे शोण म्हणजे लालरंगाचे. अर्ध म्हणजे ज्यांचे अर्धे शरीर आहे असे.
    मरुत्वन्मणि श्रीमहः श्याममर्धम् -मरुत्वन्मणि म्हणजे इंद्रनील मण्याच्या श्रीमहः- तेजा प्रमाणे
    श्याममर्धम्- अर्धे शरीर निळसर काळपट असे सावळे आहे.
    यातील पोवळ्याच्या लालीमे चा रंग आदिशक्तीचे प्रतीक असून भस्मधारण केल्याने निळसर धूसर दिसणारे शरीर भगवान शंकरांचे आहे. अर्धनारीश्वर स्वरूपात हे दोन्ही रंग एकवटतात.
    गुणस्यूतमेतद्वपुः शैवमंतः- शैववपु म्हणजे भगवान शंकरांच्या शरीरात हे दोन गुण स्यूत अर्थात एकत्र आलेले आहेत.
    स्मरापत्तिसंपत्तिहेतोः - स्मर म्हणजे मदन त्याच्यावरची आपत्ती म्हणजे त्याचा विनाश आणि त्याची संपत्ती म्हणजे निर्मिती, या दोन्हींचा आधार असणारे.
    शक्ती स्वरूपात, प्रकृती स्वरूपात विश्वाची निर्मिती आणि शंकर स्वरूपात विलय या दोन्हींचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या अर्धनारीश्वराचे मी स्मरण करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • इथं काय महत्त्व राखतं..!

    ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…

  • अंतरंग – भगवद्गीता – भाग १

    एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४

    शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः |
    अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं
    परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖

    भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी.
    येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी तत्त्वाचे, तत्पुरुष हे अग्नी तत्वाचे, अघोर हे आकाश तत्वाचे तर वामदेव हे वायू तत्वाचे प्रतिक आहे. त्या पंचमहाभूतांच्या रूपात भगवान प्रगट होत असल्याने यांना मुख म्हटले आहे.
    षड्भिरंगैः - सहा अंगांनी.
    वेदांची सहा अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, ज्योतिष आणि छंद.
    या सहा अंगांनी अध्ययन केल्यावर वेदांचा अर्थ कळतो. भगवान या सगळ्यांच्या पार आहे.
    अनौपम्य- अनुपमेय. ज्यांना कशाचीच उपमा देता येत नाही असे.
    षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं- छत्तीस तत्व विद्यांच्या पार असणारे.
    शैव सिद्धांतामध्ये असणाऱ्या तंत्रांतर पटल या आगम ग्रंथात, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय, यासह मन, बुद्धी ,अहंकार, शिव,शक्ती, सदाशिव, ईश्वर, विद्या, माया, अविद्या, कला, राग, काल, नियती,जीव आणि प्रकृती अशा छत्तीस तत्वविद्यांचे वर्णन आहे.
    परं - या सगळ्यांच्या पार असणाऱ्या,
    त्वां कथं वेत्ति को वा - आपणास कसे आणि कोण जाणू शकेल?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४

    शिवेशानतत्पूरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः षड्भिरंगैः |
    अनौपम्य षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं
    परं त्वां कथं वेत्ति को वा ‖ ४ ‖

    भगवान श्रीशंकरांच्या अगम्यतेचे वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    शिवेशानतत्पुरुषाघोरवामादिभिः
    पंचभिर्हृन्मुखैः- शिव, ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव या पाच प्रसन्न मुखांनी.
    येथे भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाचे वर्णन आले आहे. यातील शिव किंवा ज्याला सद्योजात असेही नाव आहे ते जलतत्वाचे, ईशान हे पृथ्वी तत्त्वाचे, तत्पुरुष हे अग्नी तत्वाचे, अघोर हे आकाश तत्वाचे तर वामदेव हे वायू तत्वाचे प्रतिक आहे. त्या पंचमहाभूतांच्या रूपात भगवान प्रगट होत असल्याने यांना मुख म्हटले आहे.
    षड्भिरंगैः - सहा अंगांनी.
    वेदांची सहा अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण , निरुक्त, ज्योतिष आणि छंद.
    या सहा अंगांनी अध्ययन केल्यावर वेदांचा अर्थ कळतो. भगवान या सगळ्यांच्या पार आहे.
    अनौपम्य- अनुपमेय. ज्यांना कशाचीच उपमा देता येत नाही असे.
    षट्त्रिंशतं तत्त्वविद्यामतीतं- छत्तीस तत्व विद्यांच्या पार असणारे.
    शैव सिद्धांतामध्ये असणाऱ्या तंत्रांतर पटल या आगम ग्रंथात, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिय, यासह मन, बुद्धी ,अहंकार, शिव,शक्ती, सदाशिव, ईश्वर, विद्या, माया, अविद्या, कला, राग, काल, नियती,जीव आणि प्रकृती अशा छत्तीस तत्वविद्यांचे वर्णन आहे.
    परं - या सगळ्यांच्या पार असणाऱ्या,
    त्वां कथं वेत्ति को वा - आपणास कसे आणि कोण जाणू शकेल?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • मी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)

    ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत.

  • श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

    आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.

  • श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

    आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.