वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से
July 17, 2026
कसं काय मंडळी मजेत ना?आणि आपला नेहेमीचा आपुलकीचा प्रश्न ” वाचताय ना? वाचायलच पाहिजे , कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम उदय सप्रे म प्रस्तुत चला , { आनंदाने } जगण्याची दवा येऊ द्या ! { झी आणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून !
January 15, 2024
आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे ? या एका प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थ्याचा लेखाजोखा आणि आलेख मांडला जातो. ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी मुक्तपणे शिक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यास मुक्तपणे शिक्षण मिळत नाही म्हणून मग ते मानवतेच्या शिक्षणात मागे पडतात.
खाजगी क्लासेस, शिकवणी यांचे वाढते पेव आर्थिक शोषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत. अशा काळात जी मुले गरीबीतील आहेत. आर्थिकदृष्टीने कमकुवत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय ? कित्येक कुटुंब मागास आहेत. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत किंवा त्यांना ते दार सापडत नाही.अशा अधांतरी आणि दोलायमान अवस्थेत अनेक मुलं शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी झगडतात. मग भारताचे सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. शालेय शिक्षणाची उपयोगिता लक्षात न आल्याने पिढ्यानपिढ्या परंपरागत अज्ञान, अडाणीपणा यामध्ये जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाची शिकार बनतात. त्यांना पुरक पोषण आहार न मिळाल्यास त्यांना मृत्यू ओढावतो. अपयश हे कुणी सांगत नसते.उघड झाले तरी सारवासारव होते.हा मानवी स्वभाव सोडला तर मुख्य प्रवाहापासून वंचित राहणारांची संख्या आजही मोठी आहे. शालाबाह्य मुल कळवा आणि हजार रूपये मिळवा अशा काही घोषणा समाजाकडून मिळणार्या सहानुभूतीसाठी केलेल्या असतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आजही कित्येक बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. शालाबाह्य मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात. त्यात शिक्षक एकाकी पडतात. समाजाचा आधार मिळत नाही. शाळेत मुल न पाठवणार्या पालकांना कोणतीही शास्ती अथवा सक्ती कायद्याने नाही. नोकरीसाठी शिक्षण एवढीच शिक्षणाची मर्यादित व्याख्या आज करून ठेवलेली आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कमी पडताहेत त्या ठिकाणी कित्येक मुलं शालाबाह्य ठरतात. अशी मुलं शाळेत दाखल असतात. परंतु वास्तव असे आहे की सतत भटकत असतात. आठवीपर्यंत गैरहजर असली तरीही त्यांना ढकलपास करून पुढे पाठवण्याची व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेत आहे . त्यामुळे त्यांच्या दाखल्यावर स्पष्ट उल्लेख येतो सतत गैरहजर नाव कमी . असे नाव कमी झालेली बालके भरपूर पहायला मिळतील. ती सर्वच मुले अपयशी ठरतात असे नाही. तर ती मुलं समाजाच्या , निसर्गाच्या शाळेत शिकत असतात. पण सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शाळा जे कार्य करतात. त्याचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
उदरनिर्वाहासाठी जी कुटुंब स्थलांतरीत होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळला पाहीजे. सध्याचा शिक्षणाचा बाजार हा थांबत नसेल तर मग गरीबांच्या लेकरांसाठी असणार्या शाळा प्रयत्नपुर्वक सुधारल्या पाहिजेत. शासन आणि समाज हे करू शकते.
प्रकाशझोताचा झगमगाट सोडून खरे संस्कारक्षम शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचायला हवे. अच्छे दिनचे स्वप्न वास्तवात उतरावयाचे असेल तर त्याची सुरूवात शिक्षणापासूनच व्हायला हवी. कालपरवा एक विद्यार्थी भेटला . कितवीला आहेस ? असा सहज प्रश्न केला. तर आठवीला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत जातोस का ? तर नाही म्हणाला. मग काय करतोस ? जेसीबी चालवतोय . शाळा का शिकत नाही. असं विचारल्यावर तो गप्प ... म्हणजे एकतर शाळेत नाही गेलं तरी पास होतय असा समज असावा किंवा
उदरनिर्वाहासाठी जेसीबी चालविणे योग्य वाटले असेल.दुसरा एक त्याचाच मित्र सोबत होता . त्यालाही विचारले ' तू जातोस का शाळेत ? '
तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. ' तू पण जात नाहीस वाटतं शाळेत .'
' सर , त्याने साखर कारखान्यावर कोयता लावलाय. उचल घेतलीय. त्यो पण आठवीलाय.'
ती दोन्ही मुलं मागास प्रवर्गातील होती. हे वास्तव चित्र आहे. शाळेऐवजी जेसीबी चालविणे किंवा मग कारखान्यावर ऊस तोडणे योग्य का वाटते? या प्रश्नावर विचारवंतांनी विचार करायला हवा.
अशी कितीतरी मुलं आहेत की ती शाळेच्या पटावर आहेत पण शाळेत उपस्थित नाहीत. अशा कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच त्यावरच्या उपाययोजना सुचतील. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, शासन, समाज आणि प्रशासन व्यवस्थेने हा प्रश्न समन्वयाने घेतला तरच मार्ग निघू शकतो नसता पुढील पिढी बरबाद करण्याचे काम चालूच राहील!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
मो.9421442995
May 16, 2017
पाऊस जणू आपल्या बरोबर हिरव्या रंगाचे डबे घेऊन येतो आणि रानावनात ओतत राहतो. रानांत पाचूचा चुरा उधळावा तसं कोवळ्या पानांनी फुललेलं रान सजू लागतं. ठिपक्यां एवढी पानं कले कलेने वाढत, रुपयाच्या नाण्याएवढी, वाटीएवढी किंवा हाताच्या पंजापेक्षा मोठी होत जातात. जमिनीवर हिरव्या गवताचं साम्राज्य पसरतं तस तसे, वाढणार्या हिरव्या गवतात आधीच्या वर्षात गळून पडलेली सुकलेली पानं, काटक्या, फांद्या झाकून जातात. काही मोडून पडलेल्या फांद्यांना देखील नवीन पालवी फुटलेली असते. जमिनी लगतचे दाट गवत, त्यावर १०-१५ फुटांपर्यंतची जागा व्यापून टाकणारी झुडपांची गच्च दाटी आणि त्या गर्दीतून माना वरती काढून, त्यावरचे ६०-७० फूट व्यापून टाकणारी झाडांची न संपणारी भिंत, असा तिपेडी हिरवा वेढा आसमंतात पडून जातो. पावसाने ओली झालेली झाडांची खोडं, काळी भोर दिसत असतात. त्या दणकट काळ्या सरळसोट बुंध्यांच्या, फांद्यांच्या पार्श्वभूमीवर, नव्याकोर्या नाजुक पानांचा चैतन्यपूर्ण हिरवा रंग मोठा खुलून दिसत असतो.
डोंगर झाडीने भरून जातात. महिन्याभरापूर्वींपर्यंत निष्पर्ण वृक्षांनी भरलेले मातकट रंगाचे डोंगर आणि टेकड्या आता हिरव्यागार झालेल्या असतात. एखाद्या हडकुळ्या मुलाच्या अंगावर चांगलं खाऊन पिऊन मांस चढावं तसं रसरशीत पानांनी लगडलेल्या झाडांमुळे डोंगर देखील अंग भरल्यासारखे वाटायला लागतात. झाडी एवढी दाट की फांद्या एकमेकात मिसळून त्यांचं एक छ्प्पर होऊन जातं. त्यात झाडं पानांनी भरून गेली की दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणं मुश्कील! डोंगरांच्या रांगां मागून रांगा नुसत्या गच्च झाडीने व्यापलेल्या. एखाद्या माकडाला एखाद्या झाडावर चढवलं, तर मैलोन मैल जमिनीवर पाय न लावता पालथं घालू शकेल अशी परिस्थिती! एखाद्या उंचश्या ठिकाणाहून, गर्द राईने भरून गेलेल्या या डोंगर टेकड्यांच्या मुलखावर नजर टाकली की एखादं अजस्त्र जनावर आपलं वळ्यावळ्यांचं अंग पसरून पहुडल्यासारखं वाटतं. त्याची हिरवी चामडी खवल्या खवल्यांनी भरून गेलेली असते. आणि या निबर जाड चामडीवर एखादा ओरखडा उठावा तसा झाडीतून गेलेला रस्ता दिसत असतो. पावसाळ्यातला ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो. ढगांच्या सावल्या डोंगरावरून सरकत असल्या की ऊन सावलीचे तुकडे एकमेकांचा पाठलाग करत धावतायत असं वाटायला लागतं.
माझ्या लॅबपासून घरापर्यंतच्या रस्त्यात जवळ जवळ ५-७ मैलांचा एक भाग असा आहे की सस्कुहाना नदी, रस्ता आणि एक रेल्वे लाईन एकमेकांना समांतर धावत असतात. रस्ता डोंगरावरून जात असतो. रस्त्याच्या एका बाजूला डोंगराचा अधिक उंच भाग, त्यानंतर रस्ता, रस्त्याच्या दुसर्या अंगाला छोटीशी दरी, त्या झाडीतून जाणारी रेल्वे लाईन, त्याच्यापलीकडे सस्कुहाना नदी, नदीच्या अल्याड पल्ल्याड झाड झडोरा आणि त्याच्याही पलीकडे गवताळ माळ. ही आडबाजूची कुठलीशी छोटीशी रेल्वे लाईन असावी, कारण फारच कमी वेळा इंजीनगाड्या ये जा करताना दिसतात. जी काही ये जा होते ती मालगाड्यांचीच. कधी कधी सस्कुहाना नदीमधे एखादी बोट दिसते. पावसाळ्यात डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावरून खाली वाहत जातं. रात्री बघावं तर नदीचं पात्र चांदण्यात चमकत असतं. झाडांच्या सावल्यांनी नदीचे काठ झाकोळून गेलेले असतात. रात्रीच्या अंधारात, आजूबाजूचे झाडीने भरलेले डोंगर आणखीनच काजोळी फासल्यासारखे वाटत असतात.त्या गच्च झाडीमधे डोंगरातून जाणारे रस्ते झाकून टाकले असतात. त्या लपलेल्या रस्त्यांवरून जाणार्या गाड्यांचे दिवे मधेच एखाद्या वळणावर दृष्टीस पडतात.झाडांच्या गर्दीतून या गाड्यांच्या दिव्यांचा लपंडाव चाललेला असला की जणू रात्रीच्या वेळी कंदील घेऊन भुतांचा खेळ चाललाय असं वाटतं.
माझ्या लॅबच्या जवळच एक मोठासा डोंगर आहे. त्यावरून उतरणारा रस्ता म्हणजे जणू मोठी घसरगुंडीच वाटते. जवळ जवळ ५००-६०० फुटांचा हा उतार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरीतून वर येणारी झाडं भिंतीसारखी भासत असतात. चहूबाजूंनी डोंगर असल्यामुळे डोंगरावरून उतरताना एखाद्या प्रचंड मोठ्या द्रोणामधे उतरल्यासारखं वाटतं. रस्ता असा उतरून पुढे साधारण मैलभर सरळ सपाटीवरून जातो त्यामुळे गाडीतून डोंगरावरून खाली उतरताना जणू एखादं विमान जमिनीवर उतरताना वाटतं तसं वाटतं. उतारावरून खाली येत असताना बाजूच्या दरीतली झाडं झपाट्याने वर वर येत आहेत असं वाटतं.
एप्रिल मे मधे झाडांवरच्या फुलांचा बहर संपता संपता गवतामधे उगवणार्या तणांना देखील फुलं यायला लागतात. पिवळ्या रंगाच्या बटणांसारख्या फुलांनी कुरणं, रस्त्याकाठचे गवताचे पट्टे भरून जातात. त्या मागोमाग, पांढर्या रंगाच्या तंतूंच्या गुच्छासारखी फुलं असलेली तणं तरारून येतात. काही दिवसांनी ही पांढरी बोंडं फुटून, त्यातून पांढर्या तंतूंच्या पंखांवर बसून, तणाची बियाणं वार्यावर वहात जाऊन दूर दूर पोहोचतात. तणांच्या या पिवळ्या पांढर्या फुलांपाठोपाठ जंगली फुलांचं नुसतं पेव फुटतं. पिवळा, गुलाबी, पांढरा आणि जांभळा हे प्रामुख्याने दिसणारे रंग. रस्त्याकडेचे, झाडांच्या पायथ्याचे, शेतांच्या बांधावरचे, कुरणातले, दगडांच्या खाचखळग्यातले गवत, तर्हेतर्हेच्या फुलांनी सजून जाते. फुलांचे प्रकार देखील किती वेगवेगळे ! काही अगदी लहान तर काही चांगली वाटी एवढी मोठी, काही एकएकटी डुलणारी तर काही गुच्छामधे लगडून जाणारी, काही साधी सुधी सदाफुलीसारखी तर काहींच्या डोक्यावर तुरे आणि कोंबडे! या सगळ्यामधूनच गर्द शेंदरी रंगाची bird of paradise सारखी फुले लक्ष वेधून घेत असतात.
August 5, 2015
या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.
December 27, 2021
आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्यांना चांगल्या बोलण्या-वागण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
October 10, 2018
२० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे.
March 24, 2019
आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.
January 14, 2012

१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.
१६ एप्रिल १८५३ च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने १४ डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली, त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून, तशाच प्रकारचे जुने दुर्मिळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू कार्यक्रमाला झालेल्या तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर, रेल्वेमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, वेदप्रकाश गोयल, राम नाईक, दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल, जयवंतीबेन मेहता व मुंबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.
दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ७ व ८ वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर, मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता, छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली.
रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले, की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस, १६ एप्रिल २००२ महत्त्वाचा आहे.
तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले, आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता, मात्र दीडशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.
ठीक ३.३५ वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून निघाली, तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टर्मिनस सोडल्यानंतर मस्जिदबंदर, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मुंबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.
दीडशे वर्षांपूर्वीच्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की १६ एप्रिल २००२ रोजी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गर्दी एवढी वाढली, की रेल्वेचे इतर मार्ग गर्दीने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या.
दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गर्दीने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं, धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल, कुर्ला स्टेशन, घाटकोपर, विक्रोळी, कांजुर-मार्ग, भांडूप, मुलुंड या साऱ्या ठिकाणी गर्दीचा महापूर लोटला होता.
ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतर्फे पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर ४.४५ वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या, शिट्टया, आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.
५.४० वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुर्मिळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर ६.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.
-- टिम मराठीसृष्टी
June 14, 2022
लेखिका मानसोपचार तज्ञ म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. व्यवसायमार्गदर्शक, मूल्यांकन व समुपदेशन प्रशिक्षक.
July 12, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti