वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖
मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.
यदा - ज्यावेळी
दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
निश्वसन्- धाप लागली असताना,
नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
ते- आपले
जटामंडलं- जटेचा विस्तार,
मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.
अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖
मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.
यदा - ज्यावेळी
दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
निश्वसन्- धाप लागली असताना,
नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
ते- आपले
जटामंडलं- जटेचा विस्तार,
मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.
अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा दारुणाभाषणा भीषणा मे
भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖
जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,
यदा - ज्यावेळी
दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
मे- माझ्या,
भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
तदा- यावेळी
मन्मनस्- माझे मानस,
त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.
असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा दारुणाभाषणा भीषणा मे
भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖
जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,
यदा - ज्यावेळी
दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
मे- माझ्या,
भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
तदा- यावेळी
मन्मनस्- माझे मानस,
त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.
असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
ते म्हणतात,
यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
वत्स - हे भक्ता !
मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
ही तुलनाच मोठी रम्य आहे.
आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
ते म्हणतात,
यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
वत्स - हे भक्ता !
मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
ही तुलनाच मोठी रम्य आहे.
आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
मनाची सबलता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा भक्कमपणा. आपल्या मनाचे निरोगी स्वास्थ्य….
मनाची सबलता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा भक्कमपणा. आपल्या मनाचे निरोगी स्वास्थ्य….
भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖
भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
आचार्य श्री म्हणतात,
हे भगवान शंकरा !
भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖
भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
आचार्य श्री म्हणतात,
हे भगवान शंकरा !
भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti