वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.
जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ पूर्ण होतो.
तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ?
नित्यं सर्व रसाभ्यासः ! चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.
पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर
गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.
कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.
खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.
गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.
मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.11.2016
दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.
दादर’ नामजन्माचा शोध घेतला असता बऱ्याच ठिकाणी ‘दादर’ हे नांव जिना किंवा शिडी यावरून आलं असा उल्लेख सापडला..
सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही.
आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते.
इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.
हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.
हृदयरोग टाळण्यासाठी नियम आहार-विहाराचे
आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा, तसेच सात-आठ चमचे साजूक तूप, शुद्ध ताजे दूध यांचा समावेश असू देणे.
आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.
नियमित चालायला जाणे, प्रकृतीनुरूप आसने करणे.
अनुलोम-विलोम, ॐकार गुंजन व ध्यानसंगीत यांच्या मदतीने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित व्हावा व हृदयाला प्राणशक्तीमचा पुरेसा पुरवठा व्हावा याकडे लक्ष देणे.
तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हृदयाची ताकद वाढवणारी, सुहृदप्राश, कार्डिसॅन प्लस वगैरे हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी रसायने नियमित सेवन करणे.
नियमित अभ्यंग करणे, विशेषतः छाती-पोट व पाठीवर रोजच हलक्यात हाताने तेल जिरवणे.
हृदयरोगाचे स्वरूप, कारण, तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून प्रकृतीनुरूप नेमके उपचार योजावे लागतात. हृदयरोगात औषधोपचारांबरोबरच पथ्य-अपथ्य सांभाळणेही खूप महत्त्वाचे असते.
तेल, आंबट पदार्थ, आंबट दही-ताक वगैरे पदार्थ, पचायला अवघड अन्न, तुरट पदार्थ हृद्रोगात वर्ज्य समजावेत, परिश्रम करू नयेत, उन्हात जाऊ नये, राग, मैथुन, चिंता, अति बोलणे टाळावे.
तांदूळ, साळीच्या लाह्या, जव, मूग, परवर, कारले वगैरे गोष्टी हृदयरोगात पथ्यकर होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- मी मराठी / इंटरनेट
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
टिळक,आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते.
मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे जसे मानले जाते तशीच नारायण पेठी या नावाची एक बोली आहे. भारतभर विखुरल्या गेलेल्या स्वकुळ साळी म्हणजेच विणकर समाजाची ‘नारायण पेठी’ ही बोली भाषा आहे.
साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा समाज अशी या स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, पैठण, येवला, नाशिक, अहमदाबाद, नवसारी, सुरत, आदोनी, बंगळुरू, हुबळी, बेळगाव, उज्जन, इंदूर अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. साहजिकच हे लोक वास्तव्यास असलेल्या राज्याची राजभाषा उत्तम प्रकारे बोलू शकतात.
आंध्र प्रदेशातील नारायण पेठ (जि. मेहबूबनगर) या गावी मोठय़ा प्रमाणावर विणकर समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. नारायण पेठी ही बोली ते आजही बोलतात. देशातील अन्य अनेक राज्यांत उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले स्वकुळ साळी समाजाचे लोक त्या त्या राज्यांमध्ये आपापल्या घरात हीच नारायण पेठी बोली बोलतात.
मात्र असे असले तरीही सध्या ही बोली बोलता येणारे काही मोजक्या ज्येष्ठ व्यक्ती उरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या अस्तानंतर ही बोली लुप्त होईल का अशी भिती या समाजाच्या लोकांच्या मनात आहेच.
नारायण पेठी बोली भाषा ही बोलायला सहज सुलभ, ऐकायला गोड आणि मवाळ अशी आहे.
हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘तेलंगणातील मराठा समाज-भाषा आणि संस्कृती’ या संशोधन प्रबंधामध्ये स्वत:ची बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणामध्ये आढळून आल्या आहेत. त्यामध्ये स्वकुळ साळी या समाजाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
हातमागावर विणकाम करणे हाच व्यवसाय असल्याने हा समाज शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. या बोलीची लिपी देवनागरी आहे. मात्र तरीही या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज मिळणे थोडे दुर्मिळच आहे.
मराठी आणि नारायण पेठी बोलीतील शब्द :
माझे – माझू,
तुझे – तुझू,
काय झाले? – का झालू?,
दुखते – दुखालै,
बरे – बरू,
बघ – देक,
बोलावणे – बोलिला,
मडके – मडकू,
कोठून – कटून,
देऊळ – गुडी,
लहान – धकटू,
सतरंजी – झमकाना,
भाकरी – भक्कर
काही वाक्प्रचार :
मुलगी पसंत पडली वाङ्निश्चय झाला – पैर पसंत पडली घट्ट झालू,.
आता मला काम करण्यास जायचे आहे – आंता मज काम करास जाँवई
काही वाक्ये :
मी काम करतो – मी काम करतैय,
ही आता आली – हिने आंता आली,
तो घरी आला – तेने घरांन आला,
मी घरी गेलो – मी घरांन गेलू.
-- मराठीसृष्टी टिम
‘फॉर्च्युन’ मासिकाच्या ’40 Under 40′ ह्या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीतही मंगेश यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील ‘Speaking Tree’ ह्या स्तंभासाठीही लिखाण केले आहे.मंगेश घोगरे यांना लहानपणापासूनच शब्दकोड्यांचे वेड होते. ते शाळेतही वर्गात बसून शब्दकोडी सोडवत असत.
आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.
Copyright © 2025 | Marathisrushti