वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात!
२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे.
२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते.
काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.
“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.
नशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..
अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.
Copyright © 2025 | Marathisrushti