वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अगदी लहानपणी १ ते ५ वर्षांपर्यंत मुलाचा हात सहजगत्या अधिक जोरात ओढला गेला तर मुले रडू लागतात व संपूर्ण बाहू हलविणे बंद करतात. अशा वेळी काय करावे हे आई-वडिलांना कळत नाही याला खेचलेला कोपराचा सांधा असे म्हणतात.
May 12, 2023
या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली.
October 10, 2022
कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या ...! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत नाही. विवाह कार्यात लेकी, सुना, नातवंडाना सोन्याचे दागिने देण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे आपला ओढा सोन्याकडे अधिक असतो, हे तर सांगणे न लगे. परिस्थितीनुसार काही जन आपली हौस चांदीचे दागिने परिधान करून भागवतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद काय ती समजते. सोने हे सौंदर्यवृद्धीसाठी आहेच शिवाय शरीरस्वास्थाची काळजी घेते व काही रोग बरे करण्यासाठी मदत करतात, अये आयुर्वेद सांगत आहे. परिधान केलेले सोन्याचे दागिने शरीरातील काही नलिका बिंदूवर दबाव टाकून मन व शरीर प्रसन्न ठेवते.
कान टोचावयास सोनारांची समस्त हिंदुना गरज सोनारांची पडते त्या सोनारांचे कान कोण टोचणार ....? हा प्रश्न नेहमीच आम्हांला पडतो. असे अनेक व्यावसायिक असतील त्यांच्या बाबतीत हेच घडत असेल. सोनार म्हणजे अर्थात ज्वेलर्स, जे सोन्याचांदीची खरेदी विक्री करतात त्यांच्याविषयी माझ्याच नव्हे तर जनमनातले विचार प्रतिपादन करायचे आहेत. गल्लीबोळात असणारे विशेषत: घोडपदेव फेरबंदर विभागात नव्हे तर अन्य विभागात व्यापाऱ्यांनी काय उच्छाद मांडला आहे तो केवळ गरीब आणि गरजवंत यालाच ठाऊक आहे. पण अडचणीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करणारे हे सोनार. त्यांच्याकडून लुबाडणूक होत असूनही त्याच्याच कडे जाणारे खरेदीदार म्हणजे सर्वसामान्य अर्थात आपण मंडळी.
मी एकदा आपल्या एका ज्वेलर्सकडून बारश्याला लहान मुलाला भेट देण्यासाठी लहान मुलाची २३ कॅरेटची अंगठी रोकड देऊन खरेदी केली. काही अवधीनंतर झवेरी बाजार मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात कामासाठी बसलो होतो. तेथे सरसकट २२ कॅरेटचा व्यवहार चालतो. तेथे बसलेलो असताना मी घेतलेल्या अंगठीशी तंतोतंत दिसणाऱ्या अंगठ्या काउंटर वर आल्या. हजार दोन हजार अंगठ्याचा जुडगा मुंबईतल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वितरीत होणार होता. मी सहज त्याला बोललो ‘अरे यार मी अशी २३ कॅरेटची अंगठी कालच खरेदी केली.’ त्याने सांगितले शक्य नाही, या मालामध्ये २३ कॅरेट नसते. अरे मी तर २३ कॅरेटचे पैसे देऊन खरेदी केले. त्यावर हसत मला त्यांनी सांगितले, ‘तुला त्याने उल्लू बनविले.’ अरेच्या असं कसं होईल या मारवाड्यांना आपण आपले मानले आहे. ते आपल्याला कसे फसवू शकतील. म्हणून त्या प्रकारची अंगठी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक दुकानात फिरलो आणि २३ कॅरेटच्या अंगठीची विचारणा केली पण कोठे ही आढळून आली नाही. मग मात्र माझं डोकं सैरभैर झाले. पन्नास रुपये जादा गेल्याचे दु:ख नव्हते. फसविल्याची कळ सोसवत नव्हती. इकडे आमच्यासारख्यांना लुटायचं आणि सामाजिक, विधायक कार्यांना मदत केल्याचे चित्र निर्माण करण्यात यांचा हातखंडा. देणार तर हजार दोन हजार पण अशा थाटात देणार की, त्याने फार मोठे पुण्याचं काम केले आहे.
गल्लीबोळात धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी माझे स्पष्ट मत आहे. त्यात काही चांगलेही असतील आणि काही चांगलेही नसतील. काही प्रामाणिक असतील तर काही लुटेरेही असतील. हे आपल्या सर्व सामान्य वर्गाला का लुटतात...? तरीही लुट होत असूनही आपला माणूस त्यांच्या दुकानाची पायरी का चढतो....? या प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर हे व्यापारी काही महिन्यासाठी उधार देतात, तगादा लावत नाहीत. घडणावळ बाहेरच्या व्यापाऱ्यापेक्षा कमी असते. व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळणारे अवास्तव महत्व आणि त्याला हुरळून जाणारा ग्राहक. आणि उद्या गहाण अथवा मोडण्याची वेळ आली तर दूर जायला नको. अशी आपण स्वत:हून ओढवून घेतलेली कारणे. एका विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी आपल्या जीवावर कसे इमले बांधलेत, याचं तर वर्णन करावयास नको.
सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याची शुद्धतेची हसत हसत शाश्वती देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यात दुट्टपीवृत्ती भरलेली असते. यांच्याकडून घेतलेले सोनं काही दिवसात काजळी चढल्याप्रमाणे का दिसते. २३ कॅरेटच आहे मग त्याप्रमाणे ते देतात का...! किती मिलावट असते,याचा विचार कोणीही करीत नाही. मग तुम्ही मोडावयास गेल्यानंतर कपाळावर हात मारून घेता की नाही. एकूण एका तोळ्याच्या मागे १ ग्राम घट धरली जाते ती काय म्हणून...! काही मारवाडी १ ग्राम घट धरूनही एकूण चालू भावाच्या १०% कमी दर त्या व्यक्तीच्या गळी उतरवितो. वाहन घसारा किंवा इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर घसारा मान्य आहे. या सोन्यातल्या घट विषयी व्यापाऱ्यांची उद्दामगिरी आपण खपवून घ्यायची. आपले लोक काही पैसे वाचविण्यासाठी बिल घेत नाहीत. मग त्यांना आयती संधी चालून येते. ज्या दुकानात सोने घेतले त्यांनी त्या दिवसाचा पूर्ण भाव आहे तो द्यायलाच हवा. ही त्याची जबाबदारी आहे . त्याने जबाबदारी असून दूर पळता कामा नये.
आपली माणसं देवभोळी आहेत. हल्ली दुकानात सोन्या चांदीच्या देवादिकांच्या नाणी, मुर्त्या आहेत. त्यामध्ये मिलावट असूनही व्यापारी सांगेल त्या भावाला खरेदी करतो. देव्हाऱ्यात ठेवा काही दिवसात काळ्याभोर पडतात. तरीही उजेडात सरळ फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदोउदो आपणच करतो. या व्यापाऱ्यांच्या उद्यमशीलता वाढीसाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सतत असतो पण दिसत नाही. प्रचंड संयम व कौशल्य आणि दुधात साखर म्हणुन त्यांस लागणारा अपार गोडवा जो मुळातच केवळ आतच नाही तर जिभेतुन पाझरत असतो.
काही ग्राहक क्रेडीट कार्डाचा वापर करून सोने घेतात तेव्हा काही मारवाडी त्यावर काही टक्के अधिक रक्कम उकळतात. सोन्याचांदीची किती मोठमोठी दुकाने आहेत . त्यांच्या दुकानात असं घडत नाही मग हे गल्लीबोळातले महाभाग आपल्या भोळ्याभाबड्या माणसांना का फसवितात...? त्यांच्या अनैतिक व्यवहाराला कसा लगाम घालता येईल, हे ग्राहकच ठरवू शकतो.
अशोक भेके
April 11, 2017
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.
August 27, 2019
पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.
August 3, 2008
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.
जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.
पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ....ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.
दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.
अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.
सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.
ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.
या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.
त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक "अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?" आणि दुसरा "अीश्वराची संकल्पना".
ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.
चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने...विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. "आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत" आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
तेथेच रुजलं.
या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व ... जेनेटिक मटेरिअल.
हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.
गजानन वामनाचार्य, मुंबअी.
शनिवारचा सत्संग - 1
शनिवार 26 नोव्हेंबर 2016
पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी -
27 फेब्रुवारी 2012
November 26, 2016
गेल्या दशकभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून आज नवी वाटणारी गोष्ट उद्या लगेच जुनी होत आहे. यामुळे ग्राहकांसमोर एकाच वेळी अनेक पर्याय खुले होत असून योग्य पर्याय निवडताना ते गोंधळून जात आहेत. सध्या अॅण्ड्राईड या मोबाईल फोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल बरीच चर्चा होत असली तरी त्यापेक्षाही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम कधीही बाजारात दाखल होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.
January 28, 2011
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे)
काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.
आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.
मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का?
डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल.
माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट.
डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.
आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.
(दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित)
June 3, 2015
भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. पण, आता बदलत्या काळानुसार ‘लिव्ह इन रिलेशनशीप’लाही समाजमान्यता मिळाली आहे. अशा नात्यात एकत्र राहण्यासाठी तसेच वेगळे होण्यासाठी ही कोणाच्या परवानगीची गरज नसते. पण, विभक्त झाल्यानंतर स्त्रीला पोटगी मिळावी, घरगुती हिंसाचार कायद्यानुसार तिला संरक्षण मिळावे तसेच अपत्यांची जबाबदारी कोणी घ्यावी यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच भाष्य केले.
October 22, 2010
हा देश महान करायचा असेल तर आधी या देशाची अस्मिता जागृत करावी लागेल, ज्या वस्तुंचे, पिकांचे उत्पादन या देशात होते, अशा सगळ्याच वस्तुंच्या आयातीवर बंदी घालावी लागेल, संसदेपासून ते प्राथमिक शाळेपर्यंत सगळीकडे इंग्रजीला कायम तृतीय किंवा त्याही खालचे स्थान द्यावे लागेल, क्रिकेटसहीत सगळ्या विदेशी खेळांची हकालपट्टी करावी लागेल आणि त्यासाठी आधी आपल्या मनात खोलवर रूजलेली गुलामीची पाळेमुळे निखंदून काढावी लागतील.
November 6, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti