(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्पर्धा परिक्षेतील डोकेबाज प्रश्नोत्तरे

    स्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्‍या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे

      November 21, 2012


  • डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ७

    त्यासुमारास डॅनलेवस्की या शास्त्रज्ञाने पक्षांमधील मलेरियाच्या परोपजीवांचा अभ्यास केला होता. त्याच्या संशोधनाप्रमाणे काही जातीची कबुतरे मलेरिया पसरविण्यास कारणीभूत आहेत असा निष्कर्ष होता. परंतु अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले होते की डास हे पक्षांना चावतच नाहीत तेव्हा रॉसने हे अनुमान पडताळून पहाण्याचा चंगच बांधला. त्याने कबुतरे, चिमण्या, कावळे यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास सुरू केला. त्याला लक्षात आले की या पक्षांना इतर किटकांप्रमाणे डासही चावतात.

    आता रॉसने मलेरियावरील संशोधन कलकत्ता येथील एका मोडकळीस आलेल्या प्रयोगशाळेत सुरू केले. या कामाकरिता रॉसने महंमद बक्श व पुरवाना असे दोन सहाय्यक निवडले. पुरवाना पहिल्याच दिवसाचा पगार घेऊन पळून गेला. महंमद बक्श मात्र कामामध्ये अतिशय दक्ष व मेहनती होता. त्याच्या पगाराचा खर्च रॉसने स्वत:च उचलला. शहरातील विविध गटारे, पाण्याची डबकी यामधून विविध जातीचे डास पकडून बक्शने रॉसपुढे हजर केले. त्या सुमारास प्लेगची जोरदार साथ असल्याने मलेरियाच्या प्रयोगाकरिता माणसे मिळेनाशी झाली व त्यामुळे रॉस पुन्हा पक्षांमधील मलेरियाच्या संशोधनाकडे वळला. यातून त्याने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले. पहिला निष्कर्ष असा की पक्षांमध्ये Culex जातीच्या डासांमुळे मलेरिया होतो व दुसरे अनुमान असे की माणसांमध्ये Anopheles डासांमुळे मलेरिया होतो. असे असूनही परोपजीवी वाढण्याची पद्धत व त्यांचे जीवनचक्र हे पक्षी व मानवप्राणी ह्या दोघांमध्ये सारख्या तऱ्हेचे असते या रॉसच्या संशोधनाच्या अहवालाचे लंडन मधील Tropical Diseases of British Medical Association या संस्थेने जोरदार स्वागत केले व यातूनच रोनॉल्ड रॉस यांच्यासाठी नोबेल पारितोषिकाचा मार्ग सुकर झाला.

    यानंतर मात्र सरकारी जाचामुळे वारंवार होणाऱ्या बदल्यांना कंटाळून तसेच कामामुळे आलेला अतिशय थकवा व जीवघेणा उकाडा या सर्व कारणास्तव कलकत्ता सोडून ऑगस्ट १८९८ मध्ये रॉस मायदेशी परतला.

    रॉसच्या संशोधनाच्या कामाची मर्यादा मलेरिया कोणत्या डासामुळे व कशा रितीने माणसात पसरतो एवढीच नव्हती तर लक्षावधी डासांचे प्रजोत्पादन कसे होते व ते कसे थांबवावे या बाबींवरही रॉसने तितकाच प्रकाश टाकला होता मुख्यतः त्याने हे सिद्ध केले की ॲनॉफेलीस डास हे मनुष्यवस्तीच्या अवतीभोवती निचरा न होणाऱ्या पाण्याच्या डबक्यात, व साठवलेल्या पाण्याच्या टाक्यांतून वाढतात. या पाण्यातच डासांच्या लक्षावधी अळ्या जन्माला येतात. चिखल व दलदलीच्या प्रदेशातच फक्त मलेरियाचे डास निर्माण होतात हा पूर्वीचा समज चुकीचा आहे हे त्याने सिद्ध करून दाखविले. पावसाळ्यात अशी डबकी जास्त प्रमाणात होतात. त्याचबरोबर उघड्या गटारातून वाहणारे सांडपाणी हे सर्व या रोगाला कारणीभूत आहेत व त्यामुळेच पावसाळा हा मलेरिया फैलावणारा ऋतु आहे. प्राचीन संस्कृतीच्या काळात गावातील गटारे जमिनीखाली व्यवस्थित बांधलेली असल्याने डासांची पैदास होत नसे त्यामुळे त्यांचे निर्मूलन आपोआप होत असे. रॉसने त्यापुढील आपले जीवन सर्वस्वीपणे डास निर्मूलनाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. रॉस सतत या विषयावरील आपल्या उपयुक्त योजना मांडीत असे. रॉसची 'सांडपाणी निचरा क्रांती' ही पद्धती अमेरिकेच्या क्युबन युद्धाचे वेळी हॅवाना शहरात व सुएझ कालवा बांधणीच्या वेळी इस्माईल शहरात अवलंबिल्याने हजारो लोकांचा मलेरिया पासून बचाव झाला होता. रॉसने मलेरियावरील संशोधनाच्या बाबतीत माणूस, मलेरियाचे परोपजीवी व डास या तीन घटकांवर आधारित या रोगाचे प्रसारण कसे होते हे गणिती सूत्राने सिद्ध केले. हा गणिती सिद्धान्त Some a priori pathometric equations by Ronold Ross British Medical Journal (BMJ) 1915 March 27 मध्ये प्रसिद्ध झाला. नोबेल प्राईझ समितीने या सूत्राची दखल रॉसनाच नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेताना विचारात घेतली होती.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 3, 2022


  • २०१२ चा दु:खद शेवट…..

    पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार?

      January 4, 2013


  • बुध्दिभेद की…?

    जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत.

      July 10, 2005


  • गणपती बाप्पा मोरया

    दीड दिवस , पाच दिवस,
    कुणाकडे रहातोस अकरा दिवस.
    सारे आळवणी करतात तुझी,
    कुणी करतात तुला नवस.
    काय सांगावा रुबाब तुझा,
    पेढे मोदक नुसती मज्जा.
    ऐषआराम सुखात ठेवतात तुला,
    आरत्या भजनांचा एकच कल्ला.
    घरही सारे न्हाऊन निघते,
    तुझ्या असण्याने भारून जाते.
    सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतात तुला,
    अष्टसात्विक भाव जागवतात मनाला.
    सगळं छान शुभ प्रसन्न असतं,
    अशुभाला इथे स्थानच नसतं.
    भक्तांच्या प्रेमाने तू ही गहीवरतोस,
    जड अंतःकरणाने परतायला निघतोस.
    इथपर्यंत बाप्पा सगळंच असतं छान ,
    जयजकार करत असतात मोठे लहान.
    विसर्जनाचं भयाण, सत्य येतं समोर,
    देवत्व संपतं,उभ राहातं वास्तव कठोर.
    विटंबना बाप्पा पहावत नाही डोळ्यांना,
    दिव्यत्वाचा तुझ्या, विसर पडतो साऱ्यांना.
    विसर्जन कसलं देवा, ढकलून देतात तुला,
    भग्नावशेष पार्थिवाचे -
    विखरून पडतातकिनाऱ्याला
    प्रासादिक म्हणे,
    -- प्रसाद कुळकर्णी.

      January 12, 2022


  • श्री गणेशस्तोत्र

    श्री गजाननाच्या पूजेत श्रीगणेशस्तोत्राचे स्थान मोठे आहे. नारदमुनींनी रचलेले हे स्तोत्र मराठीतही भाषांतरीत झाले आहे.

    श्रीगणेशाय नम । नारद उवाच ।

    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
    भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिेये ।। 1।।

    प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
    तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवत्रं चतुर्थकम् ।। 2।।

    लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
    सप्तमं विघ्नराजेन्दं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।। 3।।

    नवमं भालचन्दं च दशमं तु विनायकम् ।
    एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।। 4।।

    द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य पठेन्नर ।
    न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभुः ।। 5।।

    विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
    पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।। 6।।

    जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
    संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्र संशय ।। 7।।

    अष्टेभ्यो ब्राह्म्णेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् ।
    तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत ।। 8।।

    ।। इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम् ।।

      August 26, 2014


  • जळू , जळवा (Leech, Hirudinea)

    मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात “जळू” असू शकतो

      July 24, 2017


  • अक्षोटक / अक्रोड

    अक्षोटक / अक्रोड

    अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.

      March 19, 2019


  • समर्थ रामदास स्वामी – भाग १

    परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख "नारायण ठोसर" असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.

    समर्थ जन्मताच "परामानस विद्या" ज्याला इंग्रजीत " Advanced Psychology " असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.

    समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.

    मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या "चातुर्य लक्षणा"पासून करणार आहे.
    उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही 'गुण' धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ "आगंतुक गुण" असे म्हणतात.

    समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||

    ॥श्रीराम॥

    रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
    चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
    काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
    मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
    आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
    पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
    कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
    रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
    अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
    कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
    मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
    कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
    मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
    चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
    ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
    सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
    देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
    गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
    अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
    संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
    प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
    उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
    आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
    घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
    न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
    नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
    जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
    येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
    लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
    आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
    समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
    मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
    अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
    कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
    चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
    दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
    बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
    आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
    बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
    समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
    तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
    उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
    लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
    लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
    म्हणोन दुसर्‍यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
    दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
    हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
    समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
    समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
    यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
    जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
    समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
    आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
    दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
    मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
    बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
    आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
    नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
    ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
    तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
    आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
    बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
    बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
    उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
    शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
    सृष्टिमधें भगवद्‍भजन | वाढवावें ||३३||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||

    -- चिंतामणी कारखानीस 

      February 22, 2016


  • काश्मिरचा माजीद हुसेन

    साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही.

      October 7, 2016