वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
August 16, 2025
जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर कशाला टाकता. ते उद्यावर ढकलू नका. तुम्हीच तुम्हाला आव्हान दिल्यास, तुमच्यातील आळशीपणा दूर पळेल. त्यासाठी तुम्ही तुम्हालाच आव्हान द्या.
दिरंगाई हा शब्द तुम्हाला माहित आहे काय? आपण कितीही पध्दतशीर असलो, तरीही हा आपल्या जीवनात हळू-हळू प्रवेश करीतच
असतो. आपण जे काही हळू-हळू मिळविलेले असते, त्याची घडी तो बिघडवून टाकतो आणि जेथे काही करावेसे वाटत नाही, अशा ठिकाणीच तो अचानक आघात करीत असतो. जी शक्ती तुम्ही जमविलेली असते, ती खर्चली जाते. याचा परिणाम म्हणून आपण पूढे वाटचाल करू शकत नाही. तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटते आणि असे जर तुम्हाला वाटू लागले, म्हणजे तुम्ही दिरंगाईच्या स्थितीत आहात असे समजावे.
असे का घडते? हे समजावून घेणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही ते थांबवू शकाल. हे मोठ्या प्रमाणात असू शकते. जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे आळशीपणा होय किंवा एखाद्या गोष्टीपासून आपले लक्ष विचलित होणे होय. यासाठी प्रथमत: गळणारा नळ थांबविला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वत: कार्यरत रहा. नुसतेच कार्यरत राहू नका, तर तुम्ही अविरत कार्यरत रहा. कर्तव्य किंवा कार्य हीच विश्रांती समजा.
कधी कधी काम पुन: पुन्हा केल्यामुळे त्रासदायक वाटू लागेल. परंतू हे लक्षात ठेवा की आपल्या जीवनातील सगळी कामे हि उत्साह वर्धक असतीलच असे नाही, तर काही क्षण हे कंटाळवाणे देखील असू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घाला की हि तुमच्या जीवनातील तुमचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी केलेली तुमची गुंतवणूक आहे.
तुमच्या आयुष्यातील दिरंगाईबरोबर जर का तुम्हाला लढाई करावयाची असेल, तर तुम्ही तुम्हालाच वेळोवेळी आव्हाने द्या. त्यामुळे कंटाळा जाईल आणि तुमच्यात त्या स्फूर्तीदायक शक्तीचे संचारण होईल. त्यासाठी तुम्हाला जोखीमही उठवावी लागेल. त्यासाठी तुम्ही शूरपणाने ती जोखीम आपल्या अंगावर घ्या. आजपर्यंत ज्यांनी कोणी आपली साम्राज्ये स्थापन केलीत, ती त्यांनी आपल्या सुखावह स्थितीत निश्चितच स्थापन केलेली नाहीत. तर ती त्यांनी आपल्या प्रतिकूल स्थितीवर मात करूनच निर्माण केलीत. इतकेच काय, साम्राज्ये सोडाच, तर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात आपले नाव कमावले ते त्यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच मिळविले. त्यासाठी त्यांना वेळोवेळी झगडावे लागले. अनेक संकटाना सामोरे जावे लागले. आणि मगच ते नावारूपाला आलेत.
म्हणूनच उद्यावर कोणते काम सोडू नका. जे आजच करता येईल, ते आजच किंवा आत्ता करा. आपण ते जर कां उद्यावर सोडलेत, तरच दिरंगाईला आपल्या जीवनात वाव मिळेल व तो मिळतो देखील, कारण आपण आजचे काम उद्यावर टाकून ते देतच असतो.
हि दिरंगाई कशामुळे होत असते? तर आपल्या मनातील एका कप्प्यात असलेल्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या कल्पनेमुळे आपण ती करीत असतो. “आपण ते करू शकणार नाही” किंवा “आपला अपमान होईल” किंवा “लोक आपल्याला हसतील” किंवा “लोक आपल्याला वेड्यात काढतील” किंवा “मला यश मिळणारच नाही” किंवा “मी अपयशीच होईन” किंवा मला हे जमणारच नाही” या भीतीपोटीच आपण ते कार्य करण्यास घाबरत असतो. तुमच्या मनातील शंका आणि तुमच्यातील आत्मविश्वासाची असलेली उणीव तुम्हाला हे करण्यास प्रवृत्त करीत असते. आणि तुम्ही समजत असता की हाच तुमचा संरक्षणात्मक पवित्रा आहे.
एकदा का उशीर झाला की तुम्ही तुमचे कार्य करण्याचे टाळत जाता. याचे कारण, एखाद्या नियोजित वेळेत ते तुमच्याकडून होईल असे तुम्हाला वाटत नाही. यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील व्यवस्थापकाचा ताबा घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, ते लिहून काढा किंवा एखादी “कार्य नोंद वही” तुमच्याजवळ ठेवा. त्यासाठी लागणारा वेळ, तुम्ही देवू शकणारा वेळ, इत्यादींची त्यामध्ये नोंद करून ठेवा. अग्रक्रमानुसार नोंद घ्या व तुमचा कामाचा अग्रक्रम ठरवा. तुम्हाला हे लिहून काढण्यासाठी त्याची मदत होईल. थोडीशी स्वयंशिस्त मात्र पाळा.
अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या या नविन अवतारात लोकांनी पाहिल्यावर, तुम्हाला तुमचा बहुमान झाल्यासारखे वाटेल. तुमच्या नकळतच ते नवल घडेल. हे साध्य होण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला किंवा जवळच्या सहका-याला तुमच्यावर नजर ठेवण्यास सांगा. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या – “आज करावयाचे काम” – या नोंद वहीची दखल घ्या, ती रोजच्या रोज चाळून पहा. त्यामुळे कालचे काम, आजवर तर नाही ना ढकलले गेले आहे याची जाणीव सतत तुम्हाला होत राहील. जर तुम्ही तसे घडू दिलेत, तर ती तुमची दिरंगाई झाली असे समजा. विजयी वीर असे करीत नाहीत. आणि म्हणूनच आजचे काम आत्ता करा.
यासाठी पुढील मार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करावयास शिका..............
विश्वासाने जीवनात कर, यशाला वश .........! कर्तृवानेच मिळव यश ...........!!! पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास ...........! फक्त विजयाचा मनात धार तू ध्यास .............!!!
-- मयुर तोंडवळकर
December 1, 2010
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्या काटरगाव सुब्रमण्यम मंदिरात श्री गणेशचे दर्शन घडते. या मंदिरात श्री गणेशाचे स्वतंत्र स्थान असून गजाननाचे पूजन अर्चन वैदिक पद्धतीने केले जाते.
April 9, 2012
लीड्स्वर ऑस्ट्रेलियाचे सात गडी त्याने एकट्याने केवळ ५१ धावा देऊन गारद केले. त्यानंतर २० वर्षे विश्वचषकातील कुठल्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. १८ सप्टेंबर १९९७ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरू झालेला झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड हा कसोटी सामना ‘भाऊगर्दी’साठी प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेच्या संघात सख्ख्या भावाभावांच्या तीन जोड्या होत्या.
September 18, 2010
ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे.
June 7, 2017
दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते.
March 14, 2011
सध्याच्या परिस्थितीत बोलणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसह जगालाही भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखविली. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत भारताने अशीच ठोस भूमिका घेतली होती. भारतापासून फारकत घेण्याची उघड इच्छा व्यक्त करणार्या हुरियतच्या नेत्यांशी बोलणी करणे हा पाकचा खोडसाळपणा होता.
August 21, 2014
एखाद्याचं व्यक्तिमत्त्व केसांमुळे अधिकच खुलून येतं असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यामुळेच केस गळणं हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. बघता बघता डोक्यावरील केस गळायला लागतात आणि लवकरच, टक्कल पडण्याची भीती वाटायला लागते.
April 28, 2023
काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे.
September 14, 2010
तैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
May 27, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti