(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

    कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे 'विश्वची माझे घर' म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला की त्यात राहाणारे सारे लोक त्यांच्या रीती भाती याचबरोबरीने घरासारखाच देश मानणारी प्रवृत्ती अशा अनेकविध मानवी प्रवृत्तीतून कचरा आणि आपण, स्वच्छता आणि तिचे व्यवस्थापन यांचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे. भारतीय मनोवृत्तीचे हे एक मोठे लक्षण आहे की त्यांना अमेरिका, सिंगापूर, चीन, जपान अशा अनेक देशांचे अतिशय कौतुक आहे. अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात त्यांचा पुढाकार असतो. एवढेच नव्हे तर तिथल्या क्लीन सिटीचे, पद्धतीचे भरभरून कौतुक करताना ते मागे हटत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भारतात किती कचरा, अस्वच्छता हे ते टीका करण्यात या लोकांना काहीच गैर वाटत नाही.

    काही अपवाद वगळता हाच भारतीय माणूस त्याच्या दिनक्रमात बिनदिक्कत रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनात भरपूर कचरा करून कुठेही फेकताना दिसतो. यात त्याच्या समोर असलेली लहान मुलं तेच अनुकरण करतात. कारण त्यांच्यापुढे पालकांचे, मोठ्यांचे हेच वागणे असते.

    अशी मंडळी रेल्वे, बस, बगीचे, मैदाने अन्य सार्वजनिक ठिकाणे, स्वत:च्या वाहनातून प्रवास करतांना खिडक्यांतून रस्त्यावर कचरा टाकण्यात अग्रेसर असतात. एवढंच कशाला तोंडातील पानाचा, गुटख्याचा तोबरा रस्त्यांवर टाकणे, थुंकणे, पिचकारी मारणे, कुठल्याही कार्यालयाच्या, भिंतीवर असलेले घाण नक्षीकाम म्हणजे भारतीयांचा वावर ही जगभरात भारतीयांची ओळख ठरते म्हटलं तर चुकीचे ठरू नये.

    सार्वजनिक स्वच्छतागृहाचा शोध न घेता कुठेही लघवी सोडणे अन् परिसर घाण करणे याची लाज का वाटत नाही हा प्रश्न पडतो.स्वच्छतागृहाचा वापर करणारे फारच थोडे अन् तेही पाणी टाकतील, फ्लश ओढतील असे दृश्य विरळच.

    त्यामुळेच बहुतेक ठिकाणी नाकावर रुमाल धरूनच प्रवेश करायला लागतो अन् तेथील अस्वच्छता पाहून मळमळायला लागते. महिलांची तर एवढी कुचंबणा होते की टॉयलेटला जायचं म्हटलंकीच धस्स होतं. प्रवासात वेफर्स, बिस्किट्स, स्नॅक्स, टॉफी अस काहीही खाल्लं की त्याची वेष्टनं, पिशव्या, चांद्या, पाण्याच्या, पेयाच्या रिकाम्या बाटल्या खिडकीतून सरळ बाहेर फेकल्या जातात. काही महाभाग सार्वजनिक वाहनाने प्रवास करतांना बसल्या ठिकाणीच पायाने कचरा सीटखाली ढकलतात. यात फळ खाताना तर बघायलाच नको. केळी, संत्री, चिक्कू, आंबे, जांभळ यांची सालं, बिया कोठेही फेकताना, ढकलताना आपल्या या बेशिस्त वर्तनाने इतरांच्या अपघाताला, अपंगत्वाला या गोष्टी कारणीभूत होतील याची पर्वा न करता कुठेही कसेही खाणे यांचे आपले चालूच. शेंगांची टरफलं तर नेहमीचीच. शेंगा या अशाच खायच्या असतात जणू!

    वास्तवात प्रवास करताना प्रत्येकाने लांब अंतराचा की जवळचा हा विचार करून सरसकट कागदाची, प्लॅस्टिकची कचराबॅग बरोबर घेणे जरूरीचे आहे. व्यक्तिगत वा एकत्र कचरा या पिशवीत टाकावा. जो मुक्कामाच्या ठिकाणी, घरी, अन्यत्र कचराकुंडीत टाकणे सहज शक्य आहे. ज्यामुळे रस्त्यावरचा कचरा कमी होऊन रस्ते, पर्यायाने परिसर स्वच्छ राहील. त्याच बरोबर सफाई कामगारांचे काम कमी होईल. तेही आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांच्या स्वच्छतेच्या कामालाही मर्यादा आहेत ही एक माणूस म्हणून सर्वांनी जाणीव ठेवावी.

    मुंबापुरीत खास करून फेरीवाल्यांचे रस्ता आक्रमण आणि त्यावरील विक्री यातून निर्माण झालेला कचरा हा रस्त्यांवरच टाकला जातो. यात भाज्या, फळांमुळे कुबट ओला कचरा तयार होतो जो दुर्गंधीयुक्त अनारोग्य देतो. रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते, या सर्वांनी एक कचरा डबा ठेवून त्यातच दिवसभराचा कचरा जमा करून व्यवसाय बंद झाल्यावर कचराकुंडीत कचरा टाकणे गरजेचे आहे.

    फ्लायओव्हर, पदपथावरच्या झोपड्या यातून जो कचरा निर्माण होतो तो तर वाढता वाढे ढीग स्वरूपात असतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांना कचराडबे पुरवण्यात यावे. घंटागाडी या परिसरापर्यंत नेण्यात यावी. कचरा त्यातच टाकण्याची समज द्यावी, तशी सक्ती करावी अन्यथा नाममात्र एक रुपया वा तत्सम दंड आकारावा.

    मुंबापुरीत काही विभागात काहींचे बंगले, बैठी घरं आहेत त्यांनी आवारातील वृक्षांचा पडणारा पालापाचोळा वेळी अवेळी जाळून धूर, प्रदुषण करू नये.त्याऐवजी हा कचरा आवारात खड्डा करून त्यात टाकून कचर्‍यातून खत निर्मिती करावी. वा कचरा गोळा करून घंटागाडीत कचरा डब्यात द्यावा. अनेक सोसायट्या, इमारती, चाळी या दर्शनी भागात पॉश, साफसुफ असतात मात्र यांची मागील पाठची बाजू म्हणजे कचऱ्याचे उकीरडे असतात म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्यांची सांपत्रिक स्थिती उत्तम, उच्चभ्रू,सुशिक्षित कुटुंबही याला अपवाद नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. अशा बर्‍याच सोसायट्यांच्या सभासदांमध्ये काही सदस्य हे दाराशी येणार्‍या कचर्‍यावाल्याकडे घरातील कचरा न देता मागील बाजूस घरातूनच डस्टबीन उपडी करतात. यात आपल्या खालील मजल्यावरच्या लोकांना त्रास होतोय, हे गैर आहे याची जाण नसेल का? पण जडलेल्या गलिच्छ सवयी. यात सॅनेटरी नॅपकिन्सपासून केसांच्या गुंतवळीपर्यंत सारं, काहीच यांना वर्ज्य नसतं अशा बेतालांना काही दंड वा सजा करण्याची मुभा सर्वांना हवी असे म्हणावे वाटते.

    कचरा उचलणार्‍या सफाई कामगारांचे आरोग्य आणि माणुसकीचा दृष्टीकोन बाळगून सर्व फ्लॅटधारकांनी घराघरात ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा करून दोन डस्टबीन कटाक्षाने घरात ठेवाव्यात.

    अलीकडे सण समारंभ हे भरपूर आणि दणक्यात साजरे होतांना फटाके मस्ट् झालेत. पुन्हा हे फटाके अत्यंत जलदगतीने टायमरने उडवले जातात. या फटाक्यांपासून खूपच कागद, कपटे, कचरा रस्त्यांवर पडत राहतो अशावेळी संबंधित उत्सव प्रेमींना संयोजकांनी, सरकारनी तो कचरा त्वरित उचलण्यासाठी आग्रही असावे. एवढ्या भफबाज समारंभात तो कचरा झाडून एकत्र गोळा करण्यासाठी काही माणसं रीतसर त्यांना पैसे/पगार देऊन कामाला लावणे त्यावर खर्च करणे अशक्य नाही. कुठल्याही कामाची, कार्यक्रमाची शोभा ही व्यक्तिगत स्तरावर वा लोकांसाठी करतांना सामाजिक स्वच्छतेची जाण हवीच. हिच गोष्ट सर्व रिअॅलिटी शो, वाढदिवस, बक्षिस समारंभ, कुठलेही इव्हेंट यांच्या झिरमिळ्या सदृश्य रंगीत कागदी पावसाला स्वच्छतेचा अंकुश हवाच जेणेकरून त्या कार्यक्रमानंतर तिथे कचरा कुंडीचे रूप येणार नाही.

    अलीकडे शुभेच्छांपासून श्रद्धांजलीपर्यंत सर्वत्र फ्लेक्सचा जमाना आला आहे. पहिले नेतेमंडळींचे जन्मदिवस वा निधन, उद्घाटन, निवडणुका, स्वागत अशावेळी ब्लॅकबोर्डचा वापर केला जाई जो कार्यक्रम झाल्यानंतर पुसला जाऊन बोर्डवर नवनव्या बातम्यांचे लेखन होई त्या उलट अलिकडे फ्लेक्सचे झालल आगमन यामुळे ठिकठिकाणी समारंभ झाल्यावरही कित्येक दिवस किंबहुना कायमच हा फ्लेक्सचा टांगलेला कचरा सर्वत्र लोंबकळत राहतो. याच धर्तीवर जाहिराती, पोस्टर, बॅनर, स्टिकर यांनी रेल्वे, बस, भिंती विद्रूप तर होतातच पण हा कायमस्वरूपी कचरा ठाम मांडून बसतो. अन् मग कुठेही, कसेही, केव्हाही मसाजापासून बाबा बंगालीपर्यंत सर्वांना अवाजवी महत्व देऊ केले जाते. ज्यातून अनेक भोंदू अनैतिक गोष्टींचे पेव फुटते ते निराळेच. सर्वांचा वाईट, चुकीचा उद्देश नसतो. आकर्षकपणा, सुबकपणा यांचे आकर्षण असावेच पण हा नीटनेटकेपणा समारंभ पूर्ण झाल्यावर गुंडाळून व घडी करून ठेवणे अन् पुढच्या अनेकांसाठी स्वच्छतेचे पालन करणे, त्या अन्यांसाठी या जागेचा सुयोग्य वापर करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आधुनिकतेचा अंत जपतांना या प्रवृत्तीचा सर्वत्र प्रसार होईल अन् कुणीच नेता वा कार्यकर्ता वा सर्वसामान्य नागरिक अस्वच्छता करण्यास धजावणार नाही. पर्यायाने क्लीनसिटीचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

    थोडक्यात आपण प्रत्येकाने आपल्या देशाचा सदस्य या नात्याने आपली जबाबदारी समजून वर्तणूक ठेवली पाहिजे. टीका करणे सोपे असते पण आपल्या कल्पनेतील देश जगाच्या पाठीवर साकारताना आपण सर्वांनी केलेले प्रयत्न, वर्तन, आणि देश म्हणजे आपले घरच ही भावना जपायला हवी. आपण आपल्या घरात घरभर फळांच्या साली, खाद्यपदार्थांची वेष्टन अन्य कचरा करतो का? त्यासाठी नियोजित केलेल्या कचऱ्याच्या डब्यात तो टाकणे हे प्रत्येकजण अगदी लहान मुलंही करत त्यामुळेच आपला गाव, शहर, परिसर देश सर्वत्र आपलं घर समजून स्वच्छतेचे सुयोग्य पालन केले तर कचरा समस्या दूर होईल. पर्यायाने भारतात परदेशाकडे बोट दाखवण्याची जरुरी न उरता आपल्या देशाप्रमाणेच सर्वत्र स्वच्छता दिसली अशा आशयाची विधान आपण खुलेआम करून भारताची क्लीन नेशन ही अभिमानास्पद प्रतिमा सन्मानाने मिरवू शकू.

    समता गंधे
    ५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
    गोरेगांव (पूर्व), मुंबई
    ४०००६३०२२-२८७४५६८१

      January 2, 2016


  • प्लास्टिक

    प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली.

      October 29, 2023


  • मराठी आरमार दिन

    ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली.

      October 24, 2021


  • विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत

    ….. पण अध्यात्म याचे उत्तर देते जसे “ पाहिजे कवण हे अवघे विए | तव मूळ ते शून्य || ” (ज्ञाने 8.24) वरील वाक्य ज्ञानेश्वरी मधले आहे त्याचा अर्थ – हे सर्व कोणी निर्माण केले पहाता मुळातून शून्यातून निर्माण झाले असे दिसते .(It means the world is created by out of nothing), असेच गीतेतील एक श्लोक आहे”.

      March 23, 2019


  • सीएफएल बल्ब

    वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले.

      October 26, 2023


  • जय महाराष्ट्र

    महाराष्ट्राविषयी थोरांचे विचार…

      May 11, 2021


  • ब्रह्मानंदाचे माहेरघर स्वामींचे अक्कलकोट धाम !

    तुम्हाला हवे असणारे इहलोकीचे व परलोकीचे सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण हे अक्कलकोटच आहे. या अक्कलकोट शिवाय अन्य कोठेही तुमचे कल्याण होणार नाही. तुम्हाला अन्यत्र कोठेही परमानंदाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला हवे असणारे शाश्वत सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामीधाम अक्कलकोट हेच आहे. याशिवाय कुठेही तुमचे हित साधणार नाही. तेव्हा त्वरेने अक्कलकोट जवळ करून, स्वामीपायी धाव घ्यावी, स्वामीचरणी नतमस्तक व्हावे, यानेच तुमचे सर्वस्वी कल्याण होईल.

      September 15, 2018


  • कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा…

    एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा.

    स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा.
    सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, रस्त्यावरील दुरुस्ती कामगार,रस्त्याच्या कडेला बसलेला चांभार, भर उन्हात नारळ पाणी घेऊन फिरणारा,या घरातून दूर दुसऱ्या घरात कामाला जाणारी घरकाम मावशी,कुरिअर बॉय,इत्यादी त्यांचे काय?
    आपले काही सुती कपडे, scarf ,गॉगल, छत्री सढळ हाताने त्यांना द्यायला लाजू नका. सरबत,पाणी पुणेरी पणाने विचारू नका.न विचारता आग्रहानं त्यांना अवश्य द्या.
    ज्या लोंकाच्या हाताखाली हे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या वेळांची थोडी फेरफार त्यांच्या मालकांनी करणे गरजेचे आहे.
    पक्ष्यांसाठी भरपूर पाणी ठेवा.
    आता वैयत्तिक काळजी बघू.

    १.उन्हाशी खूप काळ संपर्क टाळा. टाळणे अशक्य असेल तर, डोकं,डोळे, याना उन्हापासून वाचवा.सफेद सुती,सैल वस्त्रे घाला.
    २.बंद AC , कूलर , खोलीतून अचानक उन्हात बाहेर जाऊ नका. विशेषतः कार मध्ये खूप वेळ थंडगार वातावरणातून एकदम बाहेर पडल्यास शरीर अचानक झालेल्या तापमानातील बदलाला सहन करू शकत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ, खूप क्वचित चक्कर येऊन पडणे, मूत्रप्रवूत्तीस त्रास होणे, इतपत त्रास होऊ शकतो.
    ३.हातापायावर,डोळ्यावर गार पाण्याचे हबके मधून मधून मारावे.
    ४. अर्थातच पाणी आणि पातळ पदार्थ अथवा पेये प्यावीत. कोल्ड्रिंक म्हणजे पेप्सी,कोक इत्यादी अजिबात पिऊ नये कारण त्याने शरीराची जलीय अंशाची गरज अजिबात भागत नाही उलट अपायच होतात.
    ५. ताक,जलजिरा, कॊकम सरबत, कैरीचे पन्हे,नारळाचे पाणी, नीरा,ताजे संत्रा मोसंबी रस प्यावा.
    ६. मसालेदार ,तिखट, गरम, तेलकट पदार्थ ,शिळे, रस्त्यावरील उघडे, पदार्थ खाणे टाळावे.
    ६. भरपूर फळे खावी.
    ७.शारीरिक अति व्यायाम अथवा काम ह्या उन्हात धोकादायक होऊ शकते. मध्ये मध्ये सावलीत आराम आणि शरीरातील जलीय अंशाची हानी भरून काढणारी वर सांगितलेली पेये प्यावीत.
    ८. भूक अर्थातच कमी होते त्यामुळे पचायला हलके आणि साधे जेवण असावे,
    ९. उष्णतेचा त्रास होतोय असे वाटल्यावर साळीच्या लाह्यांचे पाणी ,वाळा भिजवून पाणी, नारळ पाणी, उंबर जल,मनुकांचे सरबत, असे घ्यावे आणि अर्थातच आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
    १०. खूपच लहान बाळ आणि खूप वयस्कर व्यक्ती यांचे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाणावर लक्ष ठेवावे.लघवीला कमी होतेय असे वाटले तर शरीरात पाणी कमी असल्याचे ते पहिले लक्षण होय. तेंव्हा दुर्लक्ष करू नये.
    ११. शरीराची स्वछता हि आवश्यक आहे. अथवा घामोळ्या आणि इतर त्वचेच्या तक्रारी होतात.
    १२. शरीरातील पित्त रक्त असंतुलनाने होणाऱ्या डोळे येणे, डोळ्याला होणाऱ्या पुळ्या, नागीण या व्याधींवर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
    १३. उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन खाल्ले गेलेले बर्फ गोळा, icecream ,सोडा हे घशाची निश्चित वाट लावतात तेंव्हा भर उन्हात खाणे टाळा.तसेच ते तापमानाच्या दृष्टीने विरुद्ध अन्न होय.तेंव्हा निश्चित टाळा.

    आपल्याच प्रतापांनी आपल्यावर चिडलेली धरती माय आणि तिचा लाडका सूर्य लवकरच शांत होवो !

    वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
    drrupalipanse.wordpress.com
    (कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )

      April 2, 2017


  • डभईची लढाई (भाग दोन)

    बाळाजी विश्वनाथाचा उल्लेख आधी झालेलाच आहे. १६८९ च्या सुमारास तो घाटावर आला. राजारामाच्या कारकीर्दीत तो पुण्याचा सरसुभेदारीवर होता. १७०७ च्या खेडच्या लढाईच्या वेळी तो धनाजी जाधवाच्या पदरी अंमलदार होता. त्यावेळच्या कारस्थानातील बाळाजीच्या सहभागामुळे शाहूची मर्जी त्याच्यावर बसली.

      January 18, 2022


  • मुंबई उच्च न्यायालयाचा स्थापना दिन

    मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. आज १४ ऑगस्टला या न्यायालयाची स्थापना झाल्याला १५७ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाची इमारत हे आपल्या मुंबईचे वैभव आहे. मुंबई, मद्रास व कोलकाता येथील उच्च न्यायालयांच्या इमारती एकाच वेळी बांधल्या गेल्या आहेत. त्या वेळी भारतामध्ये या तिन्ही शहरांच्या ठिकाणी उच्च न्यायालये सुरू करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने २६ जून १८६२ साली परवानगी दिली.

    भारतातील ब्रिटिश काळातील न्यायालयांचा इतिहास १६७२ पासून सुरू होतो. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबईचे गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जियर होते. त्या वेळी त्यांनी मुंबईचा जो सर्वागीण आराखडा तयार केला, त्यामध्ये न्यायालयाची कल्पना मांडली. त्या वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अशी ग्वाही दिली होती की, ‘हे न्यायालय स्वायत्त आणि पारदर्शी कारभार करणारे असेल.’ तेव्हा ८ ऑगस्ट १६७२ साली या कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला.

    मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे लोक होते. जे.पी. व न्यायाधीश घोडय़ांवर स्वार होते, तर गव्हर्नर पालखीमधून व वकील लोक पायीपायीच या मिरवणुकीमध्ये होते. राजे दुसरे चार्ल्स यांनी ईस्ट इंडिया कंपनीला या बिगर सरकारी कोर्टाच्या स्थापनेसाठी दिलेले परवानापत्र खास गाडीतून आणले होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयाचे लोकांनी चांगले स्वागत केले. त्यानंतर १६७७ साली ऑन्जियार यांची कारकीर्द संपली व त्याबरोबरच न्यायालयाचा प्रामाणिकपणा व पारदर्शी कामकाजही संपले.

    या न्यायालयाचे न्यायाधीश ईस्ट इंडिया कंपनीकडून नेमले जायचे. त्यामुळे ही मंडळी प्रामाणिक नसायचीच, पण प्रशिक्षितही नसायची. त्यामुळे या न्यायालयाचे कामकाज बऱ्याच वेळा बंद पडायचे. हा सर्व प्रकार पाहून राजे पहिले जॉर्ज यांनी १७२८ मध्ये स्वतंत्रपणे पहिले ‘मेयर्स कोर्ट’ स्थापन केले. त्यानंतर राजे दुसरे जॉर्ज यांनी १७५३ साली दुसऱ्या मेयर्स कोर्टाची स्थापना केली. त्या वेळी मुंबईचा विकास जोरात होत होता व त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना सुगीचे, भरभराटीचे दिवस आले होते. या सुमारास ईस्ट इंडिया कंपनी ही नुसती व्यापारी कंपनीच राहिली नव्हती, तर ती सत्ताधारी पण बनली होती. त्यानंतर तिसरे जॉर्ज यांनी १७९८ मध्ये मेयर्स कोर्टाऐवजी ‘रेकॉर्ड्स कोर्टा’ची स्थापना केली.

    या काळात न्यायाधीशांची जागा सतत बदलत होती. त्या वेळी रेकॉर्ड्स कोर्टासाठी ‘अॅकडमिरल्टी हाऊस’ ही जागा निवडली. या वेळी कायदेतज्ज्ञ हिंदू पंडित, मुस्लीम काझी, पारसी धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू हे विद्वान लोक रेकॉर्डरला मदत करीत असत. कारण त्या काळात पर्सनल लॉनुसार तंटे मिटविले जात.

    या काळात न्यायदानाचा दर्जा नक्कीच उंचावला होता. या न्यायाधीशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू न घेण्याचे ठरविल्यामुळे म्हणजेच निष्पक्षपाती निर्णय देण्यामुळे न्यायव्यवस्था व त्या वेळचे इंग्रज सरकार यांच्यामध्ये मधूनमधून वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर मुंबई व इतर प्रांतांच्या न्यायव्यवस्थेला कामाची शिस्त लावण्यासाठी १८२४ साली चौथे जॉर्ज यांच्या परवानगीने रेकॉर्ड्स कोर्ट बरखास्त करण्यात आले व त्या जागी ‘सुप्रीम कोर्ट ऑफ बॉम्बे’ची स्थापना झाली. अशामुळे परिस्थिती सुधारली नाहीच, पण गव्हर्नर व न्यायाधीश यांचे संबंध मात्र ताणले गेले.

    १८५७ च्या स्वातंत्र्य लढय़ानंतर ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा तीन प्रेसिडेन्सी तयार केल्या. त्या वेळी इंडियन हायकोर्ट अॅतक्ट, १८६१ मध्ये निघून १४ ऑगस्ट १८६२ या दिवशी उच्च न्यायालय सुरू झाले.

    उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे पीनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड व सिव्हिल प्रोसिजर कोड यांच्या कायद्यात रूपांतर झाले. या उच्च न्यायालयात १५ न्यायाधीश नेमण्याची मुभा होती, पण प्रत्यक्षात सातच न्यायाधीश नेमले गेले होते. या उच्च न्यायालयामध्ये दाव्यांचे प्रमाण वाढले असूनसुद्धा जवळजवळ ५७ वर्षे (१८६२ ते १९१९) सातच न्यायाधीश या उच्च न्यायालयाचे सर्व कामकाज पाहत होते. ही परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या वेळी लक्षात आली, कारण त्या वेळी दाव्यांचे प्रमाण भरमसाट वाढले होते. या न्यायालयात ५०० दावे/ खटले होते, तो आकडा सात हजारांवर जाऊन पोहोचला.

    या न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम १ एप्रिल १८७१ ला सुरू होऊन नोव्हेंबर १८७८ मध्ये संपले. या बांधकामाचा प्रत्यक्ष खर्च १६,४४,५२८ एवढा झाला. या मूळ इमारतीला बरीच जोडकामे झाल्यामुळे मूळ वास्तूवर खूप भार आला आहे. न्यायालयातील खटले चांगल्याच प्रमाणात वाढले असल्यामुळे गर्दीचा भार पण चांगलाच वाढला आहे. ही हेरिटेज वास्तू सुस्थितीत करण्यासाठी राज्य सरकारने २० कोटींचा निधी पुरातत्त्व क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मंजूर केला. विशेष म्हणजे १८७८ साली या इमारतीच्या मूळ बांधकामाला साडेसोळा लाख लागले, तर सरकारला आता फक्त नुसत्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपये मंजूर करावे लागले. अगदी सुरुवातीला या उच्च न्यायालयात सात न्यायाधीश बसत असत. त्या वेळी पहिल्या मजल्यावर एक कोर्ट रूम होती, तर दुसऱ्या मजल्यावर सहा कोर्ट रूम्स होत्या. उरलेल्या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालये, न्यायाधीशांची दालने, वरिष्ठ वकिलांची दालने, बार असोसिएशनचे ऑफिस व ग्रंथालय असे सर्वकाही होते. ही वसाहत स्थापन झालेली उच्च न्यायालयाची इमारत हे मुंबईचे वैभव आहे.

    १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता या इमारतीवर तिरंगा फडकाविला गेला. त्या वेळी ब्रिटिश सरन्यायाधीश सर लिओनार्ड स्टोन यांनी त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्या हाती सर्व सूत्रे सोपविली. ही वेळ होती रात्री ११ वाजून ४५ मिनिटांची. तेव्हा सर्व सभागृह न्यायाधीश, बॅरिस्टर्स, वकील, न्यायालयाचे कर्मचारी आणि इतर पाहुण्यांनी भरगच्च भरून गेले होते. त्या वेळी कोर्टरूममध्ये तिरंगा फडकाविला गेला व त्याहून मोठा तिरंगा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या सज्जामध्ये झळकला.

    तेव्हा उच्च न्यायालयाच्या समोरच्या ओव्हल मैदानामध्ये जमलेल्या गर्दीचा आनंद गगनात मावत नव्हता. तेव्हा वसाहत काळात स्थापन झालेली न्याययंत्रणा गेल्या दीडशे वर्षांत भक्कम झाली आहे. सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालय पाहण्यासाठी मिळणे कठीण आहे; परंतु आपल्या मराठी राज्यात ज्या कोणी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत पाहिलेली नाही, त्यांनी ही इमारत आवर्जून पाहावी.

    दोन मजल्यांतील अंतर पायऱ्यांवरून चढताना चांगलीच दमछाक होते. ही इमारत म्हणजे व्हिक्टोरियन बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. जो कोणी प्रथमच ही इमारत पाहतो तो एकटक या इमारतीकडे पाहत असतो.

    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 14, 2021