(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १६

    दग्धिस्तिभि: कनकुंभमुखावसृष्टिस्वर्वाहिनी विमलचारूजलप्लुताङ्गीम।
    प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथगृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।१६।।

    दग्धिस्तिभि:- पुराणांतील अनेक संकल्पना पैकी संकल्पना आहे दिग्गज. पृथ्वीच्या आठ दिशेस हे आठ हत्ती असतात. त्यांच्या आधारावर पृथ्वी स्थिर असते.

    ही संकल्पना प्रतिकात्मक आहे. सगुण-साकार गोष्टीला जग म्हणतात. याच्या विपरीत निर्गुण-निराकाराला गज असे म्हणतात.
    अर्थात बाहेरून निराकार तत्त्वाच्या आधारे, सामान्य शब्दात निराधार स्वरूपात पृथ्वी असते.
    प्रतीकरूपात स्वीकारलेले गज म्हणजे हत्ती हे समृद्धीचे सर्वोच्च टोक.
    असे हत्ती दारात झुलत असणे श्रीमंतीचे सगळ्यात मोठे प्रतीक आहे. याला गजान्तलक्ष्मी म्हणतात.
    असे हत्ती आपल्या शुंडांनी आई जगदंबेच्या मस्तकावर अभिषेक करतात.
    हत्ती सामान्य असते तर त्यांचे घडे सामान्य असते आणि पाणी सुद्धा. येथे मात्र सर्वच अद्वितीय आहे. आचार्यश्री म्हणतात,

    कनकुंभमुखावसृष्टि- त्यांनी आपल्या सोंडे मध्ये घेतलेले घडे सोन्याचे आहेत. त्या घड्यांचा मुखातून ती वर्षाव करत आहेत. कशाचा?

    स्वर्वाहिनी- स्वर् वाहिनी अर्थात स्वर्गातून वाहणारी. देवी मंदाकिनी गंगा.

    विमलचारूजल- तिचे विमल अर्थात अत्यंत शुद्ध तर चारु म्हणजे अत्यंत सुंदर, अशा जलाच्या द्वारे,

    प्लुताङ्गीम- जिचे अंग ओलेचिंब झाले आहे अशी.

    प्रातर्नमामि - त्या आई जगदंबे ला मी सकाळी वंदन करतो. येथे सकाळी म्हणताना दिवसाचे पहिले काम, हा अर्थ अपेक्षित आहे.

    अर्थात आई जगदंबेची उपासना हेच आयुष्यातील प्राथमिक कार्य आहे.

    जगतां जननीमशेष- अशेष म्हणजे संपूर्ण, जगाची जननी अर्थात माता. कशी आहे ही माझी माता?

    लोकाधिनाथगृहिणी- हे लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. त्यांचे नाथ म्हणजे स्वामी अर्थात भगवान श्री विष्णू. त्यांची गृहिणी अर्थात प्रिय पत्नी. अमृताब्धिपुत्रीम्- अमृत अब्धि अर्थात दुधाचा समुद्र, क्षीरसागर. त्याच्यातून निर्माण झाली या अर्थाने त्याची पुत्री.
    तिला वंदन असो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 25, 2020


  • अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात

    अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .

      May 3, 2010


  • पाण्याऐवजी पारा?

    एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे.

      October 15, 2023


  • स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही!

    स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. थकवा दूर झाल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. स्विमिंग करताना आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे स्विमिंग करण्‍यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

      August 25, 2010


  • आज बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा

    कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला ‘शुभा’ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

    पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वहय़ांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. नवीन वहय़ा सुरू करण्यापूर्वी वहय़ांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो.

    नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    *९४२२३०१७३३

      October 31, 2016


  • ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

    ‘ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व असलेला प्रत्येक जण ज्येष्ठ’ असं मी मानते. आज अनेक वर्षे कला क्षेत्रात काम करीत असताना नव्या आणि जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकारांकडून अनेक गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात.

      December 25, 2022


  • दहावी सिंफनी

    सिंफनी ही साधारणपणे चार भागांची बनलेली असते. हे चारही भाग जरी एकमेकांशी संबंधित असले, तरी या चारही भागांचं स्वरूप स्वतंत्र असतं; तसंच या प्रत्येक भागात हजारो स्वर असू शकतात.

      January 13, 2022


  • नीट (NEET) परिक्षेच्या उत्तराची भाषा

    महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन !

      November 11, 2018


  • सिनेमा बनताना – मौसम

    ”मेरी  इश्क के लाखो  झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या.

      September 5, 2022


  • नवरात्र स्पेशल

    आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा...

    नवरात्रात व्रतातील आहार कसा असावा?

    - हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे - मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा - त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा - सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या.

    नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?

    नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज नवरात्रीच्या व्रतात काय करू नये? - फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये. - खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो. - यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो. - गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. - व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये. - व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं. - कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी. - साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता. - सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील. - दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं. - ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील. - नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या - नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं. - एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत. - ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 7, 2017