वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाय’ या आकड्यासाठीचे सांकेतिक चिन्ह म्हणून ग्रीक वर्णमालेतील २४ अक्षरांपैकी १६ वे अक्षर हे ‘पाय’ आणि ते आता ३.१४ किंवा २२/७ या संख्येसाठी जगन्मान्य झालेले आहे. त्यामुळे हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो.
March 14, 2022
खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही
March 27, 2016
सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती. कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!
July 9, 2017
आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?
June 10, 2021
मोबाईलमधील कॅमेरा छायाचित्रे काढण्यासाठी किवा छायाचित्रण करण्यासाठी वापरला जातो. पण, काही अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यास हा कॅमेरा आपल्याला व्यक्ती, ठिकाण याबद्दलची माहिती देऊ लागतो, स्कॅनर म्हणून वापरता येतो, ट्विटर किंवा फेसबुकवर कोण काय करत आहे हे सांगतो. त्यासाठी मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबरोबरच जीपीएस, इंटरनेट, कंपास आणि विशिष्ट अॅप्लिकेशन्स असावे लागते.
December 1, 2010
गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची…
February 27, 2020
भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.
October 11, 2020
कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ; पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ हे हलकेंफुलकें, light-weight, ( कांहींसें ‘थिल्लर’ ) नांव मुळीच suitable,योग्य वाटत नाहीं. चार ओळी अशा अर्थाचा शब्द हवा असल्यास ‘चतुष्पदी’ म्हणायला हरकत नाहीं. अनेक ‘चतुष्पदी’ असल्यास, ‘चारोळ्या’ म्हटलें जातें, त्याबद्दल अधिक न बोलणेंच बरें.
या पार्श्वभूमीवर, ‘मराठीसृष्टी’वर निलेश बामणे यांचें एक लघुकाव्य ‘चारोळी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेलें आहे, तें पहाणें योग्य ठरेल. तें काव्य असें आहे -
‘कुत्री – मांजरी
जगतात स्वतःसाठी
जगा एकदातरी
समाजातील उपेक्षितांसाठी…’
किती गंभीर, विचारप्रवर्तक काव्य ! तें आपल्याला अंतर्मुख करतें , जीवनाबद्दल चिंतन करायला भाग पाडते. चार ओळींमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे, वा: ! श्री. निलेश बामणे यांना kudos !
पण अशा या अर्थपूर्ण, संजीदा ( गंभीर, serious) काव्याचें शीर्षक ‘चारोळी’ असें वाचून आपण ( किमान मीतरी) उंचावरून दण्णकन् खाली आदळतो. हें शीर्षक, मजकुराच्या महत्तेचा पूर्णपणें खात्मा करून टाकते ! या काव्याला ‘मुक्तक’ हें अभिधान द्यायला काय हरकत आहे ?, तें नांव योग्यच आहे. मुक्तक म्हणजे खरें तर ‘Stand-alone verse’. आणि हें लघुकाव्य ( आणि यासारखी इतर लघुकाव्यें ) stand-alone verse, स्वतंत्र काव्य आहेच.
अशी आणखी उदाहरणें देता येतील. जसें की, शिरीष पै यांच्या ‘अज्ञातरेषा’ या नांवाच्या मृत्यूवरील लघुकाव्यांचा संग्रह. सांगायला नकोच की, यातील प्रत्येक stand-lone लघुकाव्य गंभीर आहे. या लघुकाव्यांना कवयित्रीनें ‘चारोळी/चारोळ्या’ म्हटलेलें नाहीं, हें निश्चित. ( आणि, कुणी जर तसें नांव देऊन म्हटलेच, तर तें योग्य ठरणार नाहींच ).
कोणी कदाचित असें म्हणेल की, ‘संस्कृत व हिंदीत मुक्तक म्हणतात हें ठीक ; पण मराठीत आम्ही काय म्हणून असें शीर्षक वापरायचें ?’ याचें उत्तर म्हणून मी महाराष्ट्र सरकारनें स्थापन केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’च्या २०१३च्या अहवालातील एक उतारा देतो . हा अहवाल, राज्य सरकारनें मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, केंद्राला officially submit केलेला आहे. या समितीत रंगनाथ पठारे, हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसेकर प्रभृती मान्यवरांचा, तसेंच राज्य सरकारच्या संबंधित Departments चे संचालक / सचिव यांचा समावेश होता. हा उतारा मराठीची पूर्वज भाषा ‘महाराष्ट्री’ हिच्यात जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथाबद्दल आहे. तो असा –
उद्.धृत मजकूर सुरूं (Quote ) =
‘गाथासप्तती’ हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसर्या शतकातील मुक्तकांचा ( द्विपदी, गाथांचा) संग्रह आहे. ....... ‘गाथा’ लोकप्रिय छंद किंवा वृत्त आहे.
= उद्.धृत मजकूर समाप्त (Unquote )
[ वरील उतार्यात ‘मुक्तक’ या शब्दाला दिलेला Bold Type माझा ] .
अशा मात्तबर समितीनें ‘मुक्तक’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. यापेक्षा अधिक athoratative भाष्य कुणी करायची जरूरच नाही. हें स्पष्ट आहे की, मुक्तक’ हें कांहीं ( चन्द, a few) पंक्तीचें stand-alone लघुकाव्य आहे (दोन-तीन-चार वगैरे ) ; आणि, हा शब्द मराठीत रूढ आहे. [ कुठल्याही stand-alone लघुकाव्याला मुक्तक’ असें संबोधण्यात theoritically प्रत्यवाय नाहीं ; मात्र हल्ली साधारणतया चार ओळींच्या लघुकाव्याला, चतुष्पदीला, ‘मुक्तक’ म्हटलें जातें, एवढेंच ] .
आपण ‘Lyric’ ला ‘भावगीत’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला ( हा शब्द फक्त मराठी व कन्नडमध्येच आहे). Free-verse ला ‘मुक्तकाव्य’ असा शब्द आपण योजायला लागलो. तर मग stand-alone गंभीर प्रकृतीच्या लघुकाव्याला आपण आधीपासून प्रचलित असलेला ‘मुक्तक’ हा सुंदर शब्द वापरला, तर काय काय हरकत आहे ?
सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.
-- सुभाष स. नाईक
Subhash s. Naik
August 16, 2017
ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.
ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न अाहे.
चला आता आपण शिरीषाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात:
१)सुज आलेल्या भागावर शिरीष बी चा लेप करावा.
२)दातांच्या रोगामध्ये शिरीषाचा सालीचा काढा गुळण्या करायला उपयुक्त आहे.
३)दम्याच्या रोगात शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी चुर्ण घालून देतात.
४)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना शिरीष सालीचे चुर्ण समभाग गाईच्या तुपामधून देतात.
५)शिरिष सालीचा काढा त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 16, 2017
ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.
February 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti