(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मेंदूवर क्ष-किरण

    मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो.

      July 4, 2021


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ७

    वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे
    ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते ।
    श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके
    पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥

    आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    वीणानादनिमीलितार्धनयने - वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली.
    शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा आपण सुखसंवेदना प्राप्त करतो त्यावेळी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आपले डोळे आपोआप मिटले जातात.
    कानावर येणारे अप्रतिम संगीत असो जिभेवर ठेवलेला रसपूर्ण पदार्थ. अत्तराचा गंध असो की गालावर फिरणाऱ्या मोरपिसाचा स्पर्श. कोणताही आनंद घेताना डोळे आपोआप मिटले जातात. पूर्ण आनंद घेण्याची ती स्वाभाविक प्रक्रिया असते. आई जगदंबा वीणा वादनाचा असा परिपूर्ण आनंद घेत आहे.
    विस्रस्तचूलीभरे- केश समूह विखुरलेली. वीणा वादनाच्या तल्लीनतेत मानेला सतत झटके दिल्याने तिची वेणी विस्कटली आहे. केस विखुरलेले आहेत.
    ताम्बूलारुणपल्लवाधरयुते- तांबूल भक्षण केल्याने आई जगदंबेचे ओष्ठ पल्लव लालबुंद झाले आहेत. कानाच्या आनंदासाठी वीणा तर रसनेच्या आनंदासाठी आई तांबूल भक्षण करते. ताटङ्कहारान्विते- ताटंक म्हणजे बाजूबंद. हार म्हणजे मोत्याच्या माळा. यांना धारण करून सुंदर दिसणारी.
    श्यामे- सावळ्या वर्णाची. शरीरशास्त्राच्या दृष्टीने अति गोरेपण आयोग्य आहे. त्यात सूर्यकिरणांनी प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक रंग कणांचा अभाव असल्याने, भारतीय संस्कृतीत सावळा वर्ण खऱ्या सौंदर्याचे प्रतीक मानलेला आहे. चन्द्रकलावतंसकलिते- मस्तकावर आभूषण रूपात चंद्रकोर धारण करणारी.
    कस्तूरिकाफालिके- भांगे मध्ये कस्तुरी भरणारी.
    पूर्णे- स्वतःचाच ठाई परिपूर्ण असणारी. पूर्णकलाभिरामवदने- पौर्णिमेचा पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकमल असणाऱ्या,
    मां पाहि मीनाम्बिके- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 31, 2020


  • कवीवर्य सुरेश भट

    १९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले.

      June 8, 2024


  • प्रतिमेचं उगमस्थान

    जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.

      June 24, 2011


  • घरंदाज वैविध्यपूर्ण गायकी

    श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

      January 26, 2011


  • शोले सिनेमाची ४६ वर्षे

    भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?

    १५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्‍‌र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले... पण " शोले" आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.

    कारण एकच त्यातील 'टिमवर्क'

    शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.

    दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.

    गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.

    जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.

    ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.

    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    https://www.youtube.com/watch?v=0OyJgWmZH0s

      August 15, 2021


  • मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

    मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं.

      February 25, 2017


  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – गोवार/गौर बाकूची

    होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते.

    अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या गेल्या तर हि भाजी कडू होते असे म्हणतात.

    हिची भाजी कडवट असली तरी लागते छान आणि ब-याच लोकांना हि भाजी फारच आवडते.जशी हि स्वयंपाकात वापरतात तसेच हिचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.

    गोवारीची भाजी हि चवीला कडू तिखट लागते व हि उष्ण असते त्यामुळे ती शरीरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त मात्र वाढवते.

    चला हिचे औषधी प्रयोग पाहूयात:

    १) चाई पडून टक्कल पडले असल्यास गवारीच्या ह्यांचा लेप त्या जागी लावावा व पोटात खायला गोवार भाजी द्यावी.

    २)हि भाजी कडूपौष्टीक मानली जाते त्यामुळे ताप येऊन गेल्या नंतर येणा-या अशक्तपणा मध्ये हि खायला द्यावी.

    ३)खरूज झाली असता गोवारीच्या बिया व कडूकारले गोमूत्रात वाटून लावावे.

    ४)त्वचेवर पांढरे कोड आल्यास तसेच सोरियासीस मध्ये गोवारीच्या बियांचे तेल त्वचेवर लावावे व पोटात खायला भाजी द्यावी.

    ५)मुळव्याध,कृमी व वारंवार संडास मधून आव पडणे ह्यात गोवारीची भाजी खाणे उत्तम होय.

    गोवारीची भाजी खायचा अतिरेक केल्यास अॅसिडीटी,पातळ जुलाब होणे व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 29, 2016


  • संवाद……. कधीही महत्वाचा !

    सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो.

      October 17, 2019


  • जानेवारी २६ : अ‍ॅडलेडवरील एका धावेची कसोटी

    ‘ऑस्ट्रेलिया डे’ला अ‍ॅडलेडमध्ये विंडीजचा केवळ एका धावेचा कसोटी-विजय आणि बर्थ-डे बॉय टिम मेची अपयशी झुंज.

      January 26, 2016