(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मेंदूसाठी मूलतत्त्वे !

    विचार आणि वर्तनाचे (त्यातून कृतीचे) मेंदू हे उगमस्थान असते. त्यावर आपले “होणे” अवलंबून असते. गैरवापर केला तर आपण वेगळे होतो आणि सदुपयोग केला तर वेगळे असतो. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मेंदूच्या सूचनेबरहुकूम होत असतात. याहीपलीकडे एक कार्य असते- प्रतिक्षिप्त क्रियेचे!

  • क्रिकेटपटू आल्फ्रेड पर्सी

    १९१० ते १९१४ पर्यंत ते केंटकडून खेळत होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे ७ वर्षे फुकट गेली. टिच फ्रीमॅन यांनी १९१९ च्या लहान सीझनमध्ये ६० विकेट्स घेतल्या तर १९२० मध्ये १०२ विकेट्स घेतल्या तर १९२१ मध्ये १६६ विकेट्स घेतल्या आणि १९२२ मध्ये १९४ विकेट्स घेतल्या ही त्यांची जबरदस्त गोलंदाजी पाहून , परफॉर्मन्स पाहून विझडेनने १९२३ मध्ये त्यांना ‘ विझडेन क्रिकेटियर ऑफ द इअर ‘ म्हणून त्यांना सन्मानित केले.

  • जागतिक कागदी पिशवी दिवस

    हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे.

  • पानशेत धरण फुटी

    पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.

  • अजूनही “लिटील” च !

    मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे?

  • पार्ले टिळक विद्यालयाची १०० वर्षे

    ‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

  • मेघदूत काव्य

    मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.

  • महाकवी कालिदास जयंती

    आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे  ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली.

  • जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

    एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे.

  • क्षमतांची संहिता

    मानव संसाधन विकासात मानव या शब्दाची व्याख्याच मुळी “क्षमतांचे गाठोडे” अशी केली आहे. काही क्षमता आपल्यात जन्मजात असतात – वंशपरंपरेने आलेल्या! काही आपण विकसित करीत असतो. पण प्रश्न असा आहे की, स्वतःच्या क्षमता आपणांस माहित असतात का? बऱ्याच जणांना माहित नसतात हे या प्रश्नाचे खरे आणि म्हणूनच कदाचित न आवडणारे उत्तर आहे.