(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ३

    अमेरिकन शेतीच्या प्रगतितील ठळक टप्पे
    १९ व्या शतकातील प्रगती – मनुष्यबळ ते अश्वशक्ती – शेती हा नेहमीच एक कष्टाचा उद्योग राहिला आहे. जमिनीची मशागत, पेरणी, तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकाचे रक्षण करणे, तयार झालेले पीक काढणे, धान्य साठवणॆ किंवा धान्य बाजारात नेण्यासाठी तजवीज करणे, एक ना दोन, हजार गोष्टी. १९ व्या शतकातलं अमेरिकेतलं महत्वाचं पीक म्हणजे गहू. अमेरिकन शेतकरी जुनीपानी लाकडी अवजारं वापरून मातीतली ढेकळं फोडण्यापासून सारी कामं हाताने करायचा. अगदी पार कापणी, मळणी आणि गव्हाची साठवणी करण्यापर्यंत सारी कामं हातानेच व्हायची.

    १९ व्या शतकात, जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली, तसतसं कमी कष्टात अधिक धान्योत्पादन शक्य होत गेलं. शेतं मोठी मोठी होत गेली. वेगवेगळ्या तांत्रिक अवजारांच्या कंपन्यांनी, पेरणीची वेगवेगळी यंत्रं तयार केली. १८३० च्या दशकात, शेतातलं तयार पीक कापण्यासाठी देखील यंत्रांचा वापर सुरू झाला. घोडयांच्या जोडीमागे असं कापणीचं यंत्र लावल्यावर कापणी अधिकच सुलभ होऊ लागली. कापणीच्या यंत्रामागे फिरत शेतकरी कापलेल्या ओंब्या गोळा करून, त्यांच्या राशी बनवून शेतात सुकण्यासाठी ठेवू लागले. पुढे तंत्रज्ञानात आणखी सुधारणा झाली आणि कापलेल्या गव्हाच्या ओंब्या नीट गोळा करून त्यांच्या राशी बनवण्याचं काम देखील यंत्रच करू लागली. गव्हाची मळणी करण्यासाठी सुरवातीला बैल किंवा घोडे, खळ्यात कापलेल्या पिकावर चालून धान्य सुटं करायचे. १८४० च्या सुमारास धान्य मळणीसाठी देखील यंत्र निर्माण होऊ लागली. १८५० च्या सुमारास वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला ही वाफेवर चालणारी यंत्रे एका जागी स्थिर (Stationary) असायची. नवीन शतकाचा उदय होण्याच्या सुमारास, ही वाफेवर चालणारी यंत्रे फिरती झाली होती. मळणीची कामे करण्यासाठी ठिकठिकाणी गिरण्यांची व्यवस्था होऊ लागली होती आणि त्यामुळे शेतकरी आपापल्या खळ्यात मळणी करण्या ऐवजी अशा गिरण्यांमधे आपलं धान्य पाठवायला लागले होते.

    सुरवातीला शेतीच्या कामात बैलांचा वापर सर्रास व्हायचा. १८७० सालापर्यंत बैलांऐवजी सर्वत्र घोडयांचा वापर होऊ लागला होता. सन १८०० च्या सुमारास शेतकर्‍याला जे काम करायला ३॥ -४ तास लागायचे, तेच काम सन १८८० च्या सुमारास केवळ १० मिनीटांमधे होऊ लागले. १८९० साली पेट्रोलवर चालणारे इंजीन शेतीच्या वापरात आले आणि शेतीच्या यांत्रिकीकरणात एका नव्या इंधनाची भर पडली.

    २० व्या शतकातील प्रगती – १९ व्या शतकातील प्रगतीमुळे, अंगमेहनतीची जी कामे त्यांचे आजोबा किंवा पणजोबा कष्टाने करत होते, तीच कामं आताची नवी शेतकरी पिढी घोडयांनी ओढण्याच्या यंत्रांत बसून करत होती.

    २० व्या शतकातील शेतीच्या दृष्टीने कदाचित सर्वाधिक महत्वाची प्रगती म्हणजे ट्रॅक्टर. सुरवातीचे ट्रॅक्टर्स खूपच अवाढव्य आणि बोजड असे होते. २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काही वर्षांतच ट्रॅक्टर अधिक लहान आणि सुटसुटीत होत गेले आणि त्यांचा वापर शेतीच्या बहुतेक कामांसाठी होऊ लागला.

    अमेरिकन यादवी युद्धानंतर जशी परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती दुसर्‍या जागतिक युद्धानंतर (१९३९-१९४५) पुन्हा उद्भवली. एक संपूर्ण तरूण पिढी मोठया प्रमाणात युद्धात कामी आली होती अथवा जायबंदी झाली होती. अमेरिकन शेतांमधे काम करणार्‍या कष्टकर्‍यांची कमतरता भासायला लागली होती. त्यामुळे ट्रॅक्टर्स आणि इतर तंत्रज्ञानाची कास पकडण्याशिवाय शेतकरी वर्गापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. तंत्रज्ञानाच्या प्रगती मधला, Combine Harvestor हा आणखी पुढचा टप्पा. या मशीन्समुळे पिकाची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येऊ लागली आणि शेतातलं उभं पीक सरळ निवडलेल्या धान्याच्या स्वरुपात शेतकर्‍याच्या हातात येऊ लागलं.

    २० व्या शतकातील शास्त्रीय संशोधनाने शेतकर्‍याचे जीवन चांगलेच बदलून टाकले. रासायनीक खते वापरून जमिनीचा कस वाढवणे, पिकांच्या नवीन नवीन जाती वापरून धान्योत्पादन वाढवणे, नवनवीन औषधांचा वापर करून पिकांवरील रोगांचा सामना करणे, वगैरे गोष्टी शक्य होऊ लागल्या. Hybrid crops नी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याही पुढे जाऊन दुष्काळाला तोंड देऊ शकतील, रोगांचा प्रतिकार करू शकतील, लवकर तयार होऊ शकतील अशी विविध प्रकारची पिकं, ह्या प्रगतीच्या वाटेवरच्या आणखी पुढच्या पायर्‍या ठरल्या. या सर्व आधुनिक साधनांमुळे, शेतकर्‍याला निसर्गावर अधिक नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ लागले.

    आता तर उपग्रहांच्या मदतीने शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज अधिक लवकर व अचूक स्वरूपात मिळू लागला आहे. याचा फायदा म्हणजे शेतीची कामे करण्यासाठी, हवामानाच्या लहरीवर न अवलंबून रहाता शेतकरी आपल्या सोयीनुसार त्यांचे वेळापत्रक आखू शकतो आहे. इंटरनेट देखील शेतकर्‍याच्या दैनंदिन कामाचं एक महत्वाचं अंग बनलं आहे. सारे जग ही एक मोठी बाजारपेठ बनत चालल्यामुळे, जागतिक घडामोडींचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात त्या अनुषंगाने फेरफार करू शकतो आहे.

    अर्थात सर्वसाधारण अमेरिकन शेतकर्‍याची आणि सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍याची जीवन पद्धत आणि कामाचं स्वरूप यांची सांगड कितपत घालता येईल हा मोठाच प्रश्न आहे.

      August 24, 2015


  • भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल.आय.सी.

    १९ जानेवारी १९५६ मध्ये भारतातील आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयकरणाच्यावेळी भारतामध्ये जवळ जवळ १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ अभारतीय कंपन्या आणि ७५ दूरदर्शी कार्यरत होत्या. राष्ट्रीयकरण दोन टप्प्यांमध्ये साध्य करण्यात आले, सुरवातीला कंपन्यांचे व्यवस्थापन अध्यादेशाच्या साधनाने ताब्यात घेण्यात आले, आणि नंतर सर्वसमावेशक विधेयकाच्या साधनाने मालकी सुद्धा.

    भारतीय संसदेने १९ जुन १९५६ रोजी आयुर्विमा महामंडळ अधिनियम पारित केला, आणी भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेषकरून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले एल.आय.सी.ची १९५६ मध्ये तीच्या कार्पोरेट कार्यालयां व्यतिरिक्त ५ प्रादेशिक कार्यालये, ३३ विभागीय कार्यालये आणि २१२ शाखा कार्यालये होती. पॉलिसी चालू असण्याच्या काळात आयुर्विमा करार दीर्घकालीन करार असल्याने तीच्या विविध सेवांच्या गरजा पुढील वर्षांमध्ये कार्यविस्तार करण्यसाठी आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये एक शाखा कार्यालय ठेवण्यासाठी भासू लागल्या. एल.आय.सी.ची पुनर्रचना करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर नविन शाखा कार्यालये उघडण्यात आली. पुनर्रचनेचा एक परिणाम म्हणून सेवा देण्याची कार्ये शाखा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि शाखा या लेखा युनिटस करण्यात आल्या.

    महामंडळाच्या कामगिरीने हे अद्भुत कार्य केले. हे फक्त सन १९५७ मध्ये २०० कोटी रूपयांपासून महामंडळाने वर्ष १९६९-७० मध्ये ओलांडलेल्या १००० कोटींच्या नविन व्यवसायावरून लक्षात येते आणि एल.आय.सी.ला नविन व्यवसायाचे २००० कोटींचे उद्दिष्ट पार करावयाला पुढील १० वर्ष लागली. परंतू ऐंशीच्या सुरवातीला घडत असलेल्या पुनर्रचनेमुळे, वर्ष १९८५-८६ पर्यंत एल.आय.सी.ने आधीच नविन पॉलिसींवरील ७०००सम एशुअर्ड चा आकडा पार केला होता.
    आज एल.आय.सी.ची २०४८ संपूर्ण संगणकीकरण केलेली शाखा कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, ८ प्रादेशिक कार्यालये, १३८१ उपग्रह कार्यालये आणि कार्पोरेट कार्यालयांसहीत कार्यरत आहे.

    एल.आय.सी.च्या वाईड एरीआ नेटवर्कने ११३ विभागीय कार्यालये व्यापली आहेत आणि मेट्रो एरीआ नेटवर्कच्या मार्फत सर्व शाखा जोडण्यात आल्या आहेत. काही निवडक शहरांमध्ये ऑनलाईन विम्याचे हप्ते गोळाकरण्याची सोय देऊ करण्यासाठी एल.आय.सी.ने काही बॅंका आणि सेवापुरवठादारांशी संधान साधलेले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी एल.आय.सी.ची इसीएस आणि एटीएम मार्फत विमाहप्ता भरणा सोय ही अतिरिक्त आहे.

    ऑनलाईन किऑस्क आणि आयव्हीआरएसच्या खेरीज मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, दिल्ली, पुणे आणि इतर अनेक शहरांमध्ये माहिती केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. पॉलिसीधारकांना त्यांच्या सहज प्रवेश पुरवण्याच्या हेतूने एल.आय.सी.ने उपग्रह संपर्क कार्यालये सुरू केलेली आहेत. उपग्रह कार्यालये छोटीशी, आटोपशीर आणि ग्राहकाला अधिक जवळची असतात. भारतीय विम्याच्या उदारीकरणाच्या परिस्थीतीत सुद्धा एल.आय.सी. नविन वाढीच्या दिशेने वेगाने स्वत:चीच मागील सर्व रेकॉर्ड मोडत कार्यक्रमण करताना आघाडीवर आहे.

    एल.आय.सी.ने ब्रिटन, फिजी, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमध्ये कारभार सुरू केला. तसेच विमा क्षेत्राबरोबरच पेन्शन, गृहकर्जे, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, वित्त उत्पादनांचे वितरण आदी क्षेत्रात एल.आय.सी. काम करीत आहे. आत्तापर्यंत एल.आय.सी.ने अनेक मैलाचे टप्पे ओलांडले आहेत आणि आयुर्विमा उद्योगाच्या दृष्टीकोनातून अभूतपूर्व कामगिरीचे अनेक मानबिंदू प्रस्थापीत केलेले आहेत. हा तोच हेतू ज्याने आमच्या पूर्वजांना विमा या देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी, आम्हाला एल.आय.सी.मध्ये हा संरक्षणाचा निरोप घेऊन सुरक्षेचा दिवा शक्यतितक्या घरांमध्ये लावण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या कुटुंबांसाठी सुरक्षा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी प्रेरणा दिली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 19, 2017


  • पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि पाकिस्तान पंतप्रधानाची अजमेरच्या दर्ग्याला भेट

    हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्‍वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्‍या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

      March 15, 2013


  • मालिका आणि वास्तव…..

    मालिका आणि वास्तव…..या विषयावरील मझे स्पष्ट विचार आपल्यासाठी आपल्यापर्यत पोहचले नसतील तर मराठी स्रुष्टीच्या माध्यमातुन !

      December 29, 2010


  • मांसाहार आणि आयुर्वेद …..

    आयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात …

      February 10, 2019


  • हसू आणि आसू

    1978 साल, बँकेच्या काऊंटरवर एक नेहमी येणारा खातेदार येऊन उभा राहिला. त्यावेळी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू होती. काउंटरवरील क्लार्क ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकत होता.

      May 12, 2023


  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३

    कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
    कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
    मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||

    श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
    कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
    कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
    गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
    तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
    तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
    मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
    अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 4, 2020


  • नवरात्रीचा साहवा दिवस

    आज नवरात्रीचा रंग हिरवा
    आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली
    'स्प्राऊटिंग ब्रोकोली' हे जरी या भाजीचे नाव असलेतरी 'ब्रोकोली' या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, सलीनास, पिलग्रीम, ग्रँडर वगैरे जाती आहेत. ब्रोकोली फ्लॉवरसारखी दिसणारी एक हिरव्यागार रंगाची भाजी आहे पण तो फुलकोबीचा हिरवा प्रकार नाही. ब्रासिका ओलेरेसिया (इटालिका ग्रुप) अस शास्त्रीय नाव असलेल्या ब्रोकोलीचा उगम इटलीतला मानला जातो.
    जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं. आणि काही प्रमाणात ओमेगा 3 देखील असतं, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रोकोलीत उत्तम प्रमाणात क्रोमियम असतं. ब्रोकोलीमध्ये सर्वात जास्त क्रोमियम असतं. ब्रोकोलीत सेलनियमही असतं. ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोगात करतात. ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतुमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्वाची अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते. ब्रोकोलीतील प्रचंड प्रमाणात असलेल्या क जीवनसत्वामुळे तिच्यामध्ये उच्च अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराचं एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी ब्रोकोली आहारात असणं चागलं असतं. ब्रोकोली वाफवली की तिच्यातील चोथ्याशी संबंधित घटक अशा प्रकारे काम करतात ज्यामुळे रक्तातील कोलोस्टेरॉलची पातळी कमी होते. ब्रोकोलीमध्ये असे काही फायटोन्यूट्रिअन्टस् आहेत ज्यामुळे शरीरात नको असलेल्या टाकाऊ गोष्टींचा निचरा होतो. ब्रोकोलीतील अ जीवनसत्व आणि के जीवनसत्व हे ज्यांना ड जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे ते बाहेरुन घ्यावं लागतं अशासाठी संयुक्तपणो उत्तम काम करतात. ब्रोकोलीत केम्पफेरॉल हे फ्लेव्हनॉइड भरपूर प्रमाणात असतं. हल्ली झालेल्या संशोधनातील निष्कर्षाप्रमाणो याचा उपयोग अॅलर्जीदायक घटकांचा परिणाम कमी करण्यासाठी होतो. गेल्या पाच वर्षातील संशोधनामधील निष्कर्षाप्रमाणो ब्रोकोलीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारे घटक आहेत. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास होतो. तसेच त्यातील क्रोमियममुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य चांगले राहून ऑसियो पोरॅसिस होण्यापासून प्रतिबंध होतो. ब्रोकोलीमुळे मलोत्सजर्नाला फायदा होतो. तसेच त्यातील अ जीवनसत्वामुळे ब्रोकोली डोळे व त्वाचा यासाठीही अगदी उत्तम असते. ब्रोकोली कच्ची खाणंही चागलं असतं. पण त्यासाठी ती पूर्णपणो नीट चावून खायला हवी.
    आपल्या नेहमीच्या भाज्या घेतांना त्या भाज्यांचे आपल्याला माहित असलेले बारकावे बाजारातल्या टोपलीतल्या भाजीत आहे की नाही याची आपण खात्री करून घेतोचं.
    ब्रोकोली विकत घेतांना त्यावरचे तुरे ताजे आणि घट्ट आहेत हे बघून घ्यावं. सर्व तु:यांचा रंग एकसारखा गडद हिरवा किंवा जांभळट हिरवा असला पाहिजे. त्यात कुठेही पिवळेपणा असता कामा नये. तु:यांचे देठ आणि मुख्य देठ घट्ट असले पाहिजेत. बाजारातून ब्रोकोली विकत आणल्यावर न धुता प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तिच्यातील शक्य तेवढी हवा काढून घेऊन पिशवी फ्रीजमध्ये ठेवल्यास ब्रोकोली दहा दिवस चांगली राहू शकते. ब्रोकोलीचे तुरे एकदा कापले की लगेच संपवावे लागतात नाहीतर त्यातील क जीवनसत्वाचा नाश होऊ लागतो. शिजवलेली ब्रोकोली उरली तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन तीन दिवस चांगली राहते.
    ब्रोकोली शिजवतांना.
    - ब्रोकोली शिजवण्याआधी थंड पाण्यात स्वच्छ धुवावी. मग तिचे तुरे वेगळे काढावेत.
    - मुख्य देठावरली साल काढून त्याचे तुकडे करावेत. मग हे सगळं दहा पंधरा मिनिटं तसचं ठेवावं. त्यामुळे ब्रोकोलीतील कार्यक्षम होतात.
    - ब्रोकोली शिजवण्याची उत्तम पद्धत म्हणजे ती कुकरमध्ये वाफवावी. पाण्यात शिजवू नये. पाण्यात शिजवल्यानं तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश होतो. देठ शिजायला वेळ लागतो म्हणून देठ आधी वाफवण्यास ठेवावे मग तीन चार मिनिटांनी तुरेही वाफवण्यास ठेवून सर्व एकत्र पाच मिनिटं वाफवावं. ब्रोकोली कधीही जास्त शिजवू नये. ती जरुरीपेक्षा जास्त मऊ झाली तर तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश झाला असं समजावं.

    ब्रोकोलीचे काही पदार्थ

    ब्रोकोली चीझ बॉल्स
    साहित्य : पाव किलो ब्रोकोली बारीक चिरूलेली, मिरची व लसूण पेस्ट दोन टेबल स्पून, एक कांदा बारीक चिरूलेला, अर्धा कप शिजवलेला बटाटा, मोझरेला चीझ १ टीस्पून, मिक्स हर्ब, , एक कप ब्रेड क्रम्प्स, एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
    कृती : गॅसवर फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, मिरची, लसूण परतून घ्या. त्यात ब्रोकोली घाला. पुन्हा परतून घ्या. हे सगळं थंड करून घ्या. मग त्यात उकडलेला बटाटा घाला. थोडे कॉर्नफ्लॉवर घालून एकजीव करा. मग त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. त्यात प्रत्येकात चीझचा तुकडा घालून ब्रेड क्रम्प्समध्ये घोळून परत कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळून घ्या.

    चायनीज चिली ब्रोकोली फ्राय
    साहित्य : १ कप ब्रोकोलीचे तुकडे, १ कप उभा चिरलेला कांदा, १ कप उभी चिरलेली सिमला मिरची, १/२ कप उभे चिरलेले गाजर, १ टीस्पून चिली सॉस, २ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ लाल मोठ्या मिरच्या, ६ लसुण पाकळ्या, १ टीस्पून बारीक चिरलेले आले, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, २ टीस्पून तेल.
    कृती : एका बाउल मध्ये सर्व सॉस आणि मीठ व मिरपूड एकत्र करावे. त्यात ब्रोकोलीचे तुकडे टाकून १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत. एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात वरील ब्रोकोली, बारीक चिरलेला लसुण, आले, मिरच्यांच्या चकत्या व उर्वरित सर्व भाज्या टाकून ८-१० मिनिटे परतावे. फ्राईड राइस किंवा नूडल्स सोबत गरमागरम वाढावे.

    ब्रोकोली सॅलड
    साहित्य : १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, १ बारीक तुकडा आले, बदाम, १ पुदिना, १/२ कोथिंबीर, १/२ लिंबाचा रस, १ चमचा ऑलिव ऑइल, मीठ व काळी मिरी.
    कृती : ब्रोकोलीची देठे काढून ब्रोकोलीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ब्रोकोली स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. जास्तीचे पाणी काढून टाका. पुदिन्याची अर्धी पाने न कापता बाजूला ठेवा. अर्धी पाने सुरीने बारीक चिरून घ्या. चिरलेली पाने एका भांड्या मध्ये ठेवा. एका मोठ्या भांड्यात दीड दोन भांडी घालून गरम करत ठेवा. भांडे झाकून ठेवा. म्हणजे पाणी लवकर गरम होईल. आता एका चाळणीत ब्रोकोली आणि बदाम घाला. पाणी निघून गेल्यावर त्याच्यावर झाकण ठेऊन बाजूला ठेवा. ब्रोकोली मध्ये आले, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, अख्खी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, लिंबाचा रस, ऑलिव ऑइल, मीठ आणे काळी मिरी घालून एकत्र करा. ब्रोकोली सॅलड जेवणाबरोबर खा.
    जर ब्रोकोली सॅलड थोडेसे गोडसर बनवायचे असेल तर सॅलड मध्ये १ चमचा मध घाला आणि ढवळून एकत्र करून घ्या.

    काबुली चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट
    साहित्य : अर्धी वाटी भिजवलेले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले काबुली चणे, अर्धी वाटी ब्रोकोलीची फुले, १ लहान बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीनुसार, १ लहान चमचा बारीक चिरलेली मिरची, १/४ लहान चमचा धणेपूड, चाट मसाला - १/४ लहान चमचा, ताजी कोथिंबीर - १ लहान जुडी, लिंबाचा रस - १ मोठा चमचा.
    कृती : काबुली चणे नरम होईपर्यंत किंवा हाताने कुस्करता येतील इतके शिजवा. याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. ब्रोकोलीच्या फुलांना पुरेशा पाण्यात थोडावेळ उकळवून घ्या, नंतर त्याला थंड पाण्यात घाला, ज्यामुळे त्यांचा हिरवा रंग कायम राहील. नंतर किसणीने ब्रोकोलीला किसून घ्या आणि चण्याच्या मिश्रणात मिसळा. नंतर या मिश्रणात चिरलेला कांदा, मीठ, धणेपूड, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
    सर्व एकत्र केल्यानंतर याचे गोल किंवा लंबगोलाकार पॅटीस बनवा. एअर फ्रायर वापरणार असल्यास १८० अंश सेल्सियस तापमानावर १५ मिनिटे ऐअर फ्राय करा. १० मिनिटांनंतर त्यांना पलटवा. तळणार असल्यास सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.

    ब्रोकोली सूप
    साहित्य : दीड कप ब्रोकोलीचे तुरे, १ टेस्पून बटर, ३/४ कप कांदा चिरलेला, १ मध्यम गाजर चिरून, १ टे स्पून मैदा, २ कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, १/४ कप क्रीम, तळलेले ब्रेडचे तुकडे चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
    कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूड सुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा साधारण ५ ते ६ मिनिटे थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे..
    यामध्ये मैदा घालून दोनेक मिनिटे परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर १० मिनिटे उकळी काढावी. क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. मीठ मिरपूड अड्जस्ट करावे. १ ते २ मिनिटे गरम करून सूप सर्व्ह करावे. सर्व्ह करताना बरोबर तळलेले ब्रेडचे तुकडे द्यावे.

    ब्रोकोली पराठा
    साहित्य : सारणासाठी. १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, दीड चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचूर पावडर, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ
    आवरणासाठी. १ कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, मीठ, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तेल
    कृती : गव्हाचं पीठ, हळद, जिरे, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. ब्रोकोलीचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावं. पिठाच्या गोळ्यात हे सारण भरून याचा पराठा लाटावा. तव्यावर शेकून घ्यावा. हा गरमागरम पराठा दह्याबरोबर सव्‍‌र्ह करावा.
    टीप : ब्रोकोलीचे सारण आधीच बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे पिठाच्या गोळ्यात हे सारण भरताना जास्त ओलाव्यामुळे पीठ चिकटही बनतं आणि पराठे लाटले जात नाहीत. त्यामुळे जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हा हे मिश्रण तयार करावं आणि लगेच याचे पराठे बनवावेत.

    ब्रोकोलीची भाजी
    साहित्य : पाव किलो ब्रोकोली, १ लहान कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, ३ टीस्पून उडदाची डाळ, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
    कृती : ब्रोकोलीचे तुरे काढून घ्यावेत. दांडे कोवळे असतील तर साधारण १/२" जाडीचे तुकडे करून घ्यावेत.
    कांदा बारीक चिरुन घ्यावा. मिरच्यांचे उभे २-२ तुकडे करून घ्यावेत. तेल तापवायला ठेवून त्यात उडीदडाळ घालून गुलबट रंगावर परतावी. त्यात मिरच्या घालून किंचीत परताव्यात. बारीक चिरलेला कांदा नीट गुलबट रंगावर परतून घ्यावा. त्यात आता ब्रोकोली घालून नीट परतावे. ब्रोकोली अगदी किंचीतच शिजू द्यावी. जास्ती शिजवल्यास अजिबात चांगले लागत नाही. मीठ घालून हलवावे. गॅस मंद करून झाकण घालून एक वाफ काढावी.
    एकदा नीट मिसळून मग कढई गॅसवरून खाली उतरावी.
    येते.

    ब्रोकोलीची पचडी
    साहित्य : ब्रोकोलीचा दांडय़ासकट किसलेला जाड कीस दोन वाटय़ा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी चण्याची डाळ, एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी-हिंग-हळद, दोन तीन चमचे लिंबाचा रस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
    कृती : चण्याची डाळ दोन तास भिजत घालावी आणि धुऊन भरड वाटून घ्यावी. ब्रोकोलीचा कीस, गाजराचा कीस, वाटलेली डाळ, चवीला मीठ, साखर एकत्र करावं. तेलाची मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. पचडीवर फोडणी घालून लिंबाचा रस मिसळावा, तसंच कोथिंबीर घालावी. फोडणीत हिरव्या मिरचीऐवजी लाल सुकी मिरची किंवा तळणीची एक मिरची चुरडून घातली तर वेगळा स्वाद येतो.
    डाळ घालायची नसल्यास भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं.

    ब्रोकोलीची भजी
    साहित्य : ब्रोकोली ३०० ग्राम, बेसन, बेकिंग पावडर, आले-लसूणाची भरड पेस्ट, तळण्यासाठी तेल,अर्धा लिंबू, मीठ चवीनुसार, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे, ओवा, हिंग.
    कृती : ब्रोकोलीचे एक इंचांचे तुकडे करून, धुऊन घ्या. नंतर, मीठ आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवून द्या.
    बेसनामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पातळसर भिजवा. त्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ, हिरवी मिरची, हिंग आणि २ छोटे चमचे तेल घालून मिश्रण एकजीव करा. वरील ब्रोकोलीला आले-लसूण पेस्ट लवून आणखी १० मिनिटे ठेवा. हे ब्रोकोलीचे तुकडे एक एक करून बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये तळून घ्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 4, 2019


  • कर्जमुक्ती नव्हे मते मिळविण्याची युक्ती

    सरकारची बहुप्रतीक्षित कर्जमाफी अखेर घोषित झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रचंड गोंधळाच्या स्वरूपात राहिली. साठ हजार कोटींच्या या कर्जमाफीमुळे चार कोटी शेतकरी लाभान्वित होतील असा सरकारचा दावा आहे, प्रत्यक्षात साठ लाख शेतकरी तरी कर्जमुत्त* आणि चितामुत्त* होतील की नाही याचीच शंका आहे. आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना एकवार कर्जमुत्त* करावे ही मागणी सुरुवातीला 2001 सालापासून आम्हीच लावून धरली.

      March 9, 2008


  • विवाह संस्था आणि आपण…

    आपल्या देशातील विवाह संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलय की काय असं वाटायला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन-दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायलाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीचं प्रमाणही अधिक वाढतय.

      December 16, 2013