(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक काल्पनीक पत्र

    दिल्लीमध्ये नुकतेच झालेले तीन भूकबळी. त्याबद्दलची अस्वस्थता मांडण्याचा केलेला प्रयत्न

      August 4, 2018


  • जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

    महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

    ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
    मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
    याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

    त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'

    “ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

    "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
    वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,

    "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
    संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

    " महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
    वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
    "महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
    "नक्कीच, ऐक तर,"
    वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

    "पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

    संजयाने मानेने नकार दर्शवला.
    "कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"

    संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
    "तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"

    वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
    "भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."

    संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"

    वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
    " याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
    तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
    मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."

    संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

    "वा!"
    वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"

    "कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'

    संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

    पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!

      August 6, 2017


  • काम’ म्हणजे नेमकं काय?

    भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय.

      December 26, 2016


  • आॅडी

    रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा..

      August 8, 2016


  • फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

    फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं.

      December 25, 2021


  • अदृश्यशक्ती

    एक अनामिक अदृष्यशक्ती ! .......... त्याला काही लोक नशीब....... असेही म्हणतात...... बघा काय म्हणणार या गोष्टींना....

    गुहागर मुंबई एसटी बस एका ढाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर छत्री घेऊन त्यांना शोधायला उतरला होता. केवळ दोघांमुळे संपूर्ण बस निघू शकत नसल्याचे पाहून बाकीचे प्रवासी वैतागलेले होते. "ओ मास्तर चला जाऊद्या, राहूदे त्यांना पावसातच इथे !" एकजण ड्रायव्हरला म्हणाला. "तेच ना, जहागीरदार आहेत हे जसे काही ! एसटी म्हणजे यांच्या बापाचा माल आहे का ?" एक कोकणी हेल चिरकला. पण ड्रायव्हरसाहेब शांत. कारण त्यांच्यासाठी हे सर्व रोजचेच. त्यांनी फक्त सारखा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात कंडक्टरसाहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैद्याकडे पहावे तसे त्यांच्याकडे पाहू लागले. पण बेल दोनदा वाजली आणि एसटीने कोसळणा-या पावसात मार्गक्रमण करायला सुरुवात केली. मागून एक जीप भरधाव वेगाने एसटीला ओव्हरटेक करून निघून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलटी वळली आणि एसटीच्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय हे ड्रायव्हरला जाणवले. त्यांनी वेग कमी केला अन जीपवल्याला विचारण्याचा प्रयत्न केला. पण ती जीप पुन्हा भरधाव वेगाने उलटी निघून गेली. काहीच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आले की सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करतोय. त्यांनी गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले की पूल मध्यावर तुटलाय आणि दोन एसटी आणि चारपाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात ! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर सरारून काटा आला. खरे म्हणजे त्या तीनही बस रोज एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन निघून गेल्या पण या बसमधल्या दोन प्रवाशांनी गाडीत यायला पाचदहा मिनिटे उशीर लावल्यामुळे सर्वांचा जीव वाचला..... नाहीतर काय झाले असते ? उशीरा येऊन ज्यांनी इतरांच्या शिव्या खाल्ल्या त्यांनीच सर्वांचा जीव वाचवला ! नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

    मुंबईतील एक चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले की नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डिंगमढील सर्व फ्लॅट्स पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेंव्हा तुम्ही वरच्या स्क्वेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतिमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला की ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार ? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्या दांपत्याची अवस्था झाली होती. आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डरचा मुलगा चाळीसमोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मतिमंद मुलगा होता ! सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बिल्डरने या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला की कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी मातापित्याला प्रश्न पडला की मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्युमुळेच फ्लॅट मिळतोय ! मग या जागेचा आनंद व्यक्त करायचा की दुःख ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

    आणखी एक सत्य घटना सांगावीशी वाटते. दिल्लीत एक मराठी वकील रहात होते. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती म्हणून ते दुस-या स्थळाच्या शोधात होते. एक विधवा स्त्रीचे स्थळ सांगून आले आणि तिच्याशी त्यांचे लग्न झाले. पण त्यांच्या लक्षात आहे की दर पंधरा दिवसांनी त्यांची पत्नी ऑफिसच्या कामासाठी म्हणून विमानाने पुण्याला जाते. ते पेशाने वकील ! त्यामुळे त्यांना शंका आली म्हणून त्यांनी तिच्या नकळत शोध घेतला तेंव्हा समजले की त्यांच्या पत्नीला पहिल्या पतीपासून झालेली एक मुलगी आहे. आणि पदरी मुलगी असेल तर आपल्याशी कोणी लग्न करणार नाही असे वाटले म्हणून पत्नीने ही बाब त्यांच्यापासून दडवून ठेवली आहे. ती मुलगी तिच्या मावशीकडे वाढत होती ! हे कळल्यावर त्या महोदयांनी काय केले असेल ? काही दिवसातच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यांनी सरळ पुण्याला येऊन त्या चिमुरडीला बरोबर घेतले आणि थेट दिल्लीला आणून पत्नीसमोर उभे केले.... तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून ! असा पती आणि असा बाप मिळणे नशिबातच असावे लागते, नाही का ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?

    नशीब, प्राक्तन, चमत्कार या तीनही शब्दांना हल्ली फक्त टीकेचे धनी व्हावे लागते. आजचे जग विज्ञानवादी आहे त्यामुळे जे दिसत नाही, जे सिद्ध करता येत नाही ते अनेकजण खरे मानत नाहीत. पण अफाट अशा अंतराळातील पृथ्वी हा एक इवलासा ग्रह आहे. त्यात असणा-या लाखो प्रकारच्या जीवांपैकी मानव हा अतिशय क्षुद्र प्राणी आहे. ज्याच्या हातात स्वतःचा जन्मही नसतो आणि मृत्यूही. पण हा प्राणी स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजतो. आपण फार म्हणजे फारच प्रगती केली आहे असे त्याला वाटते. नशीब, प्राक्तन, चमत्कार या गोष्टींना तो अंधश्रद्धा संबोधून मोकळा होतो. त्याला जणू "अहं" ची बाधा झालेली आहे. त्यामुळे माणसाच्या आधी अनेक गोष्टी होत्या आणि नंतरही अनेक गोष्टी आहेत हे त्याला कळतच नाही.

    मला सांगा, दोन एसटी बसचा कपाळमोक्ष होऊनसुद्धा केवळ पाच मिनिटांच्या फरकामुळे तिसरी बस वाचते हा चमत्कारच नव्हे का ? मुलाच्या जिवंतपणात मरण अनुभवणा-या आईबापाला तो मेल्यानंतर चांगले दिवस दिसावेत याला प्राक्तनच म्हणतात ना ? आणि एका पुरुषाने आपल्या सावत्र मुलीला अशा प्रकारे स्वीकारावे ह्याला केवळ नशीबच म्हणायला हवे नाही का ?

    एखाद्या बैलगाडीखालून कुत्रे जात असते, त्याला वाटते की आपणच संपूर्ण गाडी आपणच खांद्यावर पेलली आहे. माणसाचे काहीसे तसेच आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आपण जग चालवतो आहोत असे त्याला वाटते. पण विज्ञान कितीही पुढे गेले तरी मुळच्या गोष्टी अनुत्तरीतच राहतात. आता पहा, H2O म्हणजे पाणी हे सगळ्यांना माहित आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे अणू वेगळे काढता येतात पण हायड्रोजन चे दोन आणि ऑक्सिजन चा एक अणू एकत्र करून पाणी नाही तयार करता येत. झाडे प्राणवायू तयार करतात हे माहित आहे पण तो कसा तयार करतात हे आजवर समजलेले नाही. बाळाच्या जन्माची पद्धत समजली पण प्रयोगशाळेत बाळ तयार करता आले नाही. इतकेच काय पण स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होऊनच गर्भ तयार होत असेल तर जगातली पहिली स्त्री आणि पहिला पुरुष कसा तयार झाला असेल, कोणी तयार केला असेल याची कल्पनाही आजवर करता आलेली नाही. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाला माती तयार करता आली नाही, हवा निर्माण करता आली नाही. मग मी सर्वकाही करू शकतो अशी दर्पोक्ती का ? कोणीतरी अतींद्रिय शक्ती आहे, जिचा शोध अद्यापही आपल्याला लागला नाही, तीच सर्व जगाचे निर्माण करत असते आणि नियंत्रण करत असते. त्या शक्तीला कोणी परमेश्वर म्हणतो, कोणी विधाता म्हणतो, कोणी चमत्कार म्हणतो, कोणी प्राक्तन म्हणतो तर कोणी नशीब असे संबोधतो. तुम्ही कितीही नास्तिक असा, त्या अज्ञात शक्तीला नाकारुच शकणार नाही. पण ती नाकरण्यातच आपल्याला फुशारकी वाटते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली आहे का की जगात जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्व धर्मात देव आणि दानव तसेच स्वर्ग आणि नरक या एकसारख्याच संकल्पना मांडलेल्या आहेत. प्रत्यक धर्मात स्वर्ग आकाशातच असतो आणि नरक पताळातच असतो. शब्द वेगळे असतील पण संकल्पना एकच मांडणारे कोणीतरी अज्ञात आहे हे निश्चित पण ते नाकारण्याचा करंटेपणा आपण करत आहोत.

    मानव सोडून इतर प्रत्येक सजीव निसर्गतःच ती शक्ती मानत असतो. वाळवंटात वादळ होणार हे उंटाला कळते तेंव्हा तो आपली मान वाळूत खुपसतो. कारण वादळात उभे राहण्याची शक्ती आपल्यात नाही हे त्याला माहित असते. काजवा कधीही दिवसा बाहेर पडत नाही कारण सूर्याच्या प्रकाशाच्या शक्तीपुढे आपण फारच यत्किंचित आहोत याची त्याला कल्पना असते. पाण्यात उगवणारी लव्हाळी महापुरात नतमस्तक होतात कारण महापुरातून वाचण्यासाठी तोच एक उपाय आहे हे त्यांना माहित असते. कोकीळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते कारण घरटे बांधण्याची आणि अंडी उबवण्याची शक्ती आपल्यात नाही याची तिला कल्पना असते. फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते कारण फळे देणारा तो विधाता आहे, मी केवळ भारवाही आहे अशी त्याच्याकडे विनम्रता असते. आणि आपण ?...... पुढच्या क्षणी जिवंत असणार की नाही हे माहित नसतानासुद्धा चक्क महिन्याचा नेटपॅक मारतो आपण ! काय गम्मत आहे न ?

    -- वसंत चरमळ

      August 16, 2016


  • कल्याणवृष्टिस्तव – १४

    लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
    तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् ।
    भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं
    मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥

    विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत.

    आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे शव आहेत. अमंगल शवाला परममंगल शिव करणारी ही शक्ती. तिचे स्वरूप वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं- आई अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील तुझे हे अर्धे शरीर, भगवान शंकरांशी सदैव लग्न म्हणजे जुळलेले असो. या एकत्रीकरणाचा कधीही वियोग न होवो.

    कसे आहे आईचे हे स्वरूप? तर ते म्हणतात,

    तॆजः परं- परम तेजस्वी. बहुलकुङ्कुमपङ्कश- प्रचुर प्रमाणात अर्पण केलेल्या कुंकवाने,

    शॊणम्-
    लालबुंद दिसणारे. शोण म्हणजे रक्त. पण त्याचा प्राधान्याने विचार आहे गर्भाशयातील रक्ताशी. गर्भाशयाचा संबंध आहे नवनिर्मितीशी. भगवान महाकाल विनाशाची दैवता आहेत. त्यांच्या सोबत असणारी जगदंबा नवनिर्मितीची शक्ती. यातून ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप परिपूर्ण आहे. केवळ भकास विनाश नव्हे तर नवनिर्मितीसाठी केलेला साफ-सफाई स्वरूप विनाश.

    भास्वत्किरीट- तेजस्वी मुकुट धारण केलेले.

    अमृतांशुकलावतंसं- अमृत अर्थात शांतता दायक. अंशू म्हणजे किरण. कला म्हणजे भिन्नभिन्न अवस्था. अर्थात चंद्र. त्याला अवतंस म्हणजे मस्तकावर धारण केलेले.

    मध्यॆ त्रिकॊणनिलयं- श्री यंत्राच्या त्रिकोणात निवास करणारी. परमामृतार्द्रम्- श्रेष्ठ अशा अमृतमय करूणेने आर्द्र असणारे, हे तुझे अर्धे अंग कायम भगवंताशी जुळलेले असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 25, 2020


  • स्त्रियांमधील टक्कल

    केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात.

      April 13, 2023


  • गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

    धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित

      April 4, 2016


  • दुःखाची राणी: मीनाकुमारी

    प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते. मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती.

      May 29, 2025