वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल.
संस्कृतमधील अमूल्य’ या शब्दापासून ‘अमूल’ हा शब्द या क्रांतीला मिळाला. AMUL म्हणजे ‘आनंद मिल्क फेडरेशन युनियन लिमिटेड’. सहकारी तत्त्वावर जसा आपल्या महाराष्ट्रातील ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ आशियातील पहिला म्हणून ओळखला जातो. तंद्वतच ‘अमूल’लाही सर्वप्रथम असल्याची मान्यता आहे.
मराठी आणि मराठी भाषाभिमान हा विषय निघतो तेव्हा १९२२ साली पुण्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र शारदा मंदिराचे व तिथे येणाऱ्या साहित्यिक मित्रांनी स्थापन केलेल्या रवी किरण मंडळाचे सदस्य आणि मराठीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या माधव ज्युलियन याचे नाव प्रकर्षाने डोळ्यापुढे येते. नवीन पिढ्यांचा या नावाशी कितपत परिचय असेल कल्पना नाही.
फिल्म प्रोजेक्टर चा इतिहास मोठा रंजक आहे.
जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते.
“पर्यावरणाचा र्हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
पर्यावरण र्हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो .
समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी.
आज यूट्युबवर एक गाणे समोर आले आणी मन भूतकाळात गेले.’मैंने पायल है छनकायी’कॉलेजच्या दिवसांत हे गाणे टीव्हीवर लागायचे आणी मुली त्याला पाहून आपल्या राजकुमाराची स्वप्न रंगवायच्या.सोनेरी स्वप्न पहायचे दिवस होते ते.मन पाखरु होण्याचे दिवस..
लोकमान्य टिळकांनी ११६ वर्षापूर्वी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आज किती गणेशोत्सव पार पाडतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. बहुतांशी गणेशोत्सव या मुळ तत्वापासून दूर गेले असेल तरी आज ही काही गणेशोत्सव या मुळ उद्देशापासून दूर गेलेले नाहीत.
एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना!
Copyright © 2025 | Marathisrushti