वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हा नक्की संप आहे का?...
ही नक्की क्रांती आहे का?...
हे नक्की आंदोलनच आहे ना?
४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का?
शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का?
हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी,
गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का?
एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना खरोखरच कर्जमाफी हवीय का?
अमूल्य असा भाजीपाला, धान्य वगैरे फुकट घालवणाऱ्यांना, खरोखरंच बाजारमूल्य वाढवून पाहीजे का?....
हे सर्व आंदोलनकर्ते नक्की शेतकरीच आहेत ना, की महा'राष्ट्रा'त वाद निर्माण करणारे, गेली ७० वर्षे देशाची, राज्यांची, अर्थव्यवस्था बिघडवणारे, की सत्तेत असून सुध्दा, काहीही 'खायला' न मिळणारे अतृप्त आत्मे आहेत....
नक्की हे कोण आहेत, शेतकरीच आहेत ना?
-- संकलन : शेखर आगासकर
सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.
June 12, 2017
आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे.
November 6, 2023
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 16, 2018
आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.
December 8, 2021
एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना!
July 15, 2024
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
October 1, 2023
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
June 4, 2017
ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 19, 2017
Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्या फार्मवर पाठवली जातात.
जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.
एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री - लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.
डॉ. संजीव चौबळ
November 18, 2015
१९६२ : सर्वात जास्त काळ स्वतःची चकाकी टिकवून ठेवलेल्या द्रुतगती गोलंदाजाचा जन्म.
October 29, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti