वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते.
September 27, 2023
एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल जिथे सुरु होतो तिथे त्या पुलाबद्दल माहिती लिहिलेला एक दगड बसविलेला असतो. त्या दगडावर ज्यांच्या देखरेखीखाली पुलाचे काम झाले त्यांची नावे, वर्ष, बांधकाम पूर्ण होण्यास लागलेला काळ, खर्चाचा अंदाज व झालेला प्रत्यक्ष खर्च असा तपशील लिहिलेला (खोदलेला) असतो. इंग्रजांच्या काळातील कोणत्याही बांधकामावर लावलेल्या दगडावरील मजकूर पराकोटीच्या भ्रष्टाचाराने सडलेल्या आपल्या देशातील कोणीही वाचला तर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणे केवळ अशक्य आहे.
२०१५ च्या दिवाळीत तब्बल २५ वर्षांनंतर कोकणातील रस्त्यांवरून पुन्हा एकदा भटकंती केली. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील ‘द गेटवे ऑफ रत्नागिरी’ या कमानीवरील लावलेल्या दगडावरील लाल चौकटीतील मजकूर काळजीपूर्वक वाचा. कुठे ते अनुमानित खर्चापेक्षा कमी खर्चात कमीतकमी शंभर वर्षे टिकणारे बांधकाम करणारे इंग्रज आणि कुठे कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही काम न करणारे आम्ही भारतीय. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील धक्क्याचे किंवा कोकणातील कोणत्याही पुलाचे काम करणारे भारतीय असले तरी त्याच्यावर देखरेख (सुपरविजन) करणारे पराकोटीचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष इंग्रजच होते याची आवर्जून नोंद घ्यावी.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
July 20, 2017
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेला लेख
October 22, 2016
दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते.
February 13, 2022
सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.
December 22, 2018
१९७५ च्या मध्यावर मी भुसावळ सोडले पण तोपर्यंत गावातील तीन हिंदू -मुस्लिम दंगलींचा अनुभव गाठीला होता. पोलिसांचे वेढे,अस्ताव्यस्त जनजीवन, अंधारलेली अनाम भीती आणि वातावरण निवळायला लागलेला वेळ !
April 20, 2022
जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.
तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.
पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.
आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)
तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?
असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय
बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).
आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?
अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)
असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?
म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)
आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?
- आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी
June 7, 2017
मोबाईल कॉल दर वाढणार? स्पेक्ट्रम वाटप धोरणात मोठा बदल : दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल
February 1, 2011
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे.
अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला.
ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील.
वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा
November 29, 2016
बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)!
February 17, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti