वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी कायद्याचा जाणकार नाही. परंतू जे नजरेला दिसलं, त्यावरून मला हे लिहावसं वाटलं. माणसं, माणसं असताना कायदा गाढव होता हे ठिक आहे. पण आता माणसं गाढवासारखी वागू लागल्यावर, कायद्याने आता माणसासारखं वागायला हरकत नसावी, एवढंच मला सुचवायचं आहे..!!
महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे.
ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो,बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते.जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब,८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो.त्याच्या टोकाशी गाठी असतात.त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात.फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते.ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे दिसतात.फळ बकुळीच्या फळा सारखे अंडाकृती व पिवळ्या रंगाचे व गोड तुरट वासाचे असते.फळात १-२ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व फळ.ह्याचे मुळचवीला कडू,तुरट,गोड असून उष्ण गुणाचे व जड असते.तर फळ चवीला गोड असून थंड गुणाचे व जड आणी स्निग्ध असते.ह्याचे मुळ वात कफ नाशक तर फळ वातपित्त नाशक असते.
चला आता गंभारीचे औषधी गुणधर्म पाहुयात:
१)गंभारीची पाने स्निग्ध व थंड असल्याने तापा मध्ये व डोके दुखीत त्यांचा लेप डोक्यावर करतात.
२)शरीरात पित्तवाढून तहान लागली असल्यास व शोष लागत असल्यास चंदन,वाळा व साखरे सह गंभारीच्या फळाचा फांट देतात.
३)गंभारीचे पिकलेले फळ थंड गुणाचे असल्याने रक्त व पित्तशामक असून रक्तपित्तात उपयुक्त आहे.
४)गंभारीचे फळ हे गर्भाशयास बल देते व गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)लघ्वीच्या त्रासामध्ये गंभारीच्या पानांचा रस गाईच्या दुध व साखरे सह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
भारतीय प्राचीन परंपरेत देवदेवतांना अत्यन्त महत्व असून भारतीय पारंपारिक संस्कृती ही श्रद्धा, भक्ती, प्रेरित आहे. भारतभूमी ही देवांची,
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे?
आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.

डॉ. डॅनिएल मॅन्सफिल्ड यांचं हे सर्व संशोधन, भूमिती-त्रिकोणमिती या गणिती शाखांचा उपयोग ग्रीकांच्या कित्येक शतकं अगोदर बॅबिलोनिआत केला जात असल्याचं स्पष्ट करतं. पाटीवरची ही आकृती, उपयोजित गणिताकडून शुद्ध गणिताकडे होणारी वाटचाल दाखवते.
गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात.
पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतातच ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक Reality show किंवा Performing show होत चालला आहे.आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणक्यात पाळला जातो.
आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना ( मग त्यात "शेंदूरलाल चढायो अच्छा गजमुखको " ही हिंदी आरतीही आली) त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर "गणपती बाप्पा मोरया " हा मराठीतला जयजयकार तर अगदी अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही ( तेथे स्थाईक मराठी किंवा भारतीय मंडळी नव्हेत ) मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात .
पण आपल्याला मात्र त्या आरत्या आता जुन्या, कालबाह्य , out of fashion वाटायला लागल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी ... देवा हो देवा गणपती देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेशदेवा, देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा ,ओम जय जगदीश हरे .... अशी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या आहेत.
येई गे विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह या आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे "देवे " म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत , --देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकीत लांब आकार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत जुगलबंदीचा आनंद घेतला जातो.
भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी , गणपतीची पूजा - आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ?
-- मकरंद करंदीकर
अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०००६९
गणेश चतुर्थी ….. दरवर्षी येते आणि दरवर्षी मी मनाने ( ज्याला इंग्रजीमधे Ticketless Flight म्हणतात ! ) गणेश चतुर्थीला इयत्ता चौथीमधे जातो. वय वर्ष फक्त ८ पूर्ण ! गोरेगांव पूर्वेला प्रवासी संघाच्या समोर एक डोंगर आहे.तिथून माती आणलेली , माती कसली चिखलंच म्हणा ना , आणि गणपतीची मूर्ती बनवली ! चिखलाच्या मातीला साहजीकंच भेगा पडल्या
पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत धरायला हरकत नसावी, की पुराणांमधील उल्लेखांच्या खूप आधीपासूनच, गणेशावतारांची संकल्पना व माहिती जनमानसामधे रूढ झालेली आहे.
अवतार घेणें म्हणजे धरतीवर पुनरामन करणें. अर्थातच, गणेशावतार म्हटलें की, गजाननाचे धरतीवर पुन्हापुन्हा आगमन आभिप्रेत आहे. त्या संकल्पनेचा वैज्ञानिक अर्थही आपण शोधायला हवा.
एक महत्वाची शक्यता अशी : अवकाशप्रवासात ‘टाइम-डायलेशन’ होतें. म्हणजेच, पृथ्वीवर अनेक शतकें लोटलेली असली, तरी अवकाशयानातील प्रवाशासाठी फक्त अल्प वर्षेंच गेलेली असतात. (अशी सापेक्ष कालगणना भारतीय परंपरेमधेसुद्धा आहे. मानवाची अमुक-लक्ष वर्षें म्हणजे ‘ब्रह्म्याचे’ एक वर्ष, असें भारतीय परंपरा सांगते.) म्हणजे असें पहा, हा अवकाशयात्री (किंवा त्याची टोळी) एकदा येऊन गेल्यानंतर, पुढील वेळी जेव्हां पृथ्वीवर उतरला असेल, तेव्हां तो स्वत: फक्त थोडीशी वर्षेंच व्यतीत करून आलेला असेल, परंतु पृथ्वीवर मात्र कैक शतकें व अनेक पिढ्या गेलेल्या असतील. त्यामुळे, अवकाशप्रवासी ही व्यक्ती स्वत: तीच जरी असली तरी, पृथ्वीवासीयांना तो नवीन ‘अवतार’ वाटणें स्वाभाविक आहे.
दुसरी एक शक्यता : आपण आणखीही एक अन्य गोष्ट आपण ध्यानात घेऊं. आपण हें पाहिलेंच आहे की, ‘विशालकाय गजानन’ म्हणजे ‘स्पेस-सूट घातलेला अवकाशप्रवासी’ आहे. आतां, एक गोष्ट उघड आहे की, स्पेस-सूट हा एकप्रकारचा ‘युनिफॉर्म’च (गणवेश) आहे. आणि, आपणां सर्वांना ठाऊकच आहे की, गणवेश घातलेल्या सर्व व्यक्ती, दुरून नजर टाकल्यावर ‘एकसारख्याच’ दिसतात. उदाहरणार्थ, पोलिस, फायर-ब्रिगेडवाले, सैनिक, वगैरे. त्यामुळे, आधी व कालांतरानें पृथ्वीवर उतरलेल्या व असा युनिफॉर्म म्हणजे स्पेस-सूट घातलेल्या अवकाशयात्री व्यक्ती जरी भिन्न भिन्न असल्या, तरी बघणार्याना ‘ती एकच व्यक्ती पुन्हा अवतरली आहे’, असे वाटणें सहज शक्य आहे.
हल्लीचे उदाहरण : आपण हल्लीचे एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. काहीं दशकांपूर्वी पृथ्वीवासी ‘ऍस्ट्रॉनॉट’ आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरला होता. तेव्हां त्यानें स्पेस-सूट घातलेला होता. आपण त्याची तशा वेशातील, चंद्रावरील छायाचित्रेही पाहिलेली असतील.
समजा, चंद्रावर त्यासमयीं जर कोणी अप्रगत जीव वास करत असते, तर त्यांना आर्मस्ट्राँग हा गजाननासारखा, व आकाशातून उतरलेला, ‘देव’ वाटू शकला असता.
आणि, कांही दशकांनंतर,. किंवा शतकांनंतर, जर दुसरा एखादा, तसाच स्पेस-सूट घातलेला ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर उतरला, तर तेथील जीवांना तो ‘त्या देवाचा अवतार’ आहे, त्या देवाचें ‘पुनरागमन’ झालें आहे, असेच वाटलें असते.
म्हणूनच, आपल्याला गजाननाच्या अवतारांचा उल्लेख मिळतो ; गजानन अनादि आहे, अनंत आहे, असें मानलें जातें.
विविध अवतारांची भिन्नभिन्न वाहनें :
पुराणांनुसार, गजाननाच्या प्रत्येक अवताराचें वाहन भिन्न आहे. जसें, उंदीर, सिंह, मोर. तें कां, याचाही विचार करायला हवा.
याचें स्पष्टीकरण सोपें आहे. आजही, मोटारींचे वेगवेगळे आकार आपण पाहतोच. तसेंच, फक्त-जमिनीवर पळणारी मोटार, पाण्यात-चालणारी होडी किंवा बोट, व ‘ऍम्फिबियस’ (भूमी व पाणी, दोन्हीवर प्रवास करू शकणारें) हॉवरक्राफ्ट यांचे स्वरूप भिन्नभिन्नच असते.
ज़रासे-वरती, आकाशात प्रवास करू शकणार्या, हवाई-बलून (एअर-शिप), ग्लायडर व हेलिकॉप्टर यांचे स्वरूपही एकमेकांपेक्षा वेगळें असतें. जमिनीवरून टेक्-ऑफ् घेऊन उंच-उंच उडणार्या जेट-विमानांचा आकार अगदीच वेगळा असतो. असेच ‘फ्लाइंग-सॉसर्स’चें होतें आहे. अशा ‘उडत्या तबकड्या’ वस्तुत: अस्तित्वात आहेत की नाहींत, हा एक वेगळाच विषय आहे, परंतु, एक मात्र खरें की, ज्यांना अशी ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑबजेक्टस्’ (UFOs) ‘दिसलेली’ आहेत, ते लोक त्यांच्या आकाराचें भिन्नभिन्न वर्णन सांगतात, जसें, बशीसारखें, चिरूटासारखें, गोळ्यासारखे- गोलाकार (speherical), इत्यादि.
त्याप्रमाणेंच, अवकाशप्रवासी वापरत असलेल्या ‘ग्राउंड-कार्स’चें (पृथ्वीग्रहावरती, जमिनीवर, पाण्यात, किंवा काहीं उंचीवर आकाशातून, प्रवास करू शकणार्या वाहनांचें) स्वरूप कालानुसार किंवा आवश्यकतेनुसार, भिन्नभिन्न असूं शकेल; व त्यामुळे, भूतलवासियांना त्या वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणें दिसल्या असाव्यात.
गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजाननाची विज्ञानयुगीन प्रार्थना, आरती :
गजमुख देव गणपतीची स्तोत्रे, प्रार्थना, नमन, वंदना, आरत्या, हें सर्व आपण वाचलेलें-ऐकलेलें आहे. पण, परग्रहवासी-अवकाशप्रवासी अशा गजाननासाठी जुनी स्तोत्रें इत्यादी कितपत उपयोगी ठरतील ? त्यासाठी, त्याची ही विज्ञानयुगीन नूतन स्तुती, नूतन आरती :
‘व्योमातुन अवतरला गजमुख’
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
असे हें, कालातीत गजाननाचें, अवकाशयात्री-गण-पतीचे व गणेशाच्या अवतारांचे विज्ञानयुगीन स्पष्टीकरण. वाचल्याबरोबर, लागलीच तें पटो न पटो; पण काहीं अवधीनंतर तें सर्वांच्या विचारांना नक्कीच चालना देईल, अशी खात्री वाटते. काही काळाने, एखाद्या गणेशोत्सवात वरील आरतीचा गजर घुमला तर आश्चर्य वाटायला नको.
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
Copyright © 2025 | Marathisrushti