(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • भारतीय स्त्री वैज्ञानिक जानकी अम्मल

    अम्मल ह्या  एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पेशी शास्त्रज्ञ होत्या  ज्यांनी अनुवंशशास्त्र, उत्क्रांती, वनस्पति भूगोल आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जानकी अम्मल या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक फेलो आहेत.

  • भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ अलका बेओतरा

    डॉक्टर अलका बेओतरा-  अलका यांनी १९७७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून पदव्युत्तर पदवी आणि १९८१ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली., त्यांनी फेब्रुवारी १९८२ ते मार्च १९९० पर्यंत नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या औषधनिर्माण विभागात पूल ऑफिसर आणि रिसर्च ऑफिसर म्हणून काम केले.

  • भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ कमला सोहोनी

    विज्ञानात पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कमला सोहोनी (उर्फ भागवत) यांचा जन्म १९१२ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.त्या प्रसिद्ध मराठी संहित्यिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी होत्या.  त्यांचे वडील नारायणराव भागवत हे रसायनशास्त्रज्ञ होते. कमला यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र (सहाय्यक) विषयात बॅचलर (प्राचार्य) आणि बी.एससी. पदव्या मिळवल्या.

  • वडापावाचा इतिहास….

    आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?

  • आपली प्राचीन खाद्य संस्कृती

    जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही, पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा, कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ल्या जात होता.

  • इंडीपेंडन्स मायक्रोब्रूअरी

    पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात.
    मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास.
    काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं 'झेडकेज'ही आहे.

    मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा कारखाना.
    इंडीपेंडन्स मधे बियर बनवली जाते आणि बफे बरोबर सर्व्ह केली जाते.
    इथलं वैशिष्ट्य हे, की इथे आठ प्रकारच्या बियर मिळतात.

    तुम्हाला फारशी प्यायची सवय नसेल, तर तुम्ही फक्त शंभर रुपयात (taxes extra) इथल्या वेगवेगळ्या बियर्स ट्राय करून पाहू शकता.
    याला म्हणतात ‘बियर फ्लाईट’ !
    ‘बियर फ्लाईट' म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियर्स ३० एमएल मापात आणून दिल्या जातात.

    डावीकडून उजवीकडे एक ते आठ अशा क्रमाने ग्लासेस ठेवले जातात.
    सगळ्यात डावीकडे एकदम लाईट बियर. सगळ्यात उजवीकडे डार्क. डावीकडून उजवीकडे बियर्स डार्क होत जातात. नंबर चार म्हणजे बाहेर कॉमनली मिळणारी रेग्युलर लागर.

    शंभर रुपयात फक्त आठ टाईप चे ३० एम एल प्रत्येकी. (एकूण २४० एम एल)
    यानंतर,पूर्ण भरलेल्या ग्लास प्रमाणे पैसे देऊन आपण, जी आवडेल ती निवडून पिऊ शकतो.

    या आठ बियर्स खालीलप्रमाणे -

    १. हनी लव्हेंडर एल - मध आणि लव्हेंडर याच्या मिश्रणापासून बनलेलं एल. सुंदर लागतं. बडलाईट लाईम बियर सारखं.

    २. रासबेरी पाय - ब्रूइंग करताना भरपूर प्रमाणात रासबेरी घालून बनवलेली चक्क गुलाबी रंगाची बियर !

    ३. बेल्जियन विट – ओट, पिल्सनर बियर, गहू याच्या मिश्रणापासून बनवलेली बियर. याला संत्र्याचं साल आणि कोथिंबिरीचा हलकासा स्वाद असतो.

    ४ फोर ग्रेन सीझन – बार्ले, गहू,राय आणि ओट हे यीस्ट घालून फरमेंट केलं जातं. याला प्लम आणि पेअरचा प्रॉमिनंट स्वाद असतो.
    ही बियर बाहेर कुठेही मिळणाऱ्या लागर बियर सारखी लागते.

    ५. बेल्जियन डबेल – ही पण जवळपास फोर ग्रेन सीझनचीच बहीण. यात थोडासा गूळ वापरलेला असतो.

    ६. इक्सककाओ – कोकोच्या बिया आणि बोरबॉन व्हॅनिला घालून ही बियर बनवली जाते.

    ७. अॅव्हेगेडॉन – व्हाईट IPA म्हणजे बियर ब्रूइंग करतानाच्या विशिष्ट अमेरिकन आणि बेल्जियन पद्धतीचं मिश्रण. या व्हाईट आयपीए मधे होप्स मिसळले जातात. ही किंचित गोड पण मुख्यत्वेकरून कडूझार असते.

    ८. मेथड टू मॅडनेस IPA V१.० – तमाम वूडी, सायट्रस, फ्लोरल आणि फ्रूटी अशा सगळ्या स्वादांचं मिश्रण करून बनवलेली माल्ट आय पी ए.
    भयंकर कडू. जीभ एकदम ठार होते :)

    जर तुम्ही बफे विथ ड्रिंक्स घेतलात तर, तुम्हाला वर वर्णन केल्याप्रमाणे ‘बियर फ्लाईट’ तर मिळतेच. पण सोबत कुठलीही बियर, स्टार्टर्स आणि मेन कोर्स अनलिमिटेड मिळतो.

    जर तुम्ही वेगन असाल, ड्रिंक्स घेऊ इच्छित नसाल तर तुमच्याकरता व्हेज स्टार्टर आणि मेन कोर्स असतोच.
    फूड क्वालिटी आणि व्हरायटी उत्तम आहे.

    बियर आवडणाऱ्या लोकांना इथे प्रचंड व्हरायटी मिळेल.
    मला स्वतःला रासबेरी आणि इक्सककाओ या बियर्स त्यांच्या वेगळेपणा मुळे प्रचंड आवडल्या.
    सवय अजिबात नसल्याने तीन ग्लासच्या वर पिऊ शकलो नाही :)
    याचं जरा वाईट वाटलं :)

    याशिवाय, या बियर्स बनत असताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.
    स्टीलचे छानदार व्हेसल्स इथे आहेत. बारले, होप्स आत टाकताना तुम्ही पाहू शकता. मॉनिटर वर रिअॅक्टर्स मधे आत काय चाललंय ते पाहू शकता. गम्मत वाटते. एकदा मजा म्हणून जायला हरकत नाही.
    लाईट बियर्सच्या चाहत्यांना रासबेरी बियर होल-हार्टेडली रेकमेंडेड.

    -- From WhatsApp. I liked this so hared with you. I do not know the original author. 

  • गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

    गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

    दतात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार आसे मानले जाते. दहा हजार पायर्‍या चढुन तिथे जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.

    भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दतभक्तांची श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्र्वेताचल, श्र्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो.

    पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ पाच कि मी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच 16 गावांपर्यत आहे. सुमारे 28 चौ कि मी ने व्यापलेला गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्र्चर्येला बसलेले आढळून येतात.

    गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भगवान महादेव मंदिर ,मृगी कुंड,लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला हजारो साधूं संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला उतरतात.

    अशी एक आख्यायिका आहे. कि त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा,निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहेत . त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरु शिष्य ( नाथ परंपरा ) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे "प्रसाद" घेतला जाईल याकडे स्वत शेरनाथ बांपूचे कटाक्ष लक्ष असतो.

    लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे दिडशे वर्षेच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे,याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने प्रवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे.

    गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असतेच सुमारे दहा हजार पायर्‍यावर हे स्थान आहे . वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात.

    दोन हजार पायर्‍यांवर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिध्द स्थान आहे. २२५० पायर्‍यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला "माली परब" घाट येतो. तेथे रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. २,६०० पायर्‍यांवर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायर्‍यांपाशी प्रसूती बाई (देवी) चे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा , संतोषी माता, काली माता,वरूडी माता,खोडीयार माता , अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.

    बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर नेमिनाथचे आहे. अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथा हे 22 वे जैन तीर्थकर होय. या मंदिरातून थोड्या पायर्‍या उतरल्यावर जैन धर्मातले पाहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुरी कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत.

    थोडे पुढे गेल्यावर गौ मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ ,भाविक,साधू बैरंगी या मार्गांने येतात अथवा जातात. या मार्गांवर कूठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे, डोलावाले नसल्यामुळे बर्‍याचजणांना हा मार्ग माहित नाही.

    गौ मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायर्‍यांवर "अबाजी टुंक" येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायर्‍या चढल्यावर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते .

    नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्र्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी सिध्दांना उपदेश केला. बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयानी यांचा ठिकाणी गुरु मंत्र दिला होता.

    बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी ( बारी ) आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसर्‍या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणार्‍या मंहत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील " सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्र्चर्या करणे हे येर्‍यागबाळयाचे काम नव्हे.

    गोरक्ष टुंक नतंर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायर्‍या उतरायला लागतात. श्री गिरनारी बापूंची गुंफा लगते .येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या-त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायर्‍या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायर्‍या चढल्यावर दत टुंक आहे.

    चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. यांच स्थानवर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्त भक्तां मध्ये आहे.

    दहा बाय बारा चौ फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पुर्वजाची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही सांधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे.

    पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढग सुध्दा या शिखरा पासून खाली असतात.

    उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला 300 पाय-या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षे पासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळातही "धुनी" प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात. त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील "भस्म" प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

    भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्त टुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी ( जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसर्‍या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे.

    श्री गुरूदेव दत्त दत्त
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

    गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

    त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते. गौहर जान यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिऱ्याचे दागिने असायचे. राहणीमान अतिशय भपकेबाज होते. शेवटी त्यांना दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते.

  • गाणं

    गाणं

    खासगी छोट्या वाहनांवर देवांची चित्रे, धार्मिक वचने , अक्षरे असे काहीतरी असते.

  • गाढवाचं लग्न’ ह्या वगनाट्याची ३९ वर्ष

    गाढवाचं लग्न’ ह्या वगनाट्याची ३९ वर्ष

    गाढवाच्या जीवावर पोट भरणारा आणि गाढवालाच लेकराप्रमाणे जपणारा.सावळ्या कुंभाराला जन्म दिला तो श्री.हरिभाऊ वडगावकर ह्यांनी.एक लेखक म्हणून लेखणीतून सावळ्याला उतरवला खरा पण त्याच सावळ्यामध्ये प्राण फुकून जिवंत करणार अभिनेता ठरला प्रकाश इनामदार.