वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.).
रंग बदलण्याची गोष्ट निघाली तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते मात्र नागपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते.
बोरघाट बांधणीचे हे अवघड बांधकाम ब्रिटिशांनी कर्जत, पळसदरी ते खंडाळा आणि लोणवली (लोणावळा) ते खंडाळा असे दोन्ही बाजूंनी सुरू केले होते. हा घाट बांधण्याचा खर्च दर मैला मागे ६,६४,३७५ रुपये इतका, तर एकूण खर्च १,०५,००,२६७ रुपये इतका झाला. एका रुपया मध्ये ३५ ते ४० किलो तांदूळ मिळण्याचा आणि कारकुनाचा पगार आठ ते दहा रुपये आणि अधिकाऱ्यांचा पगार वीस ते पंचवीस रुपये महिना असण्याच्या त्या काळात हे खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे होते.
… एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…!
शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर शेअरची किमत ठरत असते. ही दोन्ही मार्केट बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते.
देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…!
जुन्या काळच्या पौर्वात्य आशियाई आणि पाश्चिमात्य युरोपीय जगाच्या मध्यावर ग्रीस हा देश येतो. या भौगोलिक स्थानामुळेत्याला अनन्यसाधारण व्यापारी महत्त्व होते. ग्रीसने जगात अनेक अनमोल देणग्या दिल्या त्यापैकी एक म्हणजे वास्तुकला. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा रसायनात रुजून आजची पाश्चिमात्य संस्कृती घडली.
मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय.
भाग १ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti