वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात.
मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास.
काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं 'झेडकेज'ही आहे.
मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा कारखाना.
इंडीपेंडन्स मधे बियर बनवली जाते आणि बफे बरोबर सर्व्ह केली जाते.
इथलं वैशिष्ट्य हे, की इथे आठ प्रकारच्या बियर मिळतात.
तुम्हाला फारशी प्यायची सवय नसेल, तर तुम्ही फक्त शंभर रुपयात (taxes extra) इथल्या वेगवेगळ्या बियर्स ट्राय करून पाहू शकता.
याला म्हणतात ‘बियर फ्लाईट’ !
‘बियर फ्लाईट' म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियर्स ३० एमएल मापात आणून दिल्या जातात.
डावीकडून उजवीकडे एक ते आठ अशा क्रमाने ग्लासेस ठेवले जातात.
सगळ्यात डावीकडे एकदम लाईट बियर. सगळ्यात उजवीकडे डार्क. डावीकडून उजवीकडे बियर्स डार्क होत जातात. नंबर चार म्हणजे बाहेर कॉमनली मिळणारी रेग्युलर लागर.
शंभर रुपयात फक्त आठ टाईप चे ३० एम एल प्रत्येकी. (एकूण २४० एम एल)
यानंतर,पूर्ण भरलेल्या ग्लास प्रमाणे पैसे देऊन आपण, जी आवडेल ती निवडून पिऊ शकतो.
या आठ बियर्स खालीलप्रमाणे -
१. हनी लव्हेंडर एल - मध आणि लव्हेंडर याच्या मिश्रणापासून बनलेलं एल. सुंदर लागतं. बडलाईट लाईम बियर सारखं.
२. रासबेरी पाय - ब्रूइंग करताना भरपूर प्रमाणात रासबेरी घालून बनवलेली चक्क गुलाबी रंगाची बियर !
३. बेल्जियन विट – ओट, पिल्सनर बियर, गहू याच्या मिश्रणापासून बनवलेली बियर. याला संत्र्याचं साल आणि कोथिंबिरीचा हलकासा स्वाद असतो.
४ फोर ग्रेन सीझन – बार्ले, गहू,राय आणि ओट हे यीस्ट घालून फरमेंट केलं जातं. याला प्लम आणि पेअरचा प्रॉमिनंट स्वाद असतो.
ही बियर बाहेर कुठेही मिळणाऱ्या लागर बियर सारखी लागते.
५. बेल्जियन डबेल – ही पण जवळपास फोर ग्रेन सीझनचीच बहीण. यात थोडासा गूळ वापरलेला असतो.
६. इक्सककाओ – कोकोच्या बिया आणि बोरबॉन व्हॅनिला घालून ही बियर बनवली जाते.
७. अॅव्हेगेडॉन – व्हाईट IPA म्हणजे बियर ब्रूइंग करतानाच्या विशिष्ट अमेरिकन आणि बेल्जियन पद्धतीचं मिश्रण. या व्हाईट आयपीए मधे होप्स मिसळले जातात. ही किंचित गोड पण मुख्यत्वेकरून कडूझार असते.
८. मेथड टू मॅडनेस IPA V१.० – तमाम वूडी, सायट्रस, फ्लोरल आणि फ्रूटी अशा सगळ्या स्वादांचं मिश्रण करून बनवलेली माल्ट आय पी ए.
भयंकर कडू. जीभ एकदम ठार होते :)
जर तुम्ही बफे विथ ड्रिंक्स घेतलात तर, तुम्हाला वर वर्णन केल्याप्रमाणे ‘बियर फ्लाईट’ तर मिळतेच. पण सोबत कुठलीही बियर, स्टार्टर्स आणि मेन कोर्स अनलिमिटेड मिळतो.
जर तुम्ही वेगन असाल, ड्रिंक्स घेऊ इच्छित नसाल तर तुमच्याकरता व्हेज स्टार्टर आणि मेन कोर्स असतोच.
फूड क्वालिटी आणि व्हरायटी उत्तम आहे.
बियर आवडणाऱ्या लोकांना इथे प्रचंड व्हरायटी मिळेल.
मला स्वतःला रासबेरी आणि इक्सककाओ या बियर्स त्यांच्या वेगळेपणा मुळे प्रचंड आवडल्या.
सवय अजिबात नसल्याने तीन ग्लासच्या वर पिऊ शकलो नाही :)
याचं जरा वाईट वाटलं :)
याशिवाय, या बियर्स बनत असताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.
स्टीलचे छानदार व्हेसल्स इथे आहेत. बारले, होप्स आत टाकताना तुम्ही पाहू शकता. मॉनिटर वर रिअॅक्टर्स मधे आत काय चाललंय ते पाहू शकता. गम्मत वाटते. एकदा मजा म्हणून जायला हरकत नाही.
लाईट बियर्सच्या चाहत्यांना रासबेरी बियर होल-हार्टेडली रेकमेंडेड.
-- From WhatsApp. I liked this so hared with you. I do not know the original author.
July 1, 2017
सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं. कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती .
April 28, 2023
परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे.
December 21, 2022
कोकण हा महाराष्ट्रातील अत्यंत रमणीय सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात आंबा, फणस काजू यासारखे बहुगुणी फळे आहेत. पण ह्या फळामध्ये गेली एक दोन दशके दुर्लक्षित राहिलेले बहुगुणी औषधी फळ आहे. त्याचो आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव कोकम किंवा रातांबा आहे. उन्हाळ्यात कोकणात आंबा, फणस व काजू सारखी अतिरथी महारथी फळे बाजारात मिळत असल्यामुळे याच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. परंतु जसजशी त्याच्या औषधी उपयोगाबद्दल माहिती उजेडात येऊ लागली तशी त्याला बरीच मागणी वाढली आहे व ह्या फळ झाडाचे नशीब सध्या जोरावर आहे.
कोकम हा सदापर्णी वृक्ष क्लुसिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव Garcinia indica आहे. या वृक्षाचे मूलस्थान भारताचा पश्चिम किनारी प्रदेश आहे. याची लागवड चीन, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत केली जाते. यांच्या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे हा द्विदल वर्गातील असूनसुद्धा याच्या पानांमध्ये समांतर शिरा असतात.
कोकमचे झाड हे सदाहरित अरण्यामध्ये, नदीकिनारी व खूप पावसाच्या ठिकाणी चांगले वाढतात. ह्याची क्वचित ठिकाणी शेती केली जाते. बहुतांश ठिकाणी ही झाडे घराभोवती व शेताच्या बांधावर लावली जातात. बाकीच्या ठिकाणी हि नैसर्गिक रीत्या जंगलामध्ये वाढतात. ह्याला खास पाण्याची सोय व कीटकनाशकाची फवारणी करावयास लागत नाही.
जगात ह्याच्या जवळ जवळ एकूण २०० प्रजाती आहेत पैकी भारतात १७ प्रजाती आहेत. या १७ भारतीय प्रजाती पैकी ७ प्रजाती ह्या पश्चिम घाटावर आढळतात व बाकी अंदमान निकोबार बेटावर आढळतात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील कोकम फळाच्या व्हरायटीस भौगोलिक संकेत (Geographical Indications, GI टॅग) मिळाले आहेत.
रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण छोट्या अशोकाची वाढतात तशी. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. ह्याची पाने लांबट असतात, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पातळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट, आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी चवीला आंबटसर असतात. हे झाड ज्या वेळेस पूर्ण वाढते त्या वेळी ते पिरॅमिड सारखे दिसते.
फुले पांढरी, लहान झुबक्यामध्ये असतात. याचे फळ संत्र्याच्या आकाराचे व नारिंगी रंगाचे, रसदार असते. फळ पूर्ण पिकल्यावर त्यात पाच ते सात बिया असतात व त्यांचे वजन फळाच्या २०-२५ टक्के एवढे असते व मगजाचे प्रमाण साधारण ४५% असते. बिया ह्या ऍसिडिक लगद्यात दाबून बसलेल्या असतात. ह्या झाडास साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
सुधारीत जातीः
• कोकण अमृताः डॉ. बा.सा.कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळयापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
• कोकण हातीसः डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाने (दापोली) ही दुसरी मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १५० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठया आकाराच्या फळामुळे या जातीची मागणी जास्त आहे.
लागवड आणि निगा:
• लागवडीसाठी मे महिन्यात ६x६ मीटर अंतरावर ६०x६०x६० सेमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळयापुर्वी चांगली माती, १ घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून सरंक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्डयात टाकावी आणि पावसाच्या सुरूवातीला प्रत्येक खड्डयात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
• विषेशतः कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते.
• कोकमामध्ये फळधारणा ५ व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
उपयोग :
• अ. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म :
कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.
उपयोग
० चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
० कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
० कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क (काढा) बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
० कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोथींबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
० अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
० अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
० पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
० हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
० हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
० हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
० रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
० कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
० कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
० शंभर ग्राम कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
ब. औषधी गुणधर्म:
१. कोकुमच्या बियांमध्ये २३-२६ टक्के तेल असते. तेलाचे प्रमाण वाढवायचे असेल तर बिया ५-६ दिवस राखेत ठेवतात त्यामुळे तेलाचे प्रमाण ४०% होते असा अनुभव आहे. बिया वाळवून उकडून उकळत्या पाण्यात टाकतात. त्यामुळे बियांतील तेल तरंगून वर येते. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. तो साठवून ठेवतात. .त्याचा उपयोग चॉकोलेट व कन्फेकशनरीत करतात.
२. थंड झाल्यावर त्याचा गोळा बनतो. हे बटर तेल टाचेच्या भेगांवर व मुरुमांवर रामबाण उपाय आहे.
३. तेलाचा उपयोग त्वचा निरोगी व तजेलदार राखण्यासाठी होतो.
४. याच्या फळांच्या सालीत Hydroxycitric acid (Hca ) हा घटक असतो. नवीन संशोधनानुसार याचा उपयोग वजन कमी करण्यास होतो. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या उतिसंवर्धन विभागात यावर बरेच संशोधन झाले आहे. सध्या पाश्चिमात्य देशात जवळ जवळ ५० टक्के लोक अति वजनाचे शिकार बनले आहेत. व तेथे हे Hca वापरून औषधी गोळ्या बनवतात व औषधी कंपन्या ते भरमसाठ किमतीत विकतात. त्यामुळे भारताला खूप परकीय चलन मिळते.
५. कोकम सरबत व आगळ बनवण्याचे छोटे उद्द्योग कोकणात खूप प्रमाणात आहेत व त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन मिळते.
क. स्वयंपाक घरातील उपयोग :
कोकमच्या फळाची गर काढलेली साल म्हणजे ओले आमसूल. ओले आमसूल साखरेत घालून ४-५ दिवस उन्हात ठेवतात व त्याचा रस म्हणजे कोकम सरबत.
गर काढलेली साल साखर न घालता रस केला कि तो आगळ या नावाने ओळखला जातो. साखर नसल्यामुळे तो मधुमेही व्यक्तींना उपयोगी असतो.
फळाची ओली साल सूर्यप्रकाशात पूर्ण व कडक वाळवली कि त्यास आमसूल म्हणतात. ह्याच्या चटणीस श्राद्धाच्या जेवणात मानाचे स्थान असते. आमसूल चिंचेच्या ऐवजी आमटीत घालतात. त्यात आंबटपणा कमी असतो. कोकमचा पल्प, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवतात.
कोकम सरबत व सोलकढी हि पेये सर्वाना आवडतात व त्याचा खप उन्हाळ्यामध्ये प्रचंड होतो. त्यामुळे परदेशी थंड पेयांचे मार्केट निम्म्यावर आले आहे व आपल्या देशाचे परकीय बाजारात जाणारे वाचत आहे.
-- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
July 22, 2021
विसाव्या शतकात स्वयंपाकघरातील मिक्सरची जागा फूड प्रोसेसरने घेतली. मिक्सरच्या मदतीने काही कामे जरूर करता येतात पण त्याला मर्यादा आहेत. त्यामुळेच पीठ मळणे, भाज्यांच्या चकत्या करणे, काही फळभाज्या किसणे, फळांचा ज्यूस करणे अशी अनेक कामे करणारे वेगवेगळ्या भांड्यांचे जोड असलेले एकच उपकरण असावे यातून फूड प्रोसेसर (अन्न संस्कारक) तयार करण्यात आला.
February 11, 2023
जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती गाडी सहजपणे पकडू शकतात. अतिशय संथ, आरामदायी असलेला हा रेल्वेप्रवास अगदी निसर्गाच्या कुशीत पोहोचतो.
ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारतातील उन्हाळा सहन करणं फारच कठीण जात असे, त्यामुळे त्यांनी भारतभरातील काही डोंगररांगांमध्ये थंड हवेची ठिकाणं शोधून तिथे टुमदार गावं बनविली. तिथपर्यंत पोहचण्याकरता नॅरो गेज रेल्वे नेली. ह्या रेल्वे बांधणीचं काम महाजिकीरीचं. बांधण्यास लागणारा कालावधी मोठा व अतिशय खर्चीक; पण या सर्व अडचणींवर ब्रिटिशांनी मात केली, कोणतंही काम अर्धवट सोडलं नाही. या सोयीमुळे सामान्य भारतीय नागरिकांनाही थंड हवेच्या जागांची गोडी लागली. यांमधील काही मार्गाना 'जागतिक वारसा' (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि आजही ही खर्चीक रेल्वे चालविली जात आहे.
सिलीगुडी - दार्जिलिंग (बंगाल), कलका - सिमला (हिमाचल प्रदेश), मदुराई-कुन्नुर उटकमंड (उदगमंडलम) (तामिळनाडू), नेरळ - माथेरान (महाराष्ट्र), असे चार प्रमुख मार्ग ब्रिटिशांनी प्रारंभी जिद्दीने बांधले. याशिवाय, भारतातील संस्थानिकांनी आपापल्या संस्थानांमध्येही नॅरोगेज व मीटरगेज मार्ग सुरू केले. बडोदा राजवाड्याची रेल्वे, मोरेना भिंड संस्थान (मध्यप्रदेश), जोगिंदरनगर (पठाणकोट), जयपूर आणि हैदराबाद ते औरंगाबाद, असे हे पाच मीटरगेज व नॅरोगेज मार्ग होते.
सन १८७८ मध्ये सिलीगुडी ते दार्जिलिंग हा ५१ मैल लांबीचा सर्पाकृती वळणं असलेला अतिशय खडतर मार्ग बांधला गेला. या बांधणीत बोगदे न बांधता वळणावळणांच्या मार्गाचा अवलंब केला गेला. या वळणांची वेटोळी ही काही ठिकाणी ५९ फूट व्यासाची आहेत आणि इथल्या प्रत्येक वळणावरून दिसणारा निसर्ग हा इतका वेगवेगळा दिसतो, की त्याची नोंद ठेवणंच कठीण आहे. चहाचे मळे, भातशेती, पाम, बांबू, ओक, फर्न, मॉसेस, चेस्टनट्स या सर्वांची विविधता, त्यांमधून डोकावणारी हिमशिखरं, असा हा एकूणच डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रवास आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या प्रवासामध्येच रवींद्रनाथ टागोरांना 'गीतांजली'तील काव्यरचना स्फुरल्या.
जगप्रसिद्ध लेखक मार्क ट्रेन याने १८९६ मध्ये दार्जिलिंगपर्यंतचा प्रवास टॉय ट्रेननं केला होता.८ तासांच्या प्रवासात हिमाच्छादित कांचनझोंगा पर्वत शिखरांचं दर्शन, ७४०७ फूट उंचीवरील 'धूम' हे नॅरो गेज मार्गावरील जगातील सर्वांत उंचीवरील स्टेशन, दोरीच्या वेटोळ्यासारखे पर्वतमाथ्यावरून दिसणारे रुळांचे वेटोळे (बटालिया लूप) हे सर्व पाहून तो अतिशय भारावून गेला. तो लिहितो, 'हा आठ तासांचा प्रवास आठ दिवसांचा असावयास हवा.' स्टीव्ह मॉकरी नावाच्या फोटोग्राफरचा रेल अॅक्रॉस द सबकॉन्टिनेंट' नावाचा भारतीय रेल्वेवरील लेख फोटोसहित नॅशनल जिओग्राफिक १९८४ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यामधील रेल्वेसंबंधी सर्वच फोटो अप्रतिम आहेत. त्यांतील ‘बटालिया लूप' हा फोटो जगप्रसिद्ध फोटोंपैकी एक आहे.
१९०३ मध्ये कलका-सिमला हा ६० मैल लांबीचा मार्ग बांधला गेला. हा मार्ग २८०० फूट उंचीवरून ७००० फुटांपर्यंत वर जातो. मार्गावर छोटे-मोठे १०३ बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी जवळपास ५ मैल भरेल.
१९०८ सालात मेटुपलम (मदुराई) ते उदकमंडलम (उटकमंड) हा २८ मैलांचा मार्ग बांधण्यात आला. १५०० फुटांवरून ७५०० फूट उंचीपर्यंत वर जाणारा हा मार्ग वर चढण्यासाठी एक कठीण मार्ग मानला जातो. या मार्गावर गाडी वर चढण्याची 'कॉगव्हिल' त-हेची पद्धत वापरली जाते. या मार्गावरील कुनुरपासून उदकमंडलम हा ब्ल्यू माउंट एक्सप्रेस प्रवास हा एक सुरेख अनुभव असतो. हा प्रवास आम्ही आवर्जून केला होता आणि आमच्यासाठी हा एक अतिशय अविस्मरणीय असा अनुभव होता.
या प्रवासात क्षितिजापर्यंत पसरलेल्या निळसर-हिरवट डोंगररांगा, रुळांच्या दोन्ही बाजूंची गर्द झाडी, मधूनच डोकावणारी लाल कौलांची घरं, असं लोभस दर्शन होत राहतं. गाडीचा वेग बेताचा असेल, तर तो दुग्धशर्करा योगच असतो इथे. निसर्गाचे विविध आविष्कार मनापासून अनुभवता येतात. वाटेतील वेलिंग्टन स्टेशन हे भारतीय सैनिकी शिक्षणाचे दक्षिणेतील महत्त्वाचे ठिकाण, त्यामुळे चढणारे व उतरणारे थोडेफार सैनिक प्लॅटफॉर्मवर दिसतात. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कोवळ्या उन्हात सैनिकांसाठी हिरव्या छताच्या बराकी, त्यामधील आखीव पांढऱ्या पट्ट्यांनी रंगविलेले रस्ते, जिप्स, ट्रक्स आणि रुबाबात फिरणारे तरणेबांड सैनिक. वातावरणात नि:स्सीम शांतता असते. आमची गाडी तर प्लॅटफॉर्मवर बराच वेळ शांतपणे उभी होती आणि क्वचितच मिळणारा एक अनुभव आमच्या गाठीशी जमा होत होता. वेलिंग्टन ते उटी हा प्रवास म्हणजे अखंड बदलत राहणारा निसर्गाचा चलतपट आहे. हा पट प्रत्येक भारतीयानं अनुभवायला हवा.
-डॉ. अविनाश वैद्य
June 30, 2022
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे बावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
पदार्थ उघडा ठेवू नये
तयार झालेला पदार्थ उघडा ठेवल्यास, भूमार्गाने येणारे झुरळ मुंगीआदि गण, आकाशमार्गाने येणारे किटक, डास, घरमाशी, कोळी इ. उपद्रवी जीव अन्न पदार्थात जाऊ शकतात. आणि अन्न विषमय होऊ शकते. किंवा उंदीर, पाल आदि जीवांची विष्ठा अन्नामधे पडू शकते. हे लक्षात असावे. नाहीतर दूषिविषाला (प्राण्यापासून निर्माण होणारा जंतुसंसर्ग, म्हणजे दूषीविष.) सामोरे जावे लागते. म्हणून आई ओरडायची. पदार्थ उघडा ठेवू नये. त्यावर झाकण घालून ठेवावे.
दुधावर फुंकर घालू नये
दुधावरची साय बाजूला करण्यासाठी पातेल्यातील दुधावर फुंकर घालू नये. साय बाजूला करताना त्यावर तोंडातील लाळ, थुंकी उडण्याची शंका असते. पुनः जन्तु संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून साय चमच्याने बाजूला करावी. यात गैर काय आहे? आजच्या भाषेत आपल्या हायजिनसाठी हे आवश्यक वाटते.
पिंपात तांब्या बुडवू नये.
तांब्याच्या तळाला लागलेला कचरा, माती पिंपात जाण्याची शक्यता असते. पिंपातील सगळेच पाणी फुकट जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन ही सूचना असते.
पातेलं खरडून वाढू नये
ज्याला मॅनर्स म्हणतात, त्यातील हा एक प्रकार आहे. पातेलं खरडून वाढताना रिकाम्या पातेल्याचा जो आवाज येतो, तो जेवणा ऱ्या च्या मनात संभ्रम निर्माण करतो, पातेल्यातील जिन्नस संपला असेल तर आपण आणखी मागायला नको, असे त्याला वाटून जेवणारा, अर्धपोटी उठू शकतो, त्याचा "अन्नदाता सुखी भव" हा आशीर्वाद मिळण्यासाठी पातेलं खरडण्याचा आवाज वाढताना होऊ नये.
काही जणांना वाटेल काय हे एवढी साधी गोष्ट कळत नाही का आम्हाला? एवढे बुद्धु आहोत का ? पण काही वेळा साध्या गोष्टी मागील मर्मच लक्षात येत नसते, त्या कोणी एका शास्त्रज्ञाने म्हणे, मोठ्या मांजराला घरातून बाहेर जाण्यासाठी एक भोक आणि लहान पिल्लांना बाहेर जाण्यासाठी वेगळे लहान भोक ठेवले होते म्हणे !
मुलांचे चालीने चालावे
मुलांचे बोलीने बोलावे
तैसे जनास सिकवावे
हळूहळू
असे समर्थ देखील म्हणतात.
ताटाच्या बाहेर सांडू नये
भूतदया असावीच, त्यांच्यासाठी चार शीते ताटाबाहेर काढूनही ठेवावीत, पण आपण जेवत असताना अन्न ताटाबाहेर पडत तर नाही ना याची काळजी देखील घ्यावी. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न द्यावा. ताटाबाहेरच नव्हे तर ताटात देखील अन्न टाकू नये. जेवढे हवे तेवढेच वाढून घ्यावे. हावरटपणाने वाढून घेऊन, नंतर ताटात टाकणे आईला पसंत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
११.०८.२०१७
August 11, 2017

लोणचं वाला च बोलना हैं क्या ?”
अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्ही सुरु होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो त्यांना मराठी येत असेल काय ?
मराठीच नव्हे तर गुजराती, तामिळ, तेलगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का ?
March 11, 2026
केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते.
July 16, 2022
साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही.
October 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti