वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर काही मोजक्या शिक्षण संस्थांनी व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचे पावित्र्य सांभाळले. मात्र बहुतांश शिक्षण संस्था म्हणजे पदव्या मिळवून देणाऱ्या ‘फॅक्टऱ्या’ बनल्या. के.जी. ते पी.जी. चे रेट फिक्स करून एकादं प्रोडक्ट विकावं तसं त्यांनी शिक्षण विकायला सुरवात केली. याचे दुष्परिणाम म्हणजे, पाण्यासारखा पैसा ओतून पदव्या मिळवाव्या लागत असल्याने पदवी घेऊन फक्त पैसे कमविण्याचाच विचार बहुतांश विद्यार्थी करतात. त्यामुळे, शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार असलेले मंदिर असते. विद्या हे दान आहे, ती काही विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, असा युक्तिवाद केला जात असला तरी, शिक्षणाचा बाजार भरवला गेलाय, हे वास्तव आहे.
येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.
आज नवरात्रीच्या ऊत्सवाचा तिसरा दिवस.दुर्गामातेच्या आजच्या रुपाचं वर्णन आणि महत्व काया आहे याची माहिती आपण घेणार आहोत.या रुपामध्ये मातेने सिंहाला आपले वाहन म्हणून निवडले असून तिचा तिसरा नेत्र सतत ऊघडा असतो ज्यामुळे दानवांचा-राक्षसांचा अत्याचार नष्ट करण्यासाठी लक्ष ठेवते. दानवांचा-राक्षसांचा नायनाट करण्यासाठी दहा शस्रांचा वापरा केलेला आहे.अर्थातच चंद्रघण्टा मातेला दहा हात आहेत.
धनुष्य,बाण,कमंडलु,तलवार,अक्षरमाला,गदा,त्रिशुळ,कमलपुष्प धारण केलेले असून भक्तांना अभय देण्यासाठी एका हाताने आशिर्वादही दिलेला आहे. चंद्रखडा,रणचंडी तसेच चंडीका या नावानेही तिला ओळखले जाते.
सुवर्णकांतिच्या माता चंद्रघण्टेच्या मस्तकावर अर्धचंद्राच्या आकाराचा मुकूट आहे.दुष्ट दानवांचा-राक्षसांचा निःप्पात करण्यासाठी सतत युध्दाच्या तयारीत ती आहे.तिच्या साधकाला दिव्य ध्वनी,अद्भुत सुगंध यांची अनुभूती येतेच.तिचा साधक हा साधनेद्वारे मिळालेल्या शक्तिमुळे वाघ-सिंहा प्रमाणे शूर,धाडसी,भय-भिती न बाळगणारा आणि विनम्र असा बनतो.बाधा,भूत,प्रेत,नकारात्मकता,मानसिक दोलायमानता नष्ट होते.साधकाचे “मणिपूर”हे महत्वाचे चक्र तिच्या ऊपासनेद्वारा जागृत होते.
जपः- पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्रकैयुता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेनि विश्रुता।।
गोकर्णी,कृण्षकमळ वा कुठलेही निळ्या रंगाचे फुल किंवा फुले आज माता चंद्रघण्टेला अर्पण करतात.आज शुक्रवार असल्यामुळे आज तिने हिरव्या वस्त्र प्रावरणांना महत्व दिले आहे.हिरवी अंगवस्त्रे आणि हिरवीच फुले माला धारण केलेल्या चार वर्षे वयाच्या कन्येची पुजा करावी असा देवीकोषात ऊल्लेख आहे.”कल्याणी”या नाव धारण केलेल्या या दुर्गारुपाची मनोभावे पूजा केल्यास धर्म आणि अर्थ प्राप्ती होते.आज तिला लोण्याचा नैवेद्य दाखवावा.असे सागितले आहे. आज तिला प्रार्थुन प्रसन्न करून घेऊ.
-- गजानन सिताराम शेपाळ
कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते. प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.
गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! )
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे.
सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!!
महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे.
वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का? शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का? आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti