वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ?
August 14, 2019
'अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच 'कॉम्प्रमाइज ' करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ''
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . अंगी लागत नाही ही समस्या सर्वत्र आहे . . अनेक रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण खाल्लेले अंगी मात्र लागत नाही . आता हे अंगी लागणे म्हणजे काय ?? तुम्ही बॅंकेत 1000 रुपये भरले की काही वेळाने तुम्हाला ते 1000 रुपये खात्यात दिसतात . . आपण काय म्हणतो ? पैसे खात्यात जमा झाले . . हाच नियम शरीराला लावा . . तुम्ही खाल्लेले अन्न त्याचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर तुमच्या शरीरावर दिसते . . लोक सुदृढ दिसतात . . 'खात्या पित्या घरातला/घरातली दिसत आहे '' हे याच प्रकारातले . . पण खाल्लेले अंगावर दिसतच नसेल तर ?? भरपूर ड्राय फ्रुट्स , ज्यूस , सलाड , कॉर्न फ्लेक्स ह्याव त्याव खाऊन पण गाडी पाप्याचं पितर असेल तर काय करावे ??
ब्लड टेस्ट्स ? सप्लिमेंट्स ?? चीज ? अरे हो . . . थांब जरा !!
शंकराचार्य म्हणतात '' जितं जगत्केन ? मनोहि येन । '' ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले . . आपली परिस्थिती उलटी आहे . . आपण जग जिंकतो पण मनाचे काय ?? ते सैराट असते . . . त्यात ना शांतता , ना समाधान , ना स्थैर्य . . . जगभरातील तत्ववेत्त्यांचे विचार डोक्यात असतात पण आचरणात शून्य . . अशा मनस्थितीत जेवण केले तर अंगी कसे लागेल भाऊ ?? आमचे आचार्य चरक म्हणतात -
''प्रसन्न चेतसा भुञ्जीत । '' म्हणजे प्रसन्न मनाने जेवावे . . .
असं होतं का ?? नाही होत . . . . जगाच्या चिंता डोक्यात घेऊन , प्रगती करणाऱ्याला चार शिव्या हासडत , घरातील कलहात डोकं आपटत केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही . त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आहारात काय ठेवू ?? हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन '' आधी प्रसन्न मन ठेव . . . मग बाकीचे बघू ''
वैयक्तिक अनुभवावरून सांगतो , जेवण करत असताना टीव्ही बंद करून , शास्त्रीय -नाट्य संगीत ते शक्य नसेल तर नामस्मरण इत्यादी केल्याने जेवण केल्याची तृप्ती येते . . ज्या दिवशी हे नाही जमत त्या दिवशी जेवण सुद्धा ' जॉब डन ' या वर्गात टिक मार्क केल्या सारखे होते . . . तुमचा काय अनुभव ??
वैद्य अंकुर रविकांत देशपांडे
9175338585
आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 16, 2017
या संपूर्ण जगामध्ये व्याप्त असणाऱ्या त्या परमात्मा चैतन्याचे स्वरूप कसे आहे ते सांगताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणताहेत,
November 13, 2020
आई जगदंबेच्या गळ्यात मंदार पुष्पांचा माळा असतात. मंदार म्हणजे पांढरी रुई. याला शास्त्रात कल्पवृक्ष म्हटले आहे. हा स्वर्गीय वृक्ष. त्याच्या फुलांच्या माळा आईच्या गळ्यात शोभून दिसत आहेत.
February 8, 2020
समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे.आज आपण समर्थांचे पहिले पत्र पाहूया ----
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||
परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||
नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||
यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||
आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||
धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||
तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||
देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||
उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||
या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||
आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||
कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||
तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||
उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||
महाराजांची समर्थ शेवटच्या ओवीत क्षमा मागून त्यांना सांगतात कि - "आपण प्रचंड राजकारणात तटले म्हणजे अडकलेले आहात त्यामुळे आपले चित्त अनेक ठिकाणी विभागले गेले आहे तरीही काहीही कारण (प्रसंग ) नसताना मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे त्या बद्दल मला क्षमा करावी " ..!
--चिंतामणी कारखानीस
March 3, 2016
टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.
September 10, 2010
आपण किती अजब वागतो… कधीतरी लक्षात घेतो का?
March 12, 2011
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना !
February 25, 2019
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.
पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:
१)गाईचे ताक:
भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.
२)म्हशीचे ताक:
दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.
३)शेळीचे ताक:
अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.
आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:
१)वातविकारात:
आंबट ताक सैंधव घालून प्यावे.
२)पित्तविकारात:
गोड ताक साखर घालून प्यावे.
३)कफविकारात:
लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 15, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 14, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti