(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सामाजिक शिष्टाचार – प्रस्तावना

    आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्‍याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्‍यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांना चांगल्या बोलण्या-वागण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

  • सामाजिक शिष्टाचार – संघभावना

    कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.

  • पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’

    राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय.

  • शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

    शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .

  • सामाजिक शिष्टाचार – सौजन्याचे दुसरे नाव लुफतान्सा

    सकारात्मक दृष्टीकोन आणि सहवेदना असेल तर कोणत्याही ठिकाणचे कर्मचारी ग्राहकांचे हित बघतील, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील. लुफतान्सा या जर्मन हवाई प्रवास कंपनीचे कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यास सगळे कर्मचारी उत्साहाने झटत असतात.

  • सीकेपी तितुका मेळवावा

    महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध  झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !!

  • सामाजिक शिष्टाचार – संस्थेची माहिती करून घेणे

    संस्थेची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय कर्मचारी संस्थेतील अंतर्गत दळणवळण नीट हाताळू शकणार नाहीत. शिवाय कुरियर असो वा पोस्टमन,ग्राहक असो वा मालपुरवठादार, सर्वांना योग्य ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करू शकतील.

  • नीट (NEET) परिक्षेच्या उत्तराची भाषा

    महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन !

  • सामाजिक शिष्टाचार- वेळेचे नियोजन व व्यवस्थापन

    प्रत्येकाने आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम होणे हे तर उत्पादकतेचं प्रमुख परिमाण आहे. आपापले काम वेळेवर पूर्ण करणे हे केवळ संस्थेच्या हिताचेच नव्हे तर आपले जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून अनेक व्याप सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा लागतो. त्यासाठी आवश्यक आहे ती कामांची क्रमवारी ठरवणे.

  • नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

    भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते.