वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कुठलंही काम जड होऊन न करता आनंदाने केल्यास ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळते. आपण केलेल्या कामाने जर आपणच समाधानी नसू तर, समोरच्या व्यक्तीकडून चांगल्या प्रतिक्रियेची आपण कशी काय अपेक्षा ठेवणार? जेव्हा आपण एखादं काम आनंदाने तसेच संपूर्ण न्यायाने पूर्ण केल्यास, प्रथम आपल्यालाच त्याचे समाधान मिळते व असे काम आपल्याला समोरच्या व्यक्तीकडूनही चांगली पोचपावती मिळवून देते.
माणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडत ते या माणसाच्या याच आवडीने … अशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता..
पुणे हे फुलांचे माहेर घर झाले.पुण्याची फुले भारतातील सर्व प्रमुख फुलं बाझारसह जगभरातील फ्लॉवर मार्केट मध्ये जाणार.या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दीड कोटी गुलाब पुष्प पुष्प प्रिमिंचे दिलं खुश करणार.व्हॅलेंटाईनडे च्या सस्नेह शुभेच्छा!
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!!
महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे.
वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का? शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का? आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे.
“इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल.
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.
संदर्भ – लोकसत्ता २३.०२.१९ . बातमी : (शीर्षक) : ‘पाणी तोडण्यांचे अधिकार मंत्र्यांना नाहीत – पृथ्वीराज चव्हाण’.
…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना !
Copyright © 2025 | Marathisrushti