(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आपले यकृत निरोगी ठेवा

    यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
    खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
    कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
    या लक्षणांकडे बघा
    * त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
    * यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
    * सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
    * पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
    * सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे.
    * दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते.
    * मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
    स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.

    जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
    जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
    * मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
    * स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
    * अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
    * ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
    * हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
    निरोगी यकृतासाठी योग्य आहार
    यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
    * शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
    * ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
    * सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
    * मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
    * कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
    * भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
    * यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
    * मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
    * दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
    * हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
    * काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. रामदास जाधव

      February 13, 2017


  • कोकणातील कातळशिल्पे

    मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

      January 17, 2023


  • बॉम्बे टू गोवा चित्रपट

    पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्या साठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता.

      March 3, 2022


  • निरंजन – भाग ९ – गुरु भक्ती

    हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु…

      December 28, 2019


  • तुकारामांच्या अभंगांचं गारूड

    तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो.

      September 1, 2022


  • मधुमेही व्यक्तीचा आहार

    मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार.

    मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्या. भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.

    स्ट्रॉबेरी हे फळ मधुमेहींसाठी सर्वात उत्तम मानावे लागेल. कारण त्यामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप असते. या फळात गोडी भरपूर असली तरी कॅलरीज्चे प्रमाण कमी असते आणि कर्बोदकेही मर्यादित असतात. तेव्हा ब्रेकफास्टच्या वेळी चार स्ट्रॉबेरीज् खाल्ल्या तरी लगेच काही शुगर वाढत नाही.

    मधुमेही व्यक्ती चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. उदा. मासे आणि चिकन. मांसाहार करताना मधुमेही व्यक्तीने प्राण्यांच्या शरीराचे विशेष भाग आवर्जून मागितले पाहिजेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 8, 2017


  • साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

    काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी त्या सर्वाना सांगितले.

      January 17, 2017


  • जागतिक चहा दिन (१५ डिसेंबर)

    पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
    चहाची कथा
    चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
    जागतिक चहा दिना निमित्ताने
    जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो... मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील.
    केस चमकदार राहतात.
    ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.
    ग्रीन टीचा वापर कसा करावा.
    केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
    जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात. डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
    सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी बॅ्ग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल. चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात. जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही. जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
    कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील. चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 30, 2016


  • ज्ञात अज्ञात पंढरपूर २ – समस्त कलगीवाले थोरली तालिम

    पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे समस्त कलगीवाले थोरली तालिम हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा. पंढरीत गुणवंत मल्लाची खाण होती, आहे त्यांना घडविण्याचे कार्य या तालिमीने केले.

      July 23, 2020


  • न्यायदानाची बिकट वाट

    जेव्हा लिखित कायदेच अस्तित्वात नव्हते आणि न्यायाची सर्वसाधारण तत्त्वे फत्त* लक्षात घेऊन न्याय करावयाचा होता, तेव्हा एका अर्थाने न्यायाधीशाचे काम सोपे तर दुसऱ्या अर्थाने अवघड होते. सोपे यासाठी की त्याच्या न्यायबुद्धीला भरपूर स्वातंत्र्य होते. संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यावे, पक्षकारांच्या हक्कांचा आजवरच्या परंपराच्या आधारांवर निर्णय करावा, जेथे धर्माचा संबंध असेल तेथे त्या धर्मातील ढोबळ नियमांची माहिती करून घेऊन त्याआधारे निर्णय द्यावा, एवढीच न्यायाधीशाची जबाबदारी होती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कायदे तयार केले आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे न्यायाधीशांना न्याय करावा लागू लागला. भारतीय दंडसंहिता, दिवाणी कामे चालविण्याच्या रीतीचा कायदा, फौजदारी कामे चालविण्याच्या रीतीचा कायदा, पुराव्याचा कायदा, संपत्ती हस्तांतरणाचा कायदा असे महत्वाचे कायदे तयार झाले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय न्यायालयात जे खटले होते त्यातील बहुसंख्य खटले तीन-चार प्रमुख प्रकाराचेच होते. सावकारी होती. त्यामुळे गहाण सोडविण्याचे किवा गहाण मालमत्ता विक्री करून कर्जफेड करण्याचे दावे होते. भावाभावांचे वंशपरंपरागत आलेल्या संपत्तीच्या वाटपाचे दावे होते. जमिनीच्या हस्तांतरणाबद्दलचे करारभंगाचे, विकलेल्या संपत्तीच्या निश्चित व्याप्तीचे दावे होते. क्वचित गावातील मुखंडांना असलेल्या मानपानाचे दावे होत. बहुसंख्य दाव्यांचे स्वरूप सामान्यत: हेच असे.

    गेल्या 50-60 वर्षांत कायद्यांची संख्या प्रचंड वाढली. समाजव्यवस्थेच्या मुळाशी जाणारे हिदू कायदे आणि कुळ कायदे झाले. आजवर परंपरेने चालत आलेले व्यक्ती व्यक्तीतील संबंध या कायद्यांनी बदलले. एक नवी सामाजिक फेररचना या कायद्यांनी आणली. न्यायालयांना यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागली. विविध स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या. त्यांच्या निवडणुकांसाठी नियम झाले. या संस्थांत काम करण्याच्या स्वाभाविक इच्छेबरोबरच नव्या व्यवस्थेतील सन्मानाच्या जागा, असेही यातील पदांना महत्त्व प्राप्त झाले. साहजिकच या निवडणुका आणि विधिमंडळाच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या, ईर्ष्येच्या, संघर्षाच्या आणि त्यातून आपोआप निर्माण होणाऱ्या तेढीच्या विषय झाल्या. सहकारी संस्थांचा जन्म सर्वसामान्य माणसाची पत वाढावी, परस्परांच्या सहकार्यामुळे सामुदायिक पत निर्माण व्हावी आणि गरीब माणसाला मदत व्हावी यासाठी झाला. पुढे या संस्था सामर्थ्याची केंद्रे बनली. त्यांचा ताबा आपल्या हाती असावा म्हणून स्पर्धा सुरू झाली व त्याचीही परिणती समाजातील कटुता वाढवण्यात झाली. अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी हे नवे सावकार झाले. शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्था असाव्या लागतात. अशा संस्थांचा उद्देश पूर्वी शिक्षणाचा सर्व वर्गात प्रसार करणे आणि अगदी दूरच्या भागातसुद्धा शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे हा होता. परंतु अलीकडील काळात शिक्षण संस्था हे राजकीय सत्ताकेंद्र बनले आणि त्याचबरोबर काहींनी तरी त्याला पैसे मिळविण्याचे साधन बनवले.

    समाजातील हे जे संस्थात्मक बदल झाले, त्यातून मोठ्या प्रमाणात न्यायालयीन तंटे उभे राहिले. काही प्रत्यक्ष होते आणि काही अप्रत्यक्ष होते. या संस्थांची प्रकरणे होती. तसेच या संस्थांमधून निर्माण झालेल्या वादाने किवा तेढीने इतर अनेक प्रकरणांना जन्म दिला होता. या सर्व कारणांनी न्यायालयांच्या समोर येणाऱ्या प्रकरणांत बेसुमार वाढ झाली. कायद्यांची वाढती संख्या आणि वाढती लोकसंख्या यांनी त्यात भर टाकली होतीच. परिणामत: न्यायव्यवस्थेवरचा ताण वाढला आणि खटले तुंबून राहू लागले. बहुतेक तालुक्याच्या गावी एक प्राथमिक न्यायालय पूर्वी असे. काही तालुक्यांत काम कमी असल्यामुळे दोन तालुक्यांना एकच न्यायालय असे. आज तालुक्यांची संख्या वाढवली गेली तरीही न्यायालयातील प्रकरणांची संख्या अनेक ठिकाणी न झेपणारी झाली आहे.

    दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आवश्यक आहे. एक तर न्यायाधीशांना ज्या सेवाशर्ती असत त्या फारशा आकर्षक नव्हत्या. चांगल्या वकिलांचे उत्पन्न केव्हाही न्यायाधीशाच्या पगारापेक्षा जास्त असणार हे उघड आहे. परंतु न्यायाधीशाचा पगार त्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा असावा हे तर पाहिले पाहिजेच. समाजातील बुद्धिमान मुलांना डॉक्टर आणि इंजिनीअर यासारख्या व्यवसायाकडे जाणे पालक भाग पाडीत होते. वकिलीत बुद्धिमान मुले येण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यातच या अनाकर्षक सेवाशताची भर. याचा परिणाम न्यायाधीश पदासाठी योग्य व्यक्ती कमी उपलब्ध होण्यावर झाला. गेल्या काही दिवसांत न्यायाधीशांचे पगार व सेवाशर्ती या दोन्हींत चांगले बदल झाले आणि आता इतर व्यवसायाप्रमाणेच या क्षेत्राकडे हुशार तरुण आकर्षित होतील, अशी अपेक्षा आहे. न्यायाधीशांच्या कामावर परिणाम करणारी आणखीही एक गोष्ट म्हणजे समाजाची आजची स्थिती. समाजात विविध कारणांसाठी जे तणाव आज आहेत त्या तणावांचा अप्रत्यक्ष परिणाम न्यायाधीशाच्या कामकाजावर जरूर होतो. आपण जे काम करतो त्याविषयी सर्वांना विश्वास आहे ही जाणीव न्यायाधीशाचा मोठा आधार असते. इतर सर्व अडचणींवर मात करण्यासाठी न्यायाधीशाला या विश्वासाची मदत होते. आज समाजातील विविध घटकांत अविश्वासाचे वातावरण आहे. त्यातच भ्रष्टाचारासारख्या दुर्गुणाने समाजव्यवस्था पोखरून टाकली आहे. काळ असा आहे की, कोणी चांगला आहे यापेक्षा तो वाईट आहे, यावर विश्वास ठेवणे लोकांना सोपे वाटते. या स्थितीचा प्रचंड ताण चांगल्या न्यायाधीशावरसुद्धा असतो.

    एखाद्या न्यायाधीशाने चांगला निकाल दिला तर त्याचे श्रेय न्यायाधीशाप्रमाणेच त्याच्यासमोर बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही असते. आपापल्या पक्षकाराची बाजू मांडण्याच्या निमित्ताने कायद्याच्या तरतुदींचा विशेष अभ्यास करून न्यायाधीशाला योग्य निन्यायाधीशाला आपले काम चांगले करता यावे यासाठी कायद्याचा अभ्यास, संतुलित मनाने दोन्ही बाजू समजून घेण्याची तयारी, सचोटी आणि माणसाच्या मनाचे चांगले ज्ञान असावे लागते. आजचा समाज कसा चालला आहे, हे त्याला जेवढे समजते त्यावर त्याने दिलेल्या न्यायाचा कसही अवलंबून असतो. मी वकिलीला प्रारंभ केला त्यावेळी तात्पुरत्या मनाई हुकूमाबाबतचे एक अपील मजकडे आले. असे प्रकरण किरकोळ समजले जात असले तरी त्यात मोठी जमीन गुंतलेली होती. माझा पक्षकार एका जमिनीचा कूळ असल्याचा दावा करत होता. प्रतिवादीसुद्धा त्याच जमिनीचे आपण कूळ आहोत असे सांगत होता. रस्त्याच्या लगतचे उत्तम उत्पन्न देणारी जमीन दोन श्रीमंतांच्या संघर्षाचा विषय बनली होती. दोघेही स्वत:ला कूळ म्हणवत होते. माझी बाजू अधिक मजबूत आहे, असे मला वाटत होते. कारण माझा पक्षकार त्या जमिनीचा कूळ आहे असे शपथपत्र खुद्द जमिनीच्या मालकानेच दाखल केले होते. तो आपला हुकूमाचा एक्का आहे असे मला वाटत होते. अपिलाची सुनावणी सुरू झाली. मी आपले विवेचन करू लागलो व मालकाच्या शपथपत्रावर विशेष जोर देऊ लागलो. तोच न्यायाधीशांनी मला थांबविले. ते म्हणाले की, मालकाने तुमच्या बाजूने शपथपत्र दिले याचा अर्थच असा की तुम्ही खरे कूळ नाही. जो खरा कूळ आहे त्याला काढून टाकण्यासाठी तुमच्या पक्षकाराला उभे करून मालकाने त्याच्याशी संगनमत केलेले असले पाहिजे. खऱ्या कुळाच्या बाजूने मालक कधीही उभा राहत नसतो. आमच्या ताब्याचा पुरावाही अगदी नजीकच्या काळात तयार झालेला दिसत होता. निकाल आमच्याविरुद्ध लागला, हे सांगण्याची गरज नाही. तोंडी पुरावा असो अगर लेखी, त्याच्या छाननीत न्यायाधीशाच्या समजशत्त*ीप्रमाणेच त्याच्या सर्वसाधारण सामान्यज्ञानाचेही महत्त्व असते. आजच्या काळात अविश्वसनीय वाटेल असा एक प्रसंग माझ्या स्मरणात आहे. एका वकिलाने पूर्वीच भांडण चालू असणारी जमीन अगदीच कमी किमतीत विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी आपल्या बायकोच्या नावाची एक इसारपावती त्याने पूर्वीच्या तारखेची तयार केली होती. भांडणातील इतर पक्षकारांच्या खरेदी ठरावापूर्वी आपण ती जमीन खरेदी करण्याचा ठराव केला होता, असे त्याला दाखवायचे होते. हे प्रकरण सुनावणीसाठी ज्या दिवशी होते त्या दिवशी त्याच वकीलसाहेबांच्या घरी काही धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवण होते. जेवणाला गावातले सर्व न्यायाधीश आणि महत्त्वाचे वकील हजर होते. जेवण 10 वाजता संपले. साडेदहा वाजता कोर्ट सुरू होई. ज्यांच्यासमोर खटला होता ते न्यायाधीशही जेवणाला हजर होते. आपल्यासमोर त्याच वकिलांचा व्यक्तीगत खटला आहे, तेव्हा जेवायला जाऊ नये असे त्यांना वाटले नाही. कोर्टात पहिली केस तीच होती. सुनावणी सुरू झाल्याबरोबर पाच मिनिटांत न्यायाधीशांनी त्या वकिलांना सांगितले, 'तुम्ही दाखल केलेली इसारपावती खोटी आहे असे माझे मत झाले आहे. तुम्ही हे प्रकरण तासाभराच्या आत काढून घ्या. अन्यथा मी खोटी इसारपावती केल्याबद्दल तुमच्याविरुद्ध खटला भरावा असा आदेश देणार आहे.' न्यायाधीशांचा हा अवतार पाहून सर्व न्यायालय चकित झाले. पण मनोमन कोठेतरी सर्वांनाच आनंद झाला. छोट्याशा गावात लग्नासारख्या समारंभात न्यायाधीशांना वकिलांच्या घरी जावे लागते. परंतु त्याचा काहीही परिणाम आपण देत असलेल्या निकालावर होणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागते.

    आज एखादा न्यायाधीश नि:स्पृह असेल तरीही त्याच्याकडून आपण हमखास काम करून घेतो अशी बढाई मारणारे निर्माण झाले आहेत. त्यांच्यापासून सावध राहणे ही कठीण करामत असते. कित्येक वेळा आपल्या अपरोक्ष कोण पक्षकारांना काय सांगतो, याचा अंदाजच बांधता येत नाही. समाजाच्या आशा ज्या न्यायव्यवस्थेवर अद्याप तरी टिकून आहेत त्या व्यवस्थेतील प्रमुखांचे काम अवघड झाले आहे.

      June 5, 2010